चार हजार कोटींच्या निवडणूक रोख्यांचा हिशेबच नाही, प्रशांत भूषण यांचा दावा; एसआयटीच्या मागणीसाठी करणार जनहित याचिका
नवी दिल्लीः निवडणूक रोख्यांचा वापर लाचखोरी, खंडणीवसुली आणि आर्थिक अफरातफरीसाठी झाला असून अद्याप चार हजार कोटींचे निवडणूक रोखे कुणाकुणाला दिले याचा हिशेबच नसल्याचा दावा ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ प्रशांत भूषण यांनी केला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष चौकशी पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणीही त्यांनी केली असून पुढील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी रविवारी जाहीर केले.
राजकीय पक्षांना निधी देण्यासाठी मोदी सरकारने सुरू केलेली निवडणूक रोखे पद्धती घटनाबाह्य असल्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला. या न्यायालयीन लढाईत असलेले प्रशांत भूषण आणि माहिती अधिकार कार्यकर्त्या व कॉमन कॉज संस्थेच्या सदस्य अंजली भारद्वाज यांनी रविवारी मुंबई प्रेस क्लबमध्ये सविस्तर विवेचन केले.
१६ हजार ५०० कोटी रुपयांच्या निवडणूक रोखे खरेदीपैकी...