![](https://newstown.in/wp-content/uploads/2023/06/rain-maharashtra-1024x587.jpg)
मुंबई: पूर्व-विदर्भ क्षेत्रात २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रविवार, २५ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांतील काही भागांमध्ये वादळाची शक्यता आहे. मुख्यत: सोमवार, दिनांक २६ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर हवामानातील बदल अपेक्षित आहे.
या तीन जिल्ह्यांसह भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि अमरावती जिल्ह्याच्या पूर्व भागातही वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भागांत गारपीटाचीही शक्यता आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या
शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणी प्रक्रिया निरंतर सुरू राहणार, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शे...
‘वेळ पडल्यास देशाची राज्यघटनाच बदलू’ परभणीतील महायुतीचे महादेव जानकरांचे वादग्रस्त वक्तव्य, आंबेडकर...
लोकसभेच्या २२ जागांवर शिंदे गटाचा दावा, भाजप-शिवसेनेत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता!
संस्थाचालकाची फुल्ल टू चाटुगिरी करत प्रशासन अधिकारी सांजेकरांच्या प्राध्यापकांना धमक्या, फुकट पगार घ...