आर्णी बाजार समिती यार्डातील जय किसान धर्मकाट्यावर तोलाईत हेराफेरी, पाच किलो वजन कमी दाखवून शेतकऱ्यांची लूट!
आर्णीः यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डातील जय किसान धर्मकाट्यावर तोलाईमध्ये ५ किलो वजन कमी दाखवून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याबाबत आर्णीच्या तहसीलदारांबरोबरच बाजार समितीकडेही लेखी तक्रार करण्यात आली आहे.
आर्णी तालुक्यातील शेतकरी गजानन शेळके हे १६ डिसेंबर रोजी त्यांच्या शेतातील कापूस विक्री करण्यसाठी आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डातील जय किनार धर्मकाटा तोलाई केंद्रावर गेले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शेळके यांनी टाटा कंपनीच्या गाडी क्रमांक एमएच-४२ एएफ ०१०७ मध्ये कापूस भरून जय किसान धर्मकाट्यावर तोलाई केली. या धर्मकाट्यावर कापूस भरलेल्या गाडीची मोजणी केली असता कापसासह त्या गाडीचे वजन १ हजार ८६५ किलो असे नेट वजन जय किसान धर्मकाट्याच्या दर्शनी मीटरवर दाखवण्यात आले होते.
गाडीतील कापूस खाली करू...










