Blog

कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात शेकडो विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त आंदोलन
देश, महाराष्ट्र

कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात शेकडो विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त आंदोलन

छत्रपती संभाजीनगरः दिल्लीत क्रॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) सुरू केलेल्या आंदोलनाचे जोरदार पडसाद आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी उमटले. सीजेपीने आज दिल्लीत संसद भवनावर मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चात सहभागी होण्यासाठी लाखोंच्या संख्येने तरूणाईचा सागर रस्त्यावर ओसंडून वाहिला. या मोर्चाच्या समर्थनार्थ आज छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात शेकडो तरूण गोळा झाले आणि त्यांनी जोरदार आंदोलन करत केंद्र सरकारच्या दडपशाहीचा निषेध करत अभिजीत दिपके व सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जोरदार आंदोलन केले. सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ पुकारलेल्या क्रांतीचौकातील या आंदोलनात विविध विद्यार्थी संघटना सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे या आंदोलनात नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशिवाय अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, मानव्य विद्याशाखांचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. ...
दिल्लीत उद्रेक: सीजेपीचे आंदोलन तीव्र, लाखोंच्या संख्येने कॉक्रोच संसद भवनाच्या दिशेने, आंदोलकांवर लाठीमार, अश्रुधुराचा वापर; पण मोर्चेकरी आंदोलनावर ठाम!
दुनिया, देश

दिल्लीत उद्रेक: सीजेपीचे आंदोलन तीव्र, लाखोंच्या संख्येने कॉक्रोच संसद भवनाच्या दिशेने, आंदोलकांवर लाठीमार, अश्रुधुराचा वापर; पण मोर्चेकरी आंदोलनावर ठाम!

नवी दिल्ली: नीट परीक्षेतील घोटाळे आणि देशातील ढासळलेल्या शिक्षण व्यवस्थेला जबाबदार धरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) सुरू केलेल्या आंदोलनाला आज नवीन धार चढली. सीजेपीने संसद भवनावर आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी लाखोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून संसद भवनाच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न करत आहेत. संसद भवनाच्या दिशेने निघालेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. दरम्यान, संसद भवन परिसरात आंदोलक शिरण्याच्या धास्तीने संसद भवनाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. जंतर-मंतरवरून कॉक्रोच जनता पार्टीच्या मोर्चाला सुरूवात झाली. या मोर्चात लाखोंच्या संख्येने आंदोलक सहभागी झाले आहेत. हे आंदोलक जंतर-मंतरवरून संसद भवन परिसरात पोहोचले. ...
धक्कादायक: मंजूर आराखड्यानुसार झालेच नाही विद्यापीठातील नामांतर शहीद स्मारकाचे काम, मूळ डिझाईनमध्ये कंत्राटदाराने केले परस्पर बदल; आंबेडकरवाद्यांच्या भावनांशी खेळ!
महाराष्ट्र, विशेष

धक्कादायक: मंजूर आराखड्यानुसार झालेच नाही विद्यापीठातील नामांतर शहीद स्मारकाचे काम, मूळ डिझाईनमध्ये कंत्राटदाराने केले परस्पर बदल; आंबेडकरवाद्यांच्या भावनांशी खेळ!

छत्रपती संभाजीनगरः मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या शहिदांच्या स्मरणार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात येत असलेल्या नामांतर शहीद स्मारकाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करून कंत्राटदाराने सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते आणि विद्यापीठाच्या कार्यकारी अभियंत्याशी संगनमत करून खिसे भरल्याची बाब उघडकीस आली असतानाच या स्मारकाचे काम मंजूर आराखड्यानुसार न करता कंत्राटदाराने मूळ डिझाईनमध्ये परस्पर बदल केल्याचे धक्कादायक पुरावे न्यूजटाऊनच्या हाती आले आहेत. तब्बल १७ वर्षे चाललेल्या मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात अनेक नामांतरवाद्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. १९९४ मध्ये मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार झाल्यानंतर तब्बल २९ वर्षांनंतर विद्यापीठ परिसरात नामांतर शहीद स्मारकाचे बांधकाम सुरू झाल...
नामांतर शहीद स्मारकाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असताना विद्यापीठाच्या कार्यकारी अभियंत्याने झोपा काढत केली कर्तव्यात कसूर, आता कुलगुरू कारवाई करणार का?
महाराष्ट्र, विशेष

नामांतर शहीद स्मारकाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असताना विद्यापीठाच्या कार्यकारी अभियंत्याने झोपा काढत केली कर्तव्यात कसूर, आता कुलगुरू कारवाई करणार का?

छत्रपती संभाजीनगरः मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी झालेल्या ज्वाजल्य लढ्याचा इतिहास आणि या लढ्यात प्राणाची आहुती दिलेल्या ज्ञात-अज्ञात शहिदांच्या सन्मानार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात येत असलेल्या नामांतर शहीद स्मारकाच्या बांधकामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेले विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता आर. डी. काळे यांनी झोपा काढत कर्तव्यात कसूर केल्यामुळेच या स्मारकाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले. परिणामी या स्मारकाचे लोकार्पण होण्याआधीच गंभीर संरचनात्मक त्रुटीमुळे स्मारकाचा मुख्य स्तंभ झुकला आणि नामांतर चळवळीतील कार्यकर्ते आणि आंबेडकरी समूहाच्या भावनांशीच खेळण्याचा प्रमाद घडला. त्यामुळे कर्तव्यात गंभीर कसूर करणारे कार्यकारी अभियंता काळे यांच्यावर कुलगुरू डॉ. विजय फुलारी कारवाई करणार का?, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा विद्यापीठ...
विद्यापीठातील नामांतर शहीद स्मारकाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे, गंभीर संरचनात्मक त्रुटींमुळे लोकार्पण होण्याआधीच झुकला स्मारकाचा मुख्य स्तंभ!
महाराष्ट्र, विशेष

विद्यापीठातील नामांतर शहीद स्मारकाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे, गंभीर संरचनात्मक त्रुटींमुळे लोकार्पण होण्याआधीच झुकला स्मारकाचा मुख्य स्तंभ!

छत्रपती संभाजीनगरः मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याच्या मागणीसाठी झालेल्या ऐतिहासिक नामांतर लढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या ज्ञात-अज्ञात नामांतर योद्ध्यांच्या स्मरणार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात आलेल्या नामांतर शहीद स्मारकाचे बांधकाम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे झाले असून स्मारकाच्या मुख्य स्तंभाच्या बांधकाम गंभीर स्वरुपाच्या संरचनात्मक त्रुटी असल्यामुळे हे स्मारक लोकार्पण होऊन खुले होण्याआधीच स्मारकाचा मुख्य स्तंभ झुकल्याची धक्कादायक बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यानेच केलेल्या पाहणीत आढळून आली आहे. आता हा मुख्य स्तंभ पाडून तो नव्याने उभारण्याचे आदेश कंत्राटदाराला देण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा विद्यापीठाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ’ असे नामांतर करा, या मागणीसाठी १९७७ ते १९९४ अशी तब्बल १७ वर्...
नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सेवाप्रवेश नियमांत होणार सुधारणा, २,९०० रिक्त पदे तातडीने भरणार
महाराष्ट्र, राजकारण

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सेवाप्रवेश नियमांत होणार सुधारणा, २,९०० रिक्त पदे तातडीने भरणार

मुंबई: राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक पावले उचलत सेवाप्रवेश नियम संविधानाच्या अनुच्छेद ३०९ अन्वये सुधारित करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या समस्यांबाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींमधील सुमारे ६,५०० मंजूर पदांपैकी ३,६०० पदे कार्यरत असून उर्वरित रिक्त पदे तातडीने भरण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात यावी. तसेच राज्य संवर्गातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच नगरपरिषद कर्मचाऱ्यांनाही सामान्य प्रशासन विभागाचे बदली धोरण लागू करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करावी, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या.नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये पूर्वीप्रमाणे गट ‘क’ व गट ‘ड’ पदांवर शैक्षण...
शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी १ सप्टेंबरचा कटऑफ रद्द, पदोन्नतीसाठी नव्याने धोरण आखण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
महाराष्ट्र

शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी १ सप्टेंबरचा कटऑफ रद्द, पदोन्नतीसाठी नव्याने धोरण आखण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

नागपूरः  पदोन्नती प्रक्रिया सुरू होताना शिक्षकांकडे टीईटी किंवा सीटीईटी पात्रता धारण करणे हाच निकष आहे. त्यासाठी १ सप्टेंबरसारखी स्वतंत्र कट-ऑफ तारीख निश्चित करता येणार नाही, असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी १ सप्टेंबर २०२५ पर्यंत टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक करणारे शिक्षक संचालकांचे १४ मे २०२६ रोजीचे परिपत्रक रद्द केले आहे. शिवाय पदोन्नती प्रक्रियेसाठी नव्याने धोरण निर्देशही राज्य सरकारला दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या या निर्देशांमुळे राज्यातील शिक्षकांना मोठा दिला मिळाला आहे. राज्याच्या शिक्षण संचालकांनी १४ मे २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकात १ सप्टेंबर २०२५ पर्यंत टीईटी किंवा सीटीईटी पात्रता धारण केलेल्या शिक्षकांचाच पदोन्नतीसाठी विचार करावा, असे निर्देश दिले होते. परिणामी पदोन्नती प्रक्रि...
पाकिस्तानच्या कुख्यात गँगस्टरचे थेट मराठवाड्यात नेटवर्क, एटीएसने १५ जणांना उचलले; सोशल मीडियाच्या माध्यमातून तरूणांना ओढळले जाळ्यात, पालकांनो सावध व्हा…
देश, महाराष्ट्र

पाकिस्तानच्या कुख्यात गँगस्टरचे थेट मराठवाड्यात नेटवर्क, एटीएसने १५ जणांना उचलले; सोशल मीडियाच्या माध्यमातून तरूणांना ओढळले जाळ्यात, पालकांनो सावध व्हा…

छत्रपती संभाजीनगर: पाकिस्तानचा कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टीशी कथित संबंध असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी मध्यरात्रीपासून छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशिव जिल्ह्यांत एकाचवेळी धडक कारवाई केली. या मोहिमेत सुमारे १५ तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शहजाद भट्टीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती तपासली जात असून आवश्यकतेनुसार संबंधितांना नोटिसा बजावण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील १०, धाराशिवमधील २, बीडमधील १ आणि जालन्यातील २ संशयितांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरच्या एटीएस पथकाकडून या १५ जणांची कसून चौकशी सुरू आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना या त...
छत्रपती संभाजीनगरची ३५९ कोटींची नवी पाणीपुरवठा योजना तब्बल २ हजार ७४० कोटींच्या घरात, तरीही कामे निकृष्ट दर्जाची; आता सरकार करणार सखोल चौकशी
महाराष्ट्र, राजकारण

छत्रपती संभाजीनगरची ३५९ कोटींची नवी पाणीपुरवठा योजना तब्बल २ हजार ७४० कोटींच्या घरात, तरीही कामे निकृष्ट दर्जाची; आता सरकार करणार सखोल चौकशी

मुंबई: छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेतील कामांच्या गुणवत्तेबाबत करण्यात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने नगरविकास विभागामार्फत समिती नियुक्त करून चौकशी करण्यात येईल; तसेच महिनाभरात अहवाल सादर केला जाईल व योजनेच्या प्रगतीचा दर १५ दिवसांनी ऑनलाइन व प्रत्यक्ष पाहणीद्वारे नगरविकास विभागामार्फत आढावा घेतला जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. विधानपरिषदेत नियम ९७ अन्वये आ. अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेसंदर्भात अल्पकालीन चर्चा उपस्थित केली, त्या संदर्भात ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेला २००९ मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यावेळी प्रकल्पाची अंदाजित किंमत ३५९.६७ कोटी रुपये होती. पुढील काही वर्षे प्रकल्प प्रलंबित राहिल्यामुळे त्याच्या खर्चात वाढ होत गेली. सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर प्रकल्पाची किंमत आता २,७४०.७५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल...
शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षक बदली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नियमावली आणणार, बदल्यांची क्लिट प्रक्रिया होणार सुलभ
महाराष्ट्र

शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षक बदली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नियमावली आणणार, बदल्यांची क्लिट प्रक्रिया होणार सुलभ

मुंबई: शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षकांची पदोन्नती, समायोजन आणि बदली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नवीन नियमावली तयार करणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य श्रीजया चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते. मंत्री गोरे म्हणाले की, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यापूर्वी पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिक्षक पदोन्नतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. टीईटी संदर्भातील अनेक प्रकरणे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने पदोन्नती आणि त्यानंतरची समायोजन प्रक्रिया विलंबाने होत आहे. यावर्षी संच मान्यता नेहमीप्रमाणे ३० सप्टेंबरपर्यंत न होता फेब्रुवारीमध्ये मिळाल्याने अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन वेळेत होऊ शकले नाही, असे गोरे...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!