श्रद्धेचा निकष लावून रामजन्मभूमी हिंदूंच्या हवाली, मग त्याच निकषांवर महाबोधी महाविहार बौद्धांच्या हवाली का करत नाही?: भीमराव आंबेडकर यांचा खडा सवाल
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): देशात कोणत्या जाती-धर्माचा पक्षकार आहे, हे पाहून न्याय दिला जात असून रामजन्मभूमी देशातील कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा विषय असल्याचे सांगत ती हिंदूंच्या हवाली करण्यात आली. परंतु बोधगयेतील महाबोधी महाविहार हा केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील कोट्यवधी बौद्धांच्या श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय असतानाही रामजन्मभूमीचाच निकष लावून महाविहार बौद्धांच्या हवाली का केले जात नाही? त्यासाठी पुराव्यांची मागणी केली का केली जाते? असा खडा सवाल अखिल भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी रविवारी केला.
आपल्या प्रेरणादायी धम्मदेसनांद्वारे बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्मितीसाठी धम्म प्रचार-प्रसाराच्या कार्याला वाहून घेतलेले भिक्खू करूणानंद थेरो यांचा महाथेरो विधान समारंभ आ...










