दुनिया

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके जंतर-मंतरवर दाखल, प्रचंड पोलिस बंदोबस्तात आंदोलन सुरू
दुनिया, देश

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके जंतर-मंतरवर दाखल, प्रचंड पोलिस बंदोबस्तात आंदोलन सुरू

नवी दिल्ली: कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे जंतर-मंतरवर दाखल झाले असून त्यांच्या नेतृत्वात हजारो समर्थकांच्या उपस्थितीत आणि प्रचंड पोलिस बंदोबस्तात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनाला सुरूवात झाली आहे.अभिजीत दिपके हे अमेरिकेहून दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल ३ वर पोहोचल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना जंतर-मंतरवर सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने समर्थकांना थेट जंतर-मंतरवर पोहोचण्याचे आवाहन केले. हातात पुस्तक आणि तिरंगा घेऊन जंतर-मंतरवर या, असे आवाहन अभिजीत दिपके यांनी समर्थकांना केले.अभिजीत दिपके हे ११ वाजेच्या सुमारास जंतर-मंतरवर पोहोचताच त्यांच्या समर्थकांनी भारत माता की जय, इन्क्लाब जिंदाबाद आणि जय भीमच्या घोषणा देत त्यांचे स्वागत केले. ...
कॉक्रोच जनता पार्टीने दिली मोदी सरकारविरुद्ध पहिल्या मोठ्या जनआंदोलनाची हाक, पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आंदोलनासाठी भारतात परतणार!
दुनिया, देश

कॉक्रोच जनता पार्टीने दिली मोदी सरकारविरुद्ध पहिल्या मोठ्या जनआंदोलनाची हाक, पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आंदोलनासाठी भारतात परतणार!

नवी दिल्लीः सोशल मीडियावर देशातील तरूणाईचे आकर्षण ठरलेल्या आणि अवघा काही दिवसांतच इन्स्टाग्रामवर सत्ताधारी भाजपपेक्षाही जास्त फॉलोअर्स मिळवणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध पहिल्या मोठ्या जनआंदोलनाची घोषणा करून खळबळ उडवून दिली आहे. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आणि सध्या अमेरिकेत असलेले कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे या आंदोलनासाठी ६ जून रोजी भारतात परतणार असून नवी दिल्लीतील जंतरमंतरवर हे आंदोलन केले जाणार आहे. देशातील युवकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीच्यावेळी देशातील बेरोजगार तरूणांना कॉक्रोच (झुरळ) आणि परजीवी म्हटले होते. त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी या राजकीय व्यंगात्मक चळवळीची स्थापना केली. या डिजिटल...
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंना जीवे मारण्याच्या धमक्या, ‘भाजपमध्ये ये अन्यथा अमेरिकेतच मारून टाकू….
दुनिया, देश, राजकारण

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंना जीवे मारण्याच्या धमक्या, ‘भाजपमध्ये ये अन्यथा अमेरिकेतच मारून टाकू….

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): व्यवस्थेविरुद्ध देशातील तरूणाईच्या संतापाचा आवाज बनत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक/संयोजक अभिजीत दिपके यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येऊ लागल्या आहेत. खुद्द अभिजीतनेच एक्सवर (ट्विटर) धमकीच्या मेसेजचा स्कीनशॉट शेअर करत ही माहिती दिली. त्यामुळे अभिजीत आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता दिसू लागली आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीच्या वेळी देशातील बेरोजगार तरूणांची तुलना कॉक्रोच (झुरळ) आणि पॅरासाईटशी (परजीवी) केल्यामुळे देशभरातील तरूणाईत निर्माण झालेल्या संतापाचे प्रतिक म्हणून अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात उच्च शिक्षण घेत असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या अभिजीत दिपके यांनी कॉक्रोच जनता पार्टी या अनोख्या आणि देशातील सर्वात मोठ्या डिजिटल राजकीय व्यंगात्मक चळव...
संभाजीनगरच्या तरूणाने स्थापन केलेल्या आभासी ‘सीजेपी’ने सत्ताधारी ‘बीजेपी’लाही मागे टाकले, कॉक्रोच जनता पार्टीचा देशभर धुमाकुळ; आता डिजिटल मुस्कटदाबीचे प्रयत्न!
दुनिया, देश, महाराष्ट्र

संभाजीनगरच्या तरूणाने स्थापन केलेल्या आभासी ‘सीजेपी’ने सत्ताधारी ‘बीजेपी’लाही मागे टाकले, कॉक्रोच जनता पार्टीचा देशभर धुमाकुळ; आता डिजिटल मुस्कटदाबीचे प्रयत्न!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान ‘काही बेरोजगार तरूण झुरळासारखे आहेत’ असे वक्तव्य केल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या तरूणाने स्थापन केलेल्या कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) देशभरात धुमाकुळ घातला असून अवघ्या चार दिवसातच या आभासी सीजेपीने फॉलोअर्सच्या बाबतीत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीलाही (बीजेपी) मागे टाकले आहे. दरम्यान देशातील तरूणाईबरोबरच सेलिब्रेटींमध्येही सीजेपी क्रेझ वाढू लागल्यानंतर या आभासी राजकीय व्यंगात्मक चळवळीची डिजिटल मुस्कटदाबी करण्याचे प्रयत्न सुरू झाले असून सीजेपीचे एक्स (ट्विटर) हँडल बंद करण्यात आले असून इंस्टाग्राम अकाऊंटही हॅक करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. १५ मे २०२६ रोजी भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान कथितरित्या बनावट पदव्या घेणाऱ्या आणि सोशल मीडियावर व्यवस्था विस्कळित करणाऱ्या बेरो...
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, महाराष्ट्र सरकार देणार डॉक्टरेट करणाऱ्या १० संशोधक छात्रांना शिष्यवृत्ती
दुनिया, महाराष्ट्र, विशेष

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, महाराष्ट्र सरकार देणार डॉक्टरेट करणाऱ्या १० संशोधक छात्रांना शिष्यवृत्ती

मुंबईः भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने प्रख्यात अशा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स संस्थेत अध्यासन स्थापनेचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. या अध्यासनाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने डॉक्टरेटसाठी शिष्यवृत्तीही देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आंतरराष्ट्रीयस्तरावर पोहोचावे, त्यांच्या विचारांवर आधारित सामाजिक न्याय, संविधानिक लोकशाही, आर्थिक समता आणि मानवी हक्कांच्या अभ्यासासाठी जागतिक दर्जाचे संशोधन केंद्र निर्माण करणे, हा अध्यासन स्थापन करण्यामागील उद्देश आहे. अध्यासनात़ संविधान आणि लोकशाही, सामाजिक समता, आर्थिक लोकशा...
विद्यार्थी-प्राध्यापक संघटनेनेच केली कुलगुरूंची सार्वजनिक चौकशी, दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने केली तत्काळ बडतर्फीची शिफारस; ‘या’ नामांकित विद्यापीठात घडला प्रकार!
दुनिया, देश

विद्यार्थी-प्राध्यापक संघटनेनेच केली कुलगुरूंची सार्वजनिक चौकशी, दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने केली तत्काळ बडतर्फीची शिफारस; ‘या’ नामांकित विद्यापीठात घडला प्रकार!

नवी दिल्लीः जागतिक पातळीवर नावलौकिक असलेल्या दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) या देशातील नामांकित विद्यापीठातील स्टुडंट्स युनियन आणि टिचर्स असोसिएशनने कुलगुरू प्रा. डॉ. शांतीश्री धुलीपुडी पंडित यांची सार्वजनिक चौकशी केली. या चौकशी अहवालात कुलगुरू धुलीपुडी यांना त्यांच्यावर ठेवण्यात आलेल्या सर्व आरोपांत दोषी ठरवण्यात आले. कुलगुरूंनी जेएनयूचे ‘पद्धतशीर संस्थात्मक नुकसान’ केले असून  त्यांना पदावरून हटवण्याची मागणी करण्यासाठी हे योग्य प्रकरण असल्याचा निष्कर्ष या चौकशी अहवालात काढण्यात आला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) गेल्या काही दिवसांपासून संस्थात्मक संघर्षात लक्षणीय वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर जेएनयू स्टुडंट्स युनियन (जेएनयूएसयू) आणि जेएनयू टिचर्स असोसिएशन (जेएनयूटीए) यांनी संयुक्तपणे जेएनयूच्या कुलगुरू प्रा. डॉ. शांतीश्री धुलीपुडी पंडित यांची १६ आणि १८ म...
भविष्यातील डॉक्टर केवळ उपचार करणारे नव्हे, तर समाजाभिमुख आरोग्यदूत!
अभिव्यक्ती, दुनिया

भविष्यातील डॉक्टर केवळ उपचार करणारे नव्हे, तर समाजाभिमुख आरोग्यदूत!

वैद्यकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर महाराष्ट्राला ओळख निर्माण करून देणाऱ्या ‘पल्स’ या वैद्यकीय परिषदेचे आयोजन मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर येथे २७ व २८ मार्च २०२६ रोजी करण्यात येणार आहे. या परिषदेत देशातून आणि जगभरातून वैद्यक क्षेत्रातील २९०० पेक्षा जास्त तज्ज्ञ, अभ्यासक आणि मान्यवर सहभागी होणार आहेत.  या परिषदेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचा हा विशेष लेख... -हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये मंत्री, महाराष्ट्र शासन पल्स वैद्यकीय परिषदेच्या माध्यमातून आरोग्य व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील नवोन्मेष, संशोधन पुढे येईल. या क्षेत्रात नवनवीन संकल्पना, कार्य करणाऱ्या स्टार्टअप्सलाही परिषदेत व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. जगभरातून उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेले तज्ज्ञ, अभ्यासक, संशोधक परिषदेत येणार आहेत. त्यामुळे आपल्या आरोग्यवस्थेचा पाया अधिक बळकट करणे...
छत्रपती संभाजीनगरचे छायाचित्रकार बैजू पाटील यांना अमेरिकेतील प्रतिष्ठेचा ‘रिफोकस वर्ल्ड फोटोग्राफी अवॉर्ड’, जागतिक पुरस्कारावर प्रथमच भारतीयाचे नाव!
दुनिया, देश

छत्रपती संभाजीनगरचे छायाचित्रकार बैजू पाटील यांना अमेरिकेतील प्रतिष्ठेचा ‘रिफोकस वर्ल्ड फोटोग्राफी अवॉर्ड’, जागतिक पुरस्कारावर प्रथमच भारतीयाचे नाव!

न्यूयॉर्क: छत्रपती संभाजीनगरातील जागतिक किर्तीचे वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांना अमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठेचा ‘रिफोकस वर्ल्ड फोटोग्राफी अवॉर्ड’ जाहीर झाला आहे. जागतिकस्तरावरील या पुरस्कारावर आपली नाममुद्रा उमटवणारे बैजू पाटील हे पहिलेच वन्यजीव छायाचित्रकार ठरले आहेत. या पुरस्कारासाठी बैजू पाटील यांनी निसर्गाच्या अफाट विश्वातील एक 'दुर्मिळ क्षण' टिपण्यासाठी तब्बल १५ दिवस संयमी पाठलाग करून भरतपूरच्या अभयारण्यात टिपलेले छायाचित्र पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरले. १०९ देशांतील हजारो दिग्गज छायाचित्रकारांना मागे टाकत बैजू पाटील यांनी मिळवलेले हे यश भारतीय छायाचित्रण क्षेत्रातील ऐतिहासिक सुवर्णक्षण ठरले आहे. राजस्थानातील भरतपूर अभयारण्यात बैजू पाटील यांनी एका अशा संघर्षाची गाथा कॅमेऱ्यात कैद केली, जी पाहून जागतिक स्तरावरील परीक्षकही थक्क झाले. पाण्याखाली शिकार करणारा ‘स्नेक बर्ड’ आणि त्य...
दरवर्षी वीजदरात ३ टक्के कपात करून ग्राहकांना स्वस्तात वीज देऊ, शेतकऱ्यांचे फिडर सौर ऊर्जेवर आणून स्वतंत्र १६ हजार मेगा वॅट वीजनिर्मितीः फडणवीस
दुनिया, महाराष्ट्र

दरवर्षी वीजदरात ३ टक्के कपात करून ग्राहकांना स्वस्तात वीज देऊ, शेतकऱ्यांचे फिडर सौर ऊर्जेवर आणून स्वतंत्र १६ हजार मेगा वॅट वीजनिर्मितीः फडणवीस

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): देशात महाराष्ट्र हे सौर ऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारे राज्य ठरले आहे. शेतकऱ्यांसाठी फिडर सौर ऊर्जेवर आणून स्वतंत्र १६ हजार मेगा वॅट वीज निर्मिती करु. त्यामुळे अन्य वापरातील विजेच्या दरात आपण दरवर्षी ३ टक्के कपात करुन ग्राहकांना स्वस्त वीज देऊ शकतो,असे आश्वसन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.  'मागेल त्याला सौर कृषीपंप' योजनेत महाराष्ट्राने विश्वविक्रम केला आहे. महावितरणने एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषीपंप स्थापित करण्याचा उच्चांक गाठला. या विक्रमाची गिनीज बुकमध्ये यशस्वी नोंद झाली. गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा आज छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा एमआयडीसीमध्ये ऑरिक सिटी मैदानावर पार पडला. या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. या विश्वविक्रमाची घोषणा करण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड...
मोदी सरकारच्या सल्ल्यानुसार एलआयसीने अदानीला दिले ३२ हजार कोटी रुपये, कॉर्पोरेट मित्राला वाचवण्यासाठी वापरला गरिब-मध्यमवर्गीयांच्या विम्याचा पैसा!
दुनिया, देश

मोदी सरकारच्या सल्ल्यानुसार एलआयसीने अदानीला दिले ३२ हजार कोटी रुपये, कॉर्पोरेट मित्राला वाचवण्यासाठी वापरला गरिब-मध्यमवर्गीयांच्या विम्याचा पैसा!

नवी दिल्लीः या वर्षाच्या सुरूवातीलाच जेव्हा अदानी समूहाचे मालक गौतम अदानी प्रचंड कर्जात बुडाले होते, अमेरिकेमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करत होते आणि अनेक बड्या युरोपीयन व अमेरिकी बँका त्यांना मदत करण्यासाठी धजावत नव्हत्या, तेव्हा मोदी सरकार आणि सरकारी विमा कंपनी लाईफ इंन्श्योरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एलआयसी त्यांना सावरण्यासाठी पुढे आले होते. मोदी सरकारच्या योजनेनुसार एलआयसीने तेव्हा अदानी समूहाच्या उद्योगात तब्बल ३.९ अब्ज डॉलर्स म्हणजेच ३२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती, असा खळबळजनक दावा द वॉशिंग्टन पोस्टने केला आहे. एलआयसीमध्ये गरिब, मध्यमवर्गीय आणि ग्रामीण भागातील लोकांच्या विम्याचा पैसा गुंतवलेला असतो. त्यामुळे कॉर्पोरेट मित्राला वाचवण्यासाठी मोदी सरकारने गरिब व मध्यमवर्गीयांच्या घामाचा पैसा का वापरला?, असा सवाल केला जात आहे. अमेरिकेतील प्रतिष्ठित वृत्त...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!