साय-टेक

वीज जाते आणि येते…मध्ये काय घडते?
महाराष्ट्र, साय-टेक

वीज जाते आणि येते…मध्ये काय घडते?

पावसाळ्याच्या सुरुवातीला वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार जास्त होतात. वीजपुरवठा खंडित झाला की, आपण वीज वितरण कंपनीला दोष देऊन मोकळे होतो. वीज का गेली, का जाते, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहीत नसते. तसेच वीज जाते आणि येते, या मधल्या काळात काय घडते, हे जाणून घेण्याची गरज आहे… -ज्ञानेश्वर आर्दड, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, छत्रपती संभाजीनगर परिमंडल, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, छत्रपती संभाजीनगर परिमंडल. पावसाळा आणि वीजपुरवठा यांचे नाते सर्वांनीच गृहित धरलेले असते. अर्थात, विजेशिवाय जगण्याची कल्पनाच करणे शक्य नाही, इतके तिचे महत्त्व वाढलेले आहे. त्यामुळे वीज गेली की, आपल्या संतापाचा पारा चढतो. परंतु वीज जाते, हे वास्तव आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार जास्त होतात. वीजपुरवठा खंडित झाला की, आपण वीज वितरण कंपनीला दोष देऊन मोकळे होतो. दुसऱ्या दिवशी त्याची बातमी...
विधिमंडळ अधिवेशन काळात विधानभवनातील प्रवेशासाठी डिजिटल फेस रेकग्निशन प्रणालीचा वापर अनिवार्य
महाराष्ट्र, साय-टेक

विधिमंडळ अधिवेशन काळात विधानभवनातील प्रवेशासाठी डिजिटल फेस रेकग्निशन प्रणालीचा वापर अनिवार्य

मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून प्रारंभ झाला असून विधान भवनातील प्रवेश व्यवस्था अधिक सुरक्षित व सुलभ करण्यासाठी डिजिटल फेस रेकग्निशन (चेहरा पडताळणी) प्रणाली लागू करण्यात आली आहे, याबाबतची घोषणा विधानपरिषदेत सभापती प्रा. राम शिंदे यांनी, तर विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केली. या नव्या प्रणालीअंतर्गत लोकप्रतिनिधी, आमदार, अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांच्या चेहऱ्याची डिजिटल नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना विधान भवनात प्रवेशासाठी स्वतंत्र ओळखपत्र पडताळणीची आवश्यकता भासणार नसून फेस रेकग्निशनद्वारे जलद प्रवेश मिळणार आहे. सर्व विधिमंडळ सदस्य, अधिकारी- कर्मचारी आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी फेस रेकग्निशनसाठी तातडीने नोंदणी करणे आवश्यक आहे. विधिमंडळाच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने हा महत...
यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस, जून महिन्यात कमी पाऊस आणि उष्णतेच्या लाटा तीव्र; हवामान विभागाच्या ताज्या अंदाजामुळे खरिपाची शेती संकटात!
देश, साय-टेक

यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस, जून महिन्यात कमी पाऊस आणि उष्णतेच्या लाटा तीव्र; हवामान विभागाच्या ताज्या अंदाजामुळे खरिपाची शेती संकटात!

नवी दिल्लीः भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) शुक्रवारी यंदाच्या मोसमासाठीचा सुधारित दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. या अंदाजानुसार यंदा जून महिन्यात एल निनो सक्रीय होणार असल्यामुळे यंदाच्या मोसमात सरासरीच्या ९० टक्केच पाऊस होण्याची शक्यता आहे. नेहमीपेक्षा कमी पावसाच्या शक्यतेमुळे शेतीवर मोठा परिणाम होणार असून त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच सर्वांचीच चिंता वाढली आहे. आयएमडीच्या या अंदाजानुसार यंदा जून महिन्यांतच एल निनो सक्रीय होईल आणि हळूहळू एल निनोचा प्रभाव वाढत जाईल. परिणामी जून महिन्यात नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात उष्णतेच्या लाटा तीव्र राहण्याची शक्यता आहे. एल निनोच्या सावटामुळे जून ते सप्टेंबरदरम्यान नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीच्या ९० टक्के होण्याची शक्यता आहे. या अंदाजामध्ये चार टक्के कमी-अधिक परिणाम दिसून येऊ शकतो. याचा अर्थ २०२६ च्या मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) संपूर्ण देशात सरासरीपेक्षा ...
जागतिक थायरॉईड दिन विशेषः जाणून घ्या थायरॉईड नोड्यूल अर्थात थायरॉईड ग्रंथीमधील गाठींची लक्षणे, निदान आणि उपचाराची पद्धती
जीवनशैली, साय-टेक

जागतिक थायरॉईड दिन विशेषः जाणून घ्या थायरॉईड नोड्यूल अर्थात थायरॉईड ग्रंथीमधील गाठींची लक्षणे, निदान आणि उपचाराची पद्धती

जागतिक आरोग्य समुदायाकडून मानवी शरीरातील थायरॉईड ग्रंथीचे महत्व, या ग्रंथीचे आजार आणि त्यावरील उपचारांविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २५ मे रोजी जागतिक थायरॉईड दिन साजरा केला जातो. या वर्षीच्या जागतिक थायरॉईड दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरातील प्रख्यात कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. स्नेहा डोंगरदिवे यांचा हा विशेष लेख... डॉ. स्नेहा डोंगरदिवे (कान, नाक, घसा तज्ज्ञ) दरवर्षी २५ मे रोजी जागतिक थायरॉईड दिन साजरा केला जातो. थायरॉईड ग्रंथीचे आरोग्य, तिचे शरिरातील महत्व आणि थायरॉईडच्या आजारांविषयी समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या मुख्य उद्देशाने जागतिक थायरॉइड दिन साजरा केला जातो. अनेकदा दुर्लक्षित केली जाणारी थायरॉईड ही शरिराची मुख्य नियामक ग्रंथी आहे. जी तुमच्या ऊर्जेची पातळी आणि वजनापासून ते तुमच्या मनःस्थिती आणि ह्रदयाच्या ठोक्यांपर्यंत सर्व गोष्टींवर प्रभाव टाकते. भारतात...
केईएम रुग्णालयात अत्याधुनिक ‘व्हेसल सीलर’ उपकरणांची उपलब्धता, शस्त्रक्रियांची अचूकता आणि सुरक्षितताही वाढणार
महाराष्ट्र, साय-टेक

केईएम रुग्णालयात अत्याधुनिक ‘व्हेसल सीलर’ उपकरणांची उपलब्धता, शस्त्रक्रियांची अचूकता आणि सुरक्षितताही वाढणार

मुंबई: राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि सर्वसामान्यांना दर्जेदार उपचार मिळावेत या उद्देशाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबईतील सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पीटल येथे अत्याधुनिक ‘हाय-एंड व्हेसल सीलर’ (Vessel Sealer) उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली असून, यामुळे शस्त्रक्रियांच्या गुणवत्तेत मोठी सुधारणा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा मिळणार आहेत. या सीएसआर प्रकल्पांतर्गत दोन प्रगत इलेक्ट्रोसर्जिकल युनिट्स जनरल सर्जरी विभागासाठी ‘इलेक्टिव्ह सर्जरी ओटी’ जमेशदजी मेहता शस्त्रक्रिया कक्षामध्ये बसवण्यात आले आहेत. केईएम रुग्णालय हे मुंबईतील सर्वात मोठ्या सार्वजनिक आरोग्य संस्थांपैकी एक असून येथे दररोज हजारो गरजू रुग्ण उपचारासाठी येतात. अ...
सुरक्षित ऑनलाईन आर्थिक व्यवहार कसे करायचे? रिझर्व्ह बँकेचे सहायक महाव्यवस्थापक पंकज बच्छाव यांनी सांगितल्या ‘या’ टिप्स
देश, साय-टेक

सुरक्षित ऑनलाईन आर्थिक व्यवहार कसे करायचे? रिझर्व्ह बँकेचे सहायक महाव्यवस्थापक पंकज बच्छाव यांनी सांगितल्या ‘या’ टिप्स

मुंबई:  सध्याच्या काळात ऑनलाईन आर्थिक व्यवहारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून ऑनलाईन आर्थिक व्यवहारांतील अपप्रकाराच्या, फसवणुकीच्या घटनांमध्येही  वाढ होताना दिसत आहे. अशा प्रकारचे आर्थिक नुकसानीचे गैरप्रकार टाळण्यासाठी ग्राहकांनी ऑनलाईन आर्थिक व्यवहारात खबरदारी घेत सर्तकतेने सुरक्षित व्यवहार करणे गरजेचे असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहायक महाव्यवस्थापक पंकज बच्छाव यांनी सांगितले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्या वतीने मंत्रालयात आयोजित 'आर्थिक व्यवहाराविषयी जनजागृती’ सत्रात बच्छाव बोलत होते. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक गोविंद अंहकारी, रिझर्व्ह बँकेच्या व्यवस्थापक शिल्पा छेडा यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. खबरदारी घेतल्यास ऑनलाईन आर्थिक व्यवहार सुरक्षितपणे करता येऊ शकतात. यादृष्टीने ग्राहकांनी कायम आपले ओटीपी, पिन, ...
वादग्रस्त डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अधिनियम तत्काळ प्रभावाने लागू; सरकारला अनियंत्रित अधिकार आणि व्यक्ती स्वातंत्र्यावर घालाः आयएफएएफचा आक्षेप
देश, साय-टेक

वादग्रस्त डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अधिनियम तत्काळ प्रभावाने लागू; सरकारला अनियंत्रित अधिकार आणि व्यक्ती स्वातंत्र्यावर घालाः आयएफएएफचा आक्षेप

नवी दिल्लीः केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने शुक्रवारी (१४ नोव्हेंबर) वादग्रस्त डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन (डीपीडीपी) अधिनियम-२०२५ च्या तरतुदी तत्काळ प्रभावाने लागू केल्याची अधिसूचना जारी केली आहे. परंतु या अधिनियमातील तरतुदी पारदर्शकता आणि वैयक्तिक स्वातंत्र्यात नवीन अडथळे निर्माण करणाऱ्या आहे, असे टिकाकारांचे म्हणणे आहे. डिटिजल पर्सनल डेटा प्रोटेक्शन (डीपीडीपी) अधिनियम २०२३ आणि तो कार्यान्वित करण्यासाठी आणलेला  डीपीडीपी अधिनियम २०२५ नागरिकांच्या डेटा अधिकारांचे संरक्षण करण्याऐवजी पारदर्शकता आणि वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी नवीन अडथळे निर्माण करतात. डीपीडीपी अधिनियमांने नागरिकांना कठोर नियमांत बांधून गोपनीयतेचा मूलभूत अधिकार कमकुवत करण्यासाठी अनेक व्यापक अपवाद निर्माण केले आहेत, असे इंटरनेट फ्रीडम फाऊंडेशनने (आयएफएफ) जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. ...
नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठीही ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर, स्थानिक युवकांना मिळणार जागतिक दर्जाचे प्रशिक्षण
महाराष्ट्र, साय-टेक

नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठीही ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर, स्थानिक युवकांना मिळणार जागतिक दर्जाचे प्रशिक्षण

मुंबई:  राज्यातील युवकांना रोजगारक्षम कौशल्ये आत्मसात करून ‘मेक इन महाराष्ट्र’ या संकल्पनेला बळकटी देण्याच्या उपक्रमाचा भाग म्हणून आता नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग (CIIIT)’ म्हणजेच ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्र मंजूर करण्यात आले आहे. उद्योग आणि कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्याच्या प्रयत्नांचा हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीला पत्र लिहून नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये सी-ट्रिपल आयटी उभारण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. या पत्राला कंपनीकडून अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असून दोन्ही जिल्ह्यांसाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्रे स्थापन करण्यास टाटा टेक्नॉलॉजीने अधिकृत मान्यता दिली आहे. या 'सीट्रिपलआय' सेंटरमुळे स...
आरोग्यसेवा व संबंधित विषयांतील ऑनलाइन, मुक्त आणि दूरस्थ अभ्यासक्रमांवर यूजीसीची बंदी; चालू शैक्षणिक वर्षापासूनच प्रवेश न देण्याचे निर्देश
देश, साय-टेक

आरोग्यसेवा व संबंधित विषयांतील ऑनलाइन, मुक्त आणि दूरस्थ अभ्यासक्रमांवर यूजीसीची बंदी; चालू शैक्षणिक वर्षापासूनच प्रवेश न देण्याचे निर्देश

नवी दिल्लीः राष्ट्रीय आरोग्यसेवा व संबंधित व्यवसाय आयोग (एनसीएएचपी) कायदा २०२१ अंतर्गत आरोग्यसेवा आणि संबंधित विषयातील पाठ्यक्रम मुक्त, दूरस्थ आणि ऑनलाइन पद्धतीने शिकवण्यावर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) बंदी घातली आहे. जुलै-ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रापासूनच विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांनी या अभ्यासक्रमांना प्रवेश देऊ नये, असे निर्देशही यूजीसीने दिले आहेत. दूरस्थ शिक्षण ब्युरो कार्यगटाच्या २२ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत ऑनलाइन, मुक्त आणि दूरस्थ आरोग्यसेवा आणि संबंधित पाठ्यक्रमांवर बंदी घालण्याची शिफारस करण्यात आली होती. यूजीसीच्या २३ जुलै रोजी झालेल्या ५९२ व्या बैठकीत ही शिफारस स्वीकारून हा बंदी आदेश जारी करण्यात आला आहे. मानसशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, अन्न व पोषण विज्ञान, जैवतंत्रज्ञान, क्लिनिकल न्यूट्रिशन आणि आहारशास्त्र या स्पेशालायजेशनमध्ये आरोग्यसेवा ...
सोशल मीडियावर पदनाम, हुद्दा, वर्दी, गणवेश वापरून स्वतःचीच टिमकी वाजवल्यास सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध होणार शिस्तभंगाची कारवाई; वाचा नवे निर्देश!
महाराष्ट्र, साय-टेक

सोशल मीडियावर पदनाम, हुद्दा, वर्दी, गणवेश वापरून स्वतःचीच टिमकी वाजवल्यास सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध होणार शिस्तभंगाची कारवाई; वाचा नवे निर्देश!

मुंबईः राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून समाज माध्यमांचा अनुचित वापर केला जात असल्याचे निर्दशनास आल्यामुळे राज्य सरकारने सोशल मीडिया वापराबाबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमांतील तरतुदींनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. राज्य किंवा केंद्र सरकारच्या अलीकडील धोरणावर प्रतिकुल टीका किंवा सरकारी अधिकारी/कर्मचारी म्हणून स्वतःचा हुद्दा, पदनाम, वर्दी, गणवेश वापरून स्वयंप्रशंसा करणारा मजकूर, छायाचित्र पोस्ट केल्यास आता शिस्तभंगाच्या कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर माहितीचे आदान-प्रदान, समन्वय व संवाद साधण्यासाठी तसेच लोकसहभाग वाढवण्यासाठी केला जातो. सोशल मीडियाच्या माध्यमातून क्षणात जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात माहिती पाठवता...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!