राजकारण

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका नेमक्या कधी होणार? निवडणूक आयोगाने दिली महत्वाची माहिती, दिवाळीनंतरच लागणार मुहूर्त
महाराष्ट्र, राजकारण

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका नेमक्या कधी होणार? निवडणूक आयोगाने दिली महत्वाची माहिती, दिवाळीनंतरच लागणार मुहूर्त

नाशिकः गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्रातील बहुप्रतीक्षित स्तानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका नेमक्या कधी होणार? याची उत्सुकता सगळ्याच लागलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया चार महिन्यात सुरू करा, असे निर्देश दिलेले आहेत. आता राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर डिसेंबर ते जानेवारीदरम्यान होतील, असे वाघमारे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येकच पक्षाला स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली सुरू आहेत. प्रत्येक पक्षाकडून स्थानिक पातळीवर आपली ताकद वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यात पक्ष...
Video: ‘याद राख, नाहीतर तुझ्या कानाखाली मारेन, तुला आत्ताच्या आत्ता बडतर्फ करून टाकेन’; राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांची भरसभेत ग्रामसेवकाला धमकी
महाराष्ट्र, राजकारण

Video: ‘याद राख, नाहीतर तुझ्या कानाखाली मारेन, तुला आत्ताच्या आत्ता बडतर्फ करून टाकेन’; राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांची भरसभेत ग्रामसेवकाला धमकी

परभणीः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमधील एकापाठोपाठ एक मंत्री वादग्रस्त वक्तव्ये करून सरकारची ‘शोभा’ वाढवत चालले असतानाच आता त्यात जिंतूरच्या भाजप आमदार आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची पडली आहे. परभणी जिल्ह्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मेघना बोर्डीकर यांनी एका ग्रामसेवकाला थेट कानखाली मारण्याची आणि आत्ताच्या आत्ता बडतर्फ करून टाकण्याची धमकी दिली आहे. सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचे टार्गेट पूर्ण न केल्यामुळे बोर्डीकरांनी ग्रामसेवकाला ही धमकी दिल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बोरी सर्कलमधील १७ ग्रामपंचायतींतील प्रधानमंत्री आवास योजनेच्या टप्पा दोन अंतर्गत ...
विधिमंडळात रम्मी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंचा अखेर निर्वाणीचा ‘खेळ’; कृषी मंत्रिपदावरून हटवले, आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे जबाबदारी!
महाराष्ट्र, राजकारण

विधिमंडळात रम्मी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंचा अखेर निर्वाणीचा ‘खेळ’; कृषी मंत्रिपदावरून हटवले, आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे जबाबदारी!

मुंबईः विधिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात भरसभागृहात बसून मोबाइलवर रम्मी खेळतानाची चित्रफित व्हायरल झाल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा आज अखेर खराखुरा ‘खेळ’ झाला. कोकाटेंना कृषी मंत्रिपदावरून हटवण्यात आले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकूनही कोकाटेंचे मंत्रिपद मात्र कसेबसे वाचले आहे. भरणे यांच्याकडील क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचा कार्यभार कोकाटेंना देण्यात आला आहे. गुरूवारी रात्री उशिरा कोकाटेंच्या ‘पदावनती’वर शिक्कामोर्तब झाले. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात बसून मोबाईलवर रम्मी खेळतानाची चित्रफित व्हायरल झाली. या चित्रफितीवरून विरोधकांनी महायुती सरकारला लक्ष्य करत कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली. म...
जालन्याचे काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल अखेर भाजपच्या गळाला, ‘पन्नास खोके, एकदम ओके’ घोषणेच्या जनकाच्याच हातात कमळ!
महाराष्ट्र, राजकारण

जालन्याचे काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल अखेर भाजपच्या गळाला, ‘पन्नास खोके, एकदम ओके’ घोषणेच्या जनकाच्याच हातात कमळ!

मुंबईः जालना विधानसभा मतदारसंघाचे तब्बल तीन टर्म आमदार राहिलेले काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशामुळे जालना जिल्ह्यात भाजपला बळ मिळण्याची शक्यता असून त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाची मात्र डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कैलास गोरंट्याल यांनी आज मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी खासदार रावसाहेब दानवे, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. गोरंट्याल यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने काँग्रेसच्या माजी मंत्री व माजी आमदारांना गळाला लावण्याचे डावपेच आखण्यास सुरूवात केली होती. त्यात आता कैलास गोरंट्याल यांच्या रुपाने आणखी एका माजी आमदाराची भर पडली आहे. गेल्या काही दिवसांत भाजपने अनेक माजी आमदारांना गळाला लावले आहे....
निवडणुकीच्या तोंडावर राज्यात ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांसाठी बंपर पुरस्कार योजना; २९० कोटी ३३ लाखांचे १ हजार ९०२ पुरस्कार
महाराष्ट्र, राजकारण

निवडणुकीच्या तोंडावर राज्यात ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांसाठी बंपर पुरस्कार योजना; २९० कोटी ३३ लाखांचे १ हजार ९०२ पुरस्कार

मुंबईः राज्यात सुमारे ६३० स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असून साधनांअभावी एकाचवेळी सर्व निवडणुका घेणे शक्य होणार नसल्यामुळे या निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार असून पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याचे संकेत निवडणूक आयोगाने देताच महायुती सरकारने ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांसाठी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानां’तर्गत मंगळवारी २९० कोटी ३३ लाख रुपयांच्या बंपर पुरस्कार योजनेची घोषणा केली. चालू आर्थिक वर्षापासून राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' हे पुरस्कार अभियान राबवण्यास मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली...
पुण्यातील उच्चभ्रू वसाहतीत रेव्ह पार्टीवर छापा, एकनाथ खडसेंच्या जावयासह सात जणांना रंगेहाथ पकडले; अंमली पदार्थ, दारू जप्त
महाराष्ट्र, राजकारण

पुण्यातील उच्चभ्रू वसाहतीत रेव्ह पार्टीवर छापा, एकनाथ खडसेंच्या जावयासह सात जणांना रंगेहाथ पकडले; अंमली पदार्थ, दारू जप्त

पुणेः शहरातील उच्चभ्रूंची वसाहत असलेल्या खराडी भागातील स्टे बर्ड गेस्ट हाऊसवर हाऊस पार्टीच्या नावाखाली सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाच जणांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये २ महिला व पाच पुरूषांत समावेश असून त्यातील एक जण प्रांजल खेवलकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचा जावई आहेत. पार्टीदरम्यान अंमली पदार्थ, दारू आणि हुक्काचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाता होता, असे पोलिसांनी सांगितले. या पार्टीत आणखी काही बड्या लोकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. खराडी परिसरातील रेडिसन हॉटेलजवळील एका फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची गुप्त माहिती खबऱ्यामार्फत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तेथे छापा टाकून पाच पुरूष व दोन महिलांना ताब्यत घेतले. ताब्यात घेतलेल्या लोकांची पोलिसांनी चौकशी...
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा; कार्यकाळ पूर्ण न करताच पद सोडणारे तिसरे उपराष्ट्रपती,पण…
देश, राजकारण

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा; कार्यकाळ पूर्ण न करताच पद सोडणारे तिसरे उपराष्ट्रपती,पण…

नवी दिल्लीः देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी (२१ जुलै) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव आपण उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा देत असल्याचे धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवलेल्या राजीनामापत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे सोमवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी राज्यसभेचे अध्यक्ष या नात्याने सभागृहाचे कामकाज पाहिले. ऑगस्ट २०२२ मध्ये धनखड हे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले होते, परंतु त्यांनी कार्यकाळ संपण्याच्या आधीच उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला आहे.  यापूर्वी भारताच्या दोन उपराष्ट्रपतींनी, व्ही.व्ही. गिरी यांनी १९६९ मध्ये तर आर. व्यंकटरमन यांनी १९८७ मध्ये कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला होता, परंतु त्यांना भारताचे राष्ट्रपती बनायचे होते म्हणून त्यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पद सोडले होत...
‘विसरा शेती, खेळी रम्मी’…कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळ अधिवेशनातच मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल
महाराष्ट्र, राजकारण

‘विसरा शेती, खेळी रम्मी’…कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळ अधिवेशनातच मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमधील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळाच्या अधिवेशनातच मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल थाला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडीओ शोसल मीडियावर पोस्ट करत ‘कभी जंगली रमी पे आओ ना महाराज म्हणत खोचक टीका केली आहे. भाजपच्या राज्यात काहीच काम नसल्यामुळे कृषी मंत्री पत्ते खेळत आहेत, असा टोलाही रोहित पवारांनी लगावला आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत माणिकराव कोकाटे हे मोबाईल फोनवर कोणता तरी तीन पत्त्यांचा गेम खेळताना दिसत आहेत. आ. रोहित पवार यांनी मात्र कोकाटे हे रम्मी खेळत असल्याचा दावा केला आहे. आ. पवार यांनी ‘जंगली रमी पे आओ ना महाराज’ आणि कधी शेतीवर या महाराज, खेळ थांबवा, कर्जमाफी द्या’ असा हॅशटॅग वापरत माणिकराव कोक...
बिहारमधील ७१.५५ टक्के दलितांना नव्या मतदार यादीत मतदान हिरावले जाण्याची भीती, २७.४२ टक्के मतदारांचा निवडणूक आयोगावर विश्वासच नाही!
देश, राजकारण

बिहारमधील ७१.५५ टक्के दलितांना नव्या मतदार यादीत मतदान हिरावले जाण्याची भीती, २७.४२ टक्के मतदारांचा निवडणूक आयोगावर विश्वासच नाही!

पाटणाः बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी करण्यात आलेल्या एका ताज्या सर्वेक्षणात बिहारमधील ७१.५५ टक्के दलितांना नवीन मतदार यादीत त्यांचे मत हिरावले जाण्याची भीती असल्याचा धक्कादायक निष्कर्ष काढण्यात आला आहे. विशेष म्हणजे येथील २७.४२ टक्के दलित मतदारांनी निवडणूक आयोगावर विश्वास नसल्याचेही याच सर्वेक्षणात सांगितले आहे. बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघड वाजू लागले आहेत. त्यातच निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचे विशेष सघन पुनरीक्षण (एसआयआर) सुरू केले आहे. बिहारमधील ऐनविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाकडून उचललेल्या या पावलावर विरोधी पक्षाकडून टिकेची झोड उठवली जात आहे. बिहारच्या मतदार यादीतून भाजपला ४ ते ५ टक्के मतदार हद्दपार करायचे आहेत,असा आरोप राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी केला असतानाच या ताज्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष हाती आले आहेत. नॅशनस कॉन्फडरेशन ऑफ दलित अँड आदिवासी ऑर्गन...
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे ‘ईश्वरपूर’ नामांतर, राज्य सरकार पाठवणार केंद्राकडे प्रस्ताव
महाराष्ट्र, राजकारण

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे ‘ईश्वरपूर’ नामांतर, राज्य सरकार पाठवणार केंद्राकडे प्रस्ताव

मुंबई: सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील इस्लामपूर या शहराचे नाव बदलून ‘ईश्वरपूर’ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या नामांतराचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.इस्लामपूर या शहराचे नाव बदलून ‘ईश्वरपूर’ करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. जनभावना लक्षात घेता इस्लामपूरचे नाव ‘ईश्वरपूर’ असे करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनास राज्य शासनाच्या शिफारशीसह सादर करण्यास मान्यता देण्यात आली आहे, असे निवेदन संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत केले.गाव किंवा शहर यांचे नाव बदलण्याबाबतचा विषय हा केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असून, याप्रकरणी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता होत असल्यामुळे याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनास शिफारसीसह सादर करण्यात येत आहे. केंद्र शासनाची मान्यता म...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!