Blog

हॉटेल्स, रेस्टॉरंट्समध्ये फक्त फूड-ग्रेड व गंजरोधक उपकरणे वापरणे बंधनकारक, अन्यथा होणार कारवाई
देश

हॉटेल्स, रेस्टॉरंट्समध्ये फक्त फूड-ग्रेड व गंजरोधक उपकरणे वापरणे बंधनकारक, अन्यथा होणार कारवाई

नवी दिल्ली: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर व प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरंट्ससह अन्न प्रक्रिया उद्योगात अन्न हाताळणी, प्रक्रिया आणि पॅकिंग करताना केवळ फूड-ग्रेड, विषमुक्त आणि गंजरोधक सुरी, ब्लेड; तसेच इतर कापण्याची उपकरणे वापरणे बंधनकारक असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.एफएसएसएआयने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार, काही अन्न व्यवसायांमध्ये गंजलेल्या, तडे गेलेल्या, खराब झालेल्या अथवा रंग लावलेल्या सुरी व कापण्याच्या साधनांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा उपकरणांमुळे अन्नामध्ये भौतिक, रासायनिक आणि सूक्ष्मजीवजन्य दूषितीकरण होण्याची शक्यता असून त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे प्राधिकरणाने म्हटले आहे.अन्न तयार करणे, प्रक्रिय...
ठाकरे गटाच्या ६ फुटीर खासदारांपैकी हिंगोलीचे नागेश आष्टीकर ठरले रात्रीच्या अंधारात दिल्लीत पोहोचणारे पहिले खासदार, वाचा ‘ऑपरेशन टायगर’मध्ये नेमके काय घडले?
देश, महाराष्ट्र, राजकारण

ठाकरे गटाच्या ६ फुटीर खासदारांपैकी हिंगोलीचे नागेश आष्टीकर ठरले रात्रीच्या अंधारात दिल्लीत पोहोचणारे पहिले खासदार, वाचा ‘ऑपरेशन टायगर’मध्ये नेमके काय घडले?

नवी दिल्लीः उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत २०२२ नंतर पुन्हा मोठी फूट पडली. शिवसेनेतील (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या दुसऱ्या मोठ्या फुटीच्या १६ जूनच्या मध्यरात्रीपासूनच सुरूवात झाली. शिवसेनेने (उबाठा) व्हीप बजावून आज दिल्लीत बोलावलेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीला ९ पैकी फक्त तीनच खासदार हजर राहिल्यामुळे या फुटीवर शिक्कामोर्तब झाले आहे. उर्वरित ६ खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत दाखल होणार हेही निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे या फूट नाट्यात हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे १६ जूनच्या मध्यरात्री दिल्लीत दाखल होणारे पहिले बंडखोर खासदार ठरले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार फोडण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्यात येत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होत होती. १४ जून रोजी शिवसेनेने (उबाठा) बोलावलेल्या बैठकीला केवळ तीनच खासदा...
‘स्वायत्त दर्जा’ मिळताच संस्थाचालकांच्या अंगात मस्तीः वसंतराव नाईक महाविद्यालयातील तब्बल १५ प्राध्यापकांविरुद्ध बडतर्फीची ‘घाऊक’ कारवाई!
महाराष्ट्र, विशेष

‘स्वायत्त दर्जा’ मिळताच संस्थाचालकांच्या अंगात मस्तीः वसंतराव नाईक महाविद्यालयातील तब्बल १५ प्राध्यापकांविरुद्ध बडतर्फीची ‘घाऊक’ कारवाई!

छत्रपती संभाजीनगरः विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) मिळालेला ‘स्वायत्त’ महाविद्यालयाचा दर्जा म्हणजे जणू ‘स्वैराचार’ करण्याचे सरकारी प्रमाणपत्रच आहे, अशी हवा काही संस्थाचालकांच्या डोक्यात भरू लागली असल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरात घडला आहे. यूजीसीकडून ‘स्वायत्तता’ मिळून अवघे ९९ दिवसही उलटले नाही तोच वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने ‘सामूहिक गैरहजेरी’चे निमित्त पुढे करून तब्बल १५ प्राध्यापकांविरुद्ध बडतर्फीच्या कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे यूजीसीकडून मिळवलेली ‘स्वायत्तता’ ही प्राध्यापकांच्या सामूहिक छळाचे संस्थाचालकांच्या हातचे अस्त्र ठरते की काय? अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. छत्रपती संभाजीनगरातील वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळाने कोणत्याही शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेताच वसंतराव नाईक महाविद्यालयाला यूजीसीकडून ९९ दिवसांपूर्वी...
वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची निवड प्रक्रियाच बोगस, प्रचलित नियम धाब्यावर बसवून केली ‘अपात्र’ डॉ. संजीव रेड्डींची ‘मागच्या दारा’ने नियुक्ती!
महाराष्ट्र, विशेष

वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची निवड प्रक्रियाच बोगस, प्रचलित नियम धाब्यावर बसवून केली ‘अपात्र’ डॉ. संजीव रेड्डींची ‘मागच्या दारा’ने नियुक्ती!

छत्रपती संभाजीनगरः  वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वसंतराव नाईक महाविद्यालय या अशासकीय अनुदानित महाविद्यालयाच्या प्राचार्यपदासाठी प्रचलित नियम धाब्यावर बसवून बोगस निवड प्रक्रिया राबवण्यात आली आणि या ‘मागच्या दारा’ने पदावर डॉ. संजीव रेड्डी या ‘सोयी’च्या अपात्र उमेदवाराची नियुक्ती करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंनी नामनिर्देशित केलेले प्रतिनिधी आणि छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय सहसंचालकांच्या साक्षीनेच ही बोगस निवड प्रक्रिया राबवण्यात आल्यामुळे अनुदानित महाविद्यालयांतील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या एकूणच निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सिडको भागात असलेले वसंतराव नाईक महाविद्यालय हे १०० टक्के अनुदानित अशासकीय महाविद्यालय आहे. या महाविद्यालया...
सॉफ्टवेअर-कॉम्प्यूटर सायन्स, एमबीएचा नाद सोडा; प्लंबर, इलेक्ट्रिशियन-सुतारकाम शिका: मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांचा सल्ला
देश

सॉफ्टवेअर-कॉम्प्यूटर सायन्स, एमबीएचा नाद सोडा; प्लंबर, इलेक्ट्रिशियन-सुतारकाम शिका: मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांचा सल्ला

नवी दिल्ली: सॉफ्टवेअर-कॉम्प्यूटर सायन्स, एमबीएचे शिक्षण आता कालबाह्य झाले असून कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे (एआय) रोजगाराच्या स्वरूपात मोठे बदल होत असल्यामुळे तरूणांनी आता पदव्यांच्या मागे न धावता प्लम्बिंग, इलेक्ट्रिशियन, सुतारकाम यासारख्या प्रत्यक्ष मानवी कौशल्यावर लक्ष केंद्रित करावे, असा 'महत्वपूर्ण' सल्ला देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी देशातील तरूणांना दिला आहे.एका खासगी वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्ही. अनंत नागेश्वरन म्हणाले की, एआयच्या झपाट्याने वाढत चाललेल्या प्रभावामुळे जगभरातील रोजगाराच्या बाजाराचे स्वरूप बदलत चालले आहे. देशात दिर्घकाळपर्यंत सॉफ्टवेअर, कॉम्प्यूटर सायन्स, एम.बी.ए. पदव्यांची मोठी चलती होती. पण आता तो काळ संपत चालला आहे. मात्र एआय आता अनेक पारंपरिक कामे आपल्या हातात घेऊ लागला आहे. त्यामुळे तरूणांनी आता एआय पर्याय ठरूच शकत नाही आणि जिथे...
प्रभारी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकरांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या एकमेव उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांच्यावर थेट बडतर्फीची कारवाई
महाराष्ट्र, विशेष

प्रभारी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकरांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या एकमेव उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांच्यावर थेट बडतर्फीची कारवाई

छत्रपती संभाजीनगर: अनुसूचित जमातीची असल्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी आणि कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर हे आपला छळ करत असल्याची सुसाईड नोट लिहून आत्महत्येच्या प्रयत्न करणाऱ्या विद्यापीठातील उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांना विद्यापीठ प्रशासनाने बुधवारी बडतर्फ केले. विशेष म्हणजे हा बडतर्फीचा आदेश जारी केल्यानंतर कुलसचिवांच्या स्वाक्षरीने बेगमपुरा पोलिसांना पत्र लिहून काही अनुचित प्रकार घडू शकते अशी भीती व्यक्त करत ‘योग्य ती खबरदारी’ घेण्याचे फर्मान जारी करण्यात आले आहे. एखाद्या कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई केल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांना असे पत्र लिहिण्याची विद्यापीठाच्या इतिहासातील कदाचित ही पहिलीच घटना आहे. विशेष म्हणजे ठाकरे यांनी प्रभारी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या कार्यपद्धतीवरच आक्षेप घेतला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा...
राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी; ३,७२३ पदांना मान्यता, तब्बल २३ वर्षांनी नवीन आकृतीबंध तयार
महाराष्ट्र

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी; ३,७२३ पदांना मान्यता, तब्बल २३ वर्षांनी नवीन आकृतीबंध तयार

मुंबई: राज्यातील कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी कृषी विद्यापीठांच्या अ आणि ब संवर्गातील एकूण ३,७२३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता देण्यात आली आहे. २००३ नंतर म्हणजेच २३ वर्षांनी नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. या निर्णयामुळे विद्यापीठांमधील मनुष्यबळ व्यवस्थापन अधिक परिणामकारक होईल, संशोधन व अध्यापनाच्या गुणवत्तेत वाढ होईल तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत अधिक वेगाने पोहोचविण्यास मदत मिळेल, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या गट-अ व गट-ब संवर्गातील पदांच्या सुधारित आकृतीबंधास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. कृषी व पदुम विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून, नियमित ३,६११ पदे आणि बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणारी ११२ पदे अशा एकूण ३,७२३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता देण...
‘अमृत’तर्फे मोफत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम, समुपदेशन क्षेत्रात संधी; कसा आणि कुठे करायचा अर्ज? वाचा सविस्तर तपशील
महाराष्ट्र

‘अमृत’तर्फे मोफत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम, समुपदेशन क्षेत्रात संधी; कसा आणि कुठे करायचा अर्ज? वाचा सविस्तर तपशील

छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) मार्फत ‘अमृत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम’ राबवण्यात येत आहे. या  प्रशिक्षण कार्यक्रमाची पहिल्या बॅचसाठी १५ ते २२ जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करावा,असे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या रूपाने कार्यरत असलेल्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) मार्फत हा अभ्यासक्रम राबवण्यात येत आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाची मानसिक आरोग्य क्षेत्रातील अग्रगण्य संस्था पुणे येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ (एमआयएमएच) ही तांत्रिक भागीदार म्हणून कार्यरत राहणार आहे. हा समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम मानसशास्त्र, समुपदेशन आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील युवक-युवतींसाठी स्वयंरोजगार, व्यावसायिक विकास आणि समाजोपयोगी कार्याची मोठी संधी उपलब्ध करून देणार आहे. प्...
१० जूनपासून प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचे विद्यार्थी सहाय्यता केंद्र, आता जिल्हास्तरावरच मिळतील ‘या’ १२ प्रकारच्या सेवा
महाराष्ट्र

१० जूनपासून प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचे विद्यार्थी सहाय्यता केंद्र, आता जिल्हास्तरावरच मिळतील ‘या’ १२ प्रकारच्या सेवा

मुंबई: राज्यातील विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP), शिष्यवृत्ती योजना आणि प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अचूक माहिती व योग्य मार्गदर्शन त्यांच्या जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘सीईटीसेलचे विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज येथे केली.मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात यासंदर्भात बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, तसेच जिल्हास्तरीय समन्वयक ऑनलाइन उपस्थित होते. बैठकीत सर्व जिल्ह्यातील सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्र...
तुम्ही आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आणि पोस्ट ग्रॅज्युएट करत आहात का?, मग यूजीसीची ‘ही’ स्कॉलरशिप तुमच्याचसाठी; वाचा योजनेचा सविस्तर तपशील
देश, विशेष

तुम्ही आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आणि पोस्ट ग्रॅज्युएट करत आहात का?, मग यूजीसीची ‘ही’ स्कॉलरशिप तुमच्याचसाठी; वाचा योजनेचा सविस्तर तपशील

नवी दिल्लीः आई-वडिलांची एकुलती एक मुलगी असलेल्या आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या सिंगल गर्ल चाईल्डसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) २००५-०६ या शैक्षणिक वर्षापासून पदव्युत्तर इंदिरा गांधी शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. कुटुंबातील एकुलत्या एक मुलीच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत एकुलत्या एक मुलीच्या उच्च शिक्षणाचा थेट खर्च उचलला जातो. भारतातील विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्था आणि महाविद्यालयांत पूर्णवेळ नियमित पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी एकुलत्या एक मुलगी असलेल्या निवड उमेदवारांना या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येते. दरवर्षी सुमारे ३००० मुलींना या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु या संख्येला कोणतीही मर्यादा नाही. दोन वर्षे कालावधीसाठी देण्यात येणाऱ्या या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत वार्षिक ३६ हजार २०० ...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!