महाराष्ट्र

२०२६ मध्ये २४ दिवसांच्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर, भाऊबीजेच्या दिवशी अतिरिक्त सुट्टी; वाचा संपूर्ण यादी
महाराष्ट्र

२०२६ मध्ये २४ दिवसांच्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर, भाऊबीजेच्या दिवशी अतिरिक्त सुट्टी; वाचा संपूर्ण यादी

मुंबईः महाराष्ट्र सरकारने २०२६ या वर्षासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी २४ सार्वजनिक सुट्ट्या जाहिर केल्या आहेत. याशिवाय भाऊबीजेच्या दिवशी (११ नोव्हेंबर २०२६, बुधवार) यादिवशी अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. जाहीर केलेल्या सुट्ट्यांमध्ये प्रमुख सण आणि राष्ट्रीय दिवसांचा समावेश आहे. या सुट्या महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालये, राज्य शासनाचे उपक्रम, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती यांना लागू राहील. याशिवाय १ एप्रिल २०२६ (बुधवार) हा दिवस केवळ बँकांसाठी वार्षिक लेखापरीक्षणासाठी सुट्टी म्हणून जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महाशिवरात्री, लक्ष्मीपूजनाची सार्वजनिक सुट्टी रविवारी आली आहे तर महाराष्ट्र दिन व बुद्ध पोर्णिमा, स्वातंत्र्य दिन व पारशी नववर्ष दिन...
दिव्यांगांसाठी ‘यूडीआयडी कार्ड’ सक्ती, बोगस प्रमाणपत्रधारकांवर कडक कारवाई सुरू; जानेवारी २०२६ अखेर होणार सगळ्यांच्याच कागदपत्रांची पडताळणी
महाराष्ट्र

दिव्यांगांसाठी ‘यूडीआयडी कार्ड’ सक्ती, बोगस प्रमाणपत्रधारकांवर कडक कारवाई सुरू; जानेवारी २०२६ अखेर होणार सगळ्यांच्याच कागदपत्रांची पडताळणी

नागपूर: राज्यातील सर्व शासकीय कार्यालये व विभागांत यूनिक डिसॅबिलिटी आयडी (यूडीआयडी) कार्ड सादर करणे ९ ऑक्टोबर २०२५ पासून सक्तीचे करण्यात आले असून, याबाबतचा शासन निर्णय सर्व विभागांना कळवण्यात आला आहे. आरक्षण, पदोन्नती, विविध शासकीय सवलती यासाठी यूडीआयडी कार्ड अनिवार्य असून, जानेवारी २०२६ अखेरपर्यंत सर्व शासकीय कार्यालयांना कागदपत्रांची पडताळणी सादर करणे आवश्यक असल्याची माहिती इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. विधानसभेत आ. बापू पठारे, बबनराव लोणीकर, सुनील प्रभू, विजय वडेट्टीवार, विक्रम पाचपुते, हेमंत उगले यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र संदर्भात प्रश्न उपस्थित केला, या प्रश्नास उत्तर देताना ते बोलत होते. राज्यात काही ठिकाणी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचे प्रकार आढळल्याने त्यावर मोठी कारवाई सुरू आहे. सातारा जिल्ह्यात ५९८ पैकी ७८ जण, पुण्यात ४२...
गुटखा माफियांना ‘मकोका’ लावण्यासाठी कायद्यात दुरूस्ती करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती
महाराष्ट्र

गुटखा माफियांना ‘मकोका’ लावण्यासाठी कायद्यात दुरूस्ती करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती

नागपूर:  गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका लागू करण्याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता; कायद्यातील तरतुदींनुसार ‘हार्म आणि हर्ट’ या दोन्ही घटकांअभावी तो लागू होत नाही. त्यामुळे या कायद्यात बदल करण्यात येऊन गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवरही मकोका लागू करता येईल, अशा आवश्यक दुरुस्त्या कायद्यात करण्यात येऊन हा कायदा अधिक कठोर करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. आमदार प्रशांत ठाकूर, अस्लम शेख, अभिमन्यू पवार, रईस शेख, अमीन पटेल यांनी शाळा, महाविद्यालय परिसरात अवैध गुटखा, विक्री व वहन संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नास उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. राज्यात गुटखा बंदी आहे. गुटखा विक्री व वहन संदर्भात राज्यभरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली असून विविध जिल्ह्यांमध्ये एकूण शेकडो गुन्हे दाखल करण्यात आले आह...
महिला व बाल सुधारगृहातून महिलांच्या पलायनाचे प्रमाण ३ टक्के तर मुलांच्या पलायनाचे प्रमाण ०.२९ टक्के, राज्य सरकारची विधान परिषदेत माहिती
महाराष्ट्र

महिला व बाल सुधारगृहातून महिलांच्या पलायनाचे प्रमाण ३ टक्के तर मुलांच्या पलायनाचे प्रमाण ०.२९ टक्के, राज्य सरकारची विधान परिषदेत माहिती

नागपूर: राज्यातील महिला व बाल सुधारगृहातून मुलांच्या पलायनाचे प्रमाण ०.२९ टक्के तर महिलांच्या पलायनाचे प्रमाण ३ टक्के असल्याची माहिती महिला व बाल  विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली. महिला व बाल सुधारगृहातून पळून जाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचेही त्या म्हणाल्या. आ. चित्रा वाघ यांनी राज्यातील महिला व बाल सुधारगृहाच्या सुरक्षा व व्यवस्थापनातील त्रुटींमुळे मुलींनी पलायन केल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना तटकरे बोलत होत्या. महिला व बाल सुधारगृहातून मुली, महिला पळून जाऊ नयेत यासाठी शासन संवेदनशीलपणे काम करत आहे. यासाठी आवश्यक उपाय योजना करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. याचबरोबर महिला व बाल सुधारगृहातून पळून जाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत, असे तटकरे म्हणाल्या. महिला व बाल सुधारगृहात तसेच महिला वस...
दरवर्षी वीजदरात ३ टक्के कपात करून ग्राहकांना स्वस्तात वीज देऊ, शेतकऱ्यांचे फिडर सौर ऊर्जेवर आणून स्वतंत्र १६ हजार मेगा वॅट वीजनिर्मितीः फडणवीस
दुनिया, महाराष्ट्र

दरवर्षी वीजदरात ३ टक्के कपात करून ग्राहकांना स्वस्तात वीज देऊ, शेतकऱ्यांचे फिडर सौर ऊर्जेवर आणून स्वतंत्र १६ हजार मेगा वॅट वीजनिर्मितीः फडणवीस

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): देशात महाराष्ट्र हे सौर ऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारे राज्य ठरले आहे. शेतकऱ्यांसाठी फिडर सौर ऊर्जेवर आणून स्वतंत्र १६ हजार मेगा वॅट वीज निर्मिती करु. त्यामुळे अन्य वापरातील विजेच्या दरात आपण दरवर्षी ३ टक्के कपात करुन ग्राहकांना स्वस्त वीज देऊ शकतो,असे आश्वसन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.  'मागेल त्याला सौर कृषीपंप' योजनेत महाराष्ट्राने विश्वविक्रम केला आहे. महावितरणने एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषीपंप स्थापित करण्याचा उच्चांक गाठला. या विक्रमाची गिनीज बुकमध्ये यशस्वी नोंद झाली. गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा आज छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा एमआयडीसीमध्ये ऑरिक सिटी मैदानावर पार पडला. या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. या विश्वविक्रमाची घोषणा करण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड...
‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेत महाराष्ट्राच्या विश्वविक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद, महावितरणने एकाच महिन्यात स्थापित केले तब्बल ४५ हजार ९११ सौर कृषीपंप
महाराष्ट्र

‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेत महाराष्ट्राच्या विश्वविक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद, महावितरणने एकाच महिन्यात स्थापित केले तब्बल ४५ हजार ९११ सौर कृषीपंप

मुंबई: महाराष्ट्राने 'मागेल त्याला सौर कृषीपंप' योजनेत विश्वविक्रम केला आहे. महावितरणने एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषीपंप स्थापित करण्याचा उच्चांक केला आहे. या विक्रमाची गिनिज बुकमध्ये यशस्वी नोंद झाली आहे. गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार, दि ५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा एमआयडीसीमध्ये ऑरिक सिटी मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अपारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावे, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट, ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर, ऊर्जा विभागाच्य अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आदी उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून ...
राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा ‘सेवाखंड क्षमापित’ करण्याच्या निर्णय, १५० वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळणार थेट लाभ
महाराष्ट्र

राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा ‘सेवाखंड क्षमापित’ करण्याच्या निर्णय, १५० वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळणार थेट लाभ

 मुंबई: राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पूर्वीच्या अस्थायी सेवाकाळातील ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला आहे. निर्णयामुळे आरोग्य व्यवस्थेत निश्चितच गुणात्मक सुधारणा होईल, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटले. निर्णयाचा थेट लाभ १५० वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळणार असून त्यांना विविध आर्थिक व प्रशासकीय लाभ प्राप्त होणार आहेत. आरोग्य भवन, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात ‘सेवाखंड क्षमापित’ पत्रांचे वितरण करण्यात आले. राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागात २००९ पूर्वी मोठ्या प्रमाणात वैद्यकीय अधिकारी अस्थायी स्वरूपात सेवेत होते. वर्ष २००९ मध्ये त्यांचा शासकीय सेवेत समावेश झाला; मात्र ‘सेवाखंड काल...
‘चोला’च्या हाती झोला: कोहिनूर महाविद्यालयाला ठोकलेले सील दोन दिवसांत उघडा, मुंबई उच्च न्यायालयाचे चोलामंडलम फायनान्स कंपनीला आदेश
महाराष्ट्र, विशेष

‘चोला’च्या हाती झोला: कोहिनूर महाविद्यालयाला ठोकलेले सील दोन दिवसांत उघडा, मुंबई उच्च न्यायालयाचे चोलामंडलम फायनान्स कंपनीला आदेश

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  कर्जाची परतफेड केली नाही म्हणून खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयाच्या इमारतीचा ताबा घेऊन ठोकलेले सील दोन दिवसांत उघडा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. हितेन वेनेगावकर यांनी चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनीला मंगळवारी दिले. तसेच सोमवारपासून महाविद्यालयाच्या इमारतीत महाविद्यालयाचे दैनंदिन कामकाज व्यवस्थित चालेल याची दक्षता घेण्याचे आदेशही खंडपीठाने कोहिनूर शिक्षण संस्थेला दिले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चिश्तिया महाविद्यालयात सुरू असलेले कोहिनूर महाविद्यालयाचे कामकाज सोमवारपासून स्वतःच्या इमारतीत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मझहर खान आणि सचिव आस्मा खान यांनी कोहिनूर ...
ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे निधन, देशाच्या सामाजिक-राजकीय चळवळीतील ७ दशकांच्या स्थित्यंतराचा ध्येय्यनिष्ठ साक्षीदार हरपला!
देश, महाराष्ट्र

ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे निधन, देशाच्या सामाजिक-राजकीय चळवळीतील ७ दशकांच्या स्थित्यंतराचा ध्येय्यनिष्ठ साक्षीदार हरपला!

सोलापूरः समाजसेवा आणि समाजसुधारणा हेच जीवनाचा श्वास आणि ध्यास मानलेले ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे मंगळवारी रात्री नळदुर्ग येथील ‘अपना घर’ निवासस्थानी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. मंगळवारी रात्री जेवणानंतर त्यांना उलटीचा त्रास झाल्यानंतर त्यांना तत्काळ सोलापूर येथील एका सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्याआधीच त्यांचे निधन झाले. आयुष्यभर समाजवादी विचारांची पताका गौरवाने मिरवणारा, अनेक लोकचळवळीत सहभाग घेणारा, सत्तेच्या पदासाठी कधीही आग्रह न धरणारा, निस्पृह व निस्वार्स्थी लोकनेता अशी पन्नालाल सुराणा यांची ओळख होती. सत्तरहून अधिक वर्षे ते देशाचे राजकारण आणि समाजकारणाच्या स्थित्यंतराचे साक्षीदार राहिले आहेत. चले जाव आंदोलनापासून ते स्वातंत्र्य चळवळीपर्यंत आणि त्यानंतर स्वातंत्र्य ते आणीबाणी तसेच देशाच्या सामाजिक व राजकीय जडणघडणीचा महत्वाचा अनुभव पन्नालाल सुर...
राज्यातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतींची मतमोजणी आणि निकाल २१ डिसेंबरलाच; मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश
महाराष्ट्र, राजकारण

राज्यातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतींची मतमोजणी आणि निकाल २१ डिसेंबरलाच; मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

नागपूरः  राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान होत असले तरी राज्य निवडणूक आयोगाने आधी जाहीर केल्याप्रमाणे आज मतदान झालेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी उद्या ३ डिसेंबर रोजी होणार नाही आणि निकालही लागणार नाहीत. आज (२ डिसेंबर) आणि २० डिसेंबर रोजी होणाऱ्या दोन्ही टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतरच सर्व नगर परिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबर रोजीच करून निकाल जाहीर केला जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याबाबतचे आदेश दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल असे जाहीर केले होते. परंतु न्यायालयीन खटल्यांचा पेच निर्माण झाल्यामुळे २४ नगरपरिषदा आणि १५४ सदस्यांच्या निवडीसाठी आज मंगळवारी (२ डिसेंबर) रोजी होणारी निवडणूक २० डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडली आहे. या २४ नग...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!