डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आरएसएस: समता आणि बहुसंख्याकतेच्या हिंदुत्वातील वैचारिक संघर्ष
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग म्हणजे विवेक, बंधुता, समता आणि न्याय तर आरएसएसचा मार्ग म्हणजे संस्कृती, राष्ट्रभक्ती आणि हिंदू एकात्मता. एका मार्गाचा उद्देश मानवाला मुक्त करणे होता, तर दुसऱ्याचा उद्देश संस्कृतीच्या चौकटीत सर्वांना बंदिस्त करून घेणे हा होता. या दोन विचारसरणींच्या संघर्षातूनच भारतीय लोकशाहीचा चेहराच ठरला.
प्रवीण बागडे, नागपूर
भारताच्या सामाजिक विचारविश्वात दोन प्रवाह कायम एकमेकांना छेद देत आले आहेत. एक म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा आणि मानवमुक्तीचा विचार आणि दुसरा म्हणजे आरएसएसचा हिंदुत्ववादी राष्ट्रवाद. या दोन विचारप्रवाहांचा संघर्ष हा केवळ इतिहासातील प्रसंग नसून तो आजही भारतीय लोकशाहीच्या आत्म्याला आकार देणारा संघर्ष आहे. एकीकडे आंबेडकरांचा विवेकाधारित, वैज्ञानिक, समतेवर उभा विचार आहे; तर दुसरीकडे आरएसएसचा संस्कृतीकेंद्रित, बहुसंख्याकवादी दृष्टिकोन आहे. य...










