किसका और काहे का डर लगता है साब?
सुरेश पाटील, संपादक न्यूजटाऊन
विद्यापीठात शिकायला येणारे, परिवर्तनाचा हुंकार देणारे विद्यार्थी म्हणजे 'तुकडे-तुकडे गँग' आहे, असे नरेटिव्ह २०१४ नंतर केव्हाच सेट करून टाकण्यात आलेले आहे. दिल्लीच्या जेएनयूच्या निमित्ताने तर ते अधिक ठळकपणे अधोरेखित करण्यात सरकारने कुठलीच कसर सोडलेली नाही. अभिव्यक्ती, लोकशाही, आंदोलने या आता तद्दन फालतू गोष्टी बनलेल्या आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने स्वतंत्र पोलिस ठाण्याची केलेली मागणी ही त्या धोरणाचाच भाग नसेल कशावरून?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थी कालानुरूप दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि परवडेल अशा खर्चात विद्यापीठ परिसरात निवासाच्या व्यवस्थेची मागणी करत असताना विद्यापीठाचे प्रशासन मात्र विद्यार्थ्यांचे ‘भलतेच हित’ साधण्याच्या उद्योगात मग्न असल्याचे दिसते. नुकत्याच झालेल...