विशेष

विद्यापीठातील प्राध्यापक भरतीला उच्च न्यायालयाची स्थगितीः मुलाखती घ्या, पण निवड यादी तयार करू नका; ११ फेब्रुवारीच्या जीआरला आव्हान देणाऱ्या याचिकेवर खंडपीठाचे आदेश
महाराष्ट्र, विशेष

विद्यापीठातील प्राध्यापक भरतीला उच्च न्यायालयाची स्थगितीः मुलाखती घ्या, पण निवड यादी तयार करू नका; ११ फेब्रुवारीच्या जीआरला आव्हान देणाऱ्या याचिकेवर खंडपीठाचे आदेश

छत्रपती संभाजीनगरः  राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापक भरतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ११ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाआधारे होऊ घातलेल्या प्राध्यापक भरतीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने चाप लावला असून या शासन निर्णयाआधारे सुरू असलेली मुलाखतीची प्रक्रिया सुरू ठेवा, परंतु कोणत्याही संवर्गातील निवड यादी तयार करू नका, असे आदेश न्या. नितीन सूर्यवंशी आणि न्या. आबासाहेब शिंदे यांच्या खंडपीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला दिले आहेत. याच शासन निर्णयाच्या आधारे राज्यातील सर्वच सार्वजनिक विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरू असून उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे ती सर्वच भरती प्रक्रिया अनिश्चिततेचे सावटात सापडण्याची शक्यता आहे. यूजीसी कायद्याच्या कलम २६ अं...
सीएचबीवरील प्राध्यापक प्रकरणात उच्च शिक्षण संचालकांना खडबडून जाग: मान्यता, मानधनात हयगय केल्यास शिस्तभंगाची कारवाई; नियुक्त्यांतील विलंबावर मात्र मौनच!
महाराष्ट्र, विशेष

सीएचबीवरील प्राध्यापक प्रकरणात उच्च शिक्षण संचालकांना खडबडून जाग: मान्यता, मानधनात हयगय केल्यास शिस्तभंगाची कारवाई; नियुक्त्यांतील विलंबावर मात्र मौनच!

पुणेः राज्यातील तासिकातत्वारील प्राध्यापकांच्या नियुक्त्या, मान्यता आणि मानधन वितरणातील विलंबास जबाबदार धरून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा मिळताच उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर खडबडून जागे झाले असून त्यांनी १४ ऑगस्टपर्यंत तासिकातत्वावरील प्राध्यापकांच्या मान्यतेचे प्रस्ताव निकाली न काढणाऱ्या विद्यापीठातील जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची तर मानधन वितरणास विलंब करणाऱ्या प्राचार्यांचे वेतन रोखण्याची आणि विभागीय सहसंचालकांविरुद्धही शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली आहे. परंतु १७ ऑक्टोबर २०२२ च्या शासन निर्णयाचे उल्लंघन करून या प्राध्यापकांच्या नियुक्त्याच वेळेत न करणाऱ्यांविरुद्ध काय कारवाई करणार? याबाबत मात्र त्यांनी मौन धारण केले आहे. यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दीडमहिना उलटला तरी अनेक महाविद्यालयांत तासिकातत्वारील प्राध्यापकांच्या नियुक्त्याच झालेल्या नाहीत. परिण...
कंत्राटी प्राध्यापक भरतीच्या टीईटी परीक्षेतही महाघोटाळा, अर्ध्या गुणाचे निगेटिव्ह मार्किंग असताना उमेदवारांना भलतेच गुण दिल्यामुळे परीक्षेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह!
महाराष्ट्र, विशेष

कंत्राटी प्राध्यापक भरतीच्या टीईटी परीक्षेतही महाघोटाळा, अर्ध्या गुणाचे निगेटिव्ह मार्किंग असताना उमेदवारांना भलतेच गुण दिल्यामुळे परीक्षेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह!

छत्रपती संभाजीनगरः  नीट पेपरफुटीसह देशातील विविध स्पर्धा परीक्षांतील घोटाळ्यांमुळे देशभरातील वातावरण तापले असतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने कंत्राटी प्राध्यापक भरतीसाठी घेतलेल्या ऑनलाइन पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेतही महाघोटाळा झाल्याचे सज्जड पुरावे न्यूजटाऊनच्या हाती आले असून या परीक्षेत अर्ध्या गुणाचे निगेटिव्ह मार्किंग असताना प्रत्यक्षात उमेदवारांना भलतेच गुण देण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आल्यामुळे या परीक्षेची पारदर्शकता आणि विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर आणि धाराशिव उपपरिसरातील विविध शैक्षणिक विभागांमध्ये ३२ हजार रुपये प्रतिमहिना एकत्रित वेतनावर ११ महिन्यांच्या कालावधीसाठी एकूण १४१ कंत्राटी सहायक प्राध्यापकांच्या नियुक्ती करिता अर्ज मागवण्यात आले होते. अर्ज केलेल्या उमेदवारांची ३ व ४ ऑ...
जालन्याच्या म. फुले समाजकार्य महाविद्यालयात मोठी लाचखोरी, सेवानिवृत्तीच्या लाभासाठी निवृत्त प्रबंधकाकडून दीडलाखांची लाच स्वीकारताना प्राचार्यांसह पाच कर्मचाऱ्यांना बेड्या!
महाराष्ट्र, विशेष

जालन्याच्या म. फुले समाजकार्य महाविद्यालयात मोठी लाचखोरी, सेवानिवृत्तीच्या लाभासाठी निवृत्त प्रबंधकाकडून दीडलाखांची लाच स्वीकारताना प्राचार्यांसह पाच कर्मचाऱ्यांना बेड्या!

जालनाः राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयात कार्यरत असलेल्या आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे संस्थाचालकांकडून पदोपदी कसे आर्थिक शोषण केले जाते याचीच साक्ष देणारी लाचखोरीची मोठी घटना आज जालना येथील महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयात घडली. तब्बल वर्षभरापूर्वी प्रबंधकपदावरून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला अर्जित रजांच्या रोखीकरणासह सेवानिवृत्तीचे अन्य लाभ देण्यासाठी १ लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारताना या महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह पाच कर्मचाऱ्यांना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडून बेड्या ठोकल्यामुळे उच्च शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जालन्याच्या परिवर्तन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने १९९३ पासून जालन्यातच महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय हे अशासकीय अनुदानित महाविद्यालय चालवण्यात येते. रिपाइंचे राष...
चंद्रकांतदादांच्या उच्च शिक्षण विभागाच्या ‘बाताच मोठ्या अन् कृती शून्य’: आता राज्याचे संचालक डॉ. देवळाणकरांविरूद्ध दाखल होणार फौजदारी गुन्हा?
महाराष्ट्र, विशेष

चंद्रकांतदादांच्या उच्च शिक्षण विभागाच्या ‘बाताच मोठ्या अन् कृती शून्य’: आता राज्याचे संचालक डॉ. देवळाणकरांविरूद्ध दाखल होणार फौजदारी गुन्हा?

पुणेः राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत तासिकातत्वावर (सीएचबी) काम करणाऱ्या प्राध्यापकांसाठी स्वतंत्र डिजिटल पोर्टल सुरू करण्यात येईल आणि या प्राध्यापकांच्या प्रतितास मानधनातही करण्यात येईल, अशी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेली घोषणा हवेतच विरली असून यंदाचे शैक्षणिक सत्र सुरू होऊन दीडमहिना उलटूनही अद्याप हे पोर्टल कार्यान्वित झाले नाही किंवा मानधनवाढीचा शासन निर्णयही निघालेला नाही. त्यामुळे राज्यातील तासिकातत्वावरील प्राध्यापक उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील व राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्याविषयी संताप व्यक्त करू लागले आहेत. दरम्यान, तासिकातत्वावरील प्राध्यापक नियुक्तीच्या वेळापत्रकाचा ‘विस्कोट’ करणारे राज्यातील सर्व विभागीय सहसंचालक, महाविद्यालयांचे प्राचार्य आणि कार्यालयीन अधीक्षकांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई न केल्यास राज्...
धक्कादायक: मंजूर आराखड्यानुसार झालेच नाही विद्यापीठातील नामांतर शहीद स्मारकाचे काम, मूळ डिझाईनमध्ये कंत्राटदाराने केले परस्पर बदल; आंबेडकरवाद्यांच्या भावनांशी खेळ!
महाराष्ट्र, विशेष

धक्कादायक: मंजूर आराखड्यानुसार झालेच नाही विद्यापीठातील नामांतर शहीद स्मारकाचे काम, मूळ डिझाईनमध्ये कंत्राटदाराने केले परस्पर बदल; आंबेडकरवाद्यांच्या भावनांशी खेळ!

छत्रपती संभाजीनगरः मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या शहिदांच्या स्मरणार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात येत असलेल्या नामांतर शहीद स्मारकाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करून कंत्राटदाराने सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते आणि विद्यापीठाच्या कार्यकारी अभियंत्याशी संगनमत करून खिसे भरल्याची बाब उघडकीस आली असतानाच या स्मारकाचे काम मंजूर आराखड्यानुसार न करता कंत्राटदाराने मूळ डिझाईनमध्ये परस्पर बदल केल्याचे धक्कादायक पुरावे न्यूजटाऊनच्या हाती आले आहेत. तब्बल १७ वर्षे चाललेल्या मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात अनेक नामांतरवाद्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. १९९४ मध्ये मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार झाल्यानंतर तब्बल २९ वर्षांनंतर विद्यापीठ परिसरात नामांतर शहीद स्मारकाचे बांधकाम सुरू झाल...
नामांतर शहीद स्मारकाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असताना विद्यापीठाच्या कार्यकारी अभियंत्याने झोपा काढत केली कर्तव्यात कसूर, आता कुलगुरू कारवाई करणार का?
महाराष्ट्र, विशेष

नामांतर शहीद स्मारकाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असताना विद्यापीठाच्या कार्यकारी अभियंत्याने झोपा काढत केली कर्तव्यात कसूर, आता कुलगुरू कारवाई करणार का?

छत्रपती संभाजीनगरः मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी झालेल्या ज्वाजल्य लढ्याचा इतिहास आणि या लढ्यात प्राणाची आहुती दिलेल्या ज्ञात-अज्ञात शहिदांच्या सन्मानार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात येत असलेल्या नामांतर शहीद स्मारकाच्या बांधकामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेले विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता आर. डी. काळे यांनी झोपा काढत कर्तव्यात कसूर केल्यामुळेच या स्मारकाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले. परिणामी या स्मारकाचे लोकार्पण होण्याआधीच गंभीर संरचनात्मक त्रुटीमुळे स्मारकाचा मुख्य स्तंभ झुकला आणि नामांतर चळवळीतील कार्यकर्ते आणि आंबेडकरी समूहाच्या भावनांशीच खेळण्याचा प्रमाद घडला. त्यामुळे कर्तव्यात गंभीर कसूर करणारे कार्यकारी अभियंता काळे यांच्यावर कुलगुरू डॉ. विजय फुलारी कारवाई करणार का?, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा विद्यापीठ...
विद्यापीठातील नामांतर शहीद स्मारकाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे, गंभीर संरचनात्मक त्रुटींमुळे लोकार्पण होण्याआधीच झुकला स्मारकाचा मुख्य स्तंभ!
महाराष्ट्र, विशेष

विद्यापीठातील नामांतर शहीद स्मारकाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे, गंभीर संरचनात्मक त्रुटींमुळे लोकार्पण होण्याआधीच झुकला स्मारकाचा मुख्य स्तंभ!

छत्रपती संभाजीनगरः मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याच्या मागणीसाठी झालेल्या ऐतिहासिक नामांतर लढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या ज्ञात-अज्ञात नामांतर योद्ध्यांच्या स्मरणार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात आलेल्या नामांतर शहीद स्मारकाचे बांधकाम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे झाले असून स्मारकाच्या मुख्य स्तंभाच्या बांधकाम गंभीर स्वरुपाच्या संरचनात्मक त्रुटी असल्यामुळे हे स्मारक लोकार्पण होऊन खुले होण्याआधीच स्मारकाचा मुख्य स्तंभ झुकल्याची धक्कादायक बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यानेच केलेल्या पाहणीत आढळून आली आहे. आता हा मुख्य स्तंभ पाडून तो नव्याने उभारण्याचे आदेश कंत्राटदाराला देण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा विद्यापीठाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ’ असे नामांतर करा, या मागणीसाठी १९७७ ते १९९४ अशी तब्बल १७ वर्...
राज्यातील जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामांचे फेरवाटप; वाचा आता कोणाकडे कोणती जबाबदारी?
महाराष्ट्र, विशेष

राज्यातील जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामांचे फेरवाटप; वाचा आता कोणाकडे कोणती जबाबदारी?

मुंबईः राज्यातील प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व कार्यक्षम करण्यासाठी राज्यातील जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) आणि उपजिल्हाधिकारी (महसूल) यांच्यातील कामे आणि जबाबदाऱ्यांचे फेरवाटप करण्यात आले आहे. प्रशासकीय कार्यपद्धतीत झालेल्या कालानुरूप बदलांचा विचार करून या अधिकाऱ्यांच्या अधिकार व कामकाजाचे फेरवाटप करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी (महसूल) यांच्यामधील अधिकार व कामकाजाचे पुनर्विलोकन करून सुधारित व सुसंगत वाटप निश्चित करण्यासाठी नाशिकच्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार हे फेरवाटप करण्यात आले असून याबाबतचा शासन निर्णय ३ जुलै रोजी जारी करण्यात आला आहे. सध्याच्या प्रशासकीय गरजा, कामकाजात वाढलेली गुंतागुंत व जबाबदाऱ्यांचा विचार करता...
मराठवाड्याच्या हितरक्षणासाठी डॉ. विजय फुलारींना कुलगुरूपदावरून हटवा, २० गंभीर मुद्यांचे ‘आरोपपत्र’ ठेवून अधिसभा सदस्यच करणार १३ जुलैपासून आमरण उपोषण
महाराष्ट्र, विशेष

मराठवाड्याच्या हितरक्षणासाठी डॉ. विजय फुलारींना कुलगुरूपदावरून हटवा, २० गंभीर मुद्यांचे ‘आरोपपत्र’ ठेवून अधिसभा सदस्यच करणार १३ जुलैपासून आमरण उपोषण

छत्रपती संभाजीनगरः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय जनार्दन फुलारी यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच त्यांच्या कार्यपद्धतीबाबत वेगवेगळे आक्षेप घेतले जात असतानाच आता प्राचार्यांशी अपमानास्पद वागणूक, लोकप्रतिनिधींची हेटाळणी, अधिकार मंडळात घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीस हटकून टाळाटाळ, प्रश्न उपस्थित करणाऱ्या अधिसभा सदस्यांवर दडपशाही, विद्यापीठातील प्रश्न चर्चेद्वारे सोडवण्याऐवजी संघर्षाची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न असे विविध गंभीर स्वरुपाच्या २० मुद्यांचे आरोपपत्र ठेवून त्यांच्या कार्यकाळातील एकूणच कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी अधिसभा सदस्य डॉ. संजय कांबळे हे १३ जुलैपासूनच आमरण उपोषण करणार आहेत. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक राहिलेले डॉ. विजय जनार्दन फुलारी यांची २४ जानेवारी २०२४ रोजी ...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!