पत्राचाळ प्रकरणात संजय राऊतांना धक्काः न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ


मुंबईः पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना न्यायालयाकडून आणखी एक धक्का बसला आहे. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालयनालयाने (ईडी) संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी अटक केली होती.

संजय राऊत यांनी ईडीच्या पीएमएलए न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर २७  सप्टेंबरला सुनावणी पार पडली होती. मात्र, न्यायालयाने संजय राऊत यांना दिलासा दिला नव्हता. न्यायालयाने ही सुनावणी १० ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत सात दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

गोरेगावच्या पत्राचाळीतील १ हजार ३९ कोटी रुपयांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात संजय राऊत यांचा सहभाग असल्याचा दावा ईडीने केला आहे. पत्राचाळ पुनर्विकासात खासदार संजय राऊत यांचा थेट असून प्रत्येक गोष्ट कृतीत आणण्यात संजय राऊत सहभागी होते, असा आरोप ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात केला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!