राजकारण

ओमराजे निंबाळकरांसह ठाकरेंचे ६ फुटीर खासदार शिंदेसेनेत, उठावाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याचे सांगत एकनाथभाईंकडून आणखी धमाक्याचे संकेत!
महाराष्ट्र, राजकारण

ओमराजे निंबाळकरांसह ठाकरेंचे ६ फुटीर खासदार शिंदेसेनेत, उठावाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याचे सांगत एकनाथभाईंकडून आणखी धमाक्याचे संकेत!

मुंबई: धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या ६ फुटीर खासदारांनी आज अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. जून २०२२ मध्ये आम्ही पहिला उठाव केला. आता उठावाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी धमाक्याचे संकेत दिले. त्यामुळे नजीकच्या काळात ‘ऑपरेशन टायगर’चा आणखी एक भाग पहायला मिळण्याची शक्यता दिसू लागली आहे.उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, परभणीचे खासदार संजय जाधव, यवतमाळचे खासदार संजय देशमुख आणि उत्तर-पूर्व मुंबईचे खीसदार संजय दिना पाटील, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे या सहा खासदारांनी आज पक्षांतर करून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात हा पक्षप्रवेश सोहळा झाला.शिवसेना हे कुटुंब असून कट्टर शिवसैन...
पवनराजे हत्याकांडाचा निकाल विरोधात जाताच खासदार ओमराजे निंबाळकरांचे ‘वेट अँड वॉच’, शिंदे सेनेचे ‘ऑपरेशन टायगर’ धोक्यात?; बंडखोरांची धडधड वाढली!
महाराष्ट्र, राजकारण

पवनराजे हत्याकांडाचा निकाल विरोधात जाताच खासदार ओमराजे निंबाळकरांचे ‘वेट अँड वॉच’, शिंदे सेनेचे ‘ऑपरेशन टायगर’ धोक्यात?; बंडखोरांची धडधड वाढली!

मुंबईः काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि राज्याचे माजी गृह राज्यमंत्री डॉ. पद्मसिंह पाटलांसह सर्व ९ आरोपींची निर्दोष सुटका केली. या निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले धाराशिवचे खासदार आणि पवनराजेंचे सुपुत्र ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा माझा अंतिम निर्णय झालेला नाही, मतदारसंघात जाऊन सर्वांशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेईन, अशी भूमिका मांडल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गेल्या काही दिवसांपासून घोंगावू लागलेले ‘ऑपरेशन टायगर’ धोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.  परिणामी बंडखोरी केलेल्या शिवसेनेच्या (उबाठा) अन्य पाच खासदारांची धडधड वाढली आहे. २० वर्षांपूर्वी घडलेल्या काँग्रेस नेते पवन राजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांच्या हत्याप्...
बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी डॉ. पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष सुटका, माफीचा साक्षीदार फितूर घोषित; निकालानंतर ओमराजे म्हणाले….
महाराष्ट्र, राजकारण

बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी डॉ. पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष सुटका, माफीचा साक्षीदार फितूर घोषित; निकालानंतर ओमराजे म्हणाले….

मुंबईः धाराशिवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडिल काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर व त्यांचे चालक समद काझी यांच्या बहुचर्चित हत्याप्रकरणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी गृह राज्यमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची आज विशेष सीबीआय न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. जून २००६ मध्ये नवी मुंबईतील कळंबोली येथे या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तब्बल २० वर्षांनंतर आज विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी या प्रकरणाचा निकाल दिला. या निकालाची भिस्त माफीच्या साक्षीदारावरच अलबंवून असताना त्याच्या जबाबाच्या बाबतीतच संदिग्धता आहे. माफीच्या साक्षीदाराने वारंवार साक्ष फिरवल्याने त्याची साक्ष ग्राह्य धरता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने त्याला फितूर घोषित करण्यात आले आणि संशयाचा फायदा देऊन या खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मु...
ठाकरे गटाच्या ६ फुटीर खासदारांपैकी हिंगोलीचे नागेश आष्टीकर ठरले रात्रीच्या अंधारात दिल्लीत पोहोचणारे पहिले खासदार, वाचा ‘ऑपरेशन टायगर’मध्ये नेमके काय घडले?
देश, महाराष्ट्र, राजकारण

ठाकरे गटाच्या ६ फुटीर खासदारांपैकी हिंगोलीचे नागेश आष्टीकर ठरले रात्रीच्या अंधारात दिल्लीत पोहोचणारे पहिले खासदार, वाचा ‘ऑपरेशन टायगर’मध्ये नेमके काय घडले?

नवी दिल्लीः उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत २०२२ नंतर पुन्हा मोठी फूट पडली. शिवसेनेतील (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या दुसऱ्या मोठ्या फुटीच्या १६ जूनच्या मध्यरात्रीपासूनच सुरूवात झाली. शिवसेनेने (उबाठा) व्हीप बजावून आज दिल्लीत बोलावलेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीला ९ पैकी फक्त तीनच खासदार हजर राहिल्यामुळे या फुटीवर शिक्कामोर्तब झाले आहे. उर्वरित ६ खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत दाखल होणार हेही निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे या फूट नाट्यात हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे १६ जूनच्या मध्यरात्री दिल्लीत दाखल होणारे पहिले बंडखोर खासदार ठरले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार फोडण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्यात येत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होत होती. १४ जून रोजी शिवसेनेने (उबाठा) बोलावलेल्या बैठकीला केवळ तीनच खासदा...
अभिजीत दिपके अमेरिकेहून दिल्लीकडे रवाना, कॉक्रोच जनता पार्टीचे उद्या जंतर-मंतरवर आंदोलन
देश, राजकारण

अभिजीत दिपके अमेरिकेहून दिल्लीकडे रवाना, कॉक्रोच जनता पार्टीचे उद्या जंतर-मंतरवर आंदोलन

नवी दिल्ली: नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी कॉक्रोच जनता पार्टी सीजेपी), ६ जून रोजी दिल्लीतील जंतर मंतरवर मोठे आंदोलन करणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके अमेरिकेहून भारताकडे रवाना झाले आहेत. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी ‘माझे भवितव्य आता संविधानाच्या हातात आहे’, असे अभिजीत दिपके यांनी दिपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटले आहे.दरम्यान, आंदोलनाच्या दोन दिवस आधी गुरुवारी कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) एक मोठा निर्णय घेतला आणि आपल्या समर्थकांना एक विशेष आवाहन केले आहे. अभिजीत दीपके यांच्या स्वागतासाठी ६ जून रोजी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गर्दी न करण्याचे आवाहन सीजेपीने आपल्या समर्थकांना केले आहे.याआधी अभिजीत दीपके यांनी त्यांच्या समर्थकांना ६ जून रोजी दिल्ली विमानतळावर येण्या...
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंना जीवे मारण्याच्या धमक्या, ‘भाजपमध्ये ये अन्यथा अमेरिकेतच मारून टाकू….
दुनिया, देश, राजकारण

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंना जीवे मारण्याच्या धमक्या, ‘भाजपमध्ये ये अन्यथा अमेरिकेतच मारून टाकू….

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): व्यवस्थेविरुद्ध देशातील तरूणाईच्या संतापाचा आवाज बनत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक/संयोजक अभिजीत दिपके यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येऊ लागल्या आहेत. खुद्द अभिजीतनेच एक्सवर (ट्विटर) धमकीच्या मेसेजचा स्कीनशॉट शेअर करत ही माहिती दिली. त्यामुळे अभिजीत आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता दिसू लागली आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीच्या वेळी देशातील बेरोजगार तरूणांची तुलना कॉक्रोच (झुरळ) आणि पॅरासाईटशी (परजीवी) केल्यामुळे देशभरातील तरूणाईत निर्माण झालेल्या संतापाचे प्रतिक म्हणून अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात उच्च शिक्षण घेत असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या अभिजीत दिपके यांनी कॉक्रोच जनता पार्टी या अनोख्या आणि देशातील सर्वात मोठ्या डिजिटल राजकीय व्यंगात्मक चळव...
सरन्यायाधीशांनी तरूणाईला झुरळ म्हटल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या ‘झुरळा’ने स्थापन केली ‘कॉक्रोच जनता पार्टी’, तीनच दिवसांत मिळाले २० लाखांहून अधिक सदस्य!
देश, महाराष्ट्र, राजकारण

सरन्यायाधीशांनी तरूणाईला झुरळ म्हटल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या ‘झुरळा’ने स्थापन केली ‘कॉक्रोच जनता पार्टी’, तीनच दिवसांत मिळाले २० लाखांहून अधिक सदस्य!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका खटल्याच्या सुनावणीवेळी ज्या बेरोजगार तरूणांची ‘झुरळ’ (कॉक्रोच) म्हणून संभावना केली, त्याच बेरोजगार तरूणांपैकी एका तरूणाने ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (सीजेपी) ही व्यंगात्मक राजकीय चळवळ सुरू केली असून ही चळवळ सुरू झाल्यानंतर अवघ्या तीनच दिवसांत २० लाखांहून अधिक सदस्यांनी या चळवळीत सहभाग नोंदवला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीच्या वेळी देशातील बेरोजगार तरूणांची झुरळाशी तुलना केल्यामुळे देशात वाद सुरू झालेला असतानाच अभिजीत दिपके या छत्रपती संभाजीनगरच्या तरूणाने १६ मे रोजी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘सर्व झुरळांसाठी एक नवीन व्यासपीठ सुरू करत आहोत... तुम्हाला सामील व्हायचे असल्यास खालील लिंकवर क्लिक करा. पात्रतेचे निकषः बेरोजगार, आळशी, सतत ऑनलाइन असणारे, व्यावसायिकपणे आपले मत मांडण्याची क्षमता,’ अशी पोस्...
‘पानसरेंचे काय झाले माहिती आहे ना?,तुला पण त्याला भेटायला वर जायचे आहे का?, अरे हरामखोरा…’ आ. संजय गायकवाडांकडून ‘शिवाजी कोण होता?’च्या प्रकाशकाला धमकी
महाराष्ट्र, राजकारण

‘पानसरेंचे काय झाले माहिती आहे ना?,तुला पण त्याला भेटायला वर जायचे आहे का?, अरे हरामखोरा…’ आ. संजय गायकवाडांकडून ‘शिवाजी कोण होता?’च्या प्रकाशकाला धमकी

मुंबईः छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारा गोविंद पानसरे कोण? पानसरेंचे काय झाले माहिती आहे ना?... तुला घरात घुसून मारीन... चिरडून टाकीन... तुझी जीभ कापून टाकीन... अशा अर्वाच्च भाषेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. आ. गायकवाड यांनी दिलेल्या धमकीची ऑडिओ क्लिप समाजमाध्यमावर वेगाने व्हायरल होत असून त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेले ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक १९८८ मध्ये प्रशांत आंबी यांनी प्रकाशित केले आहे. या पुस्तकाच्या आजवर दीडलाखाहून अधिक प्रती वितरित झाल्या आहेत. या पुस्तकाचा अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवादही झाला आहे. त्या पुस्तकाचा अचानक साक्षात्कार आमदार संजय गायकवाड यांना आता झाला आणि त्यांनी या पुस्तक...
न्या. बदर समितीच्या अहवालाबाबत आंबेडकरवाद्यांचे नेमके आक्षेप कोणते?, अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला विरोध का?; वाचा तपशीलवार मुद्दे
महाराष्ट्र, राजकारण

न्या. बदर समितीच्या अहवालाबाबत आंबेडकरवाद्यांचे नेमके आक्षेप कोणते?, अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला विरोध का?; वाचा तपशीलवार मुद्दे

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरणासाठी फडणवीस सरकारने नेमलेल्या न्या. अनंत बदस समितीचा अहवाल सार्वजनिक न करताच त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यात आल्यामुळे राज्यातील आंबेडकरी समुदाय संतप्त झाला असून न्या. बदर समितीच्या या अहवालावर गंभीर आक्षेप घेत छत्रपती संभाजीनगरातील आंबेडकरवाद्यांनी २७ एप्रिल २०२६ रोजी बौद्ध समाजासह अनुसूचित जातीतील इतर ५८ जातींचा संयुक्त मोर्चाची घोषणा केली आहे. छत्रपती संभाजीनगरातील आंबेडकरवाद्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन न्या. बदर समितीचा अहवाल, अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण याबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली. २७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता आम खास मैदानापासून विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेत सादर करण्यात आलेले निवेदन जसेच्या तसे- सर्वप्रथम आम्ही स्पष्ट सांगू इच्छितो की...
कांशीराम जरुरी है…!
अभिव्यक्ती, राजकारण

कांशीराम जरुरी है…!

कांशीरामजी यांच्या पश्चात आज त्यांचे महत्व जाणवू लागले आहे. ‘एकच साहेब बाबासाहेब!’ आम्ही अन्य कुणाला मानत नाही असे म्हणणारे देखील कांशीरामजी यांचे कार्य आज मान्य करत आहेत. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उर्वरित राजकीय कार्य कांशीरामजी यांनी पूर्ण केले हे त्रिवार सत्य आज उशिरा का होईना मान्य केले जात आहे. मान्यवर कांशीरामजी यांच्यामुळे देशात फुले, शाहू, आंबेडकरी विचारांची सत्ता निर्माण होऊ शकली, देशातील बहुजन समाजात एक राजकीय महत्त्वाकांक्षा निर्माण होऊ शकली! इंजि.चंद्रप्रकाश देगलूरकर, नांदेड पंचवीस-तीस वर्षांपूर्वी आम्ही एक नारा देत होतो. त्याची आज सर्वत्र प्रचिती येत आहे. तेंव्हा ती चळवळीची जरुरी होती, आज ती देशाची मजबुरी झाली आहे. यावर्षी सर्व सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष मान्यवर कांशीरामजी यांची जयंती साजरी करीत आहेत. या निमित्ताने कांशीरामजी यांचे स्मरण केले जात आहे. ...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!