जीवनशैली

शेतकरी तरूणाशी लग्न करायला मुली तयारच होईनात, सरपंचाने लढवली शक्कल; जाहीर केली अशी भन्नाट योजना!
जीवनशैली, विशेष

शेतकरी तरूणाशी लग्न करायला मुली तयारच होईनात, सरपंचाने लढवली शक्कल; जाहीर केली अशी भन्नाट योजना!

अहमदनगरः शेतकरी हा जगाचा पोशिंदा, अन्नदाता अशा भारी भक्कम शब्दांत आपण सगळेच शेतकऱ्यांचे कौतुक करतो. परंतु त्याच शेतकऱ्याशी जेव्हा बेटी व्यवहार करण्याची वेळ आली तर मात्र काय करतो तुमचा मुलगा? शेती? असे म्हणून आपण ज्याची रोटी खातो, त्याच्याशी बेटी व्यवहार करायला मात्र सपशेल नकार देतो. ही समस्या महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच गावांत कमीअधिक प्रमाणात गंभीर स्वरुप धारण करू लागली आहे. यावर तोडगा म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील एका सरपंचाने शक्कल लढवली आणि एक भन्नाट योजना जाहीर केली आहे. सध्या ही योजना चांगलीच चर्चेत आहे.  गावातील शेतकऱ्यांच्या मुलांना मुली द्यायला कोणीच तयार होत नसल्यामुळे त्यांचे लग्न कसे व्हायचे? हा प्रश्न गंभीर बनत चालल्याचे पाहून एका सरपंचाने शक्कल लढवली आणि एक भन्नाट योजना जाहीर केली आहे. शेतकरी अर्धांगिनी योजना असे त्या योजनेचे नाव असून जी मुलगी शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न क...
महिलादिनी आनंदाची बातमीः स्तनाच्या कर्करोगावर राज्य सरकार करणार मोफत उपचार, नोंदणी शुल्कही माफ!
जीवनशैली, महाराष्ट्र

महिलादिनी आनंदाची बातमीः स्तनाच्या कर्करोगावर राज्य सरकार करणार मोफत उपचार, नोंदणी शुल्कही माफ!

मुंबई: देशात प्रत्येक वर्षी स्तनाच्या कर्करोगाने ९० हजार महिलांचा मृत्यू होतो. दर सहा मिनिटाला एक मृत्यू, अशी या रोगाची चिंताजनक आकडेवारी आहे. स्तनाच्या कर्क रोगावरील सर्व उपचार राज्य सरकार मोफत करणार असल्याची घोषणा आज आंतरराष्ट्रीय महिलादिनी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली. कोणत्याही रूग्णालयात महिलांना स्तन कर्करोगाच्या तपासासाठी नोंदणी शुल्क (केस पेपर फी) माफ करणार असल्याचेही महाजन यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय महिलादिनी कामा व आलब्लेस रूग्णालय येथे स्तनाच्या कर्क रोगाबाबत जनजागृती आणि उपचार अभियानाच्या शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात महाजन बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक दिलीप म्हैसेकर, सहसंचालक अजय चंदनवाले, रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे आदी उपस्थित होते. ...
‘सनातन धर्म’ हाच भारताचा राष्ट्रीय धर्मः योगी आदित्यनाथ यांची घोषणा; तर मग जैन, बौद्ध, इस्लाम संपले का?-काँग्रेसचा सवाल
जीवनशैली, देश, विशेष

‘सनातन धर्म’ हाच भारताचा राष्ट्रीय धर्मः योगी आदित्यनाथ यांची घोषणा; तर मग जैन, बौद्ध, इस्लाम संपले का?-काँग्रेसचा सवाल

नवी दिल्ली/लखनऊः ‘सनातन धर्म’ हाच भारताचा राष्ट्रीय धर्म आणि राम मंदिर हेच भारताचे राष्ट्रीय मंदिर आहे, अशी घोषणाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी करून टाकली आहे. भारतीय संविधानाच्या मूळ भावनेलाच हात घालणारी योगी आदित्यनाथ यांची ही घोषणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) हिंदू राष्ट्राच्या स्वप्नाची अप्रत्यक्ष घोषणाच असल्याचे मानले जात आहे. योगींच्या या घोषणेवर देशभरातून तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.  राजस्थानच्या जालोर येथील नीलकंठ महादेव मंदिराच्या वतीने शुक्रवारी (२७ जानेवारी) आयोजित एका कार्यक्रमात बोलताना योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केली आहे. वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जाऊन आम्ही राष्ट्रीय धर्माशी जोडले जातो. जर आम्ही राष्ट्रीय धर्माशी जोडलो गेलो तरच देश सुरक्षित होता. आमची धार्मिक स्थळे तोडली गेली तर त्यांची पुनर्बांधणीही होते. अयोध्येत ५०० वर्षांन...
देशात समान नागरी कायदा लागू करण्यावर भाजप ठामः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
जीवनशैली, देश

देशात समान नागरी कायदा लागू करण्यावर भाजप ठामः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

नवी दिल्लीः भारतीय जनसंघापासून भाजपपर्यंतच्या राजकीय प्रवासात समान नागरी कायदा लागू करण्याचे देशातील जनतेला आश्वासन आहे. देशात समान नागरी कायदा लागू करण्यावर भाजप ठाम आहे. परंतु निर्धारित प्रक्रियेचे पालन आणि लोकशाही मार्गाने चर्चा करूनच देशात समान नागरी कायदा लागू केला जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. जेव्हा केव्हा योग्यवेळ येईल, तेव्हा देशात समान नागरी कायदा आणला पाहिजे, असा सल्ला संविधान सभेनेही देशभरातील विधिमंडळे आणि संसदेला दिला होता. कोणत्याही पंथनिरपेक्ष राष्ट्रात धर्माच्या आधारावर कायदे असू नयेत, असेही शाह म्हणाले. टाइम्स नाऊच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. विशेष म्हणजे गुजरात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याच्या तोंडावर मागच्या महिन्यात गुजरातमधील भाजप सरकारने समान नागरी कायदा लागू करण्याच्या मुद्दयावर एक समिती स्थापन करण्याची घोषणा क...
कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी अननसाचा रस फायदेशीर
जीवनशैली

कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी अननसाचा रस फायदेशीर

मुंबई: शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी ज्यूसचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. ज्यूसमधील पोषक तत्त्वे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात. बहुतेक लोक मोसंबी आणि डाळिंबाचा रस पिणे पसंत करतात; परंतु हा रस जास्ती गोड असल्यामुळे मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. तसेच कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी अननसाचा रस अधिक फायदेशीर ठरू शकते. अननसात (Pineapple) ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. अननस हे लिंबूवर्गीय फळ असून ते चरबीदेखील कमी करण्यास मदत करते. उच्च कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊ लागते. यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, मधुमेह आणि उच्च रक्तदाब होऊ शकतो. लिंबूवर्गीय फळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. यामध्ये अननस हा सर्वांत उत्तम पर्याय मानला जातो. अननसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’...
राजधानी दिल्लीत नाइट लाइफः ३०० पेक्षाजास्त आस्थापना २४ तास सुरू राहणार
जीवनशैली, देश, विशेष

राजधानी दिल्लीत नाइट लाइफः ३०० पेक्षाजास्त आस्थापना २४ तास सुरू राहणार

नवी दिल्लीः मुंबईत नाइट लाइफ सुरू करण्याचे युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांचे स्वप्न राजधानी दिल्लीतही साकार होणार आहे. दिल्लीतील ३०० पेक्षा जास्त आस्थापना २४ तास सुरू ठेवता येणार आहेत. यामध्ये रेस्टॉरंट्सपासून मेडिकलची दुकाने, परिवहन सेवा, बीपीओ आणि ऑनलाइन डिलिव्हरीचा समावेश आहे. या श्रेणीतील दुकानांनी २४ तास सुरू ठेवण्याच्या परवानगीसाठी अर्ज केल्यानंतर त्यांना पुढील आठवड्यापासून परवानगी दिली जाणार आहे.  दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी ३१४ आस्थापनांना २४ तास सुरू ठेवण्याची सूट देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामधील काही प्रस्ताव २०१६ पासून प्रलंबित होते. आता उपराज्यपालांनी दिलेल्या निर्देशांनुसार यासंबंधीची अधिसूचना सात दिवसांच्या आत जारी करावी. या निर्णयानंतर मोठ्या शहरांमध्ये प्रचलित असलेल्या ‘नाइट लाइफ’ संस्कृतीलाही चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे. यामध्...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!