देश

मोहन भागवत यांना मोदी-शहा यांच्या दर्जाची सुरक्षा, आता ‘एएसएल’ कव्हरमध्ये वावरतील आरएसएस प्रमुख!
देश, राजकारण

मोहन भागवत यांना मोदी-शहा यांच्या दर्जाची सुरक्षा, आता ‘एएसएल’ कव्हरमध्ये वावरतील आरएसएस प्रमुख!

नवी दिल्लीः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आता त्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दर्जाचीच सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आली आहे. मोहन भागवत यांना सध्या असलेली झेड प्लस सुरक्षा वाढवून ऍडव्हॉन्स सिक्योरिटी लाईजन (एएसएल) करण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने नुकत्याच घेतलेल्या समीक्षा बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. भागवतांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्यामुळे त्यांना नेमका कोणापासून धोका आहे? त्यांना प्रधानमंत्री आणि गृह मंत्र्याइतकीच सुरक्षा का देण्यात आली? असे सवाल उपस्थित केले जात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृह मंत्रालयाच्या समीक्षा बैठकीत असे आढळून आले आहे की, बिगर भाजप शासित राज्यात दौऱ्यावर गेल्यानंतर मोहन भागवत यांच्या सुरक्षेत ढिलाई आढळून आली. त्यामुळ...
तमीळ अभिनेत्री, भाजप नेत्या नमिता यांना मदुराईच्या मंदिरात प्रवेशासाठी मागितला हिंदू असल्याचा पुरावा
देश, राजकारण

तमीळ अभिनेत्री, भाजप नेत्या नमिता यांना मदुराईच्या मंदिरात प्रवेशासाठी मागितला हिंदू असल्याचा पुरावा

मदुराईः तामीळनाडू भाजप राज्य कार्यकारिणीच्या सदस्या आणि अभिनेत्री नमिता यांना मदुराईतील मीनाक्षी सुंदरेश्वरी मंदिरात प्रवेशासाठी हिंदू असल्याचा पुरावा मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नमिता या सोमवारी पतीसह या मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. तेव्हा मंदिर प्रशासनाने त्यांना प्रवेश नाकारला आणि हिंदू असल्याचा पुरावा मागितला, असा आरोप नमिता यांनी केला आहे. मी हिंदू म्हणूनच जन्माला आली आहे आणि माझे लग्न तिरूपती येथे झाले होते, हे सर्वांनाच माहिती आहे. माझ्या मुलाचे नावही भगवान श्रीकृष्णाच्या नावावरून ठेवले आहे. तरीही मंदिरातील अधिकारी आमच्याशी उद्धटपणे आणि अहंकाराने वागले. त्यांनी माझी जात आणि श्रद्धा सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे पुरावा मागितला, असे नमिता म्हणाल्या. मला माझ्या स्वतःच्या देशात आणि माझ्या स्वतःच्या राज्यात पहिल्यांदाच परके असल्याची भावना दिसून आली. मी हिंदू आहे, य...
जालन्यातील गजकेसरी स्टील कंपनीच्या बॉयलरमध्ये भीषण स्फोट; ४ कामगारांची प्रकृती चिंताजनक, २० गंभीर जखमी
देश, महाराष्ट्र

जालन्यातील गजकेसरी स्टील कंपनीच्या बॉयलरमध्ये भीषण स्फोट; ४ कामगारांची प्रकृती चिंताजनक, २० गंभीर जखमी

जालनाः येथील औद्योगिक वसाहतीतील गजकेसरी स्टील कंपनीच्या बॉयलरचा भीषण स्फोट झाला.  स्फोटानंतर लागलेल्या आगीत ४ कामगार होरपळले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या स्फोटात किमान २० ते २२ कामगार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आज शनिवारी दुपारच्या सुमारास गजकेसरी स्टील कंपनीच्या भट्टीतील केमिकल अंगावर पडल्याने त्या ठिकाणी काम करणारे कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी माध्यमांना दिली. तर भट्टी फुटल्याने भट्टीतील केमिकल कामगारांवर उडाल्यामुळे काही कामगार जागीच ठार झाल्याची भीती स्थानिक कामगारांनी व्यक्त केली आहे.  गजकेसरी कंपनीच्या बॉयलरचा स्फोट होताच तातडीने कंपनी बंद करून आतमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे मोबाइल हिसकावून घेण्यात आल्याची माहितीही समोर येत आहे. या स्फोटानंतर घटनास्थळी कामगारांची गर्दी जमली. जखमी झालेल्यांपैकी...
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवदरम्यान जड वाहनांना वाहतूक बंदी
देश

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवदरम्यान जड वाहनांना वाहतूक बंदी

मुंबई: गणेशोत्सवासाठी गणेश मूर्तींचे आगमन, गणेशमूर्तींचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास आदींसाठी सार्वजनिक हितास्तव  मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर वजनक्षमता १६ टन किंवा १६ टनांपेक्षा जास्त वाहनांना मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १५५ मधील तरतुदीनुसार वाहतूक बंदी करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील मुंबई ते सावंतवाडी दरम्यान जड वाहनांना बंदी असणार आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा प्रवास म्हणून ५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून ते ८ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत या कालावधीत बंदी असणार आहे. तर ५ व ७ दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवासासाठी ११ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपासून ते १३ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत, अनंत चतुर्दशी ११ दिवसांचे गणेशमूर्तींचे विसर्जन, परतीच्या प्रवासाकरिता १७ सप्टेंबर...
भारत बंदः पाटण्यात आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार; रेल्वे, रस्ते वाहतूक विस्कळित
देश

भारत बंदः पाटण्यात आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार; रेल्वे, रस्ते वाहतूक विस्कळित

नवी दिल्लीः  अनुसूचित जाती-जमाती म्हणजेच एससी-एसटी आरक्षणात उपवर्गीकरण आणि क्रिमी लेअर लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात पुकारलेलया भारत बंदला आज देशभरात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. पाटण्यात पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. या बंदमुळे देशभरात काही ठिकाणी रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळित झाली आहे. भारत बंदमध्ये २० हून अधिक संघटना आणि राजकीय पक्ष सहभागी झाले आहेत. डावे पक्ष, झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, बहुजन समाज पार्टी या पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांवर बिहारच्या पाटणा शहरात पोलिसांनी लाठीमार केला. आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने निदर्शने केली जात असताना हा प्रकार घडला. दानापूरमध्येही आंदोलकांनी डीआरएम कार्यालयाकडे जाणारा रस्ता रोखून धरला आहे. आंदोलकांनी ज...
लॅटरल एन्ट्रीवरून मोदी सरकारची फजिती; राहुल गांधींच्या दबावापुढे झुकले सरकार, जाहिरात रद्द करण्याचे यूपीएससीला निर्देश
देश, राजकारण

लॅटरल एन्ट्रीवरून मोदी सरकारची फजिती; राहुल गांधींच्या दबावापुढे झुकले सरकार, जाहिरात रद्द करण्याचे यूपीएससीला निर्देश

नवी दिल्लीः भारतीय नागरी सेवेत लॅटरल एन्ट्रीच्या मुद्द्यावरून भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारची चांगलीच फजिती झाली आहे. आरक्षणाला तिलांजली देऊन लॅटरल एन्ट्रीच्या नावाखाली भारतीय नागरी सेवेत थेट प्रवेश देण्याच्या मोदी सरकारच्या धोरणावरून विरोधकांनी घेरल्यानंतर अखेर मोदी सरकारने केंद्रीय लोकसेवा आयोगाला (यूपीएससी) लॅटरल एन्ट्रीची जाहिरातच रद्द करण्यास सांगितले आहे.  केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मंगळवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) अध्यक्षांना पत्र लिहून भारतीय नागरी सेवेत लॅटरल एन्ट्रीची जाहिरात रद्द करण्यास सांगितले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने ट्विट करून लॅटरल एन्ट्रीला विरोध करत होते. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही लॅटरल एन्ट्रीच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला...
उद्या, २१ ऑगस्ट रोजी भारत बंद; एससी-एसटी आरक्षणात उपवर्गीकरण आणि क्रिमी लेअरच्या विरोधात उपसले आंदोलनाचे हत्यार!
देश

उद्या, २१ ऑगस्ट रोजी भारत बंद; एससी-एसटी आरक्षणात उपवर्गीकरण आणि क्रिमी लेअरच्या विरोधात उपसले आंदोलनाचे हत्यार!

नवी दिल्लीः  अनुसूचित जाती-जमाती म्हणजेच एससी आणि एसटीच्या आरक्षणात उपवर्गीकरण तसेच क्रिमी लेअर लागू करण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ उद्या, २१ ऑगस्ट रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. आरक्षण बचाव संघर्ष समिती तसेच विविध दलित संघटनांनी ही बंद हाक दिली आहे. या भारत बंदच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि तणाव निर्माण होऊ नये म्हणून सर्व जिल्ह्यांमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असणार आहे.  मंगळवारी, २१ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा भारत बंद राहील. या बंदला विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांचाही पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे. या भारत बंदच्या काळात सार्वजनिक वाहतूक सेवा बंद राहण्याची शक्यता आहे. व्यावसायिक आस्थापना, खासगी ऑफिसेसही बंद राहण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शाळांनाही सुटी दिली जाण्याची श...
‘गॅस सिलिंडर’ हेच आता ‘वंचित’चे सामाईक निवडणूक चिन्ह, २८८ विधानसभा मतदारसंघात प्रचार-प्रसार होणार अधिक सोयीचा!
देश, राजकारण

‘गॅस सिलिंडर’ हेच आता ‘वंचित’चे सामाईक निवडणूक चिन्ह, २८८ विधानसभा मतदारसंघात प्रचार-प्रसार होणार अधिक सोयीचा!

नवी दिल्लीः महाराष्ट्रात येत्या काही महिन्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीला निवडणूक आयोगाने ‘गॅस सिलिंडर’ हे निवडणूक चिन्ह दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार ‘गॅस सिलिंडर’ याच निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवतील. परिणामी मतदारांपर्यंत निवडणूक चिन्ह पोहोचवणे आणि एकीकृत प्रचार करणे वंचित बहुजन आघाडीला सोपे जाणार आहे. प्रकाश आंबेडकरांनी भारिप-बहुजन महासंघाचे विलिनीकरण करून सहा वर्षांपूर्वी म्हणजेच २०१८ मध्ये वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली होती. वंचित बहुजन आघाडीने २०१९ च्या महाराष्ट्र विधासभेच्या निवडणुकीबरोबरच लोकसभा निवडणूकही लढवली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीलाही वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे सामोरे गेली आहे. या तिन्ही निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेद...
विद्यार्थ्यांनी ‘गुड मॉर्निंग’ म्हणण्यावर सरकारचा आक्षेप, शाळांना दिले ‘असे’ आदेश
देश

विद्यार्थ्यांनी ‘गुड मॉर्निंग’ म्हणण्यावर सरकारचा आक्षेप, शाळांना दिले ‘असे’ आदेश

चंदीगडः शाळांमधील विद्यार्थ्यांनी रोज सकाळी ‘गुड मॉर्निंग’ म्हणून अभिवादन करण्याचा प्रघात बंद करण्याचे निर्देश हरियाणा सरकारने जारी केले आहेत. १५ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांनी एकमेकांना किंवा शिक्षकांना ‘गुड मॉर्निंग’ऐवजी ‘जय हिंद’ म्हणत अभिवादन करावे, असे या निर्देशात म्हटले आहे. हरियाणा सरकारने यासंबंधी काढलेले परिपत्रक सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी, ब्लॉक शिक्षणाधिकारी आणि सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठवण्यात आले आहे. येत्या १५ ऑगस्टपासून या निर्देशांची अंमलबजावणी करावी, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता हरियाणामध्ये ‘गुड मॉर्निंग’ म्हणून अभिवादन करण्याचा प्रघात बंद होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती व देशाभिमान जागृत करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे देशाच्या राष्ट्रीय ऐक्याविषयी आणि जाज्वल्य इतिहासाबाब...
NEET-PG ला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, ११ ऑगस्टलाच होणार ४१६ केंद्रांवर परीक्षा!
देश

NEET-PG ला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, ११ ऑगस्टलाच होणार ४१६ केंद्रांवर परीक्षा!

नवी दिल्लीः सर्वोच्च न्यायालयाने नीट-पीजी परीक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. ही परीक्षा रविवारी (११ ऑगस्ट) रोजी होणार आहे. परीक्षा केंद्रांचे वितरण आणि दोन विद्यार्थ्यांच्या गुणांचे सामान्यीकरणाबद्दल चिंता व्यक्त करत या परीक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती, ती फेटाळून लावण्यात आली आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी झाली. आम्ही नवीन शैक्षणिक धोरण तयार करू शकत नाही आणि ही काही आदर्श दुनिया नाही, असे सांगत या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे. नीट-पीजी परीक्षेच्या अनेक उमेदवारांना अशी परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत की, तेथे पोहोचणे त्यांच्यासाठी अत्यंत असुविधेचे आहे. त्यामुळे ही परीक्षा स्थगित करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी याचिकेत केली होती....
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!