महाराष्ट्र

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात १०० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह, मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय
महाराष्ट्र

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात १०० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह, मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय

मुंबई: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात १०० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह उभारण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासोबतच मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्त केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक समितीचे अध्यक्ष उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मंत्रालयात झालेल्या या बैठकीला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, सामान्य प्...
‘भामटेगिरी’ फसली: ‘डॉ.बामु’च्या वादग्रस्त कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांचा राजीनामा
महाराष्ट्र, विशेष

‘भामटेगिरी’ फसली: ‘डॉ.बामु’च्या वादग्रस्त कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांचा राजीनामा

औरंगाबाद: राजपूत भामटा जातीचे बनावट प्रमाणपत्रामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वादग्रस्त कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी अखेर राजीनामा दिला. त्यांच्या ठिकाणी केमिकल टेक्नॉलॉजीचे प्रा. डॉ. भगवान साखळे यांची प्रभारी नियुक्ती करण्यात आली आहे.डॉ. जयश्री सूर्यवंशी या जन्माने मराठा जातीच्या आहेत. आंतरजातीय विवाह केल्यानंतर त्यांनी राजपूत भामटा जातीचे बनावट प्रमाणपत्र काढले. याच बनावट जातप्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी डॉ. इं.भा. पाठक महिला महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी मिळवली. या अनुभवाच्या जोरावरच त्या पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिव झाल्या. ही 'भामटेगिरी' उघडकीस आल्यानंतर डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी आपल्याकडे असलेले राजपूत भामटा जातीचे प्रमाणपत्र केवळ 'शोभेची वस्तू' असून त्याचा आपण कुठेही वापर केला नसल्याचा बचा...
पत्राचाळ प्रकरणात संजय राऊतांना धक्काः न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ
महाराष्ट्र, राजकारण

पत्राचाळ प्रकरणात संजय राऊतांना धक्काः न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ

मुंबईः पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना न्यायालयाकडून आणखी एक धक्का बसला आहे. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालयनालयाने (ईडी) संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी अटक केली होती. संजय राऊत यांनी ईडीच्या पीएमएलए न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर २७  सप्टेंबरला सुनावणी पार पडली होती. मात्र, न्यायालयाने संजय राऊत यांना दिलासा दिला नव्हता. न्यायालयाने ही सुनावणी १० ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत सात दिवसांची वाढ करण्यात आली आहे. गोरेगावच्या पत्राचाळीतील १ हजार ३९ कोटी रुपयांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात संजय राऊत यांचा सहभाग असल्याचा दावा ईडीने केला आहे. पत्राचाळ पुनर्विकासात खासदार संजय र...
सरकारचा निर्णय आहे, सरकारनेच ठरवावेः हल्लेखोर एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याच्या निर्णयावर शरद पवार
महाराष्ट्र, राजकारण

सरकारचा निर्णय आहे, सरकारनेच ठरवावेः हल्लेखोर एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याच्या निर्णयावर शरद पवार

नागपूरः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी हल्ला करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळातील बडतर्फ ११८ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रूजू करून घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने घेतला आहे. यावर प्रतिक्रिया विचारली असता सरकारचा निर्णय आहे, सरकारनेच ठरवावे, अशा मोजक्या शब्दांत शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला केला होता. या हल्ल्याचा आरोप असलेल्या ११८ एसटी कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारने घेतला होता. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रूजू करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच शरद पवार यांनी मात्र अगदी मोज...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!