CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारकडून तिन्ही मागण्या मान्य, कॉक्रोच जनता पार्टीचे जंतर-मंतरवरील आंदोलन मागे!
नवी दिल्लीः कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर-मंतरवर तब्बल ३६ दिवस निडरपणे केलेल्या आंदोलनापुढे मान तुकवत मोदी सरकारने अखेर नमते घेतले आणि आज दुपारी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यानंतर केंद्र सरकारने कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) तिन्ही मागण्या केल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने जंरत-मंतरवरील आंदोलन मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली आहे. आंदोलंकानी शांततापूर्ण मार्गाने जंतर-मंतर रिकामे करावे आणि आपल्या घरी जावे असे आवाहन सीजेपीच्या वतीने आंदोलकांना करण्यात आले.
नीट पेपरफुटी प्रकरण आणि देशातील शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदी कारभाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ही कॉक्रोच जनता पार्टीची पहिली व मुख्य मागणी आज दुपारी २ वाजून १८ मिनिटांनी प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर मान्य झाली. धर्मेंद्र प्रधान य...










