![](https://newstown.in/wp-content/uploads/2022/12/nagpur-samant-1024x582.jpg)
नागपूर: रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक करण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सदस्यांनी बेकायदेशीर आर्थिक व्यवहार व अनधिकृत व्यवसायिक गाळ्यांचे बांधकाम करून शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक केली आहे, अशा आशयाची लक्षवेधी आमदार महेश बालदी, बच्चू कडू आदींनी उपस्थित केली होती.
या लक्षवेधीला उत्तर देताना सामंत म्हणाले की पणन संचालकांमार्फत या प्रकरणाची तीस दिवसात चौकशी केली जाईल. तसेच ही चौकशी पूर्ण होईपर्यंत इथे बांधलेल्या गाळ्यांचे कोणालाही वाटप करणार नाही.
संबंधित बातम्या
मंत्री अब्दुल सत्तारांचा होणार ‘करेक्ट कार्यक्रम’?, महिलांबद्दलच्या आक्षेपार्ह विधानांवर उचित कारवाई...
अवयवदान क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. वत्सला त्रिवेदी, डॉ. प्रवीण शिंगारे आणि डॉ. अरूणकुमार भगत यांना...
अमृता फडणवीसांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे भाजपचा ‘बाहुबली’ नेता जिल्ह्यातून हद्दपार!
राज्यपाल कोश्यारींकडून शिवाजी महाराजांचा पुन्हा एकेरी उल्लेख, व्हीडीओ शेअर करत मिटकरींचा शिंदे-फडणवी...