राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत उद्धव ठाकरे, शरद पवार हे महाराष्ट्राचे राजकारण कूस बदलण्याचे संकेत; भाजप अस्वस्थ!
मुंबईः राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेही सहभागी होणार आहेत. या घडामोडीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. सुमारे तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील सत्तेची समीकरणे बदलण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले होते आणि अडीच वर्षांपर्यंत सत्तेतही राहिले. महाराष्ट्राच्या राजकारणात हा नवीन प्रयोग झाला तेव्हा बहुतांश राजकीय विश्लेषकांनी सत्ता हेच महाविकास आघाडीचे एकमेव उद्दिष्ट असल्याचे सांगत या नवीन प्रयोगाची संभावना केली होती. परंतु आता सत्ता जाऊनही काँग्रेसच्या नेतृत्त्वातील भारत जोडो यात्रेत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षाचे नेते सहभागी होत असल्याने त्याचे राजकीय अन्वयार्थ लावले जाऊ लागले आहेत.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि श...