अभिव्यक्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आरएसएस: समता आणि बहुसंख्याकतेच्या हिंदुत्वातील वैचारिक संघर्ष
अभिव्यक्ती, जीवनशैली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आरएसएस: समता आणि बहुसंख्याकतेच्या हिंदुत्वातील वैचारिक संघर्ष

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग म्हणजे विवेक, बंधुता, समता आणि न्याय तर आरएसएसचा मार्ग म्हणजे संस्कृती, राष्ट्रभक्ती आणि हिंदू एकात्मता. एका मार्गाचा उद्देश मानवाला मुक्त करणे होता, तर दुसऱ्याचा उद्देश संस्कृतीच्या चौकटीत सर्वांना बंदिस्त करून घेणे हा होता. या दोन विचारसरणींच्या संघर्षातूनच भारतीय लोकशाहीचा चेहराच ठरला. प्रवीण बागडे, नागपूर भारताच्या सामाजिक विचारविश्वात दोन प्रवाह कायम एकमेकांना छेद देत आले आहेत. एक म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा आणि मानवमुक्तीचा विचार आणि दुसरा म्हणजे आरएसएसचा हिंदुत्ववादी राष्ट्रवाद. या दोन विचारप्रवाहांचा संघर्ष हा केवळ इतिहासातील प्रसंग नसून तो आजही भारतीय लोकशाहीच्या आत्म्याला आकार देणारा संघर्ष आहे. एकीकडे आंबेडकरांचा विवेकाधारित, वैज्ञानिक, समतेवर उभा विचार आहे; तर दुसरीकडे आरएसएसचा संस्कृतीकेंद्रित, बहुसंख्याकवादी दृष्टिकोन आहे. य...
राज्यघटनेचे खरे शिल्पकार कोण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर की बी.एन.राव? वाचा मनुवादी बांडगुळांच्या विखारी अपप्रचाराची पोलखोल
अभिव्यक्ती, देश

राज्यघटनेचे खरे शिल्पकार कोण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर की बी.एन.राव? वाचा मनुवादी बांडगुळांच्या विखारी अपप्रचाराची पोलखोल

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीतील योगदान नगण्य होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नव्हे तर बी.एन. राव हेच भारतीय राज्यघटनेचे खरे शिल्पकार आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचा घटना समिती स्थापन करण्यास विरोध होता. घटना समितीने बाबासाहेबांची एकही मागणी मान्य केली नाही. राज्यघटना तयार झाल्यानंतरही ती जाळून टाकण्याची भाषा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. त्यामुळे बाबासाहेबांना राज्यघटनेचे शिल्पकार संबोधणे चुकीचे असल्याचा अपप्रचार सध्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून ‘अंधभक्तीच्या पदव्या’ प्राप्त केलेल्या मनुवादी बांडगुळांकडून सोशल मीडियावर केला जात आहे. बाबासाहेबांची वाढीस लागलेली स्वीकारार्हता आणि केंद्रात दहा वर्षे सत्ता असूनही बाबासाहेबांच्या राज्यघटनेतील तरतुदींमुळे हिंदुराष्ट्राच्या निर्मितीत आलेले अपयश या नैराश्यातून हा अपप्रचार केला जात आहे. मनुवादी बांडगुळांच्या प्रत्येक आक्षे...
नेपाळमधील उद्रेक फक्त डिजिटल स्वातंत्र्यासाठी की मदांध सत्तेला धडा शिकवण्यासाठी?
अभिव्यक्ती, दुनिया

नेपाळमधील उद्रेक फक्त डिजिटल स्वातंत्र्यासाठी की मदांध सत्तेला धडा शिकवण्यासाठी?

भारतात जवळजवळ संपूर्ण माध्यमे, मग ती प्रिंट असो वा इलेक्ट्रॉनिक-पूर्णपणे सरकारी झाली आहेत आणि सामान्य लोकांमध्ये ती 'गोदी मीडिया' म्हणून कुप्रसिद्ध आहेत. हाच प्रकार नेपाळमध्ये चालला होता. सोशल मीडियाद्वारेच लोकांना काही प्रमाणात योग्य माहिती मिळू शकत होती. त्यावर बंदी घालण्याची घोडचूक ओली सरकारने केली आणि या मुस्कटदाबीविरूध्द नेपाळी जनता पेटून उठली.  त्यापासून किमान नेपाळच्या शेजारी असलेल्या देशांनी तरी धडा घ्यायला हवा... प्रभाकर ढगे, आंतरराष्ट्रीय प्रश्नाचे अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार, पणजी गोदी मीडियाचा खोटा प्रचार नेहमीप्रमाणे जनतेच्या माथी मारण्यासाठी पंतप्रधान  के. पी. ओली सरकारने फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉटस्अप यासारख्या २६ सामाजिक माध्यमांवर बंदी घातली. त्याचा निषेध करत डिजीटल स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थी, तरुण तथा नागरिकांच्या ...
मराठा हेच कुणबी? नेमके काय आहे हैदराबाद गॅझेट?
अभिव्यक्ती, महाराष्ट्र

मराठा हेच कुणबी? नेमके काय आहे हैदराबाद गॅझेट?

मराठा आरक्षणाचा विषय ज्या-ज्या वेळी येतो, त्या वेळी हैदराबाद गॅझेटचा उल्लेख होतो. हैदराबाद गॅझेटचा उल्लेख मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी ही केला आहे. त्यामुळे हे हैदराबाद गॅझेट नक्की काय आहे? हे समजून घेणे महत्वाचे आहे.   प्रा.डॉ.पुंडलिक कोलते, छत्रपती संभाजीनगर हैदराबाद संस्थानात (आजचे मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटकचा काही भाग) निजामाच्या अंमलाखाली १७ जिल्हे होते. त्यात सध्याच्या मराठवाड्यातील जिल्ह्यांचा समावेश होता. त्यावेळी म्हणजे १८६२ मध्ये ब्रिटीश अधिकारी रिचर्ड मिड यांनी जनगणना केली होती. त्याची सुरूवात १८५० च्या दरम्यान करण्यात आली होती. १८८१ मध्ये जनगणनेचे रेकॉर्ड प्रकाशित करण्यात आले होते. जनगणनेचा हा प्रकाशित शासकीय दस्तावेज म्हणजेच ‘हैदराबाद गॅझेट’ किंवा ‘हैदराबाद गॅझेटियर’. निजामशाही काळात विविध जाती-जमातींविषयी प्रशासकीय नोंदी केल्या जात असत. त्या नोंदींमध...
न्यूजटाऊनचा आज वर्धापनदिनः विश्वासार्हतेच्याही ‘विश्वासार्हते’चा सहा वर्षांचा प्रवास!
अभिव्यक्ती, विशेष

न्यूजटाऊनचा आज वर्धापनदिनः विश्वासार्हतेच्याही ‘विश्वासार्हते’चा सहा वर्षांचा प्रवास!

सुरेश पाटील, मुख्य संपादक सध्याच्या युगात कोणत्याही तथ्यांची पडताळणी न करताच ‘मोदीने लिया पाकिस्तान से बडा बदला, भारतीय सेना ने किया इस्लामाबाद पर कब्जा’ किंवा ‘मोदी ने रूकवा दी युक्रेन की जंग’ अशा फेकन्यूजच सर्रासपणे ब्रेक्रिंग न्यूज म्हणून थोपवणाऱ्या पत्रकारितेची चलती असतानाच ३१ ऑगस्ट २०१९ रोजी पत्रकारितेच्या ग्लोबल दुनियेत पाऊल ठेवलेल्या न्यूजटाऊनने मात्र प्रारंभापासूनच तथ्यांची पडताळणी केल्याशिवाय कोणतीही बातमी द्यायची नाही, या स्वतःसाठीच ठरवून घेतलेल्या आचारसंहितेचे कटाक्षाने पालन केले आहे. ‘भयमुक्त आणि चाटुगिरीमुक्त पत्रकारिता’ (Journalism Without Fear & Favor!) असे बोधवाक्य उराशी बाळगून उपेक्षित, दुर्लक्षित, आधारवंचित समाजाचे विविध प्रश्न, राजकारण आणि धोरण, सरकार आणि प्रशासन या मुद्यांवर लक्ष केंद्रित करतानाच लोकशाही मूल्ये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पाठराखण करत भयमुक्...
पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत पोस्ट केल्यामुळे लखनऊ विद्यापीठाच्या प्राध्यापिकेवर देशद्रोहाचा गुन्हा, वाचा नेमके काय आहे प्रकरण?
अभिव्यक्ती, देश

पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत पोस्ट केल्यामुळे लखनऊ विद्यापीठाच्या प्राध्यापिकेवर देशद्रोहाचा गुन्हा, वाचा नेमके काय आहे प्रकरण?

लखनऊः पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे उत्तर प्रदेश पोलिसांनी लखऊन विद्यापीठाच्या भाषाशास्त्र विभागाच्या सहायक प्राध्यापक डॉ. माद्री काकोटी यांच्याविरुद्ध देशद्रोहासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून केंद्र सरकारवर केलेल्या टिकेमुळे भोजपुरी गायिका नेहासिंह राठौरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रा. डॉ. काकोटी यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) या उजव्या विचारसरणीच्या संघटनेचा सदस्य आणि विद्यापीठाचा विद्यार्थी जतीन शुक्ला याने दिलेल्या फिर्यादीवरून प्रा. डॉ. माद्री काकोटी यांच्याविरुद्ध लखनऊच्या हसनगंज पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. प्रा. डॉ. माद्री काकोटी या आपल्या सोशल मीडियावरील विशेषतः एक्सवरील पोस्टमध्ये सातत्या...
भोजपुरी गायिका नेहासिंह राठौरविरूद्ध देशद्रोहाचा गुन्हा, पहलगाम हल्ल्यावरून मोदी सरकारला सवाल करणे पडले महागात!
अभिव्यक्ती, देश

भोजपुरी गायिका नेहासिंह राठौरविरूद्ध देशद्रोहाचा गुन्हा, पहलगाम हल्ल्यावरून मोदी सरकारला सवाल करणे पडले महागात!

लखनऊ/नवी दिल्लीः प्रसिद्ध भोजपुरी गायिका नेहासिंह राठौरविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नेहासिंह राठौरने सोशल मीडियावर पोस्ट करून मोदी सरकारवर टिकास्त्र सोडले होते आणि काही सवाल उभे केले होते. त्यावरून लखनऊच्या हजरतगंज पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. नेहासिंह राठौर देशविरोधी वक्तव्य करत आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये व्हायरल होत आहे, असे या एफआयआरमध्ये म्हटले आहे. नेहाविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि आयटी कायद्यान्वये अनेक गंभीर स्वरुपाची कलमे लावण्यात आली आहेत. त्यात देशद्रोहाच्या कलमाचाही समावेश आहे. नेहासिंह राठौर एका समुदायाला धर्माच्या आधारावर भडकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे देशाची एकता आणि शांततेला धोका निर्माण होऊ शकतो, असे या एफआयआरमध्ये म्हटले आहे. नेहाच्या सोशल मीडिया पोस्ट चुकीच्...
अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा मूलाधार, व्यंगात्मक विनोदामुळे जीवन अधिक अर्थपूर्ण: सुप्रीम कोर्ट; खा. प्रतापगढींविरुद्धचा एफआयआर रद्द
अभिव्यक्ती, देश

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा मूलाधार, व्यंगात्मक विनोदामुळे जीवन अधिक अर्थपूर्ण: सुप्रीम कोर्ट; खा. प्रतापगढींविरुद्धचा एफआयआर रद्द

नवी दिल्लीः अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे निरोगी आणि सुसंस्कृत समाजाचा अविभाज्य भाग आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा मूलाधार आहे. एखाद्या व्यक्तीने व्यक्त केलेले विचार बहुसंख्य व्यक्तींना आवडले नाहीत तरी त्या व्यक्तीच्या विचार मांडण्याच्या स्वातंत्र्याचे रक्षण आणि आदर व्हायलाच हवा. कोणतेही साहित्य मग ते कविता, नाट्य, चित्रपट, व्यंग किंवा कला असो त्यातून मानवाचे जीवन अधिक अर्थपूर्ण होते, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी यांच्या विरोधातील एफआयआर रद्द केला आहे. काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी यांनी सोशल मीडियावर ‘ए खून के प्यासे बात सुनो’ ही कविता शेअर केली होती. या कवितेतून राष्ट्रीय एकात्मतेला आव्हान देण्यात आल्याचे तसेच त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात ३ जानेवारी रोजी गुजरातच्या जामनगरमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला...
‘अभिजात’ मराठीचे इंग्रजीपेक्षा श्रेष्ठत्व मनामनात पेरले तरच निभाव शक्य!
अभिव्यक्ती, महाराष्ट्र

‘अभिजात’ मराठीचे इंग्रजीपेक्षा श्रेष्ठत्व मनामनात पेरले तरच निभाव शक्य!

'कोणतीही भाषा जागतिक स्तरावर पसरवण्यासाठी त्या भाषेच्या ज्ञानाची निर्मिती होणे आवश्यक असते. तेव्हा मराठी भाषा फक्त राजभाषा नाही तर ज्ञानाची भाषा, व्यवहाराची भाषा व्हायला हवी. भाषा ध्रुवीकरणाच्या काळात मराठी जर ज्ञान भाषा झाली नाही तर तिचा सामान्य भाषा ही म्हणून ही निभाव लागणार नाही. यासाठी मराठीची केवळ सक्ती करून चालणार नाही तर आजच्या काळात ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कसोटीवर मराठी कशी उतरेल हे पाहणे महत्वाचे आहे.' सुनील कुवरे, शिवडी दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या भाषा दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आज १२ कोटी लोक मराठी भाषा बोलतात. लोकसंख्येच्या निकषानुसार मराठीला जगातल्या २० प्रमुख भाषांमध्ये स्थान आहे. अशा या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी कित्येक वर्षांपासूनची होती.अखेर ती ३ ऑक्टोबर २०२४ घटस्थापनेच्या दिवशी म...
मराठी भाषेचा अभिजात दर्जा ‘सदाशिवपेठी ब्राह्मणी बोली’ पुरताच सिमीत का?: विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अशोक राणा यांचा सवाल
अभिव्यक्ती, महाराष्ट्र

मराठी भाषेचा अभिजात दर्जा ‘सदाशिवपेठी ब्राह्मणी बोली’ पुरताच सिमीत का?: विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अशोक राणा यांचा सवाल

मराठी भाषेला अभिजात हा दर्जा मिळाल्यास ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु हा दर्जा सदाशिवपेठेतील ब्राह्मणांच्या बोली पुरता सीमित आहे की महाराष्ट्रातील सर्व विभागातील बोली भाषांनाही लागू आहे हे स्पष्ट झाले नाही. वऱ्हाडी, मराठवाडी, खान्देशी, अहिराणी, कोकणी, सातारी, कोल्हापुरी, या बोलींना अभिजात मराठीमध्ये कोणते स्थान आहे हे स्पष्ट झाले पाहिजे, अशी भूमिका १९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अशोक राणा यांनी मांडली आहे. त्यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा संपादित भाग... डॉ. अशोक राणा, अध्यक्ष, १९ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद). रामदेवराय यादव याची राजवट ज्या परिसरात स्थिरावली होती, त्या परिसरात आज आपण आहोत. यादवांच्या साम्राज्याला सुरुंग लावणारी ब्राह्मणशाही आजही या ठिकाणी आपला प्रभाव गाजवीत आहे. अल्लाउद्दिन खिलजी याने या साम्राज्याचा अंत केला ही एक ...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!