अभिव्यक्ती

महान शायर बशीर बद्र यांचे निधन, उर्दू गझलेला राजवाड्याबाहेर काढून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणारा ‘आधुनिक गझलांचा उस्ताद’ काळाच्या पडद्याआड!
अभिव्यक्ती, देश

महान शायर बशीर बद्र यांचे निधन, उर्दू गझलेला राजवाड्याबाहेर काढून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणारा ‘आधुनिक गझलांचा उस्ताद’ काळाच्या पडद्याआड!

भोपाळः उर्दू गझलेला राजवाडे आणि आमीरांच्या मैफलींमधून बाहेर काढून ती सर्वसामान्य लोकांच्या ह्रदयापर्यंत पोहोचवणारे आधुनिक गझलांचे उस्ताद महान शायर बशीर बद्र यांचे आज वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. अत्यंत साध्या, सोप्या आणि मनाला भिडणाऱ्या शब्द रचनांमुळे त्यांनी उर्दू आणि गझल प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या निधनाने उर्दू आणि हिंदी साहित्य विश्वात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केल्या जात आहेत. फारसी आणि अरबी भाषेच्या क्लिष्ट चौकटीतून उर्दू गझल बाहेर काढून साध्या, सोप्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषेत तिची रचना करून ती सर्वसामान्यांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवण्याचे सारे श्रेय बशीर बद्र यांना जाते. कठीण बोजड शब्दांऐवजी सर्वसामान्यांच्या दैनंदिन बोलीभाषेला त्यांनी गझलेत स्थान दिले. त्यामुळेच त्यांच्या गझला केवळ उर्दू साहित्याच्या जाणकारांपुरत्याच सीमीत न र...
नात्यांचे तीन मुखवटे: जगण्याची आणि जपण्याची कला!
अभिव्यक्ती

नात्यांचे तीन मुखवटे: जगण्याची आणि जपण्याची कला!

एकाच माणसाला हे तीन चेहरे सांभाळताना मोठी कसरत करावी लागते. हे मुखवटे म्हणजे ढोंगीपणा नसून तो एक ‘अदृश्य अभिनय’ आहे, जो केवळ प्रेमापोटी केला जातो. नात्यातलं घर हे विटा-मातीपेक्षा शब्दांच्या संयमावर आणि शांततेवर उभं असतं. शेवटी, नाती शब्दांनी नाही, तर अनेकदा न बोललेल्या मौनानेच अधिक काळ टिकतात आणि बहरतात. या तीन अवस्थांतूनच नात्यांचं नाजूक विणकाम अखंड आणि अभेद्य राहते... -राहुल हरिभाऊ इंगळे-पाटील, रा.करकट्टा ता.जि.लातूर. नात्यांची वीण टिकवण्यासाठी कधी डोळस अंधत्व, कधी सहनशील बहिरेपणा आणि कधी संयमी मौन स्वीकारावं लागतं. समोरच्याच्या उणिवांकडे दुर्लक्ष, कटू शब्दांना माफ करणं आणि योग्य वेळी शांत राहणं हीच नाती जपण्याची खरी कला आहे. प्रेमासाठी केलेला हा अदृश्य अभिनयच नात्यांना दीर्घायुष्य देतो. नजरेवरती पडदा टाकू, उणिवांचा हा नजारा,चूक तुझी ही भासे मजला, देखणा तुझा नखरा।डोळस सोडून अंधा...
अनुदानित महाविद्यालयांचे खासगी विद्यापीठात रुपांतर: बहुजन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक’?
अभिव्यक्ती, विशेष

अनुदानित महाविद्यालयांचे खासगी विद्यापीठात रुपांतर: बहुजन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक’?

महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाचा पाया हा 'अनुदानित' व्यवस्थेवर उभा आहे. या व्यवस्थेमुळेच आज शेतमजुराचा मुलगा आणि आदिवासी पाड्यावरील मुलगी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करू शकत आहे. जर महाराष्ट्रातील अनुदानित महाविद्यालये खासगी विद्यापीठांमध्ये रुपांतरित झाली, तर भविष्यात दलित, आदिवासी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जाऊ शकतो. हा केवळ शैक्षणिक बदल नसून संविधानाच्या अनुच्छेद १५ आणि १६ वर केलेला थेट हल्ला आहे. अनुदानित महाविद्यालयांची खासगी विद्यापीठे करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणावर विशेष लेख.... -प्रा. डॉ. सतीश डी. गावित, अधिसभा सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद). महाराष्ट्र राज्याच्या उच्च शिक्षण क्षेत्रात सध्या एका धोरणात्मक बदलाची जोरदार चर्चा सुरू आहे. राज्यातील अनुदानित महाविद्यालयांचे रूपांतर खासगी विद्यापीठांमध्ये क...
भविष्यातील डॉक्टर केवळ उपचार करणारे नव्हे, तर समाजाभिमुख आरोग्यदूत!
अभिव्यक्ती, दुनिया

भविष्यातील डॉक्टर केवळ उपचार करणारे नव्हे, तर समाजाभिमुख आरोग्यदूत!

वैद्यकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर महाराष्ट्राला ओळख निर्माण करून देणाऱ्या ‘पल्स’ या वैद्यकीय परिषदेचे आयोजन मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर येथे २७ व २८ मार्च २०२६ रोजी करण्यात येणार आहे. या परिषदेत देशातून आणि जगभरातून वैद्यक क्षेत्रातील २९०० पेक्षा जास्त तज्ज्ञ, अभ्यासक आणि मान्यवर सहभागी होणार आहेत.  या परिषदेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचा हा विशेष लेख... -हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये मंत्री, महाराष्ट्र शासन पल्स वैद्यकीय परिषदेच्या माध्यमातून आरोग्य व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील नवोन्मेष, संशोधन पुढे येईल. या क्षेत्रात नवनवीन संकल्पना, कार्य करणाऱ्या स्टार्टअप्सलाही परिषदेत व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. जगभरातून उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेले तज्ज्ञ, अभ्यासक, संशोधक परिषदेत येणार आहेत. त्यामुळे आपल्या आरोग्यवस्थेचा पाया अधिक बळकट करणे...
कांशीराम जरुरी है…!
अभिव्यक्ती, राजकारण

कांशीराम जरुरी है…!

कांशीरामजी यांच्या पश्चात आज त्यांचे महत्व जाणवू लागले आहे. ‘एकच साहेब बाबासाहेब!’ आम्ही अन्य कुणाला मानत नाही असे म्हणणारे देखील कांशीरामजी यांचे कार्य आज मान्य करत आहेत. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उर्वरित राजकीय कार्य कांशीरामजी यांनी पूर्ण केले हे त्रिवार सत्य आज उशिरा का होईना मान्य केले जात आहे. मान्यवर कांशीरामजी यांच्यामुळे देशात फुले, शाहू, आंबेडकरी विचारांची सत्ता निर्माण होऊ शकली, देशातील बहुजन समाजात एक राजकीय महत्त्वाकांक्षा निर्माण होऊ शकली! इंजि.चंद्रप्रकाश देगलूरकर, नांदेड पंचवीस-तीस वर्षांपूर्वी आम्ही एक नारा देत होतो. त्याची आज सर्वत्र प्रचिती येत आहे. तेंव्हा ती चळवळीची जरुरी होती, आज ती देशाची मजबुरी झाली आहे. यावर्षी सर्व सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष मान्यवर कांशीरामजी यांची जयंती साजरी करीत आहेत. या निमित्ताने कांशीरामजी यांचे स्मरण केले जात आहे. ...
पुढारी हरामखोर निघाले तर मग आपण खपवून कसे घेतले?: २० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लोकनाथ यशवंत यांचा सवाल
अभिव्यक्ती, महाराष्ट्र

पुढारी हरामखोर निघाले तर मग आपण खपवून कसे घेतले?: २० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लोकनाथ यशवंत यांचा सवाल

नांदेड येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च असे दोन दिवस सायन्स कॉलेजच्या सदाशिवराव पाटील क्रीडा संकुल मैदानावर उभारण्यात आलेल्या राजा ढाले साहित्यनगरीत २० वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन होत आहे. आज रात्री पँथर पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर आधारित ‘भयंकराच्या दरवाजात कोण?’ या नृतनाट्याने या संमेलनाची सुरूवात होत आहे. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा संपादित भाग... -लोकनाथ यशवंत, अध्यक्ष, २० वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन, नांदेड. मी एक कवी असून कविता हे माझे सर्वस्व आहे. कविता माझ्या जीवनाचा श्वास आहे. जगातील सर्व माणसांचे चांगले दिवस येवोत, या भावनेने मी नेहमी कविता आविष्कारतो. परिस्थितीनुसारच कविता सुचतात. त्यात माझे स्वतःचे काहीच नाही. सगळे सामाजिक परिस्थितीवर अवलंबून असते. एखादा विषय डोक्यात आला की सतत मनात घोळत असतो. त्य...
शाळा, सर्व सरकारी कार्यक्रमांमध्ये आता ५२ सेकंदांच्या ‘जन गण मन’पूर्वी ३ मिनिटे १० सेकंदांचे ‘वंदे मातरम्’ अनिवार्य!
अभिव्यक्ती, देश

शाळा, सर्व सरकारी कार्यक्रमांमध्ये आता ५२ सेकंदांच्या ‘जन गण मन’पूर्वी ३ मिनिटे १० सेकंदांचे ‘वंदे मातरम्’ अनिवार्य!

नवी दिल्लीः केंद्र सरकारने आता शाळा, प्रत्येक सरकारी कार्यक्रम तसेच इतर अधिकृत आयोजनांमध्ये ५२ सेकंदांच्या ‘जन गण मन’ या राष्ट्रगीतापूर्वी ३ मिनिटे १० सेकंदांच्या ‘वंदे मातरम्’ च्या संपूर्ण सहा कडव्यांचे गायन किंवा वादन अनिवार्य केले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत १० पानांचा सविस्तर आदेश जारी केला आहे. जेव्हा राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान एकत्र गायले किंवा वाजवले जातील तेव्हा ‘वंदे मातरम्’ आधी सादर केले जाईल. सर्व उपस्थित व्यक्तींना राष्ट्रगान गायले किंवा वाजवले जात असताना सावधान मुद्रेत उभे राहणे अनिवार्य असेल. पंरतु चित्रपटगृहात चित्रपट किंवा न्यूजरिलच्या वेळी वंदे मातरम् वाजवले जात असताना उभे राहणे अनिवार्य नसेल. कारण त्यामुळे लोकांना त्रास होऊ शकतो किंवा व्यवस्था बिघडू शकते, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक नियमांवलींमध्ये म्हटले आहे. प्रत्येक अधिकृत ...
यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कारासाठी प्रवेशिका व पुस्तके पाठवण्यासाठी ३० जानेवारी २०२६ पर्यंतची मुदत
अभिव्यक्ती, महाराष्ट्र

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कारासाठी प्रवेशिका व पुस्तके पाठवण्यासाठी ३० जानेवारी २०२६ पर्यंतची मुदत

मुंबई: मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२५ करिता राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून), तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६ पर्यंत पाठवता येणार आहेत. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत.या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत्त, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई- ४०० ०२५ यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा...
कै. बी. जी. देशमुख वार्षिक निबंधलेखन स्पर्धा जाहीर; ‘हे’ आहेत स्पर्धेचे विषय, वाचा सर्वांसाठी खुल्या स्पर्धेचा सविस्तर तपशील
अभिव्यक्ती, महाराष्ट्र

कै. बी. जी. देशमुख वार्षिक निबंधलेखन स्पर्धा जाहीर; ‘हे’ आहेत स्पर्धेचे विषय, वाचा सर्वांसाठी खुल्या स्पर्धेचा सविस्तर तपशील

मुंबई: भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र प्रादेशिक शाखा यांच्यातर्फे कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा २०२५-२०२६ जाहीर करण्यात आली आहे.  निबंध स्पर्धा सर्वांसाठी खुली असून निबंध कागदाच्या एकाच बाजूस टंकलिखित करून त्यावर केवळ टोपणनाव लिहावे. निबंधाच्या चार प्रती तयार करून २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संस्थेकडे सादर करावे, असे भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र प्रादेशिक शाखेचे मानद सचिव विजय सतवीर सिंह यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळवले आहे. या वर्षीच्या स्पर्धेसाठी १) कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग (Era of Artificial Intelligence), २) सोशल मीडिया:आव्हाने आणि संधी (Social Media: Challenges and Opportunities), ३) नागरिकांचे जीवन सुलभ करणे (Ease of Living) हे विषय निश्चित करण्यात आले आहेत. स्पर्धेतील निबंध इंग्रजी किंवा मराठी भाषेत सादर करता येतील. निबंध तीन हजार शब्दांपे...
गेल्या दहा वर्षांच्या कालखंडातील ‘अघोषित आणीबाणी’ ही १९७५ च्या घोषित आणीबाणीपेक्षाही विध्वंसक: ‘साधना’चे संपादक शिरसाठ यांचे रोखठोक विश्लेषण
अभिव्यक्ती, महाराष्ट्र

गेल्या दहा वर्षांच्या कालखंडातील ‘अघोषित आणीबाणी’ ही १९७५ च्या घोषित आणीबाणीपेक्षाही विध्वंसक: ‘साधना’चे संपादक शिरसाठ यांचे रोखठोक विश्लेषण

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): १९७५ सालातील घोषित आणीबाणी ही भारतीय इतिहासातील काळा कालखंड होता. परंतु देशातील गेल्या दहा वर्षांच्या कालखंडातील अघोषित आणीबाणीने देशाची लोकशाही, संसदेचे अस्तित्व आणि न्यायालयांचे कामकाज यांची प्रचंड मोडतोड केली. लोकांमध्ये दहशत आणि एकाधिकारशाही ठसवली. घोषित आणीबाणीपेक्षा ही अघोषित आणीबाणीच जास्त परिणाम साधत असेल तर घोषित आणीबाणीची गरजच काय?,  असे विवेचन साप्ताहिक साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी केले. अनंत भालेराव प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या अनंत भालेराव पुरस्कारांचे वितरण रविवारी (९ नोव्हेंबर) छत्रपती संभाजीनगरात झाले. १९७५ च्या आणीबाणीच्या काळात वृत्तपत्रांची गळचेपी झालेली असतानाही या काळात ‘मराठवाडा’ दैनिकाचे संपादक अनंत भालेराव यांच्यासोबत काम केलेल्या गोपाळ साक्रीकर, निळू दामले आणि अरविंद गं. वैद्य या तीन ज्येष्ठ पत्रकारांना या पुरस्कार...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!