दुनिया

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगरातील ऑरिक सिटीत ‘ॲडव्हान्टेज महाएक्स्पो-२०२६’ औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन
दुनिया, देश

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगरातील ऑरिक सिटीत ‘ॲडव्हान्टेज महाएक्स्पो-२०२६’ औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): येथील मसिआ व अन्य औद्योगिक संघटना, संस्थांच्या वतीने छत्रपती संभाजीनगरातील ऑरिक सिटीमध्ये ८ ते ११ जानेवारी २०२६  या कालावधीत ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो-२०२६ या औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन केले जाणार आहे. या प्रदर्शनाची पूर्वतयारी सध्या सुरू असून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज या प्रदर्शनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. महाराष्ट्र शासनाचा सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विभाग, ऑरिक सिटी तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्य सहयोगातून आयोजित करण्यात आलेल्या ॲडव्हान्टेज महाएक्स्पो-२०२६ या औद्योगिक प्रदर्शनात देशातील तसेच विदेशातील अनेक उद्योजक आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन लावणार आहेत. तसेच येथे सामंजस्य करार, चर्चासत्रे आदी होणार आहेत. हे प्रदर्शन ऑरिक सिटीच्या आवारात २७.५ एकर क्षेत्रात भव्य आयोजीत होणार आहे. त्यात १५०० स्टॉल्स लावण्यात येणार ...
नेपाळमधील उद्रेक फक्त डिजिटल स्वातंत्र्यासाठी की मदांध सत्तेला धडा शिकवण्यासाठी?
अभिव्यक्ती, दुनिया

नेपाळमधील उद्रेक फक्त डिजिटल स्वातंत्र्यासाठी की मदांध सत्तेला धडा शिकवण्यासाठी?

भारतात जवळजवळ संपूर्ण माध्यमे, मग ती प्रिंट असो वा इलेक्ट्रॉनिक-पूर्णपणे सरकारी झाली आहेत आणि सामान्य लोकांमध्ये ती 'गोदी मीडिया' म्हणून कुप्रसिद्ध आहेत. हाच प्रकार नेपाळमध्ये चालला होता. सोशल मीडियाद्वारेच लोकांना काही प्रमाणात योग्य माहिती मिळू शकत होती. त्यावर बंदी घालण्याची घोडचूक ओली सरकारने केली आणि या मुस्कटदाबीविरूध्द नेपाळी जनता पेटून उठली.  त्यापासून किमान नेपाळच्या शेजारी असलेल्या देशांनी तरी धडा घ्यायला हवा... प्रभाकर ढगे, आंतरराष्ट्रीय प्रश्नाचे अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार, पणजी गोदी मीडियाचा खोटा प्रचार नेहमीप्रमाणे जनतेच्या माथी मारण्यासाठी पंतप्रधान  के. पी. ओली सरकारने फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉटस्अप यासारख्या २६ सामाजिक माध्यमांवर बंदी घातली. त्याचा निषेध करत डिजीटल स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थी, तरुण तथा नागरिकांच्या ...
प्रधानमंत्री मोदींच्या अर्ध्या दिवसाच्या सौदी अरब दौऱ्यावर १५.५४ कोटी रुपये खर्च, हॉटेलचेच बिल तब्बल १० कोटी रुपये!
दुनिया, देश

प्रधानमंत्री मोदींच्या अर्ध्या दिवसाच्या सौदी अरब दौऱ्यावर १५.५४ कोटी रुपये खर्च, हॉटेलचेच बिल तब्बल १० कोटी रुपये!

नवी दिल्लीः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २२-२३ एप्रिल २०२५ रोजी केलेल्या १२ तासांच्या सौदी अरब दौऱ्यावर भारत सरकारचे तब्बल १५ कोटी ५४ लाख ३ हजार ७९२ रुपये खर्च झाले आहेत. विशेष म्हणजे या एकूण खर्चात हॉटेलचेच बिल १० कोटी २६ लाख ३९ हजार ६५८ रुपये आहे. आरटीआयमधून ही माहिती समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अजय बासुदेव बोस यांनी हा आरटीआय अर्ज दाखल केला होता. सौदी अरबच्या जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दूतावासाकडून प्राप्त झालेल्या या माहितीमुळे प्रधानमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावर होणाऱ्या सरकारी खर्चाबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. ‘द वायर’ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा सौदी अरबचा मूळ दौरा दोन दिवसांचा म्हणजे २२ व २३ एप्रिल २०२५ असा होता. परंतु जम्मू-काश्मिरातील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे त्यांना आपला हा दौरा अर्धवट सोडून मायदेशी परत...
कोल्हापुरी चप्पल जीआय टॅगचे अधिकृत ‘स्वामित्व’ लिडकॉम व लिडकर महामंडळाकडेच, दोन्ही महामंडळाच्या एमडींचे स्पष्टीकरण!
दुनिया, देश

कोल्हापुरी चप्पल जीआय टॅगचे अधिकृत ‘स्वामित्व’ लिडकॉम व लिडकर महामंडळाकडेच, दोन्ही महामंडळाच्या एमडींचे स्पष्टीकरण!

मुंबई: कोल्हापुरी चप्पल या महाराष्ट्र व कर्नाटकातील पारंपरिक आणि ऐतिहासिक पादत्राणास जीआय  टॅग प्राप्त आहे. या जीआय टॅगचे अधिकृत नोंदणीकृत स्वामित्व संत रोहिदास लेदर इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड चर्मकार डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (लिडकॉम) आणि डॉ. बाबू जगजीवनराम लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (लिडकर) या दोन महामंडळाकडेच असल्याचे दोन्ही महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक यांनी स्पष्ट केले आहे. जून २०२५ मध्ये, इटलीच्या प्रसिद्ध 'प्राडा' ब्रँडने पुरुषांसाठी आपले 'स्प्रिंग/समर' कलेक्शन सादर केले. या फॅशन शोमध्ये मॉडेलने परिधान केलेल्या लेदर सँडल्सचे डिझाइन महाराष्ट्रातील पारंपरिक आणि जीआय नोंदणीकृत कोल्हापुरी चप्पलप्रमाणे अत्यंत साम्य दर्शवणारे असल्याचे निदर्शनास आले. या घटनेनंतर सामाज माध्यमांवर व पारंपरिक कारागीर समूहांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर वकिलांच्या एका गटान...
जेएनयूच्या कुलगुरूंना केवळ गुजरातमधील परिषदेत गैरहजर राहिल्यामुळे केंद्राची नोटीस, माजी उपराष्ट्रपती धनखड यांच्या ‘उपस्थितीला प्राधान्य’ देणे भोवणार?
दुनिया, देश

जेएनयूच्या कुलगुरूंना केवळ गुजरातमधील परिषदेत गैरहजर राहिल्यामुळे केंद्राची नोटीस, माजी उपराष्ट्रपती धनखड यांच्या ‘उपस्थितीला प्राधान्य’ देणे भोवणार?

नवी दिल्लीः गुजरातमध्ये आयोजित केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या परिषदेला गैरहजर राहिल्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजेच जेएनयूच्या कुलगुरू डॉ. शांतीश्री धुलीपुडी पंडित यांना नोटीस बजावली आहे. डॉ. पंडित यांची या परिषदेतील अनुपस्थिती गांभीर्याने घेत शिक्षण मंत्रालयाने त्यांना या अनुपस्थितीचे कारण विचारले आहे. विशेष म्हणजे ज्या दिवशी गुजरातमध्ये ही परिषद होती, त्याच दिवशी डॉ. पंडित या तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी उद्घाटन केलेल्या एका कार्यक्रमात सहभागी होत्या. जेएनयूच्या कुलगुरू डॉ. शांतीश्री धुलीपुडी पंडित या १० व ११ जुलै रोजी गुजरातच्या केवडियामध्ये आयोजित केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या दोन दिवसीय परिषदेत सहभागी झाल्या नाहीत. या परिषदेत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह विद्यापीठ अनुदान आयोगाचे अधिकारी, अन्...
व्हिडीओकॉन कंपनीला ३०० कोटींचे कर्ज मंजुरीच्या बदल्यात घेतली ६४ कोटींची लाच, आयसीआयसीआय बँकेच्या माजी प्रमुख चंदा कोचर लाचखोरीत दोषी!
दुनिया, देश

व्हिडीओकॉन कंपनीला ३०० कोटींचे कर्ज मंजुरीच्या बदल्यात घेतली ६४ कोटींची लाच, आयसीआयसीआय बँकेच्या माजी प्रमुख चंदा कोचर लाचखोरीत दोषी!

नवी दिल्लीः सन २००९ मध्ये व्हिडीओकॉन उद्योग समूहाला ३०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्याच्या बदल्यात तब्बल ६४ कोटी रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपात आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्याधिकारी चंदा कोचर यांना अपीलीय न्यायाधिकरणाने दोषी ठरवले आहे. आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्याधिकारी चंदा कोचर यांच्या व्हिडीओकॉन समूहाला कर्जाच्या मंजुरीमध्ये दडलेल्या हितसंबंधांना अपीलीय न्यायाधिकरणाने अधोरेखित केले आहे. व्हिडीओकॉन समूहाला कर्ज वितरित केल्यानंतरच्या काही काळातच चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांनी प्रवर्तित केलेली कंपनी न्यू पॉवर रिन्यूएबल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बँक खात्यात व्हिडीओकॉन समूहाकडून ६४ कोटी रुपये जमा झाल्याचे आढळून आले आहे. दीपक कोचर यांच्या न्यू पॉवर रिन्यूएबल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बँक खात्यात जमा झालेली रक्कम सुप्रीम एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडद्वारे पाठवण्यात आली होती. ही ...
बोधगयेतील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांकडे सोपवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, याचिका फेटाळली
दुनिया, देश

बोधगयेतील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांकडे सोपवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, याचिका फेटाळली

नवी दिल्लीः बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे वादग्रस्त व्यवस्थापन बौद्धांकडे सोपवण्याचे निर्देश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (३० जून) स्पष्ट नकार दिला. परंतु याचिकाकर्त्यास पाटणा उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय खुला असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. नागपूरच्या सुलेखा कुंभारे यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांकडे सोपवण्याचे निर्देश देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. न्या. एम.एम. सुंदरेश आणि न्या. के. विनोदचंद्रन यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. संविधानाच्या अनुच्छेद ३२ नुसार थेट सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर विचार केला जाऊ शकत नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यास पाटणा उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. ‘ आम्ही हे कसे काय करू...
भुसावळच्या सानवी सोनवणेने आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पटकावली दोन सुवर्ण व तीन रौप्य पदके
दुनिया, महाराष्ट्र

भुसावळच्या सानवी सोनवणेने आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पटकावली दोन सुवर्ण व तीन रौप्य पदके

नवी दिल्ली:  भुसावळची सानवी आनंद सोनवणे हिने थायलंडमध्ये पार पडलेल्या सातव्या आंतरराष्ट्रीय रोलर रिले स्केटिंग स्पर्धेत दोन सुवर्ण आणि तीन रौप्य पदके जिंकत भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. १८ ते २० जूनदरम्यान रोलर रिले फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने थायलंडमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारतासह सहा देशांचे खेळाडू सहभागी झाले होते. सानवी ही इयत्ता ६ वीची विद्यार्थीनी असून ती भुसावळच्या आंबेडकर नगरात राहते. तिने आपल्या वयोगटातील प्रतिस्पर्धी थायलंडच्या खेळाडूंना मागे टाकत दोन सुवर्ण आणि तीन रौप्य पदके पटकावली आहेत. तिच्या या कामगिरीचा भुसावळसह संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे.  सानवीच्या यशामागे तिचे कठोर परिश्रम तर आहेच पण तिचे प्रशिक्षक पीयूष दाभाडे, दीपक सोनार यांचेही मोलाचे मार्गदर्शन आणि तिची आई ज्योती सोनवणे व वडील डॉ. आनंद सोनवणे यांनी सातत्याने दिलेले प्रोत्साहनही कारणीभूत ठर...
भारताचा सर्वात महागडा साहित्यिक पुरस्कार ‘जेसीबी प्राइज फॉर लिटरेचर’ बंद, पुरस्कारापोटी देण्यात येत होती तब्बल २५ लाख रुपये रोख रक्कम!
दुनिया, देश

भारताचा सर्वात महागडा साहित्यिक पुरस्कार ‘जेसीबी प्राइज फॉर लिटरेचर’ बंद, पुरस्कारापोटी देण्यात येत होती तब्बल २५ लाख रुपये रोख रक्कम!

नवी दिल्लीः  भारताचा सर्वात महागडा साहित्यिक पुरस्कार ‘जेसीबी प्राइज फॉर लिटरेचर’ आता बंद करण्यात आला आहे. दरवर्षी दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारात २५ लाख रुपये रोख रक्कम देण्यात येत होती. या पुरस्कारात २५ लाख रुपये रोख रक्कम तर मिळत होतीच परंतु हा पुरस्कार भारतीय भाषांतील अनुवादित साहित्याला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावर ओळख देणारा एक प्रभावी मंच होता. शेवटचा ‘जेसीबी प्राइज फॉर लिटरेचर’ हा पुरस्कार २०२४ मध्ये लेखक उपमन्यू चट्टोपाध्याय यांना त्यांच्या ‘लॉरेन्झो सर्चेस फॉर द मिनिंग ऑफ लाइफ’ या पुस्तकासाठी देण्यात आला होता. पुरस्कार बंद करण्यात आल्याच्या वृत्ताला जेसीबी पुरस्काराच्या लिटरेरी डायरेक्टर मीता कपूर यांनी २१ जून रोजी दुजोरा दिला. परंतु त्यांनी हा पुरस्कार बंद करण्याच्या निर्णयामागे नेमके काय कारण आहे, हे स्पष्ट करण्यास नकार दिला असल्याचे ‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत...
ऑपरेशन सिंदूरः भारताचे पाकिस्तान, पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवाद्यांच्या ९ अड्ड्यांवर हवाई हल्ले, अवघ्या २३ मिनिटांत मोहीम फत्ते!
दुनिया, देश

ऑपरेशन सिंदूरः भारताचे पाकिस्तान, पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवाद्यांच्या ९ अड्ड्यांवर हवाई हल्ले, अवघ्या २३ मिनिटांत मोहीम फत्ते!

नवी दिल्लीः  जम्मू-काश्मिरातील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला जोदरार प्रत्युत्तर देत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानसह पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले चढवत हे अड्डे उद्धवस्त केले आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेअंतर्गत मध्यरात्रीनंतर झालेल्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली असून तेथील रूग्णालयांत मेडिकल इमर्जन्सी जाहीर करण्यात आली आहे.  भारतीय हवाई दलाने मध्यरात्री १ वाजून २८ मिनिटांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या हद्दीत एन्ट्री केली आणि अवघ्या २३ मिनिटांत म्हणजे रात्री १ वाजून ५१ मिनिटांनी मोहीम फत्ते करून भारताची लढाऊ विमाने भारताच्या भूमीत माघारी परतली. विशेष म्हणजे ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी सैन्यदलावर कोणतीही कारवाई केली नाही. दहशतवाद्यांचा नायनाट करणे हाच आमचा हेतू असल्याचे भारतीय सैन्...