राजकारण

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सेवाप्रवेश नियमांत होणार सुधारणा, २,९०० रिक्त पदे तातडीने भरणार
महाराष्ट्र, राजकारण

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सेवाप्रवेश नियमांत होणार सुधारणा, २,९०० रिक्त पदे तातडीने भरणार

मुंबई: राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक पावले उचलत सेवाप्रवेश नियम संविधानाच्या अनुच्छेद ३०९ अन्वये सुधारित करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या समस्यांबाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींमधील सुमारे ६,५०० मंजूर पदांपैकी ३,६०० पदे कार्यरत असून उर्वरित रिक्त पदे तातडीने भरण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात यावी. तसेच राज्य संवर्गातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच नगरपरिषद कर्मचाऱ्यांनाही सामान्य प्रशासन विभागाचे बदली धोरण लागू करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करावी, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या.नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये पूर्वीप्रमाणे गट ‘क’ व गट ‘ड’ पदांवर शैक्षण...
छत्रपती संभाजीनगरची ३५९ कोटींची नवी पाणीपुरवठा योजना तब्बल २ हजार ७४० कोटींच्या घरात, तरीही कामे निकृष्ट दर्जाची; आता सरकार करणार सखोल चौकशी
महाराष्ट्र, राजकारण

छत्रपती संभाजीनगरची ३५९ कोटींची नवी पाणीपुरवठा योजना तब्बल २ हजार ७४० कोटींच्या घरात, तरीही कामे निकृष्ट दर्जाची; आता सरकार करणार सखोल चौकशी

मुंबई: छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेतील कामांच्या गुणवत्तेबाबत करण्यात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने नगरविकास विभागामार्फत समिती नियुक्त करून चौकशी करण्यात येईल; तसेच महिनाभरात अहवाल सादर केला जाईल व योजनेच्या प्रगतीचा दर १५ दिवसांनी ऑनलाइन व प्रत्यक्ष पाहणीद्वारे नगरविकास विभागामार्फत आढावा घेतला जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. विधानपरिषदेत नियम ९७ अन्वये आ. अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेसंदर्भात अल्पकालीन चर्चा उपस्थित केली, त्या संदर्भात ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेला २००९ मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यावेळी प्रकल्पाची अंदाजित किंमत ३५९.६७ कोटी रुपये होती. पुढील काही वर्षे प्रकल्प प्रलंबित राहिल्यामुळे त्याच्या खर्चात वाढ होत गेली. सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर प्रकल्पाची किंमत आता २,७४०.७५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल...
महाराष्ट्रातही समान नागरी कायदा लागू करण्याची तयारी, मसुद्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन
महाराष्ट्र, राजकारण

महाराष्ट्रातही समान नागरी कायदा लागू करण्याची तयारी, मसुद्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन

मुंबई:   आसाम, उत्तराखंड आणि गोव्यानंतर आता महाराष्ट्रातही समान नागरी कायदा (यूसीसी) लागू करण्याच्या हालचालींना वेग आला असून या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. भारताच्या संविधानातील राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्येक राज्याने समान नागरी कायद्याचा विचार करावा, असे निर्देश आहेत. त्यानुसार २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने राज्य शासनामार्फत या समितीची स्थापना करण्यात येत आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती न्या. रंजना देसाई यांच्या ...
हदगाव व हिमायतनगर तालुके किनवट अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला जोडणार की नाही?, महसूल मंत्री म्हणाले: लोकभावनेचा विचार करूनच निर्णय घेऊ!
महाराष्ट्र, राजकारण

हदगाव व हिमायतनगर तालुके किनवट अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला जोडणार की नाही?, महसूल मंत्री म्हणाले: लोकभावनेचा विचार करूनच निर्णय घेऊ!

मुंबई: नांदेड जिल्ह्यातील हदगाव व हिमायतनगर तालुक्यांच्या लोकभावनांचा विचार करूनच हे तालुके कोणत्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयास जोडायचे याबाबतचा निर्णय राज्य शासन घेईल. हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यांना किनवट अपर जिल्हाधिकारी कार्यालय गैरसोयीचे वाटत असल्यास  त्याबाबतची लोकभावना व हरकती विचारात घेऊनच निर्णय घेतला जाईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत सांगितले राज्यातील बदलती भौगोलिक व प्रशासकीय गरज, वाढते शहरीकरण आणि महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने राज्यात ११ अपर जिल्हाधिकारी कार्यालये, आठ उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालये, ६९ अपर तहसील कार्यालये आणि दोन तहसील कार्यालये प्रस्तावित करण्यात आली आहेत. या प्रस्तावांबाबत प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांचा विचार करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही बावनकुळे म्हणाले. आ.बाबुराव कदम कोहळीकर यांनी य...
‘म्हाताऱ्यांनी आता निवृत्त व्हावे आणि आश्रमात जाऊन विश्रांती घ्यावी’ म्हणत कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपकेंनी उतरवली अण्णा हजारेंची ‘अण्णागिरी’!
देश, महाराष्ट्र, राजकारण

‘म्हाताऱ्यांनी आता निवृत्त व्हावे आणि आश्रमात जाऊन विश्रांती घ्यावी’ म्हणत कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपकेंनी उतरवली अण्णा हजारेंची ‘अण्णागिरी’!

छत्रपती संभाजीनगरः केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या १८ दिवसांपासून आंदोलनाला बसलेले कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या उपस्थितीत सोमवारी छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी जोरदार आंदोलन केले. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी भरपावसातही हजारोंच्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनानंतर पत्रकारांनी अभिजीत दिपके यांना अण्णा हजारेंची भेट घेणार का? असे विचारले असता ‘म्हाताऱ्यांनी आता निवृत्त व्हावे आणि आश्रमात जाऊन विश्रांती घ्यावी,’ अशा तिखट शब्दांत त्यांनी हजारेंची ‘अण्णागिरी’ उतरवली. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोमवारी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनाला कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके,...
ॲट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल करू नका; ‘या’ पाच जिल्ह्यातच ॲट्रॉसिटीचे जास्त गुन्हे का?, कारणे शोधण्याचे मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना निर्देश
महाराष्ट्र, राजकारण

ॲट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल करू नका; ‘या’ पाच जिल्ह्यातच ॲट्रॉसिटीचे जास्त गुन्हे का?, कारणे शोधण्याचे मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना निर्देश

मुंबई: राज्यात सोलापूर, अहिल्यानगर, परभणी, नांदेड व यवतमाळ जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अर्थात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण जास्त का आहे? या मागील कारणेपोलीस यंत्रणेने शोधावीत, याबाबत अधिक खोलवर चौकशी करून गुन्ह्यांचा शोध घेत अहवाल सादर करावा आणि कुठेही खोटे गुन्हे असल्यास तपासाअंती ते दाखल करण्यात येऊ नयेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधान भवनात अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंमलबजावणीसाठी गठीत राज्यस्तरीय दक्षता व संनियंत्रण समितीची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी 'ॲट्रॉसिटी' कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्यात यावे, असे निर्देश दिले.या कायद्यासारख्या विशेष कायद्यामध्ये सरकारी वकिलांमार्फत दोषसिद्धी वाढवण्यासाठी करण्या...
मराठी न शिकविणाऱ्या शाळांना एक लाखापर्यंत दंड, त्यानंतरही उल्लंघन केल्यास मान्यताच रद्द करणार
महाराष्ट्र, राजकारण

मराठी न शिकविणाऱ्या शाळांना एक लाखापर्यंत दंड, त्यानंतरही उल्लंघन केल्यास मान्यताच रद्द करणार

मुंबई: राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकविणे बंधनकारक आहे. मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल. त्यानंतरही नियमांचे पालन न झाल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत सांगितले.मराठी भाषा सक्तीचा कायदा लागू करण्यात आल्याने राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी शिकविणे अनिवार्य आहे. मराठी विषय शिकविण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेले शिक्षक नियुक्त करणेही शाळांसाठी बंधनकारक केले आहे. त्यामुळे शाळा तपासणी व भेटीदरम्यान मराठी विषयाच्या अध्यापनाची तसेच प्रत्येक वर्गातील मराठी परीक्षेची पडताळणी केली जाणार आहे, असे भुसे म्हणाले. अभ्यासक्रमात राज्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला अधिक स्थान देण्याचा निर्णय घेण्यात आला...
ओमराजे निंबाळकरांसह ठाकरेंचे ६ फुटीर खासदार शिंदेसेनेत, उठावाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याचे सांगत एकनाथभाईंकडून आणखी धमाक्याचे संकेत!
महाराष्ट्र, राजकारण

ओमराजे निंबाळकरांसह ठाकरेंचे ६ फुटीर खासदार शिंदेसेनेत, उठावाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याचे सांगत एकनाथभाईंकडून आणखी धमाक्याचे संकेत!

मुंबई: धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या ६ फुटीर खासदारांनी आज अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. जून २०२२ मध्ये आम्ही पहिला उठाव केला. आता उठावाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी धमाक्याचे संकेत दिले. त्यामुळे नजीकच्या काळात ‘ऑपरेशन टायगर’चा आणखी एक भाग पहायला मिळण्याची शक्यता दिसू लागली आहे.उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, परभणीचे खासदार संजय जाधव, यवतमाळचे खासदार संजय देशमुख आणि उत्तर-पूर्व मुंबईचे खीसदार संजय दिना पाटील, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे या सहा खासदारांनी आज पक्षांतर करून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात हा पक्षप्रवेश सोहळा झाला.शिवसेना हे कुटुंब असून कट्टर शिवसैन...
पवनराजे हत्याकांडाचा निकाल विरोधात जाताच खासदार ओमराजे निंबाळकरांचे ‘वेट अँड वॉच’, शिंदे सेनेचे ‘ऑपरेशन टायगर’ धोक्यात?; बंडखोरांची धडधड वाढली!
महाराष्ट्र, राजकारण

पवनराजे हत्याकांडाचा निकाल विरोधात जाताच खासदार ओमराजे निंबाळकरांचे ‘वेट अँड वॉच’, शिंदे सेनेचे ‘ऑपरेशन टायगर’ धोक्यात?; बंडखोरांची धडधड वाढली!

मुंबईः काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि राज्याचे माजी गृह राज्यमंत्री डॉ. पद्मसिंह पाटलांसह सर्व ९ आरोपींची निर्दोष सुटका केली. या निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले धाराशिवचे खासदार आणि पवनराजेंचे सुपुत्र ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा माझा अंतिम निर्णय झालेला नाही, मतदारसंघात जाऊन सर्वांशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेईन, अशी भूमिका मांडल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गेल्या काही दिवसांपासून घोंगावू लागलेले ‘ऑपरेशन टायगर’ धोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.  परिणामी बंडखोरी केलेल्या शिवसेनेच्या (उबाठा) अन्य पाच खासदारांची धडधड वाढली आहे. २० वर्षांपूर्वी घडलेल्या काँग्रेस नेते पवन राजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांच्या हत्याप्...
बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी डॉ. पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष सुटका, माफीचा साक्षीदार फितूर घोषित; निकालानंतर ओमराजे म्हणाले….
महाराष्ट्र, राजकारण

बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी डॉ. पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष सुटका, माफीचा साक्षीदार फितूर घोषित; निकालानंतर ओमराजे म्हणाले….

मुंबईः धाराशिवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडिल काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर व त्यांचे चालक समद काझी यांच्या बहुचर्चित हत्याप्रकरणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी गृह राज्यमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची आज विशेष सीबीआय न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. जून २००६ मध्ये नवी मुंबईतील कळंबोली येथे या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तब्बल २० वर्षांनंतर आज विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी या प्रकरणाचा निकाल दिला. या निकालाची भिस्त माफीच्या साक्षीदारावरच अलबंवून असताना त्याच्या जबाबाच्या बाबतीतच संदिग्धता आहे. माफीच्या साक्षीदाराने वारंवार साक्ष फिरवल्याने त्याची साक्ष ग्राह्य धरता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने त्याला फितूर घोषित करण्यात आले आणि संशयाचा फायदा देऊन या खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मु...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!