देश

नागरी सहकारी वित्त विकास महामंडळाचे मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवणारः केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची घोषणा
देश, महाराष्ट्र

नागरी सहकारी वित्त विकास महामंडळाचे मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवणारः केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची घोषणा

मुंबई: नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला आधुनिक, पारदर्शक, विश्वासार्ह आणि तंत्रज्ञानाधिष्ठित बनवण्यासाठी ‘अंब्रेला ऑर्गनायझेशन’ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक तहसीलपर्यंत नागरी सहकारी बँकिंगचे जाळे विस्तारण्याला मोठी चालना मिळेल, असा विश्वास केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी आज व्यक्त केला. देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत त्यांनी राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचे मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्यात येईल अशी घोषणा केली. मुंबईच्या बीएसई इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित ‘सहकार नव-क्रांती मेळावा' कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पणन मंत्री जयकुमार रावल, सहकार ...
CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारकडून तिन्ही मागण्या मान्य, कॉक्रोच जनता पार्टीचे जंतर-मंतरवरील आंदोलन मागे!
दुनिया, देश

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारकडून तिन्ही मागण्या मान्य, कॉक्रोच जनता पार्टीचे जंतर-मंतरवरील आंदोलन मागे!

नवी दिल्लीः कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर-मंतरवर तब्बल ३६ दिवस निडरपणे केलेल्या आंदोलनापुढे मान तुकवत मोदी सरकारने अखेर नमते घेतले आणि आज दुपारी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यानंतर केंद्र सरकारने कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) तिन्ही मागण्या केल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने जंरत-मंतरवरील आंदोलन मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली आहे. आंदोलंकानी शांततापूर्ण मार्गाने जंतर-मंतर रिकामे करावे आणि आपल्या घरी जावे असे आवाहन सीजेपीच्या वतीने आंदोलकांना करण्यात आले. नीट पेपरफुटी प्रकरण आणि देशातील शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदी कारभाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ही कॉक्रोच जनता पार्टीची पहिली व मुख्य मागणी आज दुपारी २ वाजून १८ मिनिटांनी प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर मान्य झाली. धर्मेंद्र प्रधान य...
झुरळांच्या दणक्यापुढे मोदी सरकार झुकले! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा, अभिजीत दिपके म्हणालेः कॉक्रोचशी पंगा घेऊ नका!
दुनिया, देश

झुरळांच्या दणक्यापुढे मोदी सरकार झुकले! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा, अभिजीत दिपके म्हणालेः कॉक्रोचशी पंगा घेऊ नका!

नवी दिल्लीः नीट पेपरफुटी प्रकरण आणि देशातील ढासळलेली शिक्षण व्यवस्था याला जबाबदार धरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि नीट पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपये आर्थिक मदत द्यावी. मागणीसाठे गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनाला आज मोठे यश मिळाले. मोदी सरकार सीजेपीच्या आंदोलनापुढे झुकले आणि अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. गेल्या महिनाभरापासून जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू होते. नीट फेपरफुटीप्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी कॉक्रोच जनता पार्टीने लावून धरली होती. या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला. २० जुलै रोजी कॉक्रोच जनता पार्टीने...
दिल्ली पोलिसांनी एका मुलीचे कपडे फाडले, छातीवर पाय दिला आणि काठ्या चालवल्याः अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप, आता चर्चा करायची असेल तर जंतर-मंतरवरच!
दुनिया, देश

दिल्ली पोलिसांनी एका मुलीचे कपडे फाडले, छातीवर पाय दिला आणि काठ्या चालवल्याः अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप, आता चर्चा करायची असेल तर जंतर-मंतरवरच!

नवी दिल्लीः  नीट पेपरफूट आणि शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदीला जबाबदार धरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) आंदोलन सुरू असून सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी चर्चेसाठी केंद्र सरकारसमोर नवीन अट ठेवली आहे. आता आमचे शिष्टमंडळ केंद्र सरकारशी चर्चा करायला जाणार नाही, त्यांना चर्चा करायचीच असेल तर त्यांनी जंतर-मंतरवर यावे, असे अभिजीत दिपके म्हणाले. त्यामुळे नवीन पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे जंतर-मंतरवर ३२ दिवसांपासून म्हणजेच २० जूनपासून धरणे आंदोलन सुरू आहे. २८ जूनपासून जागतिक किर्तीचे पर्यावरणतज्ज्ञ आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक हे जंतर-मंतरवर आमरण उपोषणाला बसले. त्यांचे आमरण उपोषण अद्यापही सुरूच आहे. काल २० जून रोजी सीजेपीने संसद भवनावर मोर्चाचे आयोजन केले होते. या ...
कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात शेकडो विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त आंदोलन
देश, महाराष्ट्र

कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात शेकडो विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त आंदोलन

छत्रपती संभाजीनगरः दिल्लीत क्रॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) सुरू केलेल्या आंदोलनाचे जोरदार पडसाद आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी उमटले. सीजेपीने आज दिल्लीत संसद भवनावर मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चात सहभागी होण्यासाठी लाखोंच्या संख्येने तरूणाईचा सागर रस्त्यावर ओसंडून वाहिला. या मोर्चाच्या समर्थनार्थ आज छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात शेकडो तरूण गोळा झाले आणि त्यांनी जोरदार आंदोलन करत केंद्र सरकारच्या दडपशाहीचा निषेध करत अभिजीत दिपके व सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जोरदार आंदोलन केले. सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ पुकारलेल्या क्रांतीचौकातील या आंदोलनात विविध विद्यार्थी संघटना सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे या आंदोलनात नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशिवाय अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, मानव्य विद्याशाखांचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. ...
दिल्लीत उद्रेक: सीजेपीचे आंदोलन तीव्र, लाखोंच्या संख्येने कॉक्रोच संसद भवनाच्या दिशेने, आंदोलकांवर लाठीमार, अश्रुधुराचा वापर; पण मोर्चेकरी आंदोलनावर ठाम!
दुनिया, देश

दिल्लीत उद्रेक: सीजेपीचे आंदोलन तीव्र, लाखोंच्या संख्येने कॉक्रोच संसद भवनाच्या दिशेने, आंदोलकांवर लाठीमार, अश्रुधुराचा वापर; पण मोर्चेकरी आंदोलनावर ठाम!

नवी दिल्ली: नीट परीक्षेतील घोटाळे आणि देशातील ढासळलेल्या शिक्षण व्यवस्थेला जबाबदार धरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) सुरू केलेल्या आंदोलनाला आज नवीन धार चढली. सीजेपीने संसद भवनावर आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी लाखोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून संसद भवनाच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न करत आहेत. संसद भवनाच्या दिशेने निघालेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. दरम्यान, संसद भवन परिसरात आंदोलक शिरण्याच्या धास्तीने संसद भवनाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. जंतर-मंतरवरून कॉक्रोच जनता पार्टीच्या मोर्चाला सुरूवात झाली. या मोर्चात लाखोंच्या संख्येने आंदोलक सहभागी झाले आहेत. हे आंदोलक जंतर-मंतरवरून संसद भवन परिसरात पोहोचले. ...
पाकिस्तानच्या कुख्यात गँगस्टरचे थेट मराठवाड्यात नेटवर्क, एटीएसने १५ जणांना उचलले; सोशल मीडियाच्या माध्यमातून तरूणांना ओढळले जाळ्यात, पालकांनो सावध व्हा…
देश, महाराष्ट्र

पाकिस्तानच्या कुख्यात गँगस्टरचे थेट मराठवाड्यात नेटवर्क, एटीएसने १५ जणांना उचलले; सोशल मीडियाच्या माध्यमातून तरूणांना ओढळले जाळ्यात, पालकांनो सावध व्हा…

छत्रपती संभाजीनगर: पाकिस्तानचा कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टीशी कथित संबंध असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी मध्यरात्रीपासून छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशिव जिल्ह्यांत एकाचवेळी धडक कारवाई केली. या मोहिमेत सुमारे १५ तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शहजाद भट्टीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती तपासली जात असून आवश्यकतेनुसार संबंधितांना नोटिसा बजावण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील १०, धाराशिवमधील २, बीडमधील १ आणि जालन्यातील २ संशयितांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरच्या एटीएस पथकाकडून या १५ जणांची कसून चौकशी सुरू आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना या त...
राज्यातील पाच शासकीय बीएस्सी नर्सिंग महाविद्यालयांची प्रवेश क्षमता ५० वरून १०० वर,  दहा ठिकाणी सुरू करणार नवीन शासकीय बीएस्सी नर्सिंग महाविद्यालये
देश

राज्यातील पाच शासकीय बीएस्सी नर्सिंग महाविद्यालयांची प्रवेश क्षमता ५० वरून १०० वर,  दहा ठिकाणी सुरू करणार नवीन शासकीय बीएस्सी नर्सिंग महाविद्यालये

मुंबई: राज्यातील आरोग्य व्यवस्थेसाठी कुशल परिचारिकांची उपलब्धता वाढवणे तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शासकीय महाविद्यालयांमधून कमी शैक्षणिक शुल्कात दर्जेदार नर्सिंग शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने नर्सिंग शिक्षणाच्या व्यापक विस्ताराचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत आज या संदर्भातील निवेदन केले. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार मुंबई (जी.टी.), मुंबई (सेंट जॉर्जेस), धुळे, सोलापूर, अंबाजोगाई (बीड), अकोला, नागपूर (आयजीएमसी) आणि सांगली येथील ८ शासकीय जी.एन.एम. महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन करून तेथे प्रत्येकी १०० प्रवेश क्षमतेची शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत, असे मुश्रीफ म्हणाले. मुंबई (जे.जे.), नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नांदेड येथील विद्यमान ५ शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्य...
‘म्हाताऱ्यांनी आता निवृत्त व्हावे आणि आश्रमात जाऊन विश्रांती घ्यावी’ म्हणत कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपकेंनी उतरवली अण्णा हजारेंची ‘अण्णागिरी’!
देश, महाराष्ट्र, राजकारण

‘म्हाताऱ्यांनी आता निवृत्त व्हावे आणि आश्रमात जाऊन विश्रांती घ्यावी’ म्हणत कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपकेंनी उतरवली अण्णा हजारेंची ‘अण्णागिरी’!

छत्रपती संभाजीनगरः केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या १८ दिवसांपासून आंदोलनाला बसलेले कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या उपस्थितीत सोमवारी छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी जोरदार आंदोलन केले. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी भरपावसातही हजारोंच्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनानंतर पत्रकारांनी अभिजीत दिपके यांना अण्णा हजारेंची भेट घेणार का? असे विचारले असता ‘म्हाताऱ्यांनी आता निवृत्त व्हावे आणि आश्रमात जाऊन विश्रांती घ्यावी,’ अशा तिखट शब्दांत त्यांनी हजारेंची ‘अण्णागिरी’ उतरवली. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोमवारी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनाला कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके,...
बालभारतीने केले महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे कर्तृत्व संकुचित, इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकात ‘ऐतिहासिक घोडचूक’;  देशातील मुलींची पहिली शाळा…
देश, महाराष्ट्र

बालभारतीने केले महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे कर्तृत्व संकुचित, इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकात ‘ऐतिहासिक घोडचूक’;  देशातील मुलींची पहिली शाळा…

पुणेः महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून देशातील स्त्री शिक्षणाची क्रांतीकारी बिजे रोवली. वस्तुनिष्ठ ऐतिहासिक पुराव्यांवर आधारित असलेला हा इतिहास संपूर्ण जगाला माहीत आहे, परंतु बालभारतीलाच हा इतिहास मान्य नाही. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या उत्तुंग कर्तृत्वाला संकुचित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न बालभारतीच्या इयत्ता तिसरीच्या ‘आपल्या सभोवतालचे जग भाग-२’ या पाठ्यपुस्तकात करण्यात आला आहे. बालभारतीच्या या कोतेपणावर शिक्षक संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून ही ‘ऐतिहासिक घोडचुक’ तातडीने दुरूस्त करण्याची मागणी केली आहे. महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात देशातील मुलींची पहिली शाळा सुरू करून भारतातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!