आता फक्त QR कोड स्कॅन करून नोंदवा तुमची तक्रार किंवा सूचना, जिल्हाधिकारी कार्यालयाचे डिजिटल पाऊल
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): आपल्यावर होणारा अन्याय, कामकाजातील दिरंगाई यासाठी नागरिकांना थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवता यावी यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी QR कोड स्कॅन करून नागरिकांना तक्रार किंवा सूचना नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता आपल्या मोबाईलमध्ये फक्त QR कोड स्कॅन करा आणि आपली तक्रार वा सूचना नोंदवा, अशी ही अभिनव संकल्पना असून आजपासून प्रत्येक तहसील व उपविभागीय कार्यालयांत हे QR कोड प्रदर्शित करण्यात आले आहेत. आजपासून जेथे मंडळस्तरावर कार्यालये कार्यरत नव्हती तेथे मंडळ कार्यालयेही सुरु करण्यात आली आहेत.
नागरिकांना तक्रार व सूचना नोंदवताना येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी स्वामी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालये व उपविभागीय अधिकारी (एसडीएम) कार्यालयांत तक्रार पेटीशेजारी QR कोड लावण्यात आले आहेत. या QR कोडच्या माध्यमातू...









