विशेष

‘मायमराठी’चीच दैनाः दहावीच्या परीक्षेत मराठी मातृभाषा असलेले तब्बल ९४ हजार ५४४ विद्यार्थी मराठी विषयातच नापास!
महाराष्ट्र, विशेष

‘मायमराठी’चीच दैनाः दहावीच्या परीक्षेत मराठी मातृभाषा असलेले तब्बल ९४ हजार ५४४ विद्यार्थी मराठी विषयातच नापास!

पुणेः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा निकाल मंडळामार्फत जाहीर करण्यात आला असून या परीक्षेत मराठी मातृभाषा असलेले तब्बल ९४ हजार ५४४ विद्यार्थी मराठी विषयाच्याच पेपरमध्ये नापास झाले आहेत. ही आकडेवारी धक्कादायक असून मराठी भाषेच्या अध्यापन प्रक्रियेवरच त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. या परीक्षेत राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ५५ हजार ०२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ४२ हजार ४७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उतीर्णतेची टक्केवारी ९२.०९ इतकी आहे. या परीक्षेत एकूण ३५ विषयांपैकी १२ ...
अनुदानित महाविद्यालयांचे खासगी विद्यापीठात रुपांतर: बहुजन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक’?
अभिव्यक्ती, विशेष

अनुदानित महाविद्यालयांचे खासगी विद्यापीठात रुपांतर: बहुजन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक’?

महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाचा पाया हा 'अनुदानित' व्यवस्थेवर उभा आहे. या व्यवस्थेमुळेच आज शेतमजुराचा मुलगा आणि आदिवासी पाड्यावरील मुलगी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करू शकत आहे. जर महाराष्ट्रातील अनुदानित महाविद्यालये खासगी विद्यापीठांमध्ये रुपांतरित झाली, तर भविष्यात दलित, आदिवासी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जाऊ शकतो. हा केवळ शैक्षणिक बदल नसून संविधानाच्या अनुच्छेद १५ आणि १६ वर केलेला थेट हल्ला आहे. अनुदानित महाविद्यालयांची खासगी विद्यापीठे करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणावर विशेष लेख.... -प्रा. डॉ. सतीश डी. गावित, अधिसभा सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद). महाराष्ट्र राज्याच्या उच्च शिक्षण क्षेत्रात सध्या एका धोरणात्मक बदलाची जोरदार चर्चा सुरू आहे. राज्यातील अनुदानित महाविद्यालयांचे रूपांतर खासगी विद्यापीठांमध्ये क...
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, महाराष्ट्र सरकार देणार डॉक्टरेट करणाऱ्या १० संशोधक छात्रांना शिष्यवृत्ती
दुनिया, महाराष्ट्र, विशेष

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, महाराष्ट्र सरकार देणार डॉक्टरेट करणाऱ्या १० संशोधक छात्रांना शिष्यवृत्ती

मुंबईः भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने प्रख्यात अशा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स संस्थेत अध्यासन स्थापनेचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. या अध्यासनाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने डॉक्टरेटसाठी शिष्यवृत्तीही देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आंतरराष्ट्रीयस्तरावर पोहोचावे, त्यांच्या विचारांवर आधारित सामाजिक न्याय, संविधानिक लोकशाही, आर्थिक समता आणि मानवी हक्कांच्या अभ्यासासाठी जागतिक दर्जाचे संशोधन केंद्र निर्माण करणे, हा अध्यासन स्थापन करण्यामागील उद्देश आहे. अध्यासनात़ संविधान आणि लोकशाही, सामाजिक समता, आर्थिक लोकशा...
राज्यातील अनुदानित महाविद्यालयांचे खासगी विद्यापीठात रुपांतर करण्याचा शिक्षण सम्राटांचा डाव, धोरण निश्चितीसाठी सरकारने स्थापन केली उच्चस्तरीय समिती
महाराष्ट्र, विशेष

राज्यातील अनुदानित महाविद्यालयांचे खासगी विद्यापीठात रुपांतर करण्याचा शिक्षण सम्राटांचा डाव, धोरण निश्चितीसाठी सरकारने स्थापन केली उच्चस्तरीय समिती

मुंबईः सरकारी जमिनी आणि सरकारी अनुदानांवर गल्लेलठ्ठ झालेल्या राज्यातील शिक्षण संस्थांनी अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे खासगी विद्यापीठांत रुपांतर करण्याचा घाट घातला असून या मार्ग सुकर करून घेण्यासाठी या शिक्षण संस्थांनी राज्य सरकारवर दबाब वाढवला आहे. त्यामुळे राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे खासगी विद्यापीठांत रुपांतर करण्याबाबत धोरण निश्चित करण्यासाठी चार सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या महाविद्यालयांचे खासगी विद्यापीठांत रुपांतर झाल्यास उच्च शिक्षण घेणे बहुजन विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची आणि या महाविद्यालयांत कार्यरत असलेल्या लाखो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे भवितव्य असुरक्षिततेच्या खाईत लोटले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना माफक दरात उच्च शिक्षण घेणे सोयीचे व्हावे म्हणून राज्य सर...
भाजप नेते नितीन पाटील यांच्या हतूरच्या राष्ट्रीय महाविद्यालयातून लीक झाला बी. कॉम.चा पेपर, कुलगुरू गुन्हा दाखल करू म्हणतात; पण तसे होणार का?
महाराष्ट्र, विशेष

भाजप नेते नितीन पाटील यांच्या हतूरच्या राष्ट्रीय महाविद्यालयातून लीक झाला बी. कॉम.चा पेपर, कुलगुरू गुन्हा दाखल करू म्हणतात; पण तसे होणार का?

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.कॉम. परीक्षेत प्रश्नपत्रिका लीक करून व्हायरल केल्याचा प्रकार छज्ञपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातील हातनूरच्या राष्ट्रीय कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या केंद्रावर घडल्याचे उघडकीस आले आहे. हे महाविद्यालय राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे असून भाजप नेते नितीन पाटील हे त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. पेपर लिक करून होत्याचे नव्हते करण्यात भाजपचे नेतेच आघाडीवर असल्याचे आरोप अनेकदा झालेले आहेत. आता मराठवड्यातील हा पेपर घोटाळा उघडकीस आला आहे. आता हे परीक्षा केंद्र कायमस्वरूपी तात्काळ रद्द करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी दिले आहेत, अशी माहिती परीक्षा मंडळ संचालक डॉ. बी. एन. डोळे यांनी दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीए, बीकॉम व बीएस्सी या पदवी अभ्यासक्रमाच्या ...
घुसमट झाली तर राजीनामा देऊन बाहेर पडेनः डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीतील ‘संघदक्ष’तेवर समिती सदस्य प्रा. ऋषीकेश कांबळे यांची भूमिका
महाराष्ट्र, विशेष

घुसमट झाली तर राजीनामा देऊन बाहेर पडेनः डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीतील ‘संघदक्ष’तेवर समिती सदस्य प्रा. ऋषीकेश कांबळे यांची भूमिका

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीवर फडणवीस सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीच संबंधित कार्यकर्त्यांचा भरणा केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून या समितीत डॉ. आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचा पुरस्कार करणारे विचारवंत/अभ्यासकांऐवजी संघाशी ‘समरस’ असलेल्या कार्यकर्त्यांच्या खोगीर भरतीवर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. या समितीचे सदस्य आणि प्रसिद्ध आंबेडकरी साहित्यिक/विचारवंत प्रा. डॉ. ऋषीकेश कांबळे यांनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे. भीम जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १३ एप्रिल रोजी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शासन निर्णयाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे पुनर्गठन केले आहे. या पुनर्गठनात छत्रपती संभाजीनगरचे प्रा. डॉ. ऋषीकेश कांबळे आणि नागपूरचे डॉ. प्रदीप आगलावे हे दोघे वगळता उर्वरित सर्वच्या सर्...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीत ‘संघाचा ऍनाकोंडा’, दोन सदस्य वगळता उर्वरित १६ सदस्य समरसून ‘संघदक्ष’, वाचा एकेकाची संपूर्ण कुंडली!
देश, महाराष्ट्र, विशेष

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीत ‘संघाचा ऍनाकोंडा’, दोन सदस्य वगळता उर्वरित १६ सदस्य समरसून ‘संघदक्ष’, वाचा एकेकाची संपूर्ण कुंडली!

मुंबईः महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे पुनर्गठन केले असून या पुनर्गठनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वज्ञानाचा पुरस्कार करणारे विचारवंत, अभ्यासकांऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) निष्ठा असणाऱ्या व्यक्तींचीच खोगीर भरती करण्यात आली आहे. संघाशी ‘समरस’ असलेल्या कार्यकर्त्यांचाच भरणा  झाल्यामुळे ही पुनर्गठित समिती वादाच्या भोवऱ्यात सापडली असून ती बरखास्त करण्याची मागणी केली जात आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे १३ एप्रिल रोजी एका शासन निर्णयाद्वारे पुनर्गठन केले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री उपाध्यक्ष, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव/प्रधान सचिव हे सदस्य सचिव, उच्च शिक्षण संच...
‘एबीव्हीपी ही कुत्र्यांचीच संघटना…परत एकदा सांगतो..कुत्र्यांचीच संघटना…रेकॉर्ड करून पाठवू का तुला?’ जेईएसचे प्राचार्य डॉ. गणेश अग्नीहोत्री यांची वादग्रस्त क्लिप
देश, महाराष्ट्र, विशेष

‘एबीव्हीपी ही कुत्र्यांचीच संघटना…परत एकदा सांगतो..कुत्र्यांचीच संघटना…रेकॉर्ड करून पाठवू का तुला?’ जेईएसचे प्राचार्य डॉ. गणेश अग्नीहोत्री यांची वादग्रस्त क्लिप

जालनाः जालना येथील जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्नीहोत्री यांनी मोठ्या ‘आत्मविश्वासा’ने आणि ‘धाडसा’ने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) विद्यार्थी आघाडी असलेली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी/अभाविप) ही ‘कुत्र्यांचीच संघटना’ असल्याचे ‘प्रशस्तीपत्र’ देऊन नवा वाद ओढवून घेतला आहे. विशेष म्हणजे स्वतःला आरएसएसचा ‘निष्ठावान स्वयंसेवक’ असल्याचे सांगत फिरणाऱ्या प्राचार्य अग्नीहोत्री यांनीच अभाविपबाबत असे विधान केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ११ एप्रिल रोजी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी जेईएस महाविद्यालयाच्या प्रांगणात पक्षीमित्र अभियानाचे आयोजन केले होते. उन्हाळा असल्यामुळे झाडांवर पक्षांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था करण्याच्या हेतूने हे अभियान आयोजित करण्यात आले होते. या अभियानाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. गणेश अग्नीहोत्री यांच्या हस्ते करावे या हेतूने अभाविपचे जालना जिल्...
‘कायम विनाअनुदानित’ विषयाच्या प्राध्यापकाला विद्यापीठाने दिली १०० टक्के अनुदानित सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून मान्यता, सहसंचालकांनीही…
महाराष्ट्र, विशेष

‘कायम विनाअनुदानित’ विषयाच्या प्राध्यापकाला विद्यापीठाने दिली १०० टक्के अनुदानित सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून मान्यता, सहसंचालकांनीही…

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): अशासकीय अनुदानित महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी अनुदानित तुकडी किंवा विषयाच्या प्राध्यापकाचीच सेवा ज्येष्ठतेनुसार नियुक्ती करावी, असे महाराष्ट्र शासनाचे धोरण आणि नियम असताना जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथील १०० टक्के अनुदानित सिद्धार्थ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी त्याच महाविद्यालयात कार्यरत असलेल्या कायम विनाअनुदानित विषयाच्या प्राध्यापकाचीच नियुक्ती करण्यात आल्याचे आणि या नियुक्तीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मान्यताही दिल्याचे धक्कादायक प्रकरण न्यूजटाऊनच्या हाती आले आहे. ‘थोर शिक्षण महर्षि’ दादासाहेब उर्फ जनार्दन म्हस्के हे सिल्लोड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत तर त्यांचे पुत्र डॉ. राहुल म्हस्के हे संस्थेचे सचिव आहे. या संस्थेचे जाफ्राबाद येथे सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे. १९९१ मध्ये स्थापन झालेले हे म...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्रा. डॉ. वाल्मिक सरवदे यांचा तडकाफडकी राजीनामा, ‘हार्डकोअर स्वयंसेवका’साठी पद करून घेतले रिकामे?
महाराष्ट्र, विशेष

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्रा. डॉ. वाल्मिक सरवदे यांचा तडकाफडकी राजीनामा, ‘हार्डकोअर स्वयंसेवका’साठी पद करून घेतले रिकामे?

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्रा. डॉ. वाल्मिक सरवदे यांनी आपल्या पदाचा आज तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे विद्यापीठ वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, प्रा. डॉ. सरवदे यांची मुंबई विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रात प्रोफेसरपदी निवड झाली असून ते उद्या मंगळवारी तेथील पदभार स्वीकारणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी २९ जानेवारी २०२४ रोजी प्रा. डॉ. वाल्मिक सरवदे यांची प्रभारी प्रकुलगुरूपदी नियुक्ती केली होती. या नियुक्तीला ४८ तास उलटण्याच्या आधीच डॉ. फुलारी यांनी त्यांचा कार्यभार काढून घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे विद्यापीठ वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. कुलगुरू फुलारींच्या या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगरातील आंबेडकरी चळवळीत असंतोष उफाळून आला होता. १० फेब्रुवारी २०२४...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!