विशेष

ऐनदिवाळीत ‘दिवाळे’: कोहिनूर महाविद्यालयाला पुन्हा सील, तब्बल ३ कोटींचे कर्ज बुडवल्याने चोलामंडलम् फायनान्सने कोर्टाच्या आदेशाने घेतला मालमत्तेचा ताबा!
महाराष्ट्र, विशेष

ऐनदिवाळीत ‘दिवाळे’: कोहिनूर महाविद्यालयाला पुन्हा सील, तब्बल ३ कोटींचे कर्ज बुडवल्याने चोलामंडलम् फायनान्सने कोर्टाच्या आदेशाने घेतला मालमत्तेचा ताबा!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  संस्थाचालकांची बेबंदशाही आणि मनमानी कारभारामुळे गेल्या काही महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयाला आज पुन्हा एकदा सील ठोकण्यात आले. कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मझहर खान आणि सचिव आस्मा खान यांनी कोहिनूर महाविद्यालयाची इमारत आणि जागा गहाण ठेवून चोलामंडलम् इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या तब्बल २ कोटी ८२ लाख ८६ हजार २५४ रुपये कर्जाची परतफेडच न केल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार कोर्ट कमिशनरच्या उपस्थितीत चोलामंडलमने आज महाविद्यालयाच्या इमारतीला सील ठोकून ही मालमत्ता ताब्यात घेतली. त्यामुळे ऐनदिवाळीतच संस्थेचे दिवाळे निघाल्यामुळे येथे कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी हवालदिल झाले आहेत.  कोहिनूर शिक्षण संस्था, संस्थेचे अध्यक्ष मझहर खान आणि सचिव आस्मा खान यांनी २१ ऑक्टोबर २०२२ रोजी चोलाम...
अनुज्ञेय नसतानाही दीर्घ सुटी विभागाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा रोखीकरणाचा धडाका, शासन आदेश धाब्यावर!
महाराष्ट्र, विशेष

अनुज्ञेय नसतानाही दीर्घ सुटी विभागाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा रोखीकरणाचा धडाका, शासन आदेश धाब्यावर!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  उच्च व तंत्रशिक्षण विभागासह राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या दीर्घ सुटी विभागातील कर्मचाऱ्यांना अर्जित रजांचे रोखीकरण अनुज्ञेय नसतानाही अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर शासन आदेश धाब्यावर बसवून अर्जित रजांचे रोखीकरण अनुज्ञेय करून उच्च व तंत्र शिक्षण विभागासह विविध विभागांचे प्रमुख संगनमताने मोठा आर्थिक अपहार करून शासकीय निधीवर डल्ला मारत असल्याचे पुरावेच न्यूजटाऊनच्या हाती आले आहेत. महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील तरतुदींनुसार शालेय शिक्षण विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग, ग्रामविकास विभाग आणि जलसंपदा विभागातील दीर्घ सुटी विभागात सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांची स्वंयस्पष्ट व्याख्या करण्यात आली आहे. ‘दीर्घ सुटी विभाग म्हणजे ज्या विभागाला किंवा विभागाच्या भागाला नियमित दीर्घ...
उच्च शिक्षण विभागाकडून नेट/सेटधारकांची चेष्टाः प्राध्यापक भरतीत यूजीसीनेच मोडित काढलेल्या एमफिलला ५ तर ‘नेट’ला मात्र केवळ ४ गुण; जीआरवरून संशयकल्लोळ!
महाराष्ट्र, विशेष

उच्च शिक्षण विभागाकडून नेट/सेटधारकांची चेष्टाः प्राध्यापक भरतीत यूजीसीनेच मोडित काढलेल्या एमफिलला ५ तर ‘नेट’ला मात्र केवळ ४ गुण; जीआरवरून संशयकल्लोळ!

मुंबईः राज्यातील सार्वजनिक अकृषिक विद्यापीठांतील अध्यापकांच्या भरती प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विहित केलेल्या सुधारित कार्यपद्धतीत विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ६ जानेवारी २०२५ रोजी जारी केलेल्या नियमावलीकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करण्यात आले असून सहायक प्राध्यापकपदाच्या भरती प्रक्रियेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यूजीसीनेच मोडित काढलेल्या एम.फिल. पदवीला ५ गुण तर राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या नेट पात्रतेला ४ आणि सेट पात्रतेला केवळ ३ गुण निश्चित करण्यात आले आहेत. हा भेदभाव करून उच्च व तंत्रशिक्षण विभागाने आमची चेष्टा केली अशी भावना राज्यातील हजारो नेट/सेट पात्रताधारकांकडून व्यक्त केली जात आहे. यूजीसीने १८ जुलै २०१८ रोजी अधिसूचना जारी करून ‘विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये अध्यापक आणि इतर शैक्षणिक कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी किमान पात्...
देशातील विद्यापीठांमध्ये ‘शहरी नक्षलवादी’, सामाजिकशास्त्राच्या प्राध्यापकांकडूनच विद्यार्थ्यांना देशविरोधी प्रशिक्षण: दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरूंचे आरोप
देश, विशेष

देशातील विद्यापीठांमध्ये ‘शहरी नक्षलवादी’, सामाजिकशास्त्राच्या प्राध्यापकांकडूनच विद्यार्थ्यांना देशविरोधी प्रशिक्षण: दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरूंचे आरोप

नवी दिल्लीः विद्यापीठ कॅम्पसमध्ये ‘शहरी नक्षलवादी’ सक्रीय आहेत. प्राध्यापकांकडूनच विद्यार्थ्यांचे मेंदू दूषित केले जात आहेत. शैक्षणिक जगतात अनियंत्रित शहरी नक्षलवादाचा उदय झाला आहे. सामाजिकशास्त्राच्या प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांना देशविरोधी प्रशिक्षण दिले जात आहे. ‘पिंजरा तोड’सारख्या विद्यार्थ्यांच्या चळवळी ‘कृतघ्नपणा’ने प्रेरित आहेत....हे आरोप केले आहेत दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू योगेश सिंह यांनी. असोसिएशन ऑफ यूर्निव्हर्सिटीजच्या संयुक्त विद्यमाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांनी केलेल्या त्यांच्या भाषणाचा  व्हिडीओ त्यांनीच आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर जारी केला आणि नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या भाषणाचा प्राध्यापक, विद्यार्थी आणि शैक्षणिक जगतातून निषेध केला जात आहे. योगेश सिंह यांनी दिल्लीच्या विज्ञान भवनात २८ सप्टेंबर रोज...
१ ऑक्टोबर २०२५ च्या विद्यार्थी संख्येवर राज्यातील अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर पदांचा कार्यभार निश्चितीचे आदेश, अनेकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर?
महाराष्ट्र, विशेष

१ ऑक्टोबर २०२५ च्या विद्यार्थी संख्येवर राज्यातील अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर पदांचा कार्यभार निश्चितीचे आदेश, अनेकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर?

पुणेः राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील १ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या विद्यार्थी संख्येवर आधारित शिक्षक व शिक्षकेतर पदांचा आढावा घेण्याचे आदेश उच्च शिक्षण संचालनालयाने राज्यातील सर्व विभागीय सहसंचालकांना दिले आहेत.  विशेष म्हणजे महाविद्यालयांनी केलेल्या दाव्यानुसार नव्हे तर विद्यापीठांनी प्रमाणित केलेली विद्यार्थी संख्याच या आढाव्यासाठी ग्राह्य धरली जाणार आहे. या निर्णयामुळे अनेक अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरून त्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येण्याची शक्यता आहे. राज्यात विविध अभ्यासक्रमांची एकूण ३ हजार ५५६ हून अधिक महाविद्यालये असून त्यापैकी १ हजार १७७ हून अधिक अनुदानित अशासकीय महाविद्यालये आहेत. आता या अनुदानित महाविद्यालयांतील १ ऑक्टोबर २०२५ अखेरची विद्यार्थी संख्या विचारात घेऊन अनुज्ञेय पदे, कार्यरत पदे व रिक्त पदांची माहिती संकलित करण्...
‘तुम्ही एकटेच शहाणे आणि बाकीचे सगळे गाढव आहेत का?’ अधिसभा बैठकीत कुलगुरू फुलारींनी मुक्ताफळे उधळताच गदारोळ, अखेर शब्द मागे घेत हाराकिरी!
महाराष्ट्र, विशेष

‘तुम्ही एकटेच शहाणे आणि बाकीचे सगळे गाढव आहेत का?’ अधिसभा बैठकीत कुलगुरू फुलारींनी मुक्ताफळे उधळताच गदारोळ, अखेर शब्द मागे घेत हाराकिरी!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): ‘तुम्हीच एकटे शहाणे आणि बाकीचे सगळे गाढव आहेत का?’ अशी मुक्ताफळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी आज (३० सप्टेंबर) झालेल्या अधिसभा बैठकीत उधळली. त्यामुळे अधिसभा सदस्यांनी संतप्त भावना व्यक्त करत ‘आमचा कुलगुरू गाढव कसा असू शकतो?’ असा प्रतिप्रश्न केला. त्यामुळे स्वतःच्याच तोंडाने स्वतःचीच गोची करून घेत अडचणीत सापडलेल्या कुलगुरूंना आपले शब्द मागे घेत हाराकिरी पत्करावी लागली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची आजची अधिसभेची बैठक गाजली ती महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदींना फाटा देत ‘स्वतःचेच नियम’ लादून अधिसभा सदस्यांना बैठकीत ठराव मांडण्यापासून रोखण्याचा विद्यापीठ प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांवरून! अधिसभा सदस्य डॉ. उमाकांत राठोड यांनी बैठकीच्या १९ दिवस आधी म्हणजे ११ सप्टेंबर रोजी ‘सध्याचे विद्या...
पारदर्शकतेलाच तिलांजलीः उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नियम डावलून ज्ञानस्त्रोत केंद्र संचालकपदाची तब्बल १६ महिन्यांनी भरती प्रक्रिया, ‘मर्जीतील भिडू’साठीच खटाटोप?
महाराष्ट्र, विशेष

पारदर्शकतेलाच तिलांजलीः उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नियम डावलून ज्ञानस्त्रोत केंद्र संचालकपदाची तब्बल १६ महिन्यांनी भरती प्रक्रिया, ‘मर्जीतील भिडू’साठीच खटाटोप?

जळगावः कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नियम डावलून ज्ञानस्त्रोत केंद्र संचालकपदाची भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून भरती प्रक्रियेतील पारदर्शकता व निष्पक्षता राखण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ठराविक व वाजवी कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असतानाही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तब्बल १६ महिन्यांनंतर ही प्रक्रिया राबवण्यात येत असल्यामुळे या पदावर मर्जीतील बगलबच्चाची वर्णी लावण्यासाठीच हा सगळा नियमबाह्य खटाटोप केला तर जात नाही ना? अशी शंका घेण्यात येऊ लागली आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने ज्ञानस्त्रोत केंद्र संचालकाच्या पदभरतीसाठी ७ मार्च २०२४ रोजी वृत्तपत्र व विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले होते. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याच्या कलम ८१(३)(अ) (xii) मधील तरतुदी आणि विद...
समाज कल्याण उपायुक्त जयश्री सोनकवडे अखेर निलंबित, अनियमितता आणि महिला कर्मचाऱ्यांना घरगड्यासारखे राबवून घेणे भोवले!
महाराष्ट्र, विशेष

समाज कल्याण उपायुक्त जयश्री सोनकवडे अखेर निलंबित, अनियमितता आणि महिला कर्मचाऱ्यांना घरगड्यासारखे राबवून घेणे भोवले!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): निविदा प्रक्रियेचे उल्लंघन करून मर्जीतील ठेकेदारांना वसतिगृहाचा भोजन ठेका देऊन केलेली अनियमितता, उच्च पदस्थ अधिकाऱ्यांवर केलेले जातीयवादाचे गंभीर आरोप आणि वसतिगृहात नियुक्त करण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्यांना घरी बोलावून घरगड्यासारखे राबवून घेत त्यांचे केलेले शोषण यासह अनेक कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या तत्कालीन प्रादेशिक उपायुक्त आणि जिल्हा जातपडताळणी समितीच्या विद्यमान उपायुक्त जयश्री रावण सोनकवडे यांना आज (२३ सप्टेंबर) अखेर निलंबित करण्यात आले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहसचिव सो.ना. बागल यांच्या स्वाक्षरीने हे निलंबन आदेश जारी करण्यात आले. समाज कल्याणच्या छत्रपती संभाजीनगर विभागाच्या प्रादेशिक उपायुक्तपदी असताना जयश्री रावण सोनकवडे यांनी शासनाचे प्रचलित नियम, महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमांचा भंग करून अ...
‘कोहिनूर’च्या अध्यक्ष आणि सचिवांना महाविद्यालय परिसरात बंदी, आता पोलिस बंदोबस्तात चालणार कामकाज; संस्थाचालकांच्या बेबंदशाहीला हाय कोर्टाचा लगाम!
महाराष्ट्र, विशेष

‘कोहिनूर’च्या अध्यक्ष आणि सचिवांना महाविद्यालय परिसरात बंदी, आता पोलिस बंदोबस्तात चालणार कामकाज; संस्थाचालकांच्या बेबंदशाहीला हाय कोर्टाचा लगाम!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त शिक्षण संस्था असल्याचा नावाखाली कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मझहर खान आणि सचिव आस्मा खान यांनी खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयात चालवलेल्या बेबंदशाही आणि दडपशाहीला आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने लगाम घातला. या दोघांनाही महाविद्यालयात परिसरात प्रवेश करण्यास प्रतिबंध घालण्यात आला असून पोलिस बंदोबस्तात महाविद्यालयाचे कामकाज सुरू ठेवण्याचे निर्देशही दिले आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर टाकण्यात आली आहे. बनावट पदव्यांचा घोटाळा, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची अडवणूक आणि पिळवणूक अशा अनेक कारणांमुळे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालय चालवणाऱ्या कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव आस्मा खान यांनी आधी प्रभारी प्राचार्या डॉ. ...
विद्यापीठात नेमके काय चाललेय?, मूळ नियुक्तीतच खोट असलेल्या ‘कर्तृत्ववान’ प्राध्यापकांच्या खांद्यावर आता अध्यासन केंद्राच्या संचालकपदाचीही धुरा!
महाराष्ट्र, विशेष

विद्यापीठात नेमके काय चाललेय?, मूळ नियुक्तीतच खोट असलेल्या ‘कर्तृत्ववान’ प्राध्यापकांच्या खांद्यावर आता अध्यासन केंद्राच्या संचालकपदाचीही धुरा!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अध्यासन केंद्र प्रमुखांचे नुकतेच खांदेपालट करण्यात आले असून ज्यांच्या विद्यापीठातील मूळ नियुक्तीतच खोट आहे, अशा ‘कर्तृत्ववान’ प्राध्यापकांच्या खांद्यावरच काही अध्यासन केंद्राच्या संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.  विद्यापीठ प्रशासनाचा हा निर्णय अनेक व्यवस्थापन परिषद सदस्यांनाही रूचला नाही. विद्यापीठ प्रशासनाच्या या कृतीचा निषेध नोंदवण्यासाटी शुक्रवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या तातडीच्या बैठकीत सहा सदस्य गैरहजर राहिले. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या आदेशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील १२ अध्यासन केंद्रांच्या संचालकांचे खांदेपालट करण्यात आले. विद्यापीठाच्या विविध विभागात ‘ऍक्टिव्ह’ असलेल्या प्राध्यापकांना संधी देण्याच्या नावाखाली हा निर्णय घेताना संबंधित प्राध्यापकाचे ‘मूळ’ आणि ‘कु...