देश

महापुरुषांच्या भूमीत लोकमान्यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे सौभाग्य: प्रधानमंत्री मोदी
देश

महापुरुषांच्या भूमीत लोकमान्यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे सौभाग्य: प्रधानमंत्री मोदी

पुणे: पुणे ही छत्रपती शिवाजी महाराज, चाफेकर बंधू यांची भूमी आहे. या भूमीशी जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा आणि आदर्श जोडलेले आहेत. अशा भूमीत लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार मिळत आहे ते आपले सौभाग्य आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यभूमीत मिळणारा पुरस्कार हा आपला सन्मान आहे, अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. स.प. महाविद्यालयात आयोजित समारंभात प्रधानमंत्री मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक, विश्वस्त सुशीलकुमार शिंदे, डॉ. रोहित टिळक, गीताली टिळक, डॉ. प्रणती टिळक आदी उपस्थित होते. स्मृतिचिन्ह, मानपत्र...
पीक विमा भरण्यास तीन दिवसांची मुदतवाढ, आता ३ ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार
देश

पीक विमा भरण्यास तीन दिवसांची मुदतवाढ, आता ३ ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार

मुंबई: पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य शासनाने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता, पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून ३ ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे दिली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी एक रुपयात पीक विमा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. आजपर्यंत राज्यात तब्बल एक कोटी पन्नास लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी एक रुपयात आपला विमा अर्ज नोंदवून सहभाग घेतला आहे. मागील चोवीस तासात ७ लाख २० हजार शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरला आहे. मात्र काही ठिकाणी सर्व्हर डाऊन होणे व तत्सम तांत्रिक अडचणी येत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार शेतकरी कोणत्याही तांत्रिक बाब...
धावत्या जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस रेल्वेत आरपीएफ जवानाचा गोळीबार, ४ जणांचा मृत्यू
देश

धावत्या जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस रेल्वेत आरपीएफ जवानाचा गोळीबार, ४ जणांचा मृत्यू

मुंबईः जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये आज सोमवारी पहाटे पाच वाजता गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये रेल्वे पोलिस दलातील दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गोळीबार करून आरपीएफ जवान चालत्या गाडीतून उडी मारून फरार झाला आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात आणण्यात आली असून पोलिसांना पुढील तपास सुरू केला आहे. गाडी क्रमांक १२९५६ जयपूर-मुंबई ही सुपरफास्ट एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलकडे जात होती. या रेल्वेत सुरक्षेसाठी तैनात असलेला आरपीएफ जवान चेतनकुमार सिंह याने बोगी क्रमांक बी-५ मध्ये आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळीबार केला. या गोळीबारात रेल्वे पोलिस दलातील सहायक निरीक्षक टिकाराम यांच्यासह चार जणांचा मृत्यू झाला. यानंतर चेतनकुमार सिंह हा दहिसर रेल्वेस्थानकाजवळ चालत्या रेल्वेतून उडी...
पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात गुरूवारी जमा होणार १४ वा हप्ता, प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते वितरण
देश

पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात गुरूवारी जमा होणार १४ वा हप्ता, प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते वितरण

मुंबई: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरूवारी (२७जुलै) सकाळी ११ वाजता राजस्थानमधील सिकर येथे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्यावतीने आयोजित 'पीएम किसान संमेलन' कार्यक्रमाच्या निमित्ताने पीएम किसान सन्मान योजनेतील ८.५ कोटी लाभार्थींच्या खात्यावर पीएम किसान योजनेच्या १४ व्या हप्त्याची रक्कम एका क्लिकद्वारे वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत दिली. प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पनेतून सन २०१९ मध्ये शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने पीएम किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली. याद्वारे देशातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना, त्यांच्या बँक खात्यात दरवर्षी ६ हजार रुपयांचे अर्थसहाय्य तीन हप्त्यात देण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी २ हजार रुपयांचे एकूण १३ हप्ते ११ कोटी शेतकऱ्यांना अशी एकूण २ लाख ४२  हजार कोटी रुपये ...
तुमच्या खात्यात नेमका जीपीएफ किती? हार्ड कॉपी देणे बंद, आता ऑनलाइन असा पहा तपशील!
देश

तुमच्या खात्यात नेमका जीपीएफ किती? हार्ड कॉपी देणे बंद, आता ऑनलाइन असा पहा तपशील!

मुंबई: भविष्य निर्वाह निधीचे २०२२-२३ चे वार्षिक लेखा विवरण सेवार्थच्या https://sevaarth.mahakosh.gov.in या संकेतस्थळावर कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले असून त्याची प्रत्यक्ष प्रत (हार्ड कॉपी) देणे थांबवल्याचे महालेखाकार कार्यालयाने प्रसिद्धी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. महालेखापाल कार्यालय यांनी लेखा आणि कोषागार संचालकांना २०२२-२३ या वर्षासाठी जीपीएफ लेखा स्लिप प्रदान केल्या असून त्या सेवार्थ या वेबसाइटवर अपलोड केल्या आहेत. कर्मचारी हे विवरण डाउनलोड करून प्रिंट काढू शकतात. खात्याच्या स्लिपमध्ये विसंगती आढळून आल्यास संबंधित आहरण आणि संवितरण अधिकाऱ्यामार्फत वरिष्ठ उपमहालेखापाल (निधी), महालेखापाल यांच्या निदर्शनास आणल्या जाऊ शकतात. गहाळ क्रेडिट/डेबिट, जन्मतारीख आणि नियुक्तीची तारीख इत्यादी माहिती स्लिपवर छापली नसल्यास, नोंदी पडताळणी आणि अद्ययावत करण्यासाठी agaeMaharshtral@ca...
तुमच्याही मोबाइलवर आलाय का इमर्जन्सी कॉल अलर्ट?; घाबरून जाऊ नका, समजून घ्या नेमका काय आहे हा प्रकार!
देश, साय-टेक

तुमच्याही मोबाइलवर आलाय का इमर्जन्सी कॉल अलर्ट?; घाबरून जाऊ नका, समजून घ्या नेमका काय आहे हा प्रकार!

मुंबईः आज (गुरुवारी) सकाळी १० वाजून २० मिनिटांची वेळ. हजारो स्मार्टफोनवर एकाच वेळी अचानक एक इमर्जन्सी अलर्ट आला. ज्यांच्या मोबाइलवर कॉल सुरू होते, अशांचे मोबाइल हॅण्डसेट व्हायब्रेट होऊन कसला तरी अलर्ट देऊ लागले... अचानक आलेल्या या इमर्जन्सी अलर्टमुळे ही नेमकी काय भानगड आहे, हे कळायला मार्ग नव्हता. त्यामुळे अनेकजण गोंधळून गेले. काही जणांना वाटले आपला मोबाइल हॅण्डसेट हॅक केला गेला आहे... काही जणांना वाटले हा फ्रॉड अलर्ट आहे... त्यामुळे अनेकांनी या इमर्जन्सी अलर्टला कोणताही प्रतिसाद न देणेच पसंत केले. सर्वच मोबाइल वापरकर्त्यांमध्ये या इमर्जन्सी अलर्टमुळे संभ्रम निर्माण झालेला असतानाच या इमर्जन्सी अलर्टमुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. हा भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून घेण्यात आलेला एक चाचणी संदेश आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत किंवा मोठ्या संकटाच्या काळात देशातील सर्व नागरिकांना एकाच...
८०० वर्षे जुन्या जुम्मा मशिदीत नमाजावर बंदी घालणारा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश औरंगाबाद खंडपीठाकडून स्थगीत
देश

८०० वर्षे जुन्या जुम्मा मशिदीत नमाजावर बंदी घालणारा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश औरंगाबाद खंडपीठाकडून स्थगीत

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  ८०० वर्षे जुन्या जुम्मा मशिदीत मुस्लिम समुदायाला नमाज पढण्यावर बंदी घालणारा जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १८ जून रोजी जारी केलेल्या मनमानी आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे ही मशीद आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर.एम. जोशी यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने मंगळवारी (१८ जुलै) रोजी जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशाला दोन आठवड्यांसाठी स्थगिती दिली आहे. जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी १८ जून रोजी मशिदीत नमाज पढण्यावर बंदी घालणारा आदेश जारी केला होता. खंडपीठाच्या या आदेशानंतर जुम्मा मशीद ट्रस्टने या मशिदीवर पुन्हा नियंत्रण मिळवले असून आता मुस्लिम समुदायाला या मशिदीत पूर्वीप्रमाणे नमाज अदा करता येणार आहे. मुस्लिम समुदायासाठी हा मोठा दिलासा आहे. उच...
मुख्यमंत्री शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रेचा फैसला कधी? सुप्रीम कोर्टाची विधानसभाध्यक्ष नार्वेकरांना नोटीस, दोन आठवडे मुदत
देश, राजकारण

मुख्यमंत्री शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रेचा फैसला कधी? सुप्रीम कोर्टाची विधानसभाध्यक्ष नार्वेकरांना नोटीस, दोन आठवडे मुदत

नवी दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकर निर्णय येण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.१६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सध्या कोणती प्रक्रिया सुरू आहे? अशी विचारणा करत सर्वोच्च न्यायालयाने आज विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांना नोटीस बजावली असून या नोटिसीवर उत्तर देण्यासाठी त्यांना दोन आठवडे मुदत देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकर निर्णय घेण्याचे आदेश महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांना द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर पहिली सुनावणी आज झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांना दोन आठवड्यात आपली बाजू मांडावी लागणार आहे. सर्...
व्यापाऱ्यांना दिलासाः राज्यात सात जीएसटी अपिलीय न्यायाधिकरण स्थापन होणार, अर्थ खात्याच्या निर्णयाची वन मंत्र्यांनी दिली माहिती
देश

व्यापाऱ्यांना दिलासाः राज्यात सात जीएसटी अपिलीय न्यायाधिकरण स्थापन होणार, अर्थ खात्याच्या निर्णयाची वन मंत्र्यांनी दिली माहिती

नवी दिल्ली:  वस्तू व सेवाकर परिषदेच्या ५० व्या बैठकीत महाराष्ट्रामध्ये सात अपिलीय न्यायाधिकरण (ट्रिब्युनल) स्थापनेच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे सांगितले. वित्त मंत्रालयाच्यावतीने आज वस्तू आणि सेवा कर परिषदेची ५० वी बैठक येथील विज्ञान भवनात आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अर्थमंत्री निर्मला सीतारामन होत्या. बैठकीत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते. महाराष्ट्राचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार या परिषदेस राज्याच्यावतीने उपस्थित होते. यासह राज्याच्या वित्त सचिव शैला ए. आणि जीएसटी आयुक्त राजीव कुमार मित्तल उपस्थित होते. आज पार पडलेल्या 50व्या बैठकीत विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आले. आज झालेल्या वस्तू व सेवाकर परिषदेच्या महत्वाच्या बैठकीत राज्यात वस...
आता पुढचा भूकंप सत्ताधारी भाजपमध्ये, पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये जाणार? सोनिया गांधी-पंकजांच्या गुप्त भेटीची चर्चा
देश, राजकारण

आता पुढचा भूकंप सत्ताधारी भाजपमध्ये, पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये जाणार? सोनिया गांधी-पंकजांच्या गुप्त भेटीची चर्चा

मुंबईः अजित पवार यांनी काकांविरुद्ध बंड करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडल्यामुळे झालेल्या राजकीय भूकंपामुळे बसलेले हादरे अजून शांत व्हायचे असतानाच महाराष्ट्रात आणखी एका राजकीय भूकंपाचे संकेत मिळत आहेत. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची गुप्त भेट घेतल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यामुळे पंकजा मुंडे लवकरच काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याचेही सांगितले जात आहे. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आज दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडणार आहेत. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी  आणि राहुल गांधी यांची नवी दिल्लीत दोनवेळा गुप्त भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुरू असलले राजकीय घमासान आणखी वाढण्याचे संकेत आहेत. शिवसेना- राष्ट्रवाद...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!