देश

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगरातील ऑरिक सिटीत ‘ॲडव्हान्टेज महाएक्स्पो-२०२६’ औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन
दुनिया, देश

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगरातील ऑरिक सिटीत ‘ॲडव्हान्टेज महाएक्स्पो-२०२६’ औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): येथील मसिआ व अन्य औद्योगिक संघटना, संस्थांच्या वतीने छत्रपती संभाजीनगरातील ऑरिक सिटीमध्ये ८ ते ११ जानेवारी २०२६  या कालावधीत ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो-२०२६ या औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन केले जाणार आहे. या प्रदर्शनाची पूर्वतयारी सध्या सुरू असून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज या प्रदर्शनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. महाराष्ट्र शासनाचा सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विभाग, ऑरिक सिटी तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्य सहयोगातून आयोजित करण्यात आलेल्या ॲडव्हान्टेज महाएक्स्पो-२०२६ या औद्योगिक प्रदर्शनात देशातील तसेच विदेशातील अनेक उद्योजक आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन लावणार आहेत. तसेच येथे सामंजस्य करार, चर्चासत्रे आदी होणार आहेत. हे प्रदर्शन ऑरिक सिटीच्या आवारात २७.५ एकर क्षेत्रात भव्य आयोजीत होणार आहे. त्यात १५०० स्टॉल्स लावण्यात येणार ...
देशातील विद्यापीठांमध्ये ‘शहरी नक्षलवादी’, सामाजिकशास्त्राच्या प्राध्यापकांकडूनच विद्यार्थ्यांना देशविरोधी प्रशिक्षण: दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरूंचे आरोप
देश, विशेष

देशातील विद्यापीठांमध्ये ‘शहरी नक्षलवादी’, सामाजिकशास्त्राच्या प्राध्यापकांकडूनच विद्यार्थ्यांना देशविरोधी प्रशिक्षण: दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरूंचे आरोप

नवी दिल्लीः विद्यापीठ कॅम्पसमध्ये ‘शहरी नक्षलवादी’ सक्रीय आहेत. प्राध्यापकांकडूनच विद्यार्थ्यांचे मेंदू दूषित केले जात आहेत. शैक्षणिक जगतात अनियंत्रित शहरी नक्षलवादाचा उदय झाला आहे. सामाजिकशास्त्राच्या प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांना देशविरोधी प्रशिक्षण दिले जात आहे. ‘पिंजरा तोड’सारख्या विद्यार्थ्यांच्या चळवळी ‘कृतघ्नपणा’ने प्रेरित आहेत....हे आरोप केले आहेत दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू योगेश सिंह यांनी. असोसिएशन ऑफ यूर्निव्हर्सिटीजच्या संयुक्त विद्यमाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांनी केलेल्या त्यांच्या भाषणाचा  व्हिडीओ त्यांनीच आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर जारी केला आणि नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या भाषणाचा प्राध्यापक, विद्यार्थी आणि शैक्षणिक जगतातून निषेध केला जात आहे. योगेश सिंह यांनी दिल्लीच्या विज्ञान भवनात २८ सप्टेंबर रोज...
आधार कार्ड अद्यतनीकरणाच्या शुल्कात तब्बल ५० टक्क्यांपर्यंत वाढ, सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भूर्दंड!
देश

आधार कार्ड अद्यतनीकरणाच्या शुल्कात तब्बल ५० टक्क्यांपर्यंत वाढ, सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भूर्दंड!

मुंबईः भारतीय विशिष्ट ओळक प्राधिकरणाने (यूआयडीएआय) आधार कार्ड अद्यतनीकरण सेवांच्या शुल्कात ५० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. १ ऑक्टोबर २०२५ पासून या सेवांचे सुधारित दर लागू झाले असून यूआयडीएआयच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. कोणत्याही शासकीय सेवा अथवा योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड मागितले जाते. एकदा काढलेले हे आधार कार्ड अद्ययावत ठेवणेही तितकेच महत्वाचे आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या प्रमुख दस्तऐवजांपैकी एक महत्वाचा दस्तऐवज ठरलेल्या आधार कार्ड अद्यतनीकरण सेवांच्या शुल्कात यूआयडीएआयने १ ऑक्टोबरपासून ५० टक्क्यांपर्यंत वाढ केली असून त्याचा मोठा भूर्दंड विद्यार्थी, शेतकरी, लाडक्या बहिणींसह सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. यूआयडीएने लागू केलेले नवीन दर ३० सप्टेंबर २०२८ पर्यंत ला...
Video: सरन्यायाधीश भूषण गवईंच्या आई कमलाताई आरएसएसच्या व्यासपीठावर जाणारच, पुत्र राजेंद्र गवई यांचा मोठा खुलासा; सोशल मीडियावरील ‘ते’ पत्र खोटे!
देश, महाराष्ट्र

Video: सरन्यायाधीश भूषण गवईंच्या आई कमलाताई आरएसएसच्या व्यासपीठावर जाणारच, पुत्र राजेंद्र गवई यांचा मोठा खुलासा; सोशल मीडियावरील ‘ते’ पत्र खोटे!

नागपूरः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त अमरावती येथे ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विजयादशमी सोहळ्यासाठी देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलाताई गवई मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. आरएसएसने त्यांनी य कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले आणि त्यांनी ते स्वतःच स्वीकारले, असा मोठा खुलासा त्यांचे आणखी एक पुत्र व रिपब्लिकन पक्षाचे नेते राजेंद्र गवई यांनी केला आहे. त्यामुळे कालपासून कमलाताईंच्या नावाने समाजमाध्यमावर व्हायरल होत असलेले पत्र खोटे असल्याचे स्पष्ट झाले असून गवई परिवाराच्या ‘निष्ठा’ही उजागर झाल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. आरएसएसच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त ५ ऑक्टोबर रोजी अमरावती येथे आयोजित विजयादशी पथसंचलनाच्या कार्यक्रमात देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलाताई गवई यांना मुख्य अतिथी म्हणून न...
आरएसएसच्या विजयादशमी सोहळ्याला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलाताई गवई मुख्य अतिथी!
देश, महाराष्ट्र

आरएसएसच्या विजयादशमी सोहळ्याला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलाताई गवई मुख्य अतिथी!

नागपूरः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) विजयादशमीच्या दिवशी होणाऱ्या शताब्दी सोहळ्याला भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई आणि दिवंगत माजी राज्यपाल रा. सु. गवई यांच्या पत्नी कमलाताई गवई या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. १९२५ मध्ये विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती. यावर्षी आरएसएसच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्यामुळे आरएसएसचा शताब्दी सोहळा साजरा केला जाणार आहे. नागपूरमध्ये २ ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या शताब्दी वर्ष सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी देशभरातील स्वयंसेवक इच्छूक आहेत. परंतु मैदानाची मर्यादा पाहता सर्वांना प्रवेश देणे शक्य नसल्यामुळे यावर्षी नागपूरसह देशभरात आरएसएसच्या शाखा असणाऱ्या विविध भागामध्ये शताब्दी सोहला साजरा केला जाणार आहे. या ठिकाणी पथसंचलन करत शताब्दी सोहळा...
एसआरटी मराठवाडा विद्यापीठाच्या पेट-२०२४ मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी, आरएसी होऊन दोन महिने उलटले तरी संशोधन प्रक्रिया रखडलेलीच!
देश, महाराष्ट्र

एसआरटी मराठवाडा विद्यापीठाच्या पेट-२०२४ मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी, आरएसी होऊन दोन महिने उलटले तरी संशोधन प्रक्रिया रखडलेलीच!

नांदेडः  पीएच. डी.च्या प्रवेशासाठी डिसेंबर २०२४ मध्ये घेतलेल्या पेट-२०२४ परीक्षेच्या निकालानंतरची प्रक्रिया पूर्ण करण्यात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रशासन सपशेल अपयशी ठरले असून संशोधन सल्लागार समिती अर्थात आरएसीच्या बैठका होऊन दोन महिने उलटले तरी पीएच.डी.साठी संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन मार्गदर्शक/सुपरवायझरच देण्यात आले नसल्यामुळे संशोधन प्रक्रियेलाच खीळ बसली आहे. त्यामुळे पेट-२०२४ उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये असंतोष खदखदू लागला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने डिसेंबर २०२४ मध्ये पीएच.डी. च्या प्रवेशासाठी पेट परीक्षा घेतली. परीक्षेपूर्वी पीएच.डी.साठीच्या विद्याशाखानिहाय रिक्त जागांचा तपशीलही जाहीर करण्यात आला होता. त्यात मानव्य विद्याशाखेच्या २१८, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेच्या ३८, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाख...
रिक्त जागांमुळे नव्हे तर मूलभूत ‘गुंतवणुकी’कडे कुलगुरूंचे दुर्लक्ष अन् आयक्यूएसी सेलच्या गलथानपणामुळे एनआयआरएफ रॅकिंगमधून लुप्त झाले विद्यापीठाचे नाव!
देश, महाराष्ट्र, विशेष

रिक्त जागांमुळे नव्हे तर मूलभूत ‘गुंतवणुकी’कडे कुलगुरूंचे दुर्लक्ष अन् आयक्यूएसी सेलच्या गलथानपणामुळे एनआयआरएफ रॅकिंगमधून लुप्त झाले विद्यापीठाचे नाव!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेली प्राध्यापकांची पदे आणि त्यामुळे संशोधनाकडे झालेले दुर्लक्ष यामुळे एनआयआरएफ रँकिंगमध्ये ‘घसरण’ झाल्याचा कांगावा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठाचे प्रशासन करत असले तरी वस्तुस्थिती मात्र तशी नाही. विद्यापीठाने २०२४ च्या एनआयआरएफ रँकिंगमध्ये राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या श्रेणीत ४६ वे स्थान पटकावले तेव्हा नियमित प्राध्यापकांची संख्या जेवढी होती, तेवढीच संख्या थोड्या अधिक फरकाने याहीवेळी होती. त्यामुळे हा कांगावा तथ्यावर आधारित नसून मुलभूत गुंतवणुकीकडे झालेले अक्ष्यम दुर्लक्ष आणि कुलगुरूंसह विद्यापीठाच्या आयक्यूएसी सेलच्या लगथानपणामुळे आहे ते रँकिंग टिकवणे तर सोडाच पण राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या पहिल्या शंभरच्या यादीतूनच विद्यापीठाचे नाव लुप्त झाल्याची धक्कादायक माहिती न्यूजटाऊनच्या हाती आली आहे. केंद्र सरकारच्य...
सीटीईटी असलेल्या शिक्षकांनीही ‘टीईटी’ उत्तीर्ण न केल्यास सेवानिवृत्ती घ्यावी लागणार?, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिक्षण क्षेत्रात संभ्रम
देश, महाराष्ट्र

सीटीईटी असलेल्या शिक्षकांनीही ‘टीईटी’ उत्तीर्ण न केल्यास सेवानिवृत्ती घ्यावी लागणार?, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिक्षण क्षेत्रात संभ्रम

मुंबईः शिक्षक म्हणून सेवेत कायम रहायचे असल्यास शिक्षक पात्रता चाचणी अर्थात टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. जे शिक्षक टीईटी उत्तीर्ण होणार नाहीत, त्यांना सेवानिवृत्ती घ्यावी लागेल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे शिक्षण क्षेत्रात संभ्रमाचे वातावरण असून जे शिक्षक सीटीईटी उत्तीर्ण आहेत, त्यांनाही टीईटी उत्तीर्ण व्हावे लागणार की काय? आणि त्यांनी टीईटी उत्तीण न केल्यास त्यांनाही सेवानिवृत्ती घ्यावी लागणार का?  महाराष्ट्र सरकारने १३ फेब्रुवारी २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटीमधून दिलेल्या सुटीचे काय होणार? असे कळीचे प्रश्न शैक्षणिक वर्तुळात चर्चिले जात आहेत आणि त्यामुळेच हा संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) २०१० मध्ये इयत्ता १ ते ८ वी पर्यंतच्या शिक्षकांच्या नियुक्त्यांसाठी किमान शैक्षणिक अर्हता निश्चित केली होती. त्यानंतर टीईटी...
‘आयएएस’ सेवेत निवडीने नियुक्तीसाठीचे निकष मॅटकडून रद्द, रविवारी होणारी परीक्षाच स्थगित; सामान्य प्रशासन विभाग तोंडघशी!
देश, महाराष्ट्र

‘आयएएस’ सेवेत निवडीने नियुक्तीसाठीचे निकष मॅटकडून रद्द, रविवारी होणारी परीक्षाच स्थगित; सामान्य प्रशासन विभाग तोंडघशी!

मुंबईः भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) बिगर राज्य नागरी सेवेतून निवडीने नियुक्ती करण्यासाठी निर्धारित केलेल्या निकषांत सेवा कालावधीला दिलेले २० गुण महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) रद्द केले आहेत. त्यामुळे काही अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी हे मनमानी निकष तयार करणारा महाराष्ट्र शासनाचा सामान्य प्रशासन विभाग तोंडघशी पडला असून मॅटच्या या निर्णयानंतर येत्या रविवारी (७ सप्टेंबर) होणारी परीक्षाच रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवली आहे. महसूल विभाग वगळता इतर विभागातील सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत निवडीने नियुक्तीसाठी दरवर्षी रिक्त जागांच्या तुलनेत ५ टक्के जागा राखीव असतात. यावर्षी अशा तीन जागा आहेत. या रिक्त तीन जागांवर निवडीने नियुक्तीसाठी सामान्य प्रशासन विभागाने निकषांची तरतूद असलेला शासन निर्णय २४ जुलै रोजी केला होता. सामान्य प्रशासन विभागाच्या अवर स...
मुंबईत ३४ मानवी बॉम्ब घुसले, ४०० किलो आरडीएक्सच्या साह्याने १ कोटी लोकांना उडवून देऊः मुंबई पोलिसांना फोनवरून धमकी; सुरक्षा वाढवली
देश, महाराष्ट्र

मुंबईत ३४ मानवी बॉम्ब घुसले, ४०० किलो आरडीएक्सच्या साह्याने १ कोटी लोकांना उडवून देऊः मुंबई पोलिसांना फोनवरून धमकी; सुरक्षा वाढवली

मुंबईः मुंबईत ३४ मानवी बॉम्ब पेरण्यात आले असून ३४ गाड्यांमध्ये तब्बल ४०० किलो आरडीएक्स ठेवण्यात आले आहे. या ३४ मानवी बॉम्बच्या साह्याने एक कोटी लोकांना उडवून देऊ, अशी सनसनाटी धमकी मुंबई पोलिसांना फोनवरून देण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर ही धमकी मिळाली आहे. अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला ही धमकी मिळाल्यामुळे पोलिस सतर्क झाले असून मुंबईतील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनात सुरक्षेची चोख जबाबदारी बजावणारे मुंबई पोलिस गणेशोत्सवाच्या सुरक्षेत व्यस्त असताना आणि उद्याच्या (६ सप्टेंबर) गणेश विसर्जनाची धामधूम सुरू असतानाच मुंबई पोलिसांना ही धमकी मिळाली आहे. मुंबई हादरवून सोडण्याची धमकी देणाऱ्या या व्यक्तीने लष्कर ए जिहादी संघटनेचा सदस्य असल्याचे सांगितले आहे. ही धमकी मिळाल्यानंतर पोलिस सतर्क झाले असून मुंबईतील सुरक्षा व्यवस्था आ...