देश

भारताचा शिक्षणावरील खर्च भूतान, मालदीवसारख्या सार्क देशांपेक्षाही कमी; संसदीय समितीने काढले वाभाडे!
देश

भारताचा शिक्षणावरील खर्च भूतान, मालदीवसारख्या सार्क देशांपेक्षाही कमी; संसदीय समितीने काढले वाभाडे!

नवी दिल्लीः भारताचा शिक्षणावरील खर्च भूतान आणि मालदीवसारख्या अन्य सार्क देशांपेक्षाही कमी आहे. यावर संसदीय समितीने गंभीर चिंता व्यक्त केली असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० च्या शिफारशीनुसार शिक्षणावर जीडीपीच्या ६ टक्क्यांपर्यंत खर्च वाढवण्याचा आग्रह केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडे धरला आहे. शिक्षण, महिला, बाल, युवा आणि क्रीडाविषयक संसदीय स्थायी समितीने ‘उच्च शिक्षण विभागाच्या २०२५-२६ च्या अनुदान मागण्या’वरील अहवालात ही बाबा अधोरेखित केली आहे. एनईपी २०२० मध्ये केंद्र आणि राज्य सरकारांनी सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या (जीडीपी) ६ टक्के खर्च सार्वजनिक शिक्षणावर खर्च करण्याची शिफारस केली आहे. परंतु २०२१-२२ मध्ये केंद्र, राज्य व केंद्रशासित प्रदेशांचा शिक्षणावरील एकूण खर्च जीडीपीच्या केवळ ४.१२ टक्केच राहिला आहे. काँग्रेसचे राज्यसभा सदस्य दिग्विजय सिंह यांच्या अध्यक्षतेखालील या संसदीय सम...
आणखी एक ‘चारसौ बीसी’: ‘कोहिनूर’च्या सचिव डॉ. आस्मा खान आणि सहसचिव मकसूद खान यांची डॉ. डीवाय पाटील विद्यापीठाची एमफिलची पदवीही बोगस!
देश, महाराष्ट्र, विशेष

आणखी एक ‘चारसौ बीसी’: ‘कोहिनूर’च्या सचिव डॉ. आस्मा खान आणि सहसचिव मकसूद खान यांची डॉ. डीवाय पाटील विद्यापीठाची एमफिलची पदवीही बोगस!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  गेल्या काही महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या कोहिनूर शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची आणखी एक ‘चारसौ बीसी’  न्यूजटाऊनच्या हाती आली आहे. या संस्थेच्या सचिव डॉ. आस्मा खान आणि सहसचिव मकसूद खान यांनी पुण्यातील प्रतिष्ठित डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचीच फसवणूक करून एम.फिल. च्या बोगस पदव्या मिळवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेंगळुरूच्या राजीव गांधी हेल्थ सायन्सेस विद्यापीठाची (आरजीयूएचएस) बीएचएमएसची बनावट गुणपत्रिका व पदवी तयार केल्याप्रकरणी कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मझहर खान आणि सचिव असलेल्या त्यांच्या पत्नी डॉ. आस्मा खान यांच्याविरुद्ध बेंगळुरूच्या टिळकनगर पोलिस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल झालेला असून २५ फेब्रुवारी रोजी बेंगळुरू पोलिसांनी डॉ. मझहर खान यांना अटकही केली होती. तर उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील वीर बहादूरसिंग पूर्वांचल विद्...
आग्र्यात होणार छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक; उभारणीची जबाबदारी पर्यटन विभागाकडे, तज्ज्ञांची समितीही स्थापणार
देश, महाराष्ट्र

आग्र्यात होणार छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक; उभारणीची जबाबदारी पर्यटन विभागाकडे, तज्ज्ञांची समितीही स्थापणार

मुंबई: आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाच्या उभारणीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवजयंती दिनी केली होती. या स्मारकाच्या उभारणीसाठी कार्यान्वयीन व निधीची जबाबदारी राज्याच्या पर्यटन विभागाकडे देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे भव्य स्मारकाच्या उभारणीस येत्या काळात गती लाभणार आहे. स्मारक उभारणीसाठी पर्यटन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली इतिहासतज्ज्ञ तसेच जाणकार, तज्ज्ञांची समिती स्वतंत्रपणे स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी निधीची उपलब्धता, जमीन अधिग्रहण व अनुषंगिक बाबींकरिता पर्यटन विभागाला जबाबदारी देण्यात आली आहे. या विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम पाहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे शंभुराजे यांची आग्र्यातून सुटका आणि महाराजांच्या पराक्रमाच्या गौरवगाथे...
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना २०२४ चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर
देश, महाराष्ट्र

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना २०२४ चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर

मुंबई: गुजरातमधील स्टॅच्यु ऑफ यूनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यासह अनेक महापुरूषांचे पुतळे घडवणारे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना २०२४ चा ‘महाराष्ट्र भूषण’ हा महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. राम सुतार हे ज्येष्ठ शिल्पकार आहेत. त्यांचे वय सध्या १०० वर्ष असून अजूनही ते शिल्प तयार करण्याचे काम करीत आहेत. इंदू मिल येथे निर्माणाधीन असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती तयार करण्याचे कामही राम सुतार करीत आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या पुरस्कार निवडीबाबत १२ मार्च २०२५ रोजी निवड समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राम सुतार यांचे नाव २०२४ च्या पुरस्कारासाठी मान्यता देण्यात आली. या पुरस्कारचे स्वरू...
पेन्शनधारकांसाठी मोठी अपडेटः नवीन पेन्शन योजनेत मिळणार जुन्या पेन्शन योजनेप्रमाणेच सुविधा, केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालयाचे आदेश
जीवनशैली, देश

पेन्शनधारकांसाठी मोठी अपडेटः नवीन पेन्शन योजनेत मिळणार जुन्या पेन्शन योजनेप्रमाणेच सुविधा, केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालयाचे आदेश

नवी दिल्लीः जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. नवीन पेन्शन योजनेत जुन्या पेन्शन योजनेप्रमाणेच सुविधा देण्याचे आदेश केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालयाने (सीपीएओ) दिले आहेत. जुन्या पेन्शन योजनेप्रमाणेच (ओपीएस) राष्ट्रीय पेन्शन योजनेची (एनपीएस) प्रकरणे चालवण्याचे आदेश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. देशभरातील कर्मचारी नवीन पेन्शन योजनेला विरोध करत आहेत आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत आहेत. गेल्या दोन दशकांपासून देशभरातील कर्मचाऱ्यांचा नवीन पेन्शन योजनेच्या विरोधात लढा सुरू असतानाच केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालयाने कर्मचाऱ्यांना आनंदवार्ता दिली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत वेळेवर पेन्शन देण्यासाठी केंद्र सरकारच्या केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालयाने (सीपीएओ) नवीन मार्गदर्शक सूचना जा...
शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराला विरोध, अधिसभेच्या बैठकीत स्थगन प्रस्ताव स्वीकारला!
देश, महाराष्ट्र

शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराला विरोध, अधिसभेच्या बैठकीत स्थगन प्रस्ताव स्वीकारला!

कोल्हापूरः शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या मागणीवरून कोल्हापूरचे वातावरण चांगलेच पेटलेले असताना आज झालेल्या अधिसभेच्या बैठकीत ही या मागणीवरून जोरदार खडाजंगी झाली. नामविस्ताराला विरोध करणाऱ्या सदस्यांनी ‘आमचे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ’ अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. अखेर शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराला विरोध करणारा स्थगन प्रस्ताव चर्चेविनाच स्वीकारण्यात आल्याचे कुलगुरू डॉ. डी.व्ही. शिर्के यांनी जाहीर केले. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा प्रश्न तूर्तास थंड्या बस्त्यात पडली आहे. शिवाजी विद्यापीठाचा छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात यावा, अशी मागणी काही हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांकडून १७ मार्च रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला विरोध म्हणून शाहू सेनेने प्रतिमोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे....
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२५: अजित पवारांकडून घोषणांचा पाऊस, २१०० रुपयांची आस लावून बसलेल्या लाडक्या बहिणींची मात्र निराशाच!
देश, महाराष्ट्र

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२५: अजित पवारांकडून घोषणांचा पाऊस, २१०० रुपयांची आस लावून बसलेल्या लाडक्या बहिणींची मात्र निराशाच!

मुंबई: राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत त्यांचा ११ वा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. राज्यात गुंतवणुकीला पोषक वातावरण आहे. औद्योगिक विकासात राज्य सदैव अग्रेसर असून थेट विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीतही महाराष्ट्र देशात अव्वल आहे, असे अजित पवार म्हणाले. विधापरिषदेमध्ये वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. मात्र बहुप्रतीक्षित लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये कधी मिळणार, याची स्पष्ट घोषणा त्यांनी केली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींची मात्र निराशाच झाली आहे. वस्तू व सेवा कर कायदा लागू होण्यापूर्वी राज्यकर विभागातर्फे राबविण्यात आलेल्या विविध कायद्यांनुसार सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांकडे असलेली थकबाकीची तडजोड करण्याबाबतची अभय योजना उपमुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात जाहीर केली. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘वैदिक ब्रह्मविद्ये’चे खुलेआम उदात्तीकरण, दीक्षांत समारंभात कुलगुरूंनी दिला उपराष्ट्रपतींना ‘उपनिषद’ ग्रंथ भेट!
देश, महाराष्ट्र, विशेष

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘वैदिक ब्रह्मविद्ये’चे खुलेआम उदात्तीकरण, दीक्षांत समारंभात कुलगुरूंनी दिला उपराष्ट्रपतींना ‘उपनिषद’ ग्रंथ भेट!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): सबंध जगापुढे धर्मनिरपेक्षतेचा अनोखा घालून देणाऱ्या भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या विद्यापीठातच वैदिक ब्रह्मविद्येचे खुलेआम उदात्तीकरण केले जात आहे. विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या दीक्षांत समारंभात कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांना ‘उपनिषद’ हा धार्मिक ग्रंथ हेतुतः भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे भगवीकरण होत असल्याचेच दाखवून दिल्याची टिका होऊ लागली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६५ वा दीक्षांत समारंभ शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. या दीक्षांत समारंभासाठी उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांना निमंत्रित करण्यात आले होते. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या दीक्षांत समारंभाच्या मंचावर उपराष्ट्रपतींच्या पत्न...
बनावट बीएचएमएस पदवी प्रकरणात कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष डॉ. मझहर खान गजाआड, मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता
देश, महाराष्ट्र

बनावट बीएचएमएस पदवी प्रकरणात कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष डॉ. मझहर खान गजाआड, मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): बेबंद कारभारामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष डॉ. मोहम्मद मझहर खान याला बीएचएमएसची बनावट गुणपत्रिका आणि बनावट पदवी तयार केल्याच्या प्रकरणात बेंगळुरू पोलिसांनी आज बेड्या ठोकल्या. डॉ. मझहर खानच्या अटकेमुळे विविध अभ्याक्रमाच्या बनावट पदव्यांचे रॅकेटच समोर येण्याची शक्यता आहे.  कोहिनूर शिक्षण संस्थेचे खुलताबाद येथे कोहिनूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय हे अशासकीय अनुदानित महाविद्यालय आहा. डॉ. मझहर खान हा कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष तर त्याची पत्नी अस्मा खान ही शिक्षण संस्थेची सचिव आहे. डॉ. मझहर खान व त्याची पत्नी आस्मा खान या दोघांच्या विरोधात बीएचएमएसची बनावट पदवी व गुणपत्रक तयार केल्याच्या प्रकरणात कर्नाटकातील बेंगळुरूच्या टिळकनगर पोलिस ठाण्यात १४ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपास...
‘टक्कल व्हायरस’चे रहस्य उलगडलेः रेशन दुकानावरील गहू खाल्ल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात केसगळतीची समस्या, संशोधनातील धक्कादायक निष्कर्ष
देश, महाराष्ट्र

‘टक्कल व्हायरस’चे रहस्य उलगडलेः रेशन दुकानावरील गहू खाल्ल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात केसगळतीची समस्या, संशोधनातील धक्कादायक निष्कर्ष

बुलढाणाः बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील काही गावांमधील नागरिकांची केसगळती होऊन काही दिवसांतच टक्कल पडल्याच्या समस्येचे रहस्य अखेर उलगडले असून रेशन दुकानावरील ‘विषारी तत्व’ असलेला गहू रोजच्या आहारात वापरल्यामुळेच केसगळतीची समस्या निर्माण झाल्याचा धक्कादायक निष्कर्ष संशोधनातून काढण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील काही गावांमधील नागरिकांच्या डोक्यावरील केस अचानक गळून त्यांना टक्कल पडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली होती. या समस्येच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी दिल्ली आणि चेन्नई येथून तज्ज्ञांची पथके बुलढाणा जिल्ह्यात येऊन गेली होती. या पथकांनी नमुने गोळा केले होते. पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनीही अनेक महिने बुलढाणा जिल्ह्यातील या टक्कल व्हायरसवर संशोधन केले असून विषारी तत्व असलेला गहू खाल्ल्यामुळे केसगळतीची समस्या निर्माण झाल्याचा निष्...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!