देश

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत उद्धव ठाकरे, शरद पवार हे महाराष्ट्राचे राजकारण कूस बदलण्याचे संकेत; भाजप अस्वस्थ!
देश, महाराष्ट्र, राजकारण, विशेष

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत उद्धव ठाकरे, शरद पवार हे महाराष्ट्राचे राजकारण कूस बदलण्याचे संकेत; भाजप अस्वस्थ!

मुंबईः राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेही सहभागी होणार आहेत. या घडामोडीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. सुमारे तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील सत्तेची समीकरणे बदलण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले होते आणि अडीच वर्षांपर्यंत सत्तेतही राहिले. महाराष्ट्राच्या राजकारणात हा नवीन प्रयोग झाला तेव्हा बहुतांश राजकीय विश्लेषकांनी सत्ता हेच महाविकास आघाडीचे एकमेव उद्दिष्ट असल्याचे सांगत या नवीन प्रयोगाची संभावना केली होती. परंतु आता सत्ता जाऊनही काँग्रेसच्या नेतृत्त्वातील भारत जोडो यात्रेत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षाचे नेते सहभागी होत असल्याने त्याचे राजकीय अन्वयार्थ लावले जाऊ लागले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि श...
काँग्रेसला मिळाला नवा चेहराः मल्लिकार्जुन खारगे यांची अध्यक्षपदी बहुमताने निवड, २४ वर्षानंतर गांधी कुटुंबाहेरचा अध्यक्ष
देश, राजकारण

काँग्रेसला मिळाला नवा चेहराः मल्लिकार्जुन खारगे यांची अध्यक्षपदी बहुमताने निवड, २४ वर्षानंतर गांधी कुटुंबाहेरचा अध्यक्ष

नवी दिल्लीः  काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खारगे यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. तब्बल २४ वर्षांनंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी कुटुंबाहेरील व्यक्तीची अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.  गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक देशभर चर्चेचा विषय बनली होती. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेमकी कोणाची वर्णी लागणार? याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर आज काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यात मल्लिकार्जुन खारगे यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड झाली आहे. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});  या निवडणुकीत मल्लिकार्जुन खारगे यांना ७ हजार ८९७ मते मिळाली आहेत. त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उभे असलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरूर यांना १ ह...
उद्धव ठाकरेंच्या मागेही ईडी, सीबीआयचा भुंगा लागणार का?, मुंबई उच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचेच लक्ष!
देश, विशेष

उद्धव ठाकरेंच्या मागेही ईडी, सीबीआयचा भुंगा लागणार का?, मुंबई उच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचेच लक्ष!

मुंबईः शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बेहिशेबी मालमत्तेची सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि सीबीआयमार्फत चौकशी करा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज बुधवारी सुनावणी होणार असून उच्च न्यायालय नेमका या निकाल देणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दादरच्या रहिवासी गौरी भिडे यांनी ही याचिका दाखल केली आहे. मुंबई पोलिसांत तक्रार देऊनही कोणतीही कारवाई झाली नाही, त्यामुळे ही याचिका दाखल करण्यात आल्याचे भिडे यांनी म्हटले आहे. या याचिकेत केंद्र सरकार, राज्य सरकार, सीबीआय, ईडी, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य आणि तेजस ठाकरे यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. आर.एम. लढ्ढा यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होणार आहे. या दरम्यान हे खंडपीठ कोणते महत्वाचे निर्देश दे...
शाळा- महाविद्यालयात हिजाब घालणे चूक की बरोबर? सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायमूर्तींमध्येच मतभेद, कसे ते वाचा सविस्तर
देश, विशेष

शाळा- महाविद्यालयात हिजाब घालणे चूक की बरोबर? सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायमूर्तींमध्येच मतभेद, कसे ते वाचा सविस्तर

नवी दिल्लीः शाळा-महाविद्यालयांसह अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लीम विद्यार्थिनींनी हिजाब घालून येणे चूक की बरोबर? हे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठालाही एकमताने ठरवता आले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने याबाबत वेगवेगळे निकाल दिले. हिजाबवर बंदी घालण्याचा कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय एका न्यायमूर्तींनी वैध ठरवला तर दुसऱ्या न्यायमूर्तींनी हा निर्णय फेटाळून लावला. आता हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे जाण्याची शक्यता आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थिनींनी हिजाब घालून येण्यावर कर्नाटक सरकारने बंदी घातली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारचा हा निर्णय वैध ठरवला आहे. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्या तब्बल २६ याचिका दाखल झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे या सर्व याचिकांवरील एकत्रित सुनावणी झाली. न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आण...
कर्नाटकात पुढील वर्षीपासून पदवीस्तरावर सायबर सुरक्षा अनिवार्य विषय
देश, विशेष, साय-टेक

कर्नाटकात पुढील वर्षीपासून पदवीस्तरावर सायबर सुरक्षा अनिवार्य विषय

बेंगळुरूः कर्नाटकमध्ये पुढील शैक्षणिक वर्षांपासून सर्व पदवी अभ्यासक्रमांत सायबर सुरक्षा हा अनिवार्य विषय असेल, अशी घोषणा शुक्रवारी कर्नाटकच्या उच्चशिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. बी. थिमेगौडा यांनी केली. कर्नाटकचे उच्चशिक्षण आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण यांच्या प्रमुख उपस्थितीत सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम-२०२२ला आरंभ झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे. उच्चशिक्षण क्षेत्रातील सध्याच्या माहिती तंत्रज्ञान आणि संगणक विज्ञान या अभ्यासक्रमांच्या व्यतिरिक्त नवा सायबर सुरक्षा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. या वर्षी सरकारने नॅसकॉमच्या सहकार्याने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल फ्लुएन्सी हे विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहेत, असे थिमेगौडा यांनी सांगितले. सर्व प्रकारच्या पदवी अभ्यासक्रमांत हे विषय अनिवार्य आहेत. माहिती तंत्रज्ञानमंत्री नारायण म...
राजधानी दिल्लीत नाइट लाइफः ३०० पेक्षाजास्त आस्थापना २४ तास सुरू राहणार
जीवनशैली, देश, विशेष

राजधानी दिल्लीत नाइट लाइफः ३०० पेक्षाजास्त आस्थापना २४ तास सुरू राहणार

नवी दिल्लीः मुंबईत नाइट लाइफ सुरू करण्याचे युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांचे स्वप्न राजधानी दिल्लीतही साकार होणार आहे. दिल्लीतील ३०० पेक्षा जास्त आस्थापना २४ तास सुरू ठेवता येणार आहेत. यामध्ये रेस्टॉरंट्सपासून मेडिकलची दुकाने, परिवहन सेवा, बीपीओ आणि ऑनलाइन डिलिव्हरीचा समावेश आहे. या श्रेणीतील दुकानांनी २४ तास सुरू ठेवण्याच्या परवानगीसाठी अर्ज केल्यानंतर त्यांना पुढील आठवड्यापासून परवानगी दिली जाणार आहे.  दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी ३१४ आस्थापनांना २४ तास सुरू ठेवण्याची सूट देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामधील काही प्रस्ताव २०१६ पासून प्रलंबित होते. आता उपराज्यपालांनी दिलेल्या निर्देशांनुसार यासंबंधीची अधिसूचना सात दिवसांच्या आत जारी करावी. या निर्णयानंतर मोठ्या शहरांमध्ये प्रचलित असलेल्या ‘नाइट लाइफ’ संस्कृतीलाही चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे. यामध...
error: Content is protected !!