महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका नेमक्या कधी होणार? निवडणूक आयोगाने दिली महत्वाची माहिती, दिवाळीनंतरच लागणार मुहूर्त
नाशिकः गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्रातील बहुप्रतीक्षित स्तानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका नेमक्या कधी होणार? याची उत्सुकता सगळ्याच लागलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया चार महिन्यात सुरू करा, असे निर्देश दिलेले आहेत. आता राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर डिसेंबर ते जानेवारीदरम्यान होतील, असे वाघमारे म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येकच पक्षाला स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली सुरू आहेत. प्रत्येक पक्षाकडून स्थानिक पातळीवर आपली ताकद वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यात पक्ष...










