Uncategorized

राज्यात चार नवीन कृषी संचालयनालयांची निर्मिती, कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधानुसार २३ हजार ४७६ नियमित पदांना मंजुरी
Uncategorized

राज्यात चार नवीन कृषी संचालयनालयांची निर्मिती, कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधानुसार २३ हजार ४७६ नियमित पदांना मंजुरी

मुंबईः बदलत्या काळातील शेतीच्या गरजा लक्षात घेऊन कृषी विभाग अधिक सक्षम, तंत्रज्ञानाधारित आणि शेतकरीकेंद्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तब्बल १७ वर्षांनंतर कृषी विभागाच्या सुधारित आकृतीबंधाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. नव्या आकृतीबंधानुसार कृषी विभागातील २३ हजार ४७६ नियमित पदांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी २ हजार ६६ पदे नव्याने निर्माण करण्यात आली आहेत.  काळानुसार कृषी विभागाच्या गरजा आणि मागणी लक्षात घेऊन चार नव्या कृषी संचालयनालयांच्या निर्मितीसही मंजुरी देण्यात आली आहे. नव्या आकृतीबंधानुसार कृषी विभागातील २३ हजार ४७६ नियमित पदांना मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी २ हजार ६६८ पदे नव्याने निर्माण करण्यात आली आहेत. कालबाह्य झालेली काही पदे रद्द करून आणि काही पदांमध्ये कपात करून हा आकृतीबंध तयार करण्यात आला असून त्यामुळे दरवर्षी सुमारे ९२.६० कोटी रुपयांची बचत होणार आह...
आगाऊपणा भोवलाः वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन, डॉ. पांढरीपांडेंची स्वतंत्र समिती ठरवणार स्वायत्त महाविद्यालयांसाठी नियमावली
Uncategorized

आगाऊपणा भोवलाः वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन, डॉ. पांढरीपांडेंची स्वतंत्र समिती ठरवणार स्वायत्त महाविद्यालयांसाठी नियमावली

छत्रपती संभाजीनगर: नुकतीच स्वायत्तता मिळालेल्या आणि स्वायत्तेच्या नावाखाली मनमानी कारभार चालवल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या चौकशीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने माजी प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली त्रिदस्यीय समिती स्थापन केली आहे.दरम्यान, वसंतराव नाईक महाविद्यालय व्यवस्थापनाच्या आगाऊपणामुळे स्वायत्तता घेतलेली सर्वच महाविद्यालयेही विद्यापीठाच्या रडारवर आली असून विद्यापीठाने स्वायत्त महाविद्यालयांची कार्यपद्धती व नियमावली ठरविण्यासाठी माजी कुलगुरू डॉ.विजय पांढरीपांडे यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापना केली आहे. सध्या स्वायत्तता घेतलेल्या पाच महाविद्यालयांना भेट देऊन सदर समिती आपला अहवाल सादर करणार आहे, अशी माहिती प्रकुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते यांनी दिली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या व...
मसाप निवडणूकः प्रतिभा अहिरे म्हणतात, ‘परिवर्तन मंचमध्ये प्रतिगामी विचारधारेचा लवलेशही नाही, झेंडा-दांड्याची भाषा ध्रुवीकरणासाठीच!’
Uncategorized

मसाप निवडणूकः प्रतिभा अहिरे म्हणतात, ‘परिवर्तन मंचमध्ये प्रतिगामी विचारधारेचा लवलेशही नाही, झेंडा-दांड्याची भाषा ध्रुवीकरणासाठीच!’

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  मराठवाडा साहित्य परिषदेच्या (मसाप) कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीत काही आंबेडकरवादी साहित्यिक-कवींनी आपला ‘विद्रोह’ आरएसएसच्या दावणीला बांधून आरएसएस-भाजपप्रणित परिवर्तन मंचची पताका खांद्यावर घेतली असल्याचे वृत्त शनिवारी न्यूजटाऊनने प्रकाशित केल्यानंतर महाराष्ट्राच्या साहित्य वर्तुळात खळबळ उडाली. त्यावरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या असतानाच आरएसएसचे कट्टर स्वयंसेवक असलेल्या डॉ. सर्जेराव जिगे नेतृत्व करत असलेल्या परिवर्तन मंच पॅनलच्या उमेदवार व प्रसिद्ध विद्रोही कवयित्री प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे यांनी आपली भूमिका न्यूजटाऊनकडे मांडली आहे. परिवर्तन मंच पॅनलने प्रतिगामी विचारधारेचा झेंडा हाती घेतलेला नाही. त्यांच्या जाहिरनाम्यात त्याचा लवलेशही नाही. झेंडा-दांड्याची भाषा निवडणुकीचे ध्रुवीकरण करण्यासाठीच केली जात असल्याचा असा दावा प्रा. डॉ. अहिरे यांनी केला आ...
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात छातीत गोळ्या घालून तरूणाची हत्या
Uncategorized

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात छातीत गोळ्या घालून तरूणाची हत्या

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  उद्योग नगरी वाळूज परिसरातील तिसगाव-वडगाव कोल्हाटी मार्गावर एका तरूणाची छातीत गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे वाळूज परिसर हादरून गेला आहे. वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या तिसगाव-वडगाव कोल्हाटी मार्गावरील साईबाबा चौकात ही हत्या करण्यात आली. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास लगतच्या परिसरातील महिला कचरा टाकण्यासाठी आलेल्या असता  रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तरूण दिसला. घाबरलेल्या महिलांनी घरी येऊन हा प्रकार आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर ही बाब सरपंच सुनील काळे यांना सांगण्यात आल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. छातीत गोळ्या घालून हत्या करण्यात आलेल्या तरूणाचे नाव कपिल पिंपळे असून तो रांजणगाव येथील रहिवाशी असल्याची माहिती समोर आल...
कुलगुरूपदासाठी आज मुलाखती, शोध समिती ‘४२०’ सतीश पाटील आणि ‘दागी’ भारती गवळींची मुलाखत घेणार का? याकडेच लक्ष!
Uncategorized, महाराष्ट्र

कुलगुरूपदासाठी आज मुलाखती, शोध समिती ‘४२०’ सतीश पाटील आणि ‘दागी’ भारती गवळींची मुलाखत घेणार का? याकडेच लक्ष!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून कुलगुरूपदासाठी राज्यपालांनी स्थापन केलेल्या शोध समितीने २४ उमेदवारांना आज मुंबईत मुलाखतींसाठी पाचारण केले आहे. शोध समितीने या मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केलेल्या २४ जणांमध्ये अवैध गुणवाढ प्रकरणात ४२० चा गुन्हा दाखल असलेले आणि परीक्षेच्या कामातून कायमस्वरुपी बंदी घातलेले डॉ. सतीश पाटील आणि परीक्षेच्याच कामात अनियमिततेचा ठपका तसेच १२७ कोटींच्या घोटाळ्यातील संशयित आरोपी डॉ. भारती गवळी यांचाही समावेश आहे. न्यूजटाऊनने या दोघांच्या बाबतीत भंडाफोड केल्यानंतर वाद निर्माण झाला असून आता कुलगुरू शोध समिती या दोघांच्या मुलाखती घेणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी संपणार आहे. ड...
विद्यापीठातील २६ ‘बोगस’ प्राध्यापकांना दिले नियमबाह्य ‘कॅस’चे लाभ, संचालकांच्या पत्राला संचालक प्रतिनिधीकडूनच केराची टोपली!
Uncategorized, महाराष्ट्र, विशेष

विद्यापीठातील २६ ‘बोगस’ प्राध्यापकांना दिले नियमबाह्य ‘कॅस’चे लाभ, संचालकांच्या पत्राला संचालक प्रतिनिधीकडूनच केराची टोपली!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने कंत्राटी आणि हंगामी स्वरुपात तात्पुरत्या स्वरुपात नियुक्त केलेल्या आणि त्यानंतर उच्च शिक्षण संचालनालयाने नियमबाह्य पद्धतीने वेतन देयकात नावे समाविष्ट केलेल्या २६  तदर्थ प्राध्यापकांना आता चक्क ‘कॅस’चेही लाभ देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी या प्राध्यापकांना ‘कॅस’चे लाभ देता येणार नाहीत, असे लेखी आदेश छत्रपती संभाजीनगरचे विभागीय सहसंचालक डॉ. सुरेंद्र ठाकूर यांना देऊनही ही प्रक्रिया करण्यात आली आहे. ‘थोर’ विचारवंत डॉ. नागनाथ कोतापल्ले हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठाचे कुलगुरू असताना ३० प्राध्यापकांची मनमानी पद्धतीने नियुक्ती केली होती. त्यापैकी ११ सहायक प्राध्यापकांच्या नियुक्त्या विद्यापीठ निधीतून ५ वर्षे कालावधीसाठी १४ सहायक...
‘डॉन’ के हुक्म के बिना ‘बीट’ मिलना मुश्कील ही नहीं, नामुमकीन है…तो एफआयआर होना भी…?
Uncategorized

‘डॉन’ के हुक्म के बिना ‘बीट’ मिलना मुश्कील ही नहीं, नामुमकीन है…तो एफआयआर होना भी…?

हिमायतनगरः ‘डॉन का इंतजार तो ग्यारह मुल्कों की पुलिस कर रही है..लेकिन डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है….’  हा मूळ डायलॉग आहे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या १९७८ मध्ये रिलिज झालेल्या ‘डॉन’ सिनेमातील. त्यानंतर २००६ मध्ये याच ‘डॉन’ सिनेमाचा रिमेक आला आणि अभिनेता शाहरूख खानने उच्चारलेला हाच डायलॉग प्रचंड लोकप्रिय झाला. काडतुसे नसलेल्या रिकाम्या पिस्तुलाचा धाक दाखवून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन सहिसलामत निसटणारा ‘डॉन’ आपण या सिनेमात पाहिला. परंतु अख्खे पोलिस ठाणेच एखाद्या डॉनच्या इशाऱ्यावर चालते.... कोणत्या पोलीस कर्मचाऱ्याला कोणते बीट द्यायचे? कोणाचे अवैध अंधे सुरू ठेवायचे आणि कोणाचे अवैध धंदे बंद करायचे? कुणाकडून किती हप्ते वसूल करायचे? याबाबतचा ‘हुकुम’ एखादा डॉन पोलीस ठाणे प्रमुखाला सोडतो आणि पोलीस ठाणे प्रमुख कळसुत्री बाहुला बनून त्या हुकुमाची अंमलबजावणी करतो, असे तुम्हाला कु...
न्याय व्यवस्थेलाही अंकीत करण्याचे प्रयत्नः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा गंभीर आरोप
Uncategorized

न्याय व्यवस्थेलाही अंकीत करण्याचे प्रयत्नः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा गंभीर आरोप

मुंबईः  केंद्रीय तपास यंत्रणा सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत. ज्याच्या अंगावर जा म्हटले की त्याचा अंगावर जात आहे. केंद्रीय यंत्रणांची ही स्थिती असताना न्यायव्यवस्थेलाही अंकित करण्याचे प्रयत्न सुरू आहे. केंद्रीय कायदा मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यांतून याचेच संकेत मिळत आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. देशातील लोकांनी या विरोधात आवाज उठवला पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांना ईडीने केलेली अटक बेकायदेशीर ठरवत पीएमएलए न्यायालयाने बुधवारी त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर राऊत यांनी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी हा गंभीर आरोप केला. संजय राऊत यांना पुन्हा एकदा खोट्या गुन्ह्यात गोवून अटक...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!