महाराष्ट्र

वसंतराव नाईक महाविद्यालयाला दलित, मुस्लिम, अल्पसंख्यांकांची ऍलर्जी; विद्यापीठ नामविस्तार दिन, रमजान ईदसह ११ सार्वजनिक सुट्ट्यांना मनमानीपणे कात्री!
महाराष्ट्र, विशेष

वसंतराव नाईक महाविद्यालयाला दलित, मुस्लिम, अल्पसंख्यांकांची ऍलर्जी; विद्यापीठ नामविस्तार दिन, रमजान ईदसह ११ सार्वजनिक सुट्ट्यांना मनमानीपणे कात्री!

छत्रपती संभाजीनगरः विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) स्वायत्त दर्जा प्राप्त झाल्यापासून छत्रपती संभाजीनगरच्या सिडको वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने आपले खरे दात दाखवत सुरूवात केली असून स्वायत्ततेच्या नावाखाली मनमानी करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन, बुद्ध पोर्णिमा, रमजान ईद, बकरी ईदसह तब्बल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अधिकृतपणे जाहीर केलेल्या तब्बल ११ सार्वजनिक सुट्यांना कात्री लावली आहे. विशेष म्हणजे कमी करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्ट्या दलित, मुस्लिमांसह केवळ अल्पसंख्याक समाजाशीच संबंधित आहेत. नितीन राठोड सचिव असलेल्या वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वंसतराव नाईक महाविद्यालय हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित आहे. या महाविद्यालयाला ३ मार्च २०२६ रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी)  ‘स्वा...
Maha-TET: शिक्षक पात्रता परीक्षेत हिजाब, बुरखा, नकाब वापरण्यास बंदी; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
महाराष्ट्र, विशेष

Maha-TET: शिक्षक पात्रता परीक्षेत हिजाब, बुरखा, नकाब वापरण्यास बंदी; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय

पुणेः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने येत्या २८ जून रोजी घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (Maha-TET)  महिला उमेदवारांना हिजाब, बुरखा, दुपट्टा, नकाब वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने २६ जून २०२४ रोजी दिलेल्या निकालाचा हवाला देत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने हा निर्णय घेतला आहे. राज्यभरातून जवळपास ६ लाख उमेदवार ही परीक्षा देणार आहेत. २८ जून रोजी होत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या परीक्षा केंद्रावरील सर्व वर्ग खोल्यांमध्ये लाईव्ह सीसीटीव्हीचा वापर करण्यात येणार असल्यामुळे परीक्षार्थ्यांचा संपूर्ण चेहरा स्पष्ट दिसणे बंधनकारक आहे. त्यामुळे वर्ग खोल्यांमध्ये मानेच्या वरच्या भागावर म्हणजेच डोके, कान, तोंड किंवा चेहऱ्यावर दुपट्टा, बुरखा, नकाब, हिजाब, मास्क, टोपी यापैकी कोणत्याही प्रकारचे कपडे अथवा आवरण ठेवता येणार नसल्याचे महाराष्ट्र राज...
ओमराजे निंबाळकरांसह ठाकरेंचे ६ फुटीर खासदार शिंदेसेनेत, उठावाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याचे सांगत एकनाथभाईंकडून आणखी धमाक्याचे संकेत!
महाराष्ट्र, राजकारण

ओमराजे निंबाळकरांसह ठाकरेंचे ६ फुटीर खासदार शिंदेसेनेत, उठावाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याचे सांगत एकनाथभाईंकडून आणखी धमाक्याचे संकेत!

मुंबई: धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या ६ फुटीर खासदारांनी आज अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. जून २०२२ मध्ये आम्ही पहिला उठाव केला. आता उठावाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी धमाक्याचे संकेत दिले. त्यामुळे नजीकच्या काळात ‘ऑपरेशन टायगर’चा आणखी एक भाग पहायला मिळण्याची शक्यता दिसू लागली आहे.उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, परभणीचे खासदार संजय जाधव, यवतमाळचे खासदार संजय देशमुख आणि उत्तर-पूर्व मुंबईचे खीसदार संजय दिना पाटील, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे या सहा खासदारांनी आज पक्षांतर करून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात हा पक्षप्रवेश सोहळा झाला.शिवसेना हे कुटुंब असून कट्टर शिवसैन...
२८ जूनपर्यंत राज्यात जोरदार पाऊस, तर काही ठिकाणी मुसळधार बरसणार; विदर्भात मात्र उष्णतेची लाट; वाचा तुमच्या जिल्ह्यात कसे असेल पाऊसमान?
महाराष्ट्र

२८ जूनपर्यंत राज्यात जोरदार पाऊस, तर काही ठिकाणी मुसळधार बरसणार; विदर्भात मात्र उष्णतेची लाट; वाचा तुमच्या जिल्ह्यात कसे असेल पाऊसमान?

मुंबईः सुमारे दोन आठवड्यानंतर मोसमी वाऱ्यांची आगेकूच पुन्हा सुरू झाली असून २८ जूनपर्यंत कोकणष मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह वादळी पावसाची तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मात्र विदर्भातील जिल्ह्यांत मात्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. जवळपास दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांची आगेकूच पुन्हा सुरू झाली आहे. नैऋत्य मोसमी वारे पुणे, सोलापूर, अलिबाग या भागात दाखल झाले आहेत. येत्या ४८ तासांत नैऋत्य मोसमी वारे मुंबईसह राज्याचा आणखी काही भाग व्यापू शकतात, अशी अनुकुल स्थिती निर्माण झाली आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांची उत्तरी सीमा पुणे, अलिबाग, निझामाबाद, दंतेवाडा, सुंदरगढ, गया, मुझफ्फरपूरपर्यंत पोहोचली आहे. येत्या ४८ तासांत नैऋत्य मोसमी वाऱ्यांची आणखी प्रगती होण्यासाठी अनुकुल स्थ...
विधिमंडळ अधिवेशन काळात विधानभवनातील प्रवेशासाठी डिजिटल फेस रेकग्निशन प्रणालीचा वापर अनिवार्य
महाराष्ट्र, साय-टेक

विधिमंडळ अधिवेशन काळात विधानभवनातील प्रवेशासाठी डिजिटल फेस रेकग्निशन प्रणालीचा वापर अनिवार्य

मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून प्रारंभ झाला असून विधान भवनातील प्रवेश व्यवस्था अधिक सुरक्षित व सुलभ करण्यासाठी डिजिटल फेस रेकग्निशन (चेहरा पडताळणी) प्रणाली लागू करण्यात आली आहे, याबाबतची घोषणा विधानपरिषदेत सभापती प्रा. राम शिंदे यांनी, तर विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केली. या नव्या प्रणालीअंतर्गत लोकप्रतिनिधी, आमदार, अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांच्या चेहऱ्याची डिजिटल नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना विधान भवनात प्रवेशासाठी स्वतंत्र ओळखपत्र पडताळणीची आवश्यकता भासणार नसून फेस रेकग्निशनद्वारे जलद प्रवेश मिळणार आहे. सर्व विधिमंडळ सदस्य, अधिकारी- कर्मचारी आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी फेस रेकग्निशनसाठी तातडीने नोंदणी करणे आवश्यक आहे. विधिमंडळाच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने हा महत...
बालभारतीने केले महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे कर्तृत्व संकुचित, इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकात ‘ऐतिहासिक घोडचूक’;  देशातील मुलींची पहिली शाळा…
देश, महाराष्ट्र

बालभारतीने केले महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे कर्तृत्व संकुचित, इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकात ‘ऐतिहासिक घोडचूक’;  देशातील मुलींची पहिली शाळा…

पुणेः महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून देशातील स्त्री शिक्षणाची क्रांतीकारी बिजे रोवली. वस्तुनिष्ठ ऐतिहासिक पुराव्यांवर आधारित असलेला हा इतिहास संपूर्ण जगाला माहीत आहे, परंतु बालभारतीलाच हा इतिहास मान्य नाही. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या उत्तुंग कर्तृत्वाला संकुचित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न बालभारतीच्या इयत्ता तिसरीच्या ‘आपल्या सभोवतालचे जग भाग-२’ या पाठ्यपुस्तकात करण्यात आला आहे. बालभारतीच्या या कोतेपणावर शिक्षक संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून ही ‘ऐतिहासिक घोडचुक’ तातडीने दुरूस्त करण्याची मागणी केली आहे. महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात देशातील मुलींची पहिली शाळा सुरू करून भारतातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ...
पवनराजे हत्याकांडाचा निकाल विरोधात जाताच खासदार ओमराजे निंबाळकरांचे ‘वेट अँड वॉच’, शिंदे सेनेचे ‘ऑपरेशन टायगर’ धोक्यात?; बंडखोरांची धडधड वाढली!
महाराष्ट्र, राजकारण

पवनराजे हत्याकांडाचा निकाल विरोधात जाताच खासदार ओमराजे निंबाळकरांचे ‘वेट अँड वॉच’, शिंदे सेनेचे ‘ऑपरेशन टायगर’ धोक्यात?; बंडखोरांची धडधड वाढली!

मुंबईः काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि राज्याचे माजी गृह राज्यमंत्री डॉ. पद्मसिंह पाटलांसह सर्व ९ आरोपींची निर्दोष सुटका केली. या निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले धाराशिवचे खासदार आणि पवनराजेंचे सुपुत्र ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा माझा अंतिम निर्णय झालेला नाही, मतदारसंघात जाऊन सर्वांशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेईन, अशी भूमिका मांडल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गेल्या काही दिवसांपासून घोंगावू लागलेले ‘ऑपरेशन टायगर’ धोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.  परिणामी बंडखोरी केलेल्या शिवसेनेच्या (उबाठा) अन्य पाच खासदारांची धडधड वाढली आहे. २० वर्षांपूर्वी घडलेल्या काँग्रेस नेते पवन राजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांच्या हत्याप्...
बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी डॉ. पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष सुटका, माफीचा साक्षीदार फितूर घोषित; निकालानंतर ओमराजे म्हणाले….
महाराष्ट्र, राजकारण

बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी डॉ. पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष सुटका, माफीचा साक्षीदार फितूर घोषित; निकालानंतर ओमराजे म्हणाले….

मुंबईः धाराशिवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडिल काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर व त्यांचे चालक समद काझी यांच्या बहुचर्चित हत्याप्रकरणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी गृह राज्यमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची आज विशेष सीबीआय न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. जून २००६ मध्ये नवी मुंबईतील कळंबोली येथे या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तब्बल २० वर्षांनंतर आज विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी या प्रकरणाचा निकाल दिला. या निकालाची भिस्त माफीच्या साक्षीदारावरच अलबंवून असताना त्याच्या जबाबाच्या बाबतीतच संदिग्धता आहे. माफीच्या साक्षीदाराने वारंवार साक्ष फिरवल्याने त्याची साक्ष ग्राह्य धरता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने त्याला फितूर घोषित करण्यात आले आणि संशयाचा फायदा देऊन या खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मु...
राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढणार, आज आणि उद्या ‘या’ जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता; हवामान विभागाने जारी केला यलो अलर्ट
महाराष्ट्र

राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढणार, आज आणि उद्या ‘या’ जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता; हवामान विभागाने जारी केला यलो अलर्ट

मुंबई: राज्याच्या काही भागात पुढील काही दिवसांत मान्सूनची वाटचाल होण्यास अनुकुल स्थिती आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून हवामान विभागाने आज आणि उद्या काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज वर्तवला असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. जून महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाही संपूर्ण राज्यात अजूनही मान्सून सक्रीय झालेला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. हवामान विभागाने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या तसेच देशाच्या इतर काही भागात २३ जूनच्या आसपास मान्सूनची पुढील वाटचाल होण्यास हवामानाची स्थिती अनुकुल आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात मान्सून पुढे सरकण्याचा अंदाज आहे. २४ आणि २५ जूनच्या आसपास कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. तर पुढील काही दिवसात संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याची शक्...
ठाकरे गटाच्या ६ फुटीर खासदारांपैकी हिंगोलीचे नागेश आष्टीकर ठरले रात्रीच्या अंधारात दिल्लीत पोहोचणारे पहिले खासदार, वाचा ‘ऑपरेशन टायगर’मध्ये नेमके काय घडले?
देश, महाराष्ट्र, राजकारण

ठाकरे गटाच्या ६ फुटीर खासदारांपैकी हिंगोलीचे नागेश आष्टीकर ठरले रात्रीच्या अंधारात दिल्लीत पोहोचणारे पहिले खासदार, वाचा ‘ऑपरेशन टायगर’मध्ये नेमके काय घडले?

नवी दिल्लीः उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत २०२२ नंतर पुन्हा मोठी फूट पडली. शिवसेनेतील (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या दुसऱ्या मोठ्या फुटीच्या १६ जूनच्या मध्यरात्रीपासूनच सुरूवात झाली. शिवसेनेने (उबाठा) व्हीप बजावून आज दिल्लीत बोलावलेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीला ९ पैकी फक्त तीनच खासदार हजर राहिल्यामुळे या फुटीवर शिक्कामोर्तब झाले आहे. उर्वरित ६ खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत दाखल होणार हेही निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे या फूट नाट्यात हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे १६ जूनच्या मध्यरात्री दिल्लीत दाखल होणारे पहिले बंडखोर खासदार ठरले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार फोडण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्यात येत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होत होती. १४ जून रोजी शिवसेनेने (उबाठा) बोलावलेल्या बैठकीला केवळ तीनच खासदा...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!