राजकारण

मराठवाड्यात लवकरच आणखी एक विभागीय आयुक्त कार्यालय: महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा; नांदेड की लातूर? हा वाद मात्र अद्याप कायम!
महाराष्ट्र, राजकारण

मराठवाड्यात लवकरच आणखी एक विभागीय आयुक्त कार्यालय: महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा; नांदेड की लातूर? हा वाद मात्र अद्याप कायम!

मुंबई:  मराठवाडा विभागातील प्रशासकीय कामकाज सुलभ करण्यासाठी आणखी एक महसूल आयुक्तालय आणि उपसंचालक भूमी अभिलेख कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे. हे कार्यालय नांदेड किंवा लातूर येथे स्थापन करण्याबाबत निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधानसभेत दिली. मराठवाड्याच्या महसूल आयुक्तालयाचे विभाजन करून आणखी एका विभागीय आयुक्तालयाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. राज्य सरकारने मराठवाड्यात आणखी एका विभागीय आयुक्त कार्यालयाची निर्मिती करण्याची तत्वतः तयारीही करून ठेवली आहे. परंतु हे विभागीय आयुक्त कार्यालय नांदेडला स्थापन करायचे की लातूरला? हा वाद मिटला नसल्यामुळे विभागीय आयुक्तालायची निर्मिती रखडली आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी आ. गोपीचंद पडळकर यांनी भूमिअभिलेख विभागाबाबत मांडले...
आ. विलास भुमरेंच्या अल्पवयीन मुलाच्या बोटाला मतदान केल्याची शाई लावल्यामुळे पाचोड मतदान केंद्रातील तीन कर्मचारी निलंबित!
महाराष्ट्र, राजकारण

आ. विलास भुमरेंच्या अल्पवयीन मुलाच्या बोटाला मतदान केल्याची शाई लावल्यामुळे पाचोड मतदान केंद्रातील तीन कर्मचारी निलंबित!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पैठण तालुक्यातील पाचोड येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा मतदान केंद्रावर शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार विलास भुमरे यांच्या अल्पवयीन मुलाच्या बोटाला शाई लावल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मतदान केंद्रावरील तीन कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात आले. या मतदानाच्या दिवशी शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार विलास भुमरे हे मतदानासाठी आपल्या अल्पवयीन मुलासह पाचोड येथील मतदान केंद्रावर पोहोचले. आ. भुमरे यांच्याबरोबरच त्यांच्या अल्पवयीन मुलालाही मतदान केंद्रावर प्रवेश दिल्यानंतर त्याच्या बोटाला मतदान केल्याची शाई लावल्यामुळे टिकेची झोड उठली होती. त्याच प्रकरणात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे. हेही वाच...
आता खुद्द पवार कुटुंबालाच अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवर संशय, १० फेब्रुवारी रोजी होणार ‘रहस्या’चा उलगडा?
देश, महाराष्ट्र, राजकारण

आता खुद्द पवार कुटुंबालाच अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवर संशय, १० फेब्रुवारी रोजी होणार ‘रहस्या’चा उलगडा?

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील विमान दुर्घटनेत झालेल्या मृत्यूबाबत आता पवार कुटुंबानेही शंका घेतली आहे. या विमान दुर्घटनेबाबत लोकांच्या मनात अनेक सवाल आहेत आणि पवार कुटुंबालाही संशय आहे, असे अजित पवारांचे पुतणे आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. १० फेब्रुवारी रोजी मुंबईत आपण त्याबाबतचे सादरीकरण (प्रेझेंटेशन) करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. या प्रेझेंटेशनमध्ये सर्व शंका स्पष्ट केल्या जातील, असेही त्यांनी म्हटले आहे. २८ जानेवारी रोजी अजित पवार यांचा बारामतीतील विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. या विमान दुर्घटनेनंतर लगेचच पश्चिम बंगालच्या उपमुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी या विमान दुर्घटनेबाबत संशय व्यक्त करत या प्र...
आ. विलास भुमरे यांनी मुलाला सोबत घेऊन दाबले ईव्हीएमचे बटन, मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी बोटाला शाईही लावल्यामुळे वाद
महाराष्ट्र, राजकारण

आ. विलास भुमरे यांनी मुलाला सोबत घेऊन दाबले ईव्हीएमचे बटन, मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी बोटाला शाईही लावल्यामुळे वाद

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांचे पुत्र आणि बोगस मतदानावरून वादग्रस्त विधान करणारे शिवसेना शिंदे गटाचे पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी आज आपल्या मुलाला सोबत घेऊन मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांनी त्यांच्याबरोबरच त्यांच्या मुलाच्या बोटालाही शाई लावली. एवढेच नव्हे तर त्यांनी मुलाला सोबत घेऊन ईव्हीएमचे बटनही दाबले. हा गंभीर प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड मतदान केंद्रावर आज सकाळी घडला. आमदार विलास भुमरे हे आज सकाळी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपल्या मुलाला घेऊन पाचोड येथील मतदान केंद्रात दाखल झाले. मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांनी आ. विलास भुमरे यांच्या बरोबरच त्यांच्या मुलाच्या बोटालाही शाई लावली. आ. विलास भुमरे हे आपल्या मुलाला घेऊन ईव्हीएमजवळ गेले आणि त्यांनी मुलाला ईव्हीएमचे बटन दाबायला लावले. या गंभीर प्रकारावरून आ....
लातूरकरांनी भाजपची चांगलीच जिरवली, काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीचा दणदणीत विजय; ‘वंचित’च्या विजयाच्या स्ट्राईक रेट तब्बल ९९ टक्के!
महाराष्ट्र, राजकारण

लातूरकरांनी भाजपची चांगलीच जिरवली, काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीचा दणदणीत विजय; ‘वंचित’च्या विजयाच्या स्ट्राईक रेट तब्बल ९९ टक्के!

लातूरः काँग्रेसचे दिवगंत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसून टाकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपची लातूरकरांनी चांगलीच जिरवली. लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीच्या युतीने ४७ जागांवर दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमताचा आकडा पार  केला. या निवडणुकीत भाजपला केवळ २२ जागा मिळाल्या.  विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीने ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यापैकी ४ उमेदवार विजयी झाले आहेत. लातूरमधील ‘वंचित’च्या विजयाचा स्ट्राईक रेट तब्बल ९९ टक्के आहे. लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लातूरमधून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वाद निर्माण ...
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर; ५ फेब्रुवारीला मतदान, ७ फेब्रुवारीला मतमोजणी
महाराष्ट्र, राजकारण

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर; ५ फेब्रुवारीला मतदान, ७ फेब्रुवारीला मतमोजणी

मुंबई: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या प्रचाराची रणधुमाळी थंडावली असतानाच राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर केला. या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान तर ७ फेब्रुवारीला मतमोजणी होईल, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.ज्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यात येत आहेत, असे वाघमारे म्हणाले. असा असेल निवडणूक कार्यक्रम निवडणूक अधिसूचना: १६ जानेवारी २०२६उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी: १६ जानेवारी ते २१ जानेवारी २०२६, सकाळी ११ वाजेपासू...
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूकः ९ प्रभागांतील ३६ नगरसेवकांचा निर्णय अनुसूचित जातीच्या मतदारांच्या हाती, तेच ठरवणार ‘घडले-बिघडले’चे गणित!
महाराष्ट्र, राजकारण

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूकः ९ प्रभागांतील ३६ नगरसेवकांचा निर्णय अनुसूचित जातीच्या मतदारांच्या हाती, तेच ठरवणार ‘घडले-बिघडले’चे गणित!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): प्रभाग पद्धतीनुसार होत असलेली छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची सध्याची निवडणूक धक्कादायक निकाल देणारी आणि सगळ्यांचेच आडाखे चुकवणारी ठरण्याची शक्यता आहे. या प्रभाग पद्धतीमुळे क्रॉस व्होटिंग होण्याचाच जास्त धोका असल्यामुळे ज्यांनी हा प्रभाग रचनेचा खटाटोप करून एक हाती सत्तेचे स्वप्न पाहिले, त्यांचे स्वप्नही झोपेतच विरण्याची शक्यता राजकीय विश्लेषक बोलून दाखवू लागले आहेत. अशात एकूण २९ प्रभागांपैकी ९ प्रभागांमध्ये अनुसूचित जातीच्या मतदारांचे प्राबल्य असून या मतदारांचा निर्णयच महापालिकेच्या सत्तेच्या सोपानाचे गणित ‘घडवणार-बिघडवणार’ आहे. प्रभाग पद्धतीनुसार होत असलेल्या या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे. प्रभाग कुठून सुरू होतो आणि कुठे संपतो? याची स्पष्ट कल्पनाच आली नसल्यामुळे एका प्रभागातील उमेदवारांच्या प्रचार रॅली अने...
१५ जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; पण लाभार्थी कोण?
महाराष्ट्र, राजकारण

१५ जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; पण लाभार्थी कोण?

मुंबईः महाराष्ट्र सरकारने गुरूवार, १५ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राज्य सरकारने आधी जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या यादीत या सार्वजनिक सुट्टीचा समावेश नव्हता. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील इतर २९ महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात आलेली सार्वजनिक सुट्टी ही मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्ह्यांसह निवडणुका होऊ घातलेल्या २९ महानगरपालिकांच्या क्षेत्रात लागू असेल. ही सार्वजनिक सुट्टी केवळ संबंधित स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक कार्यक्षेत्रासाठीच लागू असेल, असे राज्य शासनाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. या सार्वजनिक सुट्टीबाबतची अधिसूचना सर्व विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणण्याचे निर्दे...
थेट जनतेतून निवडून आलेल्या नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांना सदस्यत्व आणि मताचाही अधिकार
महाराष्ट्र, राजकारण

थेट जनतेतून निवडून आलेल्या नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांना सदस्यत्व आणि मताचाही अधिकार

मुंबईः नगरपरिषदा, नगरपंचायतीमध्ये थेट जनतेतून निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व आणि मताचा अधिकार देण्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या  मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असलेली व्यक्ती अध्यक्ष म्हणून निवडून येण्यास पात्र असते. त्यामुळे एखादी व्यक्ती अध्यक्ष म्हणून आणि त्याचवेळी सदस्य म्हणून निवडून येऊ शकते आणि दोन्ही पदावरही निवडून येऊ शकते. अशा व्यक्तीला दोन्ही पदांसाठी जनादेश मिळालेला असतो. म्हणूनच सदस्यांमधून अध्यक्ष म्हणून निवडून आलेली व्यक्ती सदस्य राहते आणि त्याचबरोबर अध्यक्ष व सदस्य म्हणूनही काम करते. थेट जनतेतून निवडून आलेल्या आणि सदस्यांमधून निवडून आलेल्या अध्यक्षास जनादेश असतोच. त्यामुळे या सुधारणेनुसार आता अ...
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमीः उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्या युतीची घोषणा, मुंबईचा महापौर मराठीच म्हणत फुंकले निवडणुकांचे रणशिंग!
महाराष्ट्र, राजकारण

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमीः उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्या युतीची घोषणा, मुंबईचा महापौर मराठीच म्हणत फुंकले निवडणुकांचे रणशिंग!

मुंबईः महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचाविषय ठरलेली उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेच्या अधिकृत घोषणा आज करण्यात आली. मुंबईच्या वरळीतील हॉटेल ब्लू सीमध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केली. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार असा दावा करत राज आणि उद्धव यांनी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. आजारी असतानासुद्धा शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत हे या पत्रकार परिषदेला हजर राहिले. त्यांनीच या पत्रकार परिषदेची सुरूवात केली. ‘आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश ज्याप्रमाणे महाराष्ट्रात आला, तसाच आज मराठी ऐक्याचा मंगलकलश उद्धव आणि राज यांच्या रुपाने आला आहे. महाराष्ट्राला केवळ ठाकरेच नेतृत्व देऊ शकतात आणि आजच्या युतीमुळे मुंबईसह सर्व महापालिकांवर...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!