देश

बालभारतीने केले महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे कर्तृत्व संकुचित, इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकात ‘ऐतिहासिक घोडचूक’;  देशातील मुलींची पहिली शाळा…
देश, महाराष्ट्र

बालभारतीने केले महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे कर्तृत्व संकुचित, इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकात ‘ऐतिहासिक घोडचूक’;  देशातील मुलींची पहिली शाळा…

पुणेः महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून देशातील स्त्री शिक्षणाची क्रांतीकारी बिजे रोवली. वस्तुनिष्ठ ऐतिहासिक पुराव्यांवर आधारित असलेला हा इतिहास संपूर्ण जगाला माहीत आहे, परंतु बालभारतीलाच हा इतिहास मान्य नाही. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या उत्तुंग कर्तृत्वाला संकुचित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न बालभारतीच्या इयत्ता तिसरीच्या ‘आपल्या सभोवतालचे जग भाग-२’ या पाठ्यपुस्तकात करण्यात आला आहे. बालभारतीच्या या कोतेपणावर शिक्षक संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून ही ‘ऐतिहासिक घोडचुक’ तातडीने दुरूस्त करण्याची मागणी केली आहे. महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात देशातील मुलींची पहिली शाळा सुरू करून भारतातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ...
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाइन स्व-नामांकन भरण्याची प्रक्रिया सुरू; कुठे आणि कसा करायचा अर्ज? वाचा सविस्तर तपशील
देश

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाइन स्व-नामांकन भरण्याची प्रक्रिया सुरू; कुठे आणि कसा करायचा अर्ज? वाचा सविस्तर तपशील

मुंबई: केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- २०२६ साठी ऑनलाइन स्व-नामांकन प्रक्रियेस प्रारंभ झाला असून राज्यातील पात्र शिक्षकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी स्व-नामांकन प्रक्रिया १५ जून २०२६ पासून सुरू झाली आहे. राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांना या पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहे. पात्र शिक्षकांनी https://nationalawardstoteachers.education.gov.in या वेबपोर्टलवर १० जुलै २०२६ पर्यंत स्व-नामांकन नोंदवावे. तसेच अर्जदारांनी आपले स्व-नामांकन अंतिम करून १३ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन सादर करणे आवश्यक आहे. राज्यातील अधिकाधिक पात्र श...
हॉटेल्स, रेस्टॉरंट्समध्ये फक्त फूड-ग्रेड व गंजरोधक उपकरणे वापरणे बंधनकारक, अन्यथा होणार कारवाई
देश

हॉटेल्स, रेस्टॉरंट्समध्ये फक्त फूड-ग्रेड व गंजरोधक उपकरणे वापरणे बंधनकारक, अन्यथा होणार कारवाई

नवी दिल्ली: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर व प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरंट्ससह अन्न प्रक्रिया उद्योगात अन्न हाताळणी, प्रक्रिया आणि पॅकिंग करताना केवळ फूड-ग्रेड, विषमुक्त आणि गंजरोधक सुरी, ब्लेड; तसेच इतर कापण्याची उपकरणे वापरणे बंधनकारक असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.एफएसएसएआयने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार, काही अन्न व्यवसायांमध्ये गंजलेल्या, तडे गेलेल्या, खराब झालेल्या अथवा रंग लावलेल्या सुरी व कापण्याच्या साधनांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा उपकरणांमुळे अन्नामध्ये भौतिक, रासायनिक आणि सूक्ष्मजीवजन्य दूषितीकरण होण्याची शक्यता असून त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे प्राधिकरणाने म्हटले आहे.अन्न तयार करणे, प्रक्रिय...
ठाकरे गटाच्या ६ फुटीर खासदारांपैकी हिंगोलीचे नागेश आष्टीकर ठरले रात्रीच्या अंधारात दिल्लीत पोहोचणारे पहिले खासदार, वाचा ‘ऑपरेशन टायगर’मध्ये नेमके काय घडले?
देश, महाराष्ट्र, राजकारण

ठाकरे गटाच्या ६ फुटीर खासदारांपैकी हिंगोलीचे नागेश आष्टीकर ठरले रात्रीच्या अंधारात दिल्लीत पोहोचणारे पहिले खासदार, वाचा ‘ऑपरेशन टायगर’मध्ये नेमके काय घडले?

नवी दिल्लीः उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत २०२२ नंतर पुन्हा मोठी फूट पडली. शिवसेनेतील (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या दुसऱ्या मोठ्या फुटीच्या १६ जूनच्या मध्यरात्रीपासूनच सुरूवात झाली. शिवसेनेने (उबाठा) व्हीप बजावून आज दिल्लीत बोलावलेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीला ९ पैकी फक्त तीनच खासदार हजर राहिल्यामुळे या फुटीवर शिक्कामोर्तब झाले आहे. उर्वरित ६ खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत दाखल होणार हेही निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे या फूट नाट्यात हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे १६ जूनच्या मध्यरात्री दिल्लीत दाखल होणारे पहिले बंडखोर खासदार ठरले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार फोडण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्यात येत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होत होती. १४ जून रोजी शिवसेनेने (उबाठा) बोलावलेल्या बैठकीला केवळ तीनच खासदा...
सॉफ्टवेअर-कॉम्प्यूटर सायन्स, एमबीएचा नाद सोडा; प्लंबर, इलेक्ट्रिशियन-सुतारकाम शिका: मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांचा सल्ला
देश

सॉफ्टवेअर-कॉम्प्यूटर सायन्स, एमबीएचा नाद सोडा; प्लंबर, इलेक्ट्रिशियन-सुतारकाम शिका: मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांचा सल्ला

नवी दिल्ली: सॉफ्टवेअर-कॉम्प्यूटर सायन्स, एमबीएचे शिक्षण आता कालबाह्य झाले असून कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे (एआय) रोजगाराच्या स्वरूपात मोठे बदल होत असल्यामुळे तरूणांनी आता पदव्यांच्या मागे न धावता प्लम्बिंग, इलेक्ट्रिशियन, सुतारकाम यासारख्या प्रत्यक्ष मानवी कौशल्यावर लक्ष केंद्रित करावे, असा 'महत्वपूर्ण' सल्ला देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी देशातील तरूणांना दिला आहे.एका खासगी वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्ही. अनंत नागेश्वरन म्हणाले की, एआयच्या झपाट्याने वाढत चाललेल्या प्रभावामुळे जगभरातील रोजगाराच्या बाजाराचे स्वरूप बदलत चालले आहे. देशात दिर्घकाळपर्यंत सॉफ्टवेअर, कॉम्प्यूटर सायन्स, एम.बी.ए. पदव्यांची मोठी चलती होती. पण आता तो काळ संपत चालला आहे. मात्र एआय आता अनेक पारंपरिक कामे आपल्या हातात घेऊ लागला आहे. त्यामुळे तरूणांनी आता एआय पर्याय ठरूच शकत नाही आणि जिथे...
तुम्ही आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आणि पोस्ट ग्रॅज्युएट करत आहात का?, मग यूजीसीची ‘ही’ स्कॉलरशिप तुमच्याचसाठी; वाचा योजनेचा सविस्तर तपशील
देश, विशेष

तुम्ही आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आणि पोस्ट ग्रॅज्युएट करत आहात का?, मग यूजीसीची ‘ही’ स्कॉलरशिप तुमच्याचसाठी; वाचा योजनेचा सविस्तर तपशील

नवी दिल्लीः आई-वडिलांची एकुलती एक मुलगी असलेल्या आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या सिंगल गर्ल चाईल्डसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) २००५-०६ या शैक्षणिक वर्षापासून पदव्युत्तर इंदिरा गांधी शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. कुटुंबातील एकुलत्या एक मुलीच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत एकुलत्या एक मुलीच्या उच्च शिक्षणाचा थेट खर्च उचलला जातो. भारतातील विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्था आणि महाविद्यालयांत पूर्णवेळ नियमित पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी एकुलत्या एक मुलगी असलेल्या निवड उमेदवारांना या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येते. दरवर्षी सुमारे ३००० मुलींना या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु या संख्येला कोणतीही मर्यादा नाही. दोन वर्षे कालावधीसाठी देण्यात येणाऱ्या या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत वार्षिक ३६ हजार २०० ...
मोदी सरकारचा सर्वसामान्यांना मोठा झटका, आता वर्षाला मिळणार ९ ऐवजी फक्त ४ अनुदानित गॅस सिलिंडर!
देश, महाराष्ट्र

मोदी सरकारचा सर्वसामान्यांना मोठा झटका, आता वर्षाला मिळणार ९ ऐवजी फक्त ४ अनुदानित गॅस सिलिंडर!

नवी दिल्लीः एकीकडे स्वयंपाकाच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असतानाच मोदी सरकारने गरिबांना जबर झटका देत सोमवारी स्वयंपाकाच्या अनुदानित गॅस सिलिंडरच्या संख्येत मोठी कपात केली. या निर्णयामुळे आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी ९ ऐवजी फक्त ४ अनुदानित गॅस सिलिंडर मिळतील. या निर्णयाचा सर्वात मोठा फटका ग्रामीण भागातील महिलांना बसणार असून त्यांना पुन्हा चुलीकडे वळावे लागण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील महिलांना चुलीच्या प्रदूषणापासून वाचवण्यासाठी मोदी सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली होती. या योजनेचा मोदी सरकारने मोठ्या प्रमाणावर प्रचार-प्रसारही केला होता. आता मोदी सरकारने वाढता खर्च आणि सबसिडी नियंत्रित करण्यासाठी या योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी मिळणाऱ्या अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या ९ वरून ४ केली आहे....
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके जंतर-मंतरवर दाखल, प्रचंड पोलिस बंदोबस्तात आंदोलन सुरू
दुनिया, देश

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके जंतर-मंतरवर दाखल, प्रचंड पोलिस बंदोबस्तात आंदोलन सुरू

नवी दिल्ली: कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे जंतर-मंतरवर दाखल झाले असून त्यांच्या नेतृत्वात हजारो समर्थकांच्या उपस्थितीत आणि प्रचंड पोलिस बंदोबस्तात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनाला सुरूवात झाली आहे.अभिजीत दिपके हे अमेरिकेहून दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल ३ वर पोहोचल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना जंतर-मंतरवर सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने समर्थकांना थेट जंतर-मंतरवर पोहोचण्याचे आवाहन केले. हातात पुस्तक आणि तिरंगा घेऊन जंतर-मंतरवर या, असे आवाहन अभिजीत दिपके यांनी समर्थकांना केले.अभिजीत दिपके हे ११ वाजेच्या सुमारास जंतर-मंतरवर पोहोचताच त्यांच्या समर्थकांनी भारत माता की जय, इन्क्लाब जिंदाबाद आणि जय भीमच्या घोषणा देत त्यांचे स्वागत केले. ...
अभिजीत दिपके अमेरिकेहून दिल्लीकडे रवाना, कॉक्रोच जनता पार्टीचे उद्या जंतर-मंतरवर आंदोलन
देश, राजकारण

अभिजीत दिपके अमेरिकेहून दिल्लीकडे रवाना, कॉक्रोच जनता पार्टीचे उद्या जंतर-मंतरवर आंदोलन

नवी दिल्ली: नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी कॉक्रोच जनता पार्टी सीजेपी), ६ जून रोजी दिल्लीतील जंतर मंतरवर मोठे आंदोलन करणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके अमेरिकेहून भारताकडे रवाना झाले आहेत. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी ‘माझे भवितव्य आता संविधानाच्या हातात आहे’, असे अभिजीत दिपके यांनी दिपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटले आहे.दरम्यान, आंदोलनाच्या दोन दिवस आधी गुरुवारी कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) एक मोठा निर्णय घेतला आणि आपल्या समर्थकांना एक विशेष आवाहन केले आहे. अभिजीत दीपके यांच्या स्वागतासाठी ६ जून रोजी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गर्दी न करण्याचे आवाहन सीजेपीने आपल्या समर्थकांना केले आहे.याआधी अभिजीत दीपके यांनी त्यांच्या समर्थकांना ६ जून रोजी दिल्ली विमानतळावर येण्या...
महाराष्ट्राची विक्रमी झेप: सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा, देशातील एकूण सौर पंपांमध्ये महाराष्ट्राचा ६४ टक्के वाटा
देश, महाराष्ट्र

महाराष्ट्राची विक्रमी झेप: सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा, देशातील एकूण सौर पंपांमध्ये महाराष्ट्राचा ६४ टक्के वाटा

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): सौर कृषिपंपामध्ये विश्वविक्रम करणाऱ्या महाराष्ट्राने बुधवारी (३ जून) देशात सर्वाधिक १० लाख सौर कृषिपंपांचा टप्पा पूर्ण केला आणि देशपातळीवर एक नवा इतिहास रचला आहे. पीएम कुसुम-बी व मागेल त्याला सौर कृषिपंप अंतर्गत महाराष्ट्राने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. देशातील एकूण सौर कृषिपंपांपैकी तब्बल ६४ टक्के सौर पंप एकट्या महाराष्ट्रात कार्यान्वित झाले आहेत. प्रधानमंत्री कुसुम-बी आणि राज्य शासनाच्या मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेची महावितरणकडून प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात महावितरणने सौर कृषिपंपामध्ये मोठी आघाडी घेतली आहे. देशात आतापर्यंत एकूण १५ लाख ६२ हजार २८९ सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यापैकी तब्बल १० लाख ४७२ (६४ टक्के)...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!