औरंगाबादेत समाज कल्याणच्या वतीने ९, १० फेब्रुवारीला विभागीय कला व क्रीडा महोत्सव


औरंगाबाद समाज कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे व समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच क्रीडानैपुण्य विकसित होण्यासाठी कला व क्रीडा अविष्कार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद विभागीय स्तरावरील स्पर्धा औरंगाबाद येथे ९ व १० फेब्रुवारी रोजी होणार आहेत.

समाज कल्याण विभागांतर्गत मुला-मुलींच्या शासकीय निवासी तसेच सफाई कामगारांच्या मुला- मुलींच्या शासकीय शाळा आहेत. या शाळामधील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विभागांतर्गत नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहे. कला व क्रीडा महोत्सव कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी भूमिका-अभिनय व लोकनृत्य स्पर्धांचे तसेच १०० मीटर धावणे, २०० मीटर धावणे, ४०० मीटर धावणे, रीले-४x१०० मीटर, लांब उडी, थाळीफेक, रस्सीखेच व खो-खो या क्रीडास्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व निवासी शाळा या महोत्सवात सहभागी झाल्या असून त्याचे नियोजन संबधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त यांच्यावतीने करण्यात आले आहे.  

औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड व परभणी जिल्हयातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर स्पर्धा होणार आहे. विभागीय स्तरावर प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण औरंगाबाद यांच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे.

औरंगाबाद विभागीय स्तरावरील स्पर्धा औरंगाबाद येथे ९ व १० फेब्रुवारी रोजी होणार आहेत. प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. समाज कल्याण विभागात प्रथमच कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याने विद्यार्थी व पालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

औरंगाबाद विभागात एकूण ११ निवासी शाळा आहेत. या शाळेतील विभागीय क्रीडा स्पर्धासाठी शासकीय निवासी शाळेतील २४८ विद्यार्थी व १३२ विद्यार्थींनी सहभाग नोंदवणार आहे. कलाविष्कार महोत्सवात ७९ विद्यार्थी व ६४ विद्यार्थींनी सहभाग नोंदवणार आहेत.

समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून विभागात प्रथमच कला व क्रीडा अविष्कार महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यामुळे खाजगी शाळा प्रमाणेच समाज कल्याण विभागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणार असून या उपक्रमाचे विद्यार्थी व पालकांकडून स्वागत होत आहे यामुळे चांगले खेळाडू तयार होणार आहेत, असे औरंगाबाद समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!