जीवनशैली

रामदेव बाबांच्या दिव्य फार्मसीला एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा दणकाः  ७३ लाखांहून अधिक किंमतीचा ‘मिसब्रँडेड’ औषधसाठा जप्त
जीवनशैली, देश

रामदेव बाबांच्या दिव्य फार्मसीला एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा दणकाः  ७३ लाखांहून अधिक किंमतीचा ‘मिसब्रँडेड’ औषधसाठा जप्त

मुंबईः ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या (एफडीए) आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच आक्षेपार्ह जाहिराती असलेल्या मिसब्रँडेड औषधीसाठ्याविरुद्ध एफडीएने राज्यभर धडक कारवाई सुरू केली असून या कारवाईचा सर्वात मोठा दणका योगगुरू बाबा रामदेव यांच्या दिव्य फार्मसी या आयुर्वेदिक औषधे उत्पादन करणाऱ्या कंपनीला बसला आहे. एफडीने राज्यभरात ७ जिल्ह्यातील १२ आयुर्वेदिक औषधविक्री आस्थापनामध्ये धडक कारवाई करून दिव्य फार्मसीचा ७३ लाखांहून अधिक किमतीचा आक्षेपार्ह जाहिराती असलेला व मिसब्रँडेड औषध साठा जप्त केला आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा आस्थापनेला प्रशासनाकडून कोणतीही सवलत दिली जाणार नाही. भ्रामक व दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणे आणि अवैध औषध उत्पादन व विक्रीविरुद्धची कारवाई यापुढे अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण असेल, असा स्पष्ट इशारा अ...
जागतिक थायरॉईड दिन विशेषः जाणून घ्या थायरॉईड नोड्यूल अर्थात थायरॉईड ग्रंथीमधील गाठींची लक्षणे, निदान आणि उपचाराची पद्धती
जीवनशैली, साय-टेक

जागतिक थायरॉईड दिन विशेषः जाणून घ्या थायरॉईड नोड्यूल अर्थात थायरॉईड ग्रंथीमधील गाठींची लक्षणे, निदान आणि उपचाराची पद्धती

जागतिक आरोग्य समुदायाकडून मानवी शरीरातील थायरॉईड ग्रंथीचे महत्व, या ग्रंथीचे आजार आणि त्यावरील उपचारांविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २५ मे रोजी जागतिक थायरॉईड दिन साजरा केला जातो. या वर्षीच्या जागतिक थायरॉईड दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरातील प्रख्यात कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. स्नेहा डोंगरदिवे यांचा हा विशेष लेख... डॉ. स्नेहा डोंगरदिवे (कान, नाक, घसा तज्ज्ञ) दरवर्षी २५ मे रोजी जागतिक थायरॉईड दिन साजरा केला जातो. थायरॉईड ग्रंथीचे आरोग्य, तिचे शरिरातील महत्व आणि थायरॉईडच्या आजारांविषयी समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या मुख्य उद्देशाने जागतिक थायरॉइड दिन साजरा केला जातो. अनेकदा दुर्लक्षित केली जाणारी थायरॉईड ही शरिराची मुख्य नियामक ग्रंथी आहे. जी तुमच्या ऊर्जेची पातळी आणि वजनापासून ते तुमच्या मनःस्थिती आणि ह्रदयाच्या ठोक्यांपर्यंत सर्व गोष्टींवर प्रभाव टाकते. भारतात...
राज्यातील विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, अविवाहित आणि एकट्याने संसाराचा भार सांभाळणाऱ्या एकल महिलांसाठी धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी समिती स्थापन
जीवनशैली, महाराष्ट्र

राज्यातील विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, अविवाहित आणि एकट्याने संसाराचा भार सांभाळणाऱ्या एकल महिलांसाठी धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी समिती स्थापन

मुंबई: राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ मिळावा यासाठी एकल महिला धोरण तयार करण्यात येणार असून या धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी शनिवारी सांगितले. राज्यातील विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, अविवाहित तसेच एकट्याने संसाराचा भार सांभाळणाऱ्या महिलांच्या समस्या शासन स्तरावर प्रभावीपणे मांडून त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता होती. यासाठी महिला व बाल विकास विभागाने मसुदा समिती स्थापन केली असल्याचे बोर्डीकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केलेल्या घोषणेनुसार या धोरणासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून त्या आधारे...
हॉटेल्समध्ये पनीरच्या नावाखाली सर्रास ‘चीज ॲनालॉग’चा वापर करून खवय्यांच्या आरोग्याशी खेळ, वाचा दोघांतील फरक आणि गंडवले गेल्यास कुठे करायची तक्रार?  
जीवनशैली, महाराष्ट्र

हॉटेल्समध्ये पनीरच्या नावाखाली सर्रास ‘चीज ॲनालॉग’चा वापर करून खवय्यांच्या आरोग्याशी खेळ, वाचा दोघांतील फरक आणि गंडवले गेल्यास कुठे करायची तक्रार?  

मुंबई: पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन नियमांनुसार, प्रत्येक हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेते आणि रेस्टॉरंटला त्यांच्या मेन्युकार्ड, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर याबाबत स्पष्ट माहिती द्यावी लागेल. जर पदार्थात नैसर्गिक पनीर, चीजऐवजी 'चीज ॲनालॉग' वापरले असेल, तर त्याचा उल्लेख करणे आता कायदेशीररित्या बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात २५ मार्च २०२६ पासून मोहीम राबवली जात आहे. पनीरमधील वाढत्या भेसळीची गंभीर दखल घेत तसेच लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने मंत्री झिरवाळ यांनी पनीरच्या नावाखाली वापरल्या जाणाऱ्या वनस्पतीजन्य फॅट्सपासून बनवलेल्या 'ॲनालॉग'वर कारवाईचे आदेश दिले आहेत. राज्याच्या या निर्णयाला केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा व नियाम...
महिलांना नमाज पठण करण्यासाठी मशिदीमध्ये प्रवेश करण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत, मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण
जीवनशैली, देश

महिलांना नमाज पठण करण्यासाठी मशिदीमध्ये प्रवेश करण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत, मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण

नवी दिल्लीः महिलांना नमाज पठण करण्यासाठी मशिदीमध्ये प्रवेश करण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत, इस्लामवर अत्यावश्यक धार्मिक प्रथा (ईआरपी) चाचणी चुकीच्या पद्धतीने लादण्यात आल्या आहेत, असे अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने गुरूवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. पुरूषांना मशिदीमध्ये नमाज पठण करणे बंधनकारक आहे, मात्र स्त्रियांवर असे कोणतेही बंधन नाही, असेही मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. शबरीमलामध्ये महिलांच्या प्रवेशावरून निर्माण झालेल्या वादात दाखल याचिकांवर सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. संविधनाच्या अनुच्छेद २५ आणि २६ च्या व्याप्तीशी संबंधित घटनात्मक मुद्दे या दोन्ही प्रकरणांमध्ये लागू होत असल्यामुळे महिलांना मशिदीमध्ये प्रवेश करण्यास अनुमती देण्याची विनंती करणाऱ्या रिट याचिकाही शबरीमला प्रकरणाशी संबंधित याचिकांबरोबर जोडण्या...
सरकारी शाळेत विद्यार्थ्यांच्याच पैश्यातून बांधले ‘भूत मंदिर’, वाद चिघळताच शिक्षण विभागाने दिले चौकशीचे आदेश
जीवनशैली, देश

सरकारी शाळेत विद्यार्थ्यांच्याच पैश्यातून बांधले ‘भूत मंदिर’, वाद चिघळताच शिक्षण विभागाने दिले चौकशीचे आदेश

नवी दिल्लीः उत्तराखंड राज्यातील कुमाऊंच्या पर्वत रांगात वसलेल्या कौसानीमधील एका सरकारी शाळेच्या परिसरातच छोटेखानी ‘भूताचे मंदिर’ बांधण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. शाळेच्या परिसरातच ‘भूताचे मंदिर’ मंदिर बांधल्याचा वाद चिघळू लागताच आता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मागील ३० वर्षांपासून शाळेच्या परिसरात भटकत असलेल्या एका आत्म्याला शांत करण्यासाठी हे मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून वर्गणी गोळा करण्यात आली होती. शाळेच्या परिसरात भटकत असलेल्या ‘आत्म्याला दूर ठेवण्यासाठी’ आधी विटांची तात्पुरती संरचना बांधण्यात आली. परंतु जेव्हा शाळेतील अनेक विद्यार्थीनी अज्ञात कारणांमुळे बेशुद्ध पडू लागल्या, तेव्हा ‘नेपाळच्या एका कामगाराची भटकती आत्मा’ त्याला कारणीभूत असल्याचा समज करून घेण्यात आला, असे सांगण...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आरएसएस: समता आणि बहुसंख्याकतेच्या हिंदुत्वातील वैचारिक संघर्ष
अभिव्यक्ती, जीवनशैली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आरएसएस: समता आणि बहुसंख्याकतेच्या हिंदुत्वातील वैचारिक संघर्ष

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग म्हणजे विवेक, बंधुता, समता आणि न्याय तर आरएसएसचा मार्ग म्हणजे संस्कृती, राष्ट्रभक्ती आणि हिंदू एकात्मता. एका मार्गाचा उद्देश मानवाला मुक्त करणे होता, तर दुसऱ्याचा उद्देश संस्कृतीच्या चौकटीत सर्वांना बंदिस्त करून घेणे हा होता. या दोन विचारसरणींच्या संघर्षातूनच भारतीय लोकशाहीचा चेहराच ठरला. प्रवीण बागडे, नागपूर भारताच्या सामाजिक विचारविश्वात दोन प्रवाह कायम एकमेकांना छेद देत आले आहेत. एक म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा आणि मानवमुक्तीचा विचार आणि दुसरा म्हणजे आरएसएसचा हिंदुत्ववादी राष्ट्रवाद. या दोन विचारप्रवाहांचा संघर्ष हा केवळ इतिहासातील प्रसंग नसून तो आजही भारतीय लोकशाहीच्या आत्म्याला आकार देणारा संघर्ष आहे. एकीकडे आंबेडकरांचा विवेकाधारित, वैज्ञानिक, समतेवर उभा विचार आहे; तर दुसरीकडे आरएसएसचा संस्कृतीकेंद्रित, बहुसंख्याकवादी दृष्टिकोन आहे. य...
उपवासाला भगर खाताय? बुरशीयुक्त भगर खाल्ल्यास अन्न विषबाधा होण्याचा धोका, अशी घ्या खबरदारी!
जीवनशैली

उपवासाला भगर खाताय? बुरशीयुक्त भगर खाल्ल्यास अन्न विषबाधा होण्याचा धोका, अशी घ्या खबरदारी!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): उपवासाला फराळ म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या भगरीला जर बुरशीचा प्रादुर्भाव झाला असेल तर अन्नविषबाधा होऊ शकते. त्यासाठी प्रशासनाने ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून बुरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर विक्री करतांना आढळल्यास संबंधित विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल असेही निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण फुलारी यांनी कळवले आहे. भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्परगिलस प्रजातीच्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो. ज्यामुळे फ्युमिगाक्लेविन यासारखी विषद्रव्ये तयार होतात. पावसाळ्यातील वातावरण बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असते. त्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव झालेली अशी भगर खाण्यात आल्यास अन्न विषबाधा होऊ शकते. अशी घ्या काळजी बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करा. शक्यतो पाकीटबंद भगर घ्या. ब्रँड नाव नसलेली...
डिजिटल युगात तणावमुक्त जीवन कसे जगायचे?, वाचा प्रेरणादायी वक्ते गोपाल दास यांनी दिलेल्या महत्वाच्या टिप्स
जीवनशैली, साय-टेक

डिजिटल युगात तणावमुक्त जीवन कसे जगायचे?, वाचा प्रेरणादायी वक्ते गोपाल दास यांनी दिलेल्या महत्वाच्या टिप्स

मुंबई: धकाधकीच्या आणि डिजिटल युगात माणस जरी एकमेकांच्या संपर्कात असली, तरी मनाने दूर जात असल्याचे चित्र समाजात दिसून येत आहे. मोबाईल, सोशल मीडियाच्या सततच्या वापरामुळे प्रत्यक्ष संवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे डिजिटल युगात संवाद महत्त्वाचा आहे. धावपळीच्या जीवनात संघर्षांवर यशस्वीरित्या मात करण्यासाठी तणावमुक्त जीवनशैली आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचे मत प्रेरणादायी वक्ते व लेखक प्रभू गौर गोपाल दास यांनी व्यक्त केले. टेक-वारी कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्रालयात आयोजित ‘प्रभावी व तणावमुक्त जीवन’ या विषयावर प्रभू गौर गोपाल दास बोलत होते. मंत्रालयाच्या या मंदिरात तंत्रज्ञान हे दैवत असून डिजिटल टेक्नॉलॉजी ही अभंगासमान आहे, आधुनिक काळात तंत्रज्ञान आणि डिजिटल कौशल्य ही यशस्वी भविष्यासाठी आवश्यक ठरली आहेत. त्यामुळे आपण त्याचा स्वीकार भक्तिभावाने करावा, असे त्यांनी सांगितले. टेक्नोसॅव्...
अक्षय तृतीयेचा मुहूर्तावर अनेक बालविवाहांचा बार उडण्याची शक्यता, आपल्या परिसरात असे विवाह तर होत नाहीत ना? ‘येथे’ साधा तत्काळ संपर्क!
जीवनशैली, महाराष्ट्र

अक्षय तृतीयेचा मुहूर्तावर अनेक बालविवाहांचा बार उडण्याची शक्यता, आपल्या परिसरात असे विवाह तर होत नाहीत ना? ‘येथे’ साधा तत्काळ संपर्क!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): अक्षय तृतीययेच्या मुहूर्तावर अनेक विवाह होत असतात. त्यात बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी जिल्हा, तालुका व गावस्तरावरील शासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे, असे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यंत्रणांना दिले आहेत. नागरिकांनीही आपल्या परिसरात बालविवाह होत असल्यास तत्काळ संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. यंदा उद्या (३० एप्रिल) अक्षय तृतीया आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण लक्षात घेता बालविवाह निर्मूलनासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या कृती दलाने बालविवाह निर्मूलन कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार सर्व संबंधित विभागाच्या समन्वयाने जिल्ह्यात बालविवाह रोखण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. १ एप्रिल २०२४ ते आजपर्यंत एकूण ८८ बालविवाह या कृती दलामार्फत ...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!