महाराष्ट्र

‘स्वायत्त दर्जा’ मिळताच संस्थाचालकांच्या अंगात मस्तीः वसंतराव नाईक महाविद्यालयातील तब्बल १५ प्राध्यापकांविरुद्ध बडतर्फीची ‘घाऊक’ कारवाई!
महाराष्ट्र, विशेष

‘स्वायत्त दर्जा’ मिळताच संस्थाचालकांच्या अंगात मस्तीः वसंतराव नाईक महाविद्यालयातील तब्बल १५ प्राध्यापकांविरुद्ध बडतर्फीची ‘घाऊक’ कारवाई!

छत्रपती संभाजीनगरः विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) मिळालेला ‘स्वायत्त’ महाविद्यालयाचा दर्जा म्हणजे जणू ‘स्वैराचार’ करण्याचे सरकारी प्रमाणपत्रच आहे, अशी हवा काही संस्थाचालकांच्या डोक्यात भरू लागली असल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरात घडला आहे. यूजीसीकडून ‘स्वायत्तता’ मिळून अवघे ९९ दिवसही उलटले नाही तोच वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने ‘सामूहिक गैरहजेरी’चे निमित्त पुढे करून तब्बल १५ प्राध्यापकांविरुद्ध बडतर्फीच्या कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे यूजीसीकडून मिळवलेली ‘स्वायत्तता’ ही प्राध्यापकांच्या सामूहिक छळाचे संस्थाचालकांच्या हातचे अस्त्र ठरते की काय? अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. छत्रपती संभाजीनगरातील वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळाने कोणत्याही शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेताच वसंतराव नाईक महाविद्यालयाला यूजीसीकडून ९९ दिवसांपूर्वी...
वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची निवड प्रक्रियाच बोगस, प्रचलित नियम धाब्यावर बसवून केली ‘अपात्र’ डॉ. संजीव रेड्डींची ‘मागच्या दारा’ने नियुक्ती!
महाराष्ट्र, विशेष

वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची निवड प्रक्रियाच बोगस, प्रचलित नियम धाब्यावर बसवून केली ‘अपात्र’ डॉ. संजीव रेड्डींची ‘मागच्या दारा’ने नियुक्ती!

छत्रपती संभाजीनगरः  वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वसंतराव नाईक महाविद्यालय या अशासकीय अनुदानित महाविद्यालयाच्या प्राचार्यपदासाठी प्रचलित नियम धाब्यावर बसवून बोगस निवड प्रक्रिया राबवण्यात आली आणि या ‘मागच्या दारा’ने पदावर डॉ. संजीव रेड्डी या ‘सोयी’च्या अपात्र उमेदवाराची नियुक्ती करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंनी नामनिर्देशित केलेले प्रतिनिधी आणि छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय सहसंचालकांच्या साक्षीनेच ही बोगस निवड प्रक्रिया राबवण्यात आल्यामुळे अनुदानित महाविद्यालयांतील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या एकूणच निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सिडको भागात असलेले वसंतराव नाईक महाविद्यालय हे १०० टक्के अनुदानित अशासकीय महाविद्यालय आहे. या महाविद्यालया...
प्रभारी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकरांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या एकमेव उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांच्यावर थेट बडतर्फीची कारवाई
महाराष्ट्र, विशेष

प्रभारी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकरांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या एकमेव उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांच्यावर थेट बडतर्फीची कारवाई

छत्रपती संभाजीनगर: अनुसूचित जमातीची असल्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी आणि कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर हे आपला छळ करत असल्याची सुसाईड नोट लिहून आत्महत्येच्या प्रयत्न करणाऱ्या विद्यापीठातील उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांना विद्यापीठ प्रशासनाने बुधवारी बडतर्फ केले. विशेष म्हणजे हा बडतर्फीचा आदेश जारी केल्यानंतर कुलसचिवांच्या स्वाक्षरीने बेगमपुरा पोलिसांना पत्र लिहून काही अनुचित प्रकार घडू शकते अशी भीती व्यक्त करत ‘योग्य ती खबरदारी’ घेण्याचे फर्मान जारी करण्यात आले आहे. एखाद्या कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई केल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांना असे पत्र लिहिण्याची विद्यापीठाच्या इतिहासातील कदाचित ही पहिलीच घटना आहे. विशेष म्हणजे ठाकरे यांनी प्रभारी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या कार्यपद्धतीवरच आक्षेप घेतला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा...
राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी; ३,७२३ पदांना मान्यता, तब्बल २३ वर्षांनी नवीन आकृतीबंध तयार
महाराष्ट्र

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी; ३,७२३ पदांना मान्यता, तब्बल २३ वर्षांनी नवीन आकृतीबंध तयार

मुंबई: राज्यातील कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी कृषी विद्यापीठांच्या अ आणि ब संवर्गातील एकूण ३,७२३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता देण्यात आली आहे. २००३ नंतर म्हणजेच २३ वर्षांनी नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. या निर्णयामुळे विद्यापीठांमधील मनुष्यबळ व्यवस्थापन अधिक परिणामकारक होईल, संशोधन व अध्यापनाच्या गुणवत्तेत वाढ होईल तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत अधिक वेगाने पोहोचविण्यास मदत मिळेल, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या गट-अ व गट-ब संवर्गातील पदांच्या सुधारित आकृतीबंधास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. कृषी व पदुम विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून, नियमित ३,६११ पदे आणि बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणारी ११२ पदे अशा एकूण ३,७२३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता देण...
‘अमृत’तर्फे मोफत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम, समुपदेशन क्षेत्रात संधी; कसा आणि कुठे करायचा अर्ज? वाचा सविस्तर तपशील
महाराष्ट्र

‘अमृत’तर्फे मोफत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम, समुपदेशन क्षेत्रात संधी; कसा आणि कुठे करायचा अर्ज? वाचा सविस्तर तपशील

छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) मार्फत ‘अमृत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम’ राबवण्यात येत आहे. या  प्रशिक्षण कार्यक्रमाची पहिल्या बॅचसाठी १५ ते २२ जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करावा,असे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या रूपाने कार्यरत असलेल्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) मार्फत हा अभ्यासक्रम राबवण्यात येत आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाची मानसिक आरोग्य क्षेत्रातील अग्रगण्य संस्था पुणे येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ (एमआयएमएच) ही तांत्रिक भागीदार म्हणून कार्यरत राहणार आहे. हा समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम मानसशास्त्र, समुपदेशन आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील युवक-युवतींसाठी स्वयंरोजगार, व्यावसायिक विकास आणि समाजोपयोगी कार्याची मोठी संधी उपलब्ध करून देणार आहे. प्...
१० जूनपासून प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचे विद्यार्थी सहाय्यता केंद्र, आता जिल्हास्तरावरच मिळतील ‘या’ १२ प्रकारच्या सेवा
महाराष्ट्र

१० जूनपासून प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचे विद्यार्थी सहाय्यता केंद्र, आता जिल्हास्तरावरच मिळतील ‘या’ १२ प्रकारच्या सेवा

मुंबई: राज्यातील विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP), शिष्यवृत्ती योजना आणि प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अचूक माहिती व योग्य मार्गदर्शन त्यांच्या जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘सीईटीसेलचे विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज येथे केली.मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात यासंदर्भात बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, तसेच जिल्हास्तरीय समन्वयक ऑनलाइन उपस्थित होते. बैठकीत सर्व जिल्ह्यातील सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्र...
मोदी सरकारचा सर्वसामान्यांना मोठा झटका, आता वर्षाला मिळणार ९ ऐवजी फक्त ४ अनुदानित गॅस सिलिंडर!
देश, महाराष्ट्र

मोदी सरकारचा सर्वसामान्यांना मोठा झटका, आता वर्षाला मिळणार ९ ऐवजी फक्त ४ अनुदानित गॅस सिलिंडर!

नवी दिल्लीः एकीकडे स्वयंपाकाच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असतानाच मोदी सरकारने गरिबांना जबर झटका देत सोमवारी स्वयंपाकाच्या अनुदानित गॅस सिलिंडरच्या संख्येत मोठी कपात केली. या निर्णयामुळे आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी ९ ऐवजी फक्त ४ अनुदानित गॅस सिलिंडर मिळतील. या निर्णयाचा सर्वात मोठा फटका ग्रामीण भागातील महिलांना बसणार असून त्यांना पुन्हा चुलीकडे वळावे लागण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील महिलांना चुलीच्या प्रदूषणापासून वाचवण्यासाठी मोदी सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली होती. या योजनेचा मोदी सरकारने मोठ्या प्रमाणावर प्रचार-प्रसारही केला होता. आता मोदी सरकारने वाढता खर्च आणि सबसिडी नियंत्रित करण्यासाठी या योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी मिळणाऱ्या अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या ९ वरून ४ केली आहे....
किमान १५ जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमीच; मान्सून कोकणात दाखल, पण सर्वदूर सक्रिय नाही!
महाराष्ट्र

किमान १५ जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमीच; मान्सून कोकणात दाखल, पण सर्वदूर सक्रिय नाही!

मुंबई: मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे. सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान १५ जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खान्देश, आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही. दरम्यान, किमान १२ जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ व खानदेशात कमाल तापमान ४...
राज्यभर गुटखा, पानमसाला विक्रेत्यांवर १९५ धाडी, दोन कोटी रुपयांचा साठा जप्त; १९२ गुटखा तस्कर गजाआड
महाराष्ट्र

राज्यभर गुटखा, पानमसाला विक्रेत्यांवर १९५ धाडी, दोन कोटी रुपयांचा साठा जप्त; १९२ गुटखा तस्कर गजाआड

मुंबई:  राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाची प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तत्सम अन्नपदार्थांविरुद्धची विशेष मोहीम प्रभावीपणे सुरू आहे. १ ते ५ जून या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल १९२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. या पाच दिवसांच्या कालावधीत राज्यभर १९५ धाडी टाकण्यात आल्या असून या कारवाईत १ कोटी ९९ लाख १८ हजार ४७५ रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने कळवले आहे. अवैध उत्पादन, साठवणूक, वाहतूक व विक्रीस आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. भारतीय न्याय संहिताचे कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा मानके कायद्याचे कलम २६, २७, ३० (२) (अ) आणि कलम ५९ अंतर्गत गुन्हे दाखल करून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार प्रतिबंधित अन्नपदार्थांविरुद्ध व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेत ३ जून रोजी धुळे जिल...
महाराष्ट्राची विक्रमी झेप: सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा, देशातील एकूण सौर पंपांमध्ये महाराष्ट्राचा ६४ टक्के वाटा
देश, महाराष्ट्र

महाराष्ट्राची विक्रमी झेप: सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा, देशातील एकूण सौर पंपांमध्ये महाराष्ट्राचा ६४ टक्के वाटा

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): सौर कृषिपंपामध्ये विश्वविक्रम करणाऱ्या महाराष्ट्राने बुधवारी (३ जून) देशात सर्वाधिक १० लाख सौर कृषिपंपांचा टप्पा पूर्ण केला आणि देशपातळीवर एक नवा इतिहास रचला आहे. पीएम कुसुम-बी व मागेल त्याला सौर कृषिपंप अंतर्गत महाराष्ट्राने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. देशातील एकूण सौर कृषिपंपांपैकी तब्बल ६४ टक्के सौर पंप एकट्या महाराष्ट्रात कार्यान्वित झाले आहेत. प्रधानमंत्री कुसुम-बी आणि राज्य शासनाच्या मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेची महावितरणकडून प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात महावितरणने सौर कृषिपंपामध्ये मोठी आघाडी घेतली आहे. देशात आतापर्यंत एकूण १५ लाख ६२ हजार २८९ सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यापैकी तब्बल १० लाख ४७२ (६४ टक्के)...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!