Blog

 बजेटमधून आरक्षण द्या म्हणणारा असा कसा तुमचा नेता? भुजबळांनी उडवली जरांगेंची खिल्ली; म्हणाले, १६ नोव्हेंबरलाच राजीनामा दिला!
महाराष्ट्र

 बजेटमधून आरक्षण द्या म्हणणारा असा कसा तुमचा नेता? भुजबळांनी उडवली जरांगेंची खिल्ली; म्हणाले, १६ नोव्हेंबरलाच राजीनामा दिला!

अहमदनगरः मला मराठा समाजातील नेत्यांची आणि विचारवंतांची कीव येते. असा कसा तुमचा नेता, जो म्हणतो बजेटमधून आरक्षण देता येते का पहा. कुणाच्या मागे चाललात तुम्ही? अशा शब्दांत ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर तोफ डागली. मी १६ नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिला, असा गोफ्यस्फोटही भुजबळांनी केला. राज्य सरकारने मराठा समाजातील गणगोत आणि सग्यासोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्रे देऊन ओबीसीत समाविष्ट करण्याबाबतची अधिसूचना काढली. त्यावरून राज्यभरातील ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात भूमिका घेतली आणि रस्त्यावर उतरून लढाईचे रणशिंग फुंकले. त्याचाच एक भाग म्हणून आज अहमदनगर येथे ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात भुजबळांनी राज्य सरकारच्या ...
उच्च शिक्षण विभागात १० हजार कोटींचा अनुदान घोटाळा, अनुदान दिले पण निर्धारणच न केल्यामुळे संस्थाचालकांनी गिळल्या रकमा!
महाराष्ट्र, विशेष

उच्च शिक्षण विभागात १० हजार कोटींचा अनुदान घोटाळा, अनुदान दिले पण निर्धारणच न केल्यामुळे संस्थाचालकांनी गिळल्या रकमा!

सुरेश पाटील/ छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): राज्याच्या उच्च शिक्षण विभागात एक दोन नव्हे तर तब्बल १० हजार कोटींहून जास्त रकमेचा अनुदान घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. उच्च शिक्षण विभागाने राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांना दरमहा नियमित अनुदान तर दिले परंतु त्या अनुदानाचा योग्य विनियोग झाला की नाही, याचे दरवर्षी अनुदान निर्धारणच केले नसल्यामुळे महाविद्यालयाच्या बँक खात्यात शिल्लक राहिलेल्या रकमा संस्थाचालकांनी गिळंकृत करून टाकल्या. त्यातून हा कोट्यवधींचा घोटाळा झाला. औरंगाबाद विभागातील अनुदान घोटाळ्याची ही रक्कम एक हजार कोटींच्या घरात जाते, अशी माहिती उच्च शिक्षण खात्यातील सूत्रांनी दिली.  राज्याच्या ३६ जिल्ह्यात एकूण ४ हजार ३४६ अशासकीय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालये आहेत. त्यापैकी २ हजार ५७० कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालये कायम विनाअनुदानित तत्वावर आहे...
मुख्यमंत्री शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रेचा फैसला कधी? सुप्रीम कोर्टाची विधानसभाध्यक्ष नार्वेकरांना नोटीस, दोन आठवडे मुदत
देश, राजकारण

मुख्यमंत्री शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रेचा फैसला कधी? सुप्रीम कोर्टाची विधानसभाध्यक्ष नार्वेकरांना नोटीस, दोन आठवडे मुदत

नवी दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकर निर्णय येण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.१६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सध्या कोणती प्रक्रिया सुरू आहे? अशी विचारणा करत सर्वोच्च न्यायालयाने आज विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांना नोटीस बजावली असून या नोटिसीवर उत्तर देण्यासाठी त्यांना दोन आठवडे मुदत देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकर निर्णय घेण्याचे आदेश महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांना द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर पहिली सुनावणी आज झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांना दोन आठवड्यात आपली बाजू मांडावी लागणार आहे. सर्...
महिलांनी कपडे नाही घातले तरी त्या जास्त सुंदर दिसतात… बाबा रामदेव यांचे वादग्रस्त वक्तव्य
देश, महाराष्ट्र

महिलांनी कपडे नाही घातले तरी त्या जास्त सुंदर दिसतात… बाबा रामदेव यांचे वादग्रस्त वक्तव्य

ठाणेः महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि माझ्या नजरेने पाहिले तर, काही नाही घातले तरी त्या चांगल्या दिसतात, असे वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले आहे. ठाण्यातील हायलँड भागात पतजंली योगपीठ आणि मुंबई महिला पतंजली योग समितीच्या वतीने शुक्रवारी योग विज्ञान शिबीर आणि महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महिलांशी संवाद साधताना बाबा रामदेव यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस याही उपस्थित होत्या. महिलांनी साडी नेसली तरी चांगल्या दिसतात. सलवार सूट घातला तरी चांगल्या दिसतात आणि माझ्या नजरेने पाहिले तर काही नाही घातले तरी त्या चांगल्या दिसतात, असे रामदेव म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते....
ज्येष्ठ पत्रकार रविशकुमार यांचाही एनडीटीव्हीचा राजीनामा
देश

ज्येष्ठ पत्रकार रविशकुमार यांचाही एनडीटीव्हीचा राजीनामा

नवी दिल्लीः  एनडीटीव्हीचे संस्थापक डॉ. प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी राजीनामा दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजे आज बुधवारी एनटीडीव्ही इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संपादक रविश कुमार यांनीही एनडीटीव्हीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे देशातील दर्शकांना एनडीटीव्ही इंडियावरील रात्री ९ वाजताचा त्यांचा प्राईम टाईम दिसणार नाही. हम लोग, रविश की रिपोर्ट, देश की बात असे गाजलेले शोही त्यांनी एनडीटीव्ही इंडियावर केले आहेत. कंपनीने त्यांचा राजीनामा तत्काळ मंजूर केला आहे.  रविश कुमार यांच्या इतका काही पत्रकारांनीच लोकांवर प्रभाव पाडला आहे. हे त्यांच्याबाबतच्या अफाट प्रतिक्रियांमधून प्रतिबिंबित होते. गर्दीतही ते सर्वत्र उठून दिसतात. भारत आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर त्यांना मिळालेले प्रतिष्ठेचे पुरस्कार आणि ओळख हे त्यातून स्पष्ट होते. रविश कुमार हे अनेक दशकांपासून एनडीटीव्हीचा अविभाज्य भाग राहिले आह...
प्रत्येक शासकीय कार्यालयात आता मिळणार इंटर्नशिपची संधी, मंजूर पदांच्या पाच टक्के किंवा किमान एकास प्रशिक्षण!
महाराष्ट्र

प्रत्येक शासकीय कार्यालयात आता मिळणार इंटर्नशिपची संधी, मंजूर पदांच्या पाच टक्के किंवा किमान एकास प्रशिक्षण!

मुंबई:  राज्यातील ग्रामपंचायतीपासून ते प्रत्येक शासकीय कार्यालयात पात्र उमेदवारांना इंटर्नशिप-प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. एकूण मंजूर पदांच्या पाच टक्के किमान एका उमेदवारास प्रशिक्षण मिळणार आहे. इंटर्नशिपच्या काळात पात्र उमेदवारांना विद्यावेतनही दिले जाणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीचा मुख्यमंत्री शिंदे, युवक कल्याण व क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर आढावा घेण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले. लाडका भाऊ म्हणून या योजनेला पसंती मिळाली आहे. यात पात्र बहिणींना संधी मिळणार आहे. म्हणून उद्योग, कौशल्य विकास यांच्यासह सहकार, उच्च व तंत्रशिक्षण, सहकार, बंदर विकास, परिवहन यांच्यासह सर्वच विभाग आणि यंत्रणांनी समन्वयाने योजनेची अंमलबजावणी करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले....
मुंबई, पुणे, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार, बचाव कार्यासाठी लष्कर-नौदलाच्या तुकड्या सज्ज; मुख्यमंत्री म्हणाले, काळजी करू नका!
महाराष्ट्र

मुंबई, पुणे, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार, बचाव कार्यासाठी लष्कर-नौदलाच्या तुकड्या सज्ज; मुख्यमंत्री म्हणाले, काळजी करू नका!

मुंबई:  मुंबई, पुणे, रायगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू आहे. मात्र जिल्हा, मनपा प्रशासन सज्ज असून  संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे फिल्डवर आहेत. ज्या-ज्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे तिथे बचाव कार्य वेगाने सुरु आहे. काळजीचे कारण नाही, मात्र नागरिकांनी आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या, लष्कर, नौदल, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य यंत्रणा या सर्वांनी समन्वयाने आवश्यकतेप्रमाणे एकमेकांना मदत करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री यांनी सांगितले. एक टीमवर्क म्हणून काम करून पूर परिस्थितीतल्या लोकांना सुरक्षित हलवणे, त्यांना अन्नाची पाकिटे देणे, औषध, पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वेळप्रसंगी एनडीआरएफ, लष्कर, नौदल यांची मदत घेण्याच्या सूचना केल्या आहेत. पुणे...
पुण्यात मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कराचे १०० जवान तैनात, पुढील ४८ तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा
महाराष्ट्र

पुण्यात मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कराचे १०० जवान तैनात, पुढील ४८ तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा

पुणेः पुण्यात पावसाने हाहाकार माजवला असून शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तासांसाठी पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला असून या काळात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, पुण्याच्या एकतानगर भागात मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कराचे पथक तैनात करण्यात आले आहे.  पुण्याच्या एकतानगर भागातील पूरपरिस्थिती आटोक्यात येत नसल्यामुळे मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कराचे शंभर जवान तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुण्यातील एकतानगर परिसरात लष्कराचे १०० जवान तैनात आहेत. तसेच अनेक ठिकाणी एनडीआरएफ दाखल करण्यात आले आहे. लवासामध्ये दरड कोसळली असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे, असे पवार म्हणाले. पावसाची परिस्थिती लक्षात घेता पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पुढील आदेशापर्यंत पुणे जिल्ह्यातील धोकादायक पर्यटनस्थळे आणि ...
पुण्यात पाण्याची पातळी वाढली, पुढील ४८ तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा; बारावीच्या विद्यार्थ्यांची होणार पुन्हा पुनर्परीक्षा!
महाराष्ट्र

पुण्यात पाण्याची पातळी वाढली, पुढील ४८ तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा; बारावीच्या विद्यार्थ्यांची होणार पुन्हा पुनर्परीक्षा!

पुणेः पुण्यात पावसाने हाहाकार माजवला असून शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तासांसाठी पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला असून या काळात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाची परिस्थिती लक्षात घेता पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पुढील आदेशापर्यंत पुणे जिल्ह्यातील धोकादायक पर्यटनस्थळे आणि पूल बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. कार्यालये, कंपन्यांच्या ऑफिसेसना शक्यतो वर्क फ्रॉम होम करण्यास सांगण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. आज दुपारी १२ वाजेपर्यंत ६५ मिलीमीटर पाऊस झाला. मुळशी धरणाच्या क्षेत्रात सर्वाधिक ४८४ मिलीमीटर पाऊस झाला. पाऊस वाढल्याने खडकवासला धरणाची पाणी पातळी वाढली आहे. पुणे महानगर पालिक...
हैदराबाद गॅझेटमधील कागदपत्रे उपलब्ध करून मराठा-कुणबी नोंदी तपासणी तातडीने पूर्ण कराः मंत्री शंभुराज देसाई यांचे निर्देश
महाराष्ट्र

हैदराबाद गॅझेटमधील कागदपत्रे उपलब्ध करून मराठा-कुणबी नोंदी तपासणी तातडीने पूर्ण कराः मंत्री शंभुराज देसाई यांचे निर्देश

मुंबई: राज्यात मराठा-कुणबी नोंदीबाबत केलेल्या सर्वेक्षणात नोंदी न आढळलेल्या समाज बांधवांसाठी शासनाने अधिकच्या नोंदी मिळवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ‘हैदराबाद गॅझेट’मधील नोंदी मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांचे पथक हैदराबाद येथे पाठवले. या पथकाने तपासलेल्या कागदपत्रांची मागणी शासनाने विहित शुल्क भरून केली आहे. या कागदपत्रांच्या सत्यप्रती तातडीने उपलब्ध करून कागदपत्रांची पडताळणी गतीने पूर्ण करावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्री उपसमितीचे सदस्य शंभूराज देसाई यांनी बुधवारी दिले. मंत्रालयातील समिती कक्षात मराठा समाज आरक्षण व संबंधित विषयांबाबत मंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला गृह विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार सिंग, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, विधी व न्याय विभागाच्या सहसचिव सुवर्णा केवल आदी उपस्थित होते.  &n...
शासकीय कार्यालयाच्या आवारात महिला बचतगटांना जागा उपलब्ध करून देणार
महाराष्ट्र

शासकीय कार्यालयाच्या आवारात महिला बचतगटांना जागा उपलब्ध करून देणार

मुंबई: राज्यातील महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी महानगरातील शासकीय कार्यालयाच्या आवारात बचत गटांना जागा उपलब्ध करुन त्यांच्या उद्योगवाढीसाठी प्रोत्साहन द्यावे, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना दिले. मंत्रालयात बचतगटांच्या दालनांना शासकीय कार्यालयाच्या आवारात जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात बुधवारी आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, ‘मविम’च्या व्यवस्थापकीय संचालक माया पाटोळे उपस्थित होते. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी  महानगरांमध्ये  महिला बचत गटांच्या उद्योगवाढीसाठी अधिक प्रोत्साहन मिळावे, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. शासकीय कार्यालयांच्या आवारात महिला बचत गटांचे दालन उभारण्यासाठी परवानगी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल...
‘आदित्य ठाकरेंनी दिशा सालियानवर बलात्कार केला आणि तिला गॅलरीतून ढकलून दिले असा..,’ अनिल देशमुखांचा मोठा दावा, फडणवीसांवर गंभीर आरोप
देश, महाराष्ट्र, राजकारण

‘आदित्य ठाकरेंनी दिशा सालियानवर बलात्कार केला आणि तिला गॅलरीतून ढकलून दिले असा..,’ अनिल देशमुखांचा मोठा दावा, फडणवीसांवर गंभीर आरोप

नागपूरः आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियनवर बलात्कार केला आणि तिला गॅलरीतून ढकलून दिले, असा खोटा आरोप प्रतिज्ञापत्र देऊन करण्यासाठी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दबाव आणला. त्यांनी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यावरही खोटे आरोप करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला. मी खोटे आरोप करण्यास, प्रतिज्ञापत्र देण्यास नकार दिला. त्यामुळे माझ्यावर सीबीआय-ईडीची कारवाई करण्यात आली. मला तुरुंगात टाकण्यात आले, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे. श्याम मानव यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या दाव्या संदर्भात अनिल देशमुख यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी देशमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. उद्धव ठाकरेंना अडकवण्याचे कारस्थान झाल्याचा दावा श्याम मानव यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यावर अनिल देशमुखांनी द...
‘ठुमकत नाचत आला मोर वन्समोअर, वन्समोअर’ बालभारतीच्या पुस्तकातील वादग्रस्त कवितेवर शालेय शिक्षणमंत्री म्हणतात, ‘एखाद्या लहान गोष्टीचा…’
महाराष्ट्र

‘ठुमकत नाचत आला मोर वन्समोअर, वन्समोअर’ बालभारतीच्या पुस्तकातील वादग्रस्त कवितेवर शालेय शिक्षणमंत्री म्हणतात, ‘एखाद्या लहान गोष्टीचा…’

मुंबईः बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकातील एका कवितेवरून सोशल मीडियावर सध्या चांगलाच वाद पेटला आहे. इयत्ता पहिलीच्या पुस्तकातील ‘जंगलात ठरली मैफल’ या कवितेतील ‘ठुमकत नाचत आला मोर, वन्समोअर वन्समोअर झाला शोर’ या ओळीत वापरलेल्या इंग्रजी शब्दावर अनेकांनी आक्षेप घेतला असून राज्यभाषा सल्लागार समितीने मराठीच्या पुस्तकातील भाषेची तपासणी करण्याची मागणी केली आहे. मात्र ‘एखाद्या लहान गोष्टीचा किती बाऊ करायचा?’ असे म्हणत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या कवितेचे अप्रत्यक्ष समर्थनच केले आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीच्या इयत्ता पहिलीचे पुस्तक सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. या पुस्तकात ‘जंगलात ठरली मैफल’ ही पूर्वी भावेंची कविता प्रकाशित करण्यात आली आहे. या कवितेच्या शेवटच्या ओळीत ‘ठुमकत नाचत आला मोर वन्समोअर, वन्समोअर झाला शोर’ असे...
दिव्यांग कर्मचाऱ्यांना २०१६ पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
महाराष्ट्र

दिव्यांग कर्मचाऱ्यांना २०१६ पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई: राज्य शासनातील दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी ३० जून २०१६ पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. गट ड ते गट अ च्या पदांमध्ये पदोन्नतीमध्ये ४ टक्के आरक्षण ३० जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात येत आहे. याचा लाभ काल्पनिक पद्धतीने गट अ च्या निम्न स्तरापर्यंत मिळेल. ३० जून २०१६  पासून ज्या दिनांकाला दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरेल त्या दिनांकापासून त्यांना काल्पनिकरित्या आरक्षणाचा लाभ देण्यात येईल. पदोन्नतीचा प्रत्यक्ष आर्थिक लाभ त्यांना प्रत्यक्षात पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होईल.  या निर्णयामुळे पदोन्नती साखळीतील अंतर्गत ज्येष्ठतेवर परिणाम होण्याच्या शक्यतेमुळे गैरसोय टाळण्यासाठी ३० जून २०१६ नंतर मान्यता देण्यात आलेल्या प्रत्येक न...
‘धेडगुजरीपणा’ भोवला: पुणे जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदावरून ज्योत्सना पडियार यांची हकालपट्टी
महाराष्ट्र

‘धेडगुजरीपणा’ भोवला: पुणे जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदावरून ज्योत्सना पडियार यांची हकालपट्टी

पुणे: भरबैठकीत जोरजोराने ओऱडत मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना उद्देशून जातीवाचक शब्दांचा वापर करणाऱ्या पुणे जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा डॉ. ज्योत्सना पडियार-हिरमुखे यांची या पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. बार्टीचे महासंचालक सुनिल वारे यांनी तसे आदेश काढले आहेत. मात्र या आदेशात जातीवाचक शब्द वापरून मागासवर्गीयांना अपमानित केल्याबद्दल त्यांच्याविरूद्ध ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा आणि शिस्तभंग केल्यामुळे विभागीय चौकशी होणार की नाही, याचा कोणताही उल्लेख या आदेशात नाही.  पुणे जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा ज्योत्सना पडियार- हिरमुखे यांनी १५ जुलै रोजी त्यांच्या दालनात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला समितीचे संशोधन अधिकारी व उपायुक्त डॉ. दीपक खरात यांच्यासह सर्व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. हेही वाचा: पुणे जातप...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!