Blog

ज्येष्ठ पत्रकार रविशकुमार यांचाही एनडीटीव्हीचा राजीनामा
देश

ज्येष्ठ पत्रकार रविशकुमार यांचाही एनडीटीव्हीचा राजीनामा

नवी दिल्लीः  एनडीटीव्हीचे संस्थापक डॉ. प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी राजीनामा दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजे आज बुधवारी एनटीडीव्ही इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संपादक रविश कुमार यांनीही एनडीटीव्हीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे देशातील दर्शकांना एनडीटीव्ही इंडियावरील रात्री ९ वाजताचा त्यांचा प्राईम टाईम दिसणार नाही. हम लोग, रविश की रिपोर्ट, देश की बात असे गाजलेले शोही त्यांनी एनडीटीव्ही इंडियावर केले आहेत. कंपनीने त्यांचा राजीनामा तत्काळ मंजूर केला आहे.  रविश कुमार यांच्या इतका काही पत्रकारांनीच लोकांवर प्रभाव पाडला आहे. हे त्यांच्याबाबतच्या अफाट प्रतिक्रियांमधून प्रतिबिंबित होते. गर्दीतही ते सर्वत्र उठून दिसतात. भारत आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर त्यांना मिळालेले प्रतिष्ठेचे पुरस्कार आणि ओळख हे त्यातून स्पष्ट होते. रविश कुमार हे अनेक दशकांपासून एनडीटीव्हीचा अविभाज्य भाग राहिले आह...
महिलांनी कपडे नाही घातले तरी त्या जास्त सुंदर दिसतात… बाबा रामदेव यांचे वादग्रस्त वक्तव्य
देश, महाराष्ट्र

महिलांनी कपडे नाही घातले तरी त्या जास्त सुंदर दिसतात… बाबा रामदेव यांचे वादग्रस्त वक्तव्य

ठाणेः महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि माझ्या नजरेने पाहिले तर, काही नाही घातले तरी त्या चांगल्या दिसतात, असे वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले आहे. ठाण्यातील हायलँड भागात पतजंली योगपीठ आणि मुंबई महिला पतंजली योग समितीच्या वतीने शुक्रवारी योग विज्ञान शिबीर आणि महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महिलांशी संवाद साधताना बाबा रामदेव यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस याही उपस्थित होत्या. महिलांनी साडी नेसली तरी चांगल्या दिसतात. सलवार सूट घातला तरी चांगल्या दिसतात आणि माझ्या नजरेने पाहिले तर काही नाही घातले तरी त्या चांगल्या दिसतात, असे रामदेव म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते....
मान्सून आज केरळात धडकणार, १० जूनला होणार महाराष्ट्रात आगमन; राज्यातील १२ जिल्ह्यांत आज तुफान पावसाचा इशारा
देश

मान्सून आज केरळात धडकणार, १० जूनला होणार महाराष्ट्रात आगमन; राज्यातील १२ जिल्ह्यांत आज तुफान पावसाचा इशारा

मुंबईः अंदमानमध्ये बराच काळ रेंगाळलेल्या मान्सूनने वेग घेतला असून आता तो सक्रीय झाला आहे. मान्सून आज केरळमध्ये धडकण्याची शक्यता आहे. १० जून रोजी मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमध्ये पुढील ३-४ तासांत तुफान पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.  मान्सून नौऋत्यकडे वेगाने सरकत असल्यामुळे तो आजच केरळच्या किनारपट्टीवर धडकू शकतो. केरळच्या किनारपट्टीपासून अवघ्या ४०० किलोमीटर अंतरावर सध्या मान्सून आहे. सक्रीय झालेला मान्सून मालदीव समुद्रातून अरबी समुद्रात दाखल झाला आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.  दक्षिण बंगालचा उपसागर आणि पूर्वमध्य बंगालच्या उपसागरातही मान्सून वेगाने पुढे सरकरत आहे. त्यामुळे मान्सूनचे लवकरच केरळात आगमन होणार आहे. मान्सूनचे आज केरळमध्ये आगमन झाल्यास कर्नाटक आणि गोव्याच्या...
आश्वासित प्रगती योजना पुन्हा सुरू, विद्यापीठ आणि महाविद्यालयीन  शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश
महाराष्ट्र

आश्वासित प्रगती योजना पुन्हा सुरू, विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश

मुंबईः  विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी देणारी आश्वासित प्रगती योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मध्यंतरी ही योजना बंद करण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून रोष व्यक्त करण्यात येत होता. ही योजना पुन्हा सुरू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ आणि राज्यभरातील विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांनी लढा उभारला होता. अखेर त्या लढ्याला यश आले असून ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज संस्था आणि इतर शासकीय आस्थापनेतील कर्मचाऱ्यांना १२ आणि १४ वर्षांच्या नियमित सेवेनंतर कालबद्ध पदोन्नती योजना लागू करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर विद्यापीठ आणि महाविद्यालयांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनाही ही योजना चौथ्या आणि पाचव्या वेतन आयोगाच्या वेळी लागू करण्यात आली. परंतु सहाव्या वेतन आयोगाच्या ...
नांदेड हत्याकांड प्रकरणः बोंढार हवेलीतील गावगुंडांची मालमत्ता जप्त करा- प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी
महाराष्ट्र

नांदेड हत्याकांड प्रकरणः बोंढार हवेलीतील गावगुंडांची मालमत्ता जप्त करा- प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी

मुंबईः  गावात भीम जयंतीची मिरवणूक काढल्याचा राग मनात धरून नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावातील सवर्ण गावगुंडांनी अक्षय भालेराव या २३ वर्षीय बौद्ध तरूणाची निर्घृणपणे हत्या केल्यामुळे महाराष्ट्रभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणी कठोर भूमिका घेत अक्षय भालेरावच्या खून्यांची मालमत्ता जप्त करण्याची मागणी केली आहे. बोंढार हवेली गावात लग्नाच्या वरातील तलवारी, खंजर घेऊन नाचणाऱ्या सवर्ण गावगुंडांनी गुरूवारी १ जून रोजी अक्षय भालेराव या आंबेडकरी चळवळीत सक्रीय तरूणाची पोटात खंजरचे वार करून निर्घृण हत्या केली. ही हत्या एवढ्या निर्दयतेने करण्यात आली की, अक्षयचा कोथळा बाहेर पडेपर्यंत हे सवर्ण गावगुंड त्याच्या पोटात खंजरने वार करत राहिले. अक्षय भालेरावच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. वंचित बहुजन आघ...
‘गावात भीम जयंती काढता का?… दत्ता, खतम करून टाक याला…’ नांदेडचा मृत बौद्ध तरूण अक्षयच्या भावाचा जबाब जशाचा तसा…
महाराष्ट्र, विशेष

‘गावात भीम जयंती काढता का?… दत्ता, खतम करून टाक याला…’ नांदेडचा मृत बौद्ध तरूण अक्षयच्या भावाचा जबाब जशाचा तसा…

नांदेडः नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावातील बौद्ध तरूण अक्षय भालेराव याची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी खून आणि ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सात आरोपींना अटकही केली आहे. या घटनेनंतर समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गावात भीम जयंती साजरी केल्यामुळे गावातील मराठा तरूणांनी अक्षयची निर्घृणपणे हत्या केली, असा अक्षयच्या कुटुंबियांचा आरोप आहे. मात्र वरातीत नाचण्याच्या वादातून हा खून झाल्याचे सहायक पोलिस निरीक्षक पवार यांचा दावा आहे.  बोंढार हवेली गावात घडलेल्या या घटनेमुळे समाजमन हळहळले आहे. ही घटना कशी घडली?  अक्षय भालेरावच्या हत्येचे खरे सूत्रधार कोण?  याबाबतचा उलगडा अक्षय भालेरावचा २९ वर्षीय भाऊ आकाश भालेराव याने नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या जबाबात सविस्तरपणे झालेला आहे. आकाश भालेराव यांनी नांदेड ग्रामीण पोलि...
आणखी किती अक्षय भालेरावचे बलिदान?
अभिव्यक्ती

आणखी किती अक्षय भालेरावचे बलिदान?

बोंढार येथे आंबेडकर जयंतीच्या विरोधात गावकऱ्यांनी ठराव  घेतला. तो राष्ट्रपतींचा कायदा समजून पोलिसांनी दलितांना ‘आंबेडकर जयंतीची मिरवणूक डीजे लाऊन वाजत गाजत काढायची नाही’ अशी तंबी दिली. यामुळे जातीयवाद्यांचे बळ वाढले. तरीही अक्षय श्रावण भालेराव याने पुढाकार घेऊन २९ एप्रिल २०२३ रोजी बोंढार गावात भव्य प्रमाणात आंबेडकर जयंती साजरी केली. यामुळे सनातनी जातीयवादी लोक हादरुन गेले. त्यांचा जळफळाट झाला. त्यामुळे ते आता आणखी एकवटले होते. अक्षयचा काटा कसा काढायचा याची खलबते चालू झाली होती.  अखेर ती काळी वेळ आली आणि जातीयवादी गावगुंडांनी अक्षय भालेरावचा निर्घृणपणे खून केला... असे आणखी किती अक्षय आपण शहीद होऊ देणार आहोत? इंजि.चंद्रप्रकाश देगलूरकर कट्टर आंबेडकरी विचारधारेचा अनुयायी असलेल्या अक्षय श्रावण भालेराव या युवकाचा बोंढार हवेली (तालुका, जिल्हा नांदेड) येथील ...
लग्नाच्या वरातीत तलवारी, खंजर घेऊन नाचणाऱ्या गुंडांंकडून दलित तरूणाची निर्घृण हत्या; नांदेड जिल्ह्यातील घटना
महाराष्ट्र

लग्नाच्या वरातीत तलवारी, खंजर घेऊन नाचणाऱ्या गुंडांंकडून दलित तरूणाची निर्घृण हत्या; नांदेड जिल्ह्यातील घटना

नांदेडः गावात भीम जयंती साजरी केल्याचा राग मनात धरून लग्नाच्या वरातीत तलवार, खंजर घेऊन नाचणाऱ्या सर्वण गावगुंडांकडून एका २३ वर्षीय दलित तरूणाची पोटात चाकू भोसकून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावात गुरूवारी रात्री घडली. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे बोंढार हवेली गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री बोंढार हवेली गावात गुरूवारी विवाह सोहळा होता. या विवाह सोहळ्यानिमित्त वरात काढण्यात आली होती. वरातीत काही युवक डीजेच्या दणदणाटात नाचत होते. त्यावेळी गावातीलच अक्षय भालेराव हा दलित युवक तेथे आला. या वरातीत तलवारी, खंजर घेऊन नाचत असलेल्या सवर्ण गावगुंडांनी त्याच्यावर हल्ला चढवला. या सवर्ण गा...
राज्यातील २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंढे मराठी भाषा विभागाचे नवे सचिव, सुजाता सौनिक नव्या गृह सचिव
महाराष्ट्र

राज्यातील २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंढे मराठी भाषा विभागाचे नवे सचिव, सुजाता सौनिक नव्या गृह सचिव

मुंबईः शिंदे- फडणवीस सरकारने राज्यातील तब्बल २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांचे आदेश आज जारी करण्यात आले आहेत. ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची मंत्रालयातील मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे. बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांनी त्वरित आपला नवीन पदभार स्वीकारावा, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढले आहेत. १९८७ च्या बॅचच्या आएएस अधिकारी, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची मंत्रालयातील गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे. या पदावर दिनेश वाघमारे कार्यरत होते.  सध्या एमएमआरडीएमध्ये कार्यरत असलेले १९९१ च्या बॅचचे सनदी अधिकारी एस.व्ही. आर. श्रीनिवास यांची धारावी पुनर्विकास प्रकल्प, मुंबई येथे विशेष कार्यअधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.  तुकाराम मुंढे (आयएएस २००५) यांची मराठी भाषा विभागाच्...
SSC Result 2023: इयत्ता दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा एकूण निकाल ९३.८३ टक्के
महाराष्ट्र

SSC Result 2023: इयत्ता दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा एकूण निकाल ९३.८३ टक्के

पुणेः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावी म्हणजेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा (एसएससी) निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत ९३.८४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.११ टक्के तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी ९२.०५ टक्के लागला आहे. या परीक्षेसाठी राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण अशा नऊ विभागीय मंडळातून १५ लाख ४९ हजार ६६६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख २९ हजार ९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १४ लाख ३४ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे हे प्रमाण ९३. ८३ टक्के इतके आहे. इयत्ता बारावीप्रमाणेच इयत्ता दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली असून या परीक्षेत मुलींच्या उत्तीर्णतेची टक्...
राज्यात पुढील दिवस उष्णतेची लाट, तर काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
महाराष्ट्र

राज्यात पुढील दिवस उष्णतेची लाट, तर काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

पुणेः विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येईल तर राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. वारंवार होणाऱ्या हवामान बदलामुळे राज्यात कुठे पाऊल तर कुठे उनाचा तडाखा असे वातावरण पहायला मिळत आहे. मान्सूनही पुढे सरकला असल्यामुळे बहुतांश जिल्ह्यात आज मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे. आज सकाळपासून ते दुपारपर्यंत तापमानात वाढ झालेली असेल तर दुपारनंतर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात मोसमी पाऊस  दाखल होईपर्यंत विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा देण्यात आला आहे.  राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधूदुर्ग या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अकोला, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, सोलापूरमध्ये तीव्र उष्णतेच्या...
महिलांसाठी आरक्षित पदावर महिला उमेदवारांचीच नियुक्ती अनिवार्य, लवकरच निघणार शासन निर्णय
महाराष्ट्र

महिलांसाठी आरक्षित पदावर महिला उमेदवारांचीच नियुक्ती अनिवार्य, लवकरच निघणार शासन निर्णय

मुंबई: शासकीय नोकर भरतीमध्ये महिलांकरिता ३० टक्के आरक्षण आहे. या पदभरतीमध्ये महिलांच्या आरक्षित पदावर महिला उमेदवार न मिळाल्यास पुरुष उमेदवारांची भरती करण्यात येवू नये याबाबत मंत्रिमंडळाची मान्यता घेवून महिला व बालविकास विभागाकडून लवकरच कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी महिला आरक्षणासंदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेनुसार चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत लोढा बोलत होते. यावेळी आमदार डॉ.भारती लव्हेकर, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यासह महिला व बालविकास विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. महिला व बालविकास विभागाकडून महिलांच्या आरक्षित पदावर महिला उमेदवार न मिळाल्यास पुरुष उमेदवारांची भरती करण्यात येवू नये याबाबत मंत्रिमंडळाची मान्यता घेण्याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल....
error: Content is protected !!