अभिव्यक्ती

प्रा. संदेश ढोले यांचा ‘एवढेच फक्त सांगता येते’ कवितासंग्रह प्रकाशित; गज्वींची प्रस्तावना, ‘उपरा’कारांचा ब्लर्ब!
अभिव्यक्ती

प्रा. संदेश ढोले यांचा ‘एवढेच फक्त सांगता येते’ कवितासंग्रह प्रकाशित; गज्वींची प्रस्तावना, ‘उपरा’कारांचा ब्लर्ब!

यवतमाळः आंबेडकरी कवि प्रा. संदेश ढोले यांचा ‘एवढेच फक्त सांगता येते’ हा पहिला कवितासंग्रह नोशनप्रेस या आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला आहे. प्रसिद्ध विचारवंत, नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी या कवितासंग्रहाला प्रस्तावना लिहिली आहे. कवि प्रा. संदेश ढोले यांच्या ‘एवढेच फक्त सांगता येते’ या कवितासंग्रहातील कवितांवर प्रसिद्ध समीक्षक जयंत साठे यांनी वैचारिक भाष्य केले आहे. तर पद्मश्री ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी कवितासंग्रहाचे ब्लर्ब लिहिले आहेत. हा कवितासंग्रह लवकरच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे. प्रा. संदेश ढोले यांच्या कवितेवर ‘उपरा’कार लक्ष्मण माने लिहितात... धम्मक्रांतीच्या प्रेरणेने अस्तित्वात आलेल्या आंबेडकरी साहित्याने वैश्विक साहित्यात स्वतंत्र ओळख निर्माण केली. नव्या जाणिवा, नवा आशय आणि नवे मूल्यभान असणाऱ्या या साहित्याने काळावर अमीट असा ठसा उमटविला. डॉ...
नितीन वैद्यः समतेच्या मार्गावरील कार्यकर्ता सिनेनिर्माता
अभिव्यक्ती

नितीन वैद्यः समतेच्या मार्गावरील कार्यकर्ता सिनेनिर्माता

डॉ. ना. य. डोळे फाउंडेशनकडून दिला जाणारा यंदाचा डॉ. ना. य. डोळे स्मृती पुरस्कार राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष व सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते, पूर्वाश्रमीचे पत्रकार नितीन वैद्य यांना उदगीर येथे आज होणार्‍या समारंभात जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय सचिव व मुंबईचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील यांच्याहस्ते प्रदान करण्यात येत आहे. त्या निमित्त वैद्य यांच्या कार्याची ओळख करून देणारा हा लेख... अंकुश गायकवाड, माजी प्रदेश कार्यवाह, छात्रभारती. उच्च दर्जाची व्यावसायिकता, त्यातही टीव्ही, चित्रपटासारखे झगमगाटी जग. त्यात राहूनही लाखांत एखादाच व्यक्ती सामाजिक कार्यात राहतो. तेही हौशी समाजकार्य नव्हे, तर अत्यंत कर्मठ व आजघडीला पिछेहाट होत असलेली समाजवादी चळवळ! हा तोल प्रसिद्ध टीव्ही मालिका व चित्रपट निर्माते नितीन वैद्य यांना चांगलाच साधता आला आहे. संघटनांपासून चार हात दूर राहणाऱ्य...
सिल्लोड तालुक्यात शाहीर पठाडेंच्या नेतृत्वात लोकरंजनातून शासकीय योजनांबाबत लोकप्रबोधन!
अभिव्यक्ती, महाराष्ट्र

सिल्लोड तालुक्यात शाहीर पठाडेंच्या नेतृत्वात लोकरंजनातून शासकीय योजनांबाबत लोकप्रबोधन!

छत्रपती संभाजीनगर:  लोकरंजन लोककला प्रतिष्ठानच्या वतीने सिल्लोड तालुक्यात शेतकऱ्यांसह समाजातील विविध घटकांसाठीच्या कल्याणकारी योजनांचा प्रभावी प्रचार आणि प्रसार करण्यात आला. जिल्हा माहिती कार्यालय व सामाजिक न्याय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मार्च महिन्यातील अखेरच्या आठवड्यात या जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाहीर डॉ. शेषराव पठाडे आणि सहकाऱ्यांनी वरखेडी, बनकिन्होळा, निल्लोड, कायगाव, पिंपळगाव (पेठ), वरूड-पिंपरी, टाकळी जिवरग या सात गावांत गण, गौळण, रंगबाजी आणि लोकगीतांतून योजनांचा जागर केला. सातही गावांत कलारसिकांकडून चांगले सहकार्य मिळाले. मागेल त्याला शेततळे, एक रुपयात पीकविमा, नमो किसान सन्मान निधी, रमाई आवास, सुशिक्षित बेरोजगारांसाठी कौशल्य विकास, राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती, अनुसूचित जाती, नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्व...
रोजगाराच्या अमाप संधी, व्यापक बाजारपेठेची ‘समृद्धी’ देणारा महामार्ग!
अभिव्यक्ती

रोजगाराच्या अमाप संधी, व्यापक बाजारपेठेची ‘समृद्धी’ देणारा महामार्ग!

नागपूर ते मुंबई या ७०१ किलोमीटर लांबीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गापैकी नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्त संपूर्ण राज्यासाठी ‘समृद्धी’चा महामार्ग ठरणा-या मार्गाविषयी हा लेख… अतुल पांडे कुठल्याही देशाचा दर्जेदार विकास साधण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणा-या गोष्टी म्हणजे रस्ते आणि शिक्षण आहेत हे जाणून राज्य शासनाने रस्ते आणि शिक्षणावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. ‘गतिमान रस्ते, गतिमान विकास’ हे विकाससूत्र ठरवून समृद्धी महामार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प होय. संपूर्ण राज्य...
समृद्धी महामार्गः जितका प्रवास तितकाच पथकर!
अभिव्यक्ती

समृद्धी महामार्गः जितका प्रवास तितकाच पथकर!

नागपूर ते मुंबई ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या नागपूर ते शिर्डी या मार्गाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवार ११ डिसेंबर रोजी नागपुरात होत आहे. त्यानिमित्ताने या मार्गावरील पथकराविषयीची माहिती देणारा हा विशेष लेख... समृद्धी महामार्गाच्या निर्मितीसाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च आला आहे. त्यामुळे या मार्गावरून जाताना सर्वसामान्य नागरिकांना अधिकचा पथकर लागेल, असा गैरसमज निर्माण होऊ शकतो. मात्र, यातील वस्तुस्थिती अशी आहे की, जेवढा तुम्ही प्रवास कराल, तेवढाच तुम्हाला पथकर भरावा लागणार आहे. समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे निर्गमन पथकर (एक्झिट टोल). निर्गमन पथकर म्हणजे काय?, तर निर्गमन पथकर म्हणजे बाहेर पडताना देता येणारा कर... याचाच अर्थ तुम्ही जितके अंतर या मार्गावरुन कापले, तितकेच पैसे तुम्हाला द्यावे लागतील. स...
हॅलो नव्हे – वंदे मातरम्!
अभिव्यक्ती

हॅलो नव्हे – वंदे मातरम्!

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्यभरात ‘हॅलो नव्हे - वंदे मातरम्’ या अभियानाचा शुभारंभ झाला असून अभियानाविषयी... वर्षा फडके-आंधळे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात २ ऑक्टोबरपासून ‘हॅलो नव्हे - वंदे मातरम्’ या अभियानाचा शुभारंभ झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यभरात हे अभियान यशस्वी करण्याचा निर्धार सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजेच गांधी जयंती दिनीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ वर्धा येथून झाला.  ‘जनगणमन’हे आपले राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गाणे हे सर्वमान्य झाले आहे. आजही अनेक शासकीय कार्यालयांत संपर्क साधल्यास अधिकारी व कर्मचारी यांच्या संवादास ‘हॅलो’ या शब्दाने सुरुवात होते. काही ठिकाणी ‘जय हिंद’ तर ...
समृद्धी महामार्गः वेदनेची कोंडी फोडणारी महाराष्ट्राची भाग्यरेखा!
अभिव्यक्ती

समृद्धी महामार्गः वेदनेची कोंडी फोडणारी महाराष्ट्राची भाग्यरेखा!

संपर्क, सातत्य व संवाद हा विकासाचा मूलमंत्र आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उर्वरित प्रदेश यांच्यातील संपर्क, सातत्य, संवाद अधिक बळकट व गतिमान करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने योजनाबद्ध पावले उचलली आहेत. ‘समृद्धी महामार्ग’ हा त्याचाच एक भाग. समृद्धी महामार्ग हा विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी, सामान्य जनता, नव उद्यमी, लहान उद्योजक, व्यापाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षांना पूर्ततेकडे नेणारा राजमार्ग आहे. या महामार्गामुळे विदर्भ, मराठवाड्यापासून मुंबईचे अंतर यामुळे लक्षणीयरित्या कमी होणार आहे. रविवारी समृद्धी महामार्गाचे लोकापर्ण होत आहे, त्यानिमित्त हा विशेष लेख... प्रवीण टाके महाराष्ट्राचा औद्योगिक विकास प्रामुख्याने मुंबई, पुणे, नाशिक या भागात अधिक झाला आहे. कारण या ठिकाणी मिळणाऱ्या प्राथमिक सुविधा, चांगल्या रस्त्यांचे जाळे. गुंतवणुकदारांनी मराठवाडा- विदर्भाकडे आगेकूच करण्यासाठी सुसाट...
समृद्धी महामार्गः आधुनिक महाराष्ट्राचा विकासमार्ग!
अभिव्यक्ती

समृद्धी महामार्गः आधुनिक महाराष्ट्राचा विकासमार्ग!

कोणत्याही भागाचा विकास हा स्थानिक ठिकाणी दळण- वळणाची साधने किती चांगल्या दर्जाची आहेत, यावर ठरतो. त्यामुळे राज्याच्या विकासासाठी रस्ते विकासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. राज्यातील रस्त्यांचे जाळे विकसित झाले, तर आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे, हे ओळखून महाराष्ट्र शासनाच्या अथक प्रयत्नानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ११ डिसेंबर रोजी ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’चे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे...त्यानिमित्त हा विशेष लेख. संध्या गरवारे खंडारे ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या  पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी (कोकमठाण) या ५२० किलोमीटर रस्त्याचे  काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित शिर्डी ते मुंबई हा रस्ता जु...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!