अभिव्यक्ती

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा मूलाधार, व्यंगात्मक विनोदामुळे जीवन अधिक अर्थपूर्ण: सुप्रीम कोर्ट; खा. प्रतापगढींविरुद्धचा एफआयआर रद्द
अभिव्यक्ती, देश

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा मूलाधार, व्यंगात्मक विनोदामुळे जीवन अधिक अर्थपूर्ण: सुप्रीम कोर्ट; खा. प्रतापगढींविरुद्धचा एफआयआर रद्द

नवी दिल्लीः अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे निरोगी आणि सुसंस्कृत समाजाचा अविभाज्य भाग आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा मूलाधार आहे. एखाद्या व्यक्तीने व्यक्त केलेले विचार बहुसंख्य व्यक्तींना आवडले नाहीत तरी त्या व्यक्तीच्या विचार मांडण्याच्या स्वातंत्र्याचे रक्षण आणि आदर व्हायलाच हवा. कोणतेही साहित्य मग ते कविता, नाट्य, चित्रपट, व्यंग किंवा कला असो त्यातून मानवाचे जीवन अधिक अर्थपूर्ण होते, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी यांच्या विरोधातील एफआयआर रद्द केला आहे. काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी यांनी सोशल मीडियावर ‘ए खून के प्यासे बात सुनो’ ही कविता शेअर केली होती. या कवितेतून राष्ट्रीय एकात्मतेला आव्हान देण्यात आल्याचे तसेच त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात ३ जानेवारी रोजी गुजरातच्या जामनगरमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला...
‘अभिजात’ मराठीचे इंग्रजीपेक्षा श्रेष्ठत्व मनामनात पेरले तरच निभाव शक्य!
अभिव्यक्ती, महाराष्ट्र

‘अभिजात’ मराठीचे इंग्रजीपेक्षा श्रेष्ठत्व मनामनात पेरले तरच निभाव शक्य!

'कोणतीही भाषा जागतिक स्तरावर पसरवण्यासाठी त्या भाषेच्या ज्ञानाची निर्मिती होणे आवश्यक असते. तेव्हा मराठी भाषा फक्त राजभाषा नाही तर ज्ञानाची भाषा, व्यवहाराची भाषा व्हायला हवी. भाषा ध्रुवीकरणाच्या काळात मराठी जर ज्ञान भाषा झाली नाही तर तिचा सामान्य भाषा ही म्हणून ही निभाव लागणार नाही. यासाठी मराठीची केवळ सक्ती करून चालणार नाही तर आजच्या काळात ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कसोटीवर मराठी कशी उतरेल हे पाहणे महत्वाचे आहे.' सुनील कुवरे, शिवडी दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या भाषा दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आज १२ कोटी लोक मराठी भाषा बोलतात. लोकसंख्येच्या निकषानुसार मराठीला जगातल्या २० प्रमुख भाषांमध्ये स्थान आहे. अशा या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी कित्येक वर्षांपासूनची होती.अखेर ती ३ ऑक्टोबर २०२४ घटस्थापनेच्या दिवशी म...
मराठी भाषेचा अभिजात दर्जा ‘सदाशिवपेठी ब्राह्मणी बोली’ पुरताच सिमीत का?: विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अशोक राणा यांचा सवाल
अभिव्यक्ती, महाराष्ट्र

मराठी भाषेचा अभिजात दर्जा ‘सदाशिवपेठी ब्राह्मणी बोली’ पुरताच सिमीत का?: विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अशोक राणा यांचा सवाल

मराठी भाषेला अभिजात हा दर्जा मिळाल्यास ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु हा दर्जा सदाशिवपेठेतील ब्राह्मणांच्या बोली पुरता सीमित आहे की महाराष्ट्रातील सर्व विभागातील बोली भाषांनाही लागू आहे हे स्पष्ट झाले नाही. वऱ्हाडी, मराठवाडी, खान्देशी, अहिराणी, कोकणी, सातारी, कोल्हापुरी, या बोलींना अभिजात मराठीमध्ये कोणते स्थान आहे हे स्पष्ट झाले पाहिजे, अशी भूमिका १९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अशोक राणा यांनी मांडली आहे. त्यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा संपादित भाग... डॉ. अशोक राणा, अध्यक्ष, १९ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद). रामदेवराय यादव याची राजवट ज्या परिसरात स्थिरावली होती, त्या परिसरात आज आपण आहोत. यादवांच्या साम्राज्याला सुरुंग लावणारी ब्राह्मणशाही आजही या ठिकाणी आपला प्रभाव गाजवीत आहे. अल्लाउद्दिन खिलजी याने या साम्राज्याचा अंत केला ही एक ...
महाराष्ट्रात नेमक्या बोलीभाषा किती आणि काय आहेत त्यांची खास वैशिष्ट्ये?; वाचा राज्याच्या विविध भागातील बोलीभाषा आणि त्यांची खासियत…
अभिव्यक्ती, महाराष्ट्र

महाराष्ट्रात नेमक्या बोलीभाषा किती आणि काय आहेत त्यांची खास वैशिष्ट्ये?; वाचा राज्याच्या विविध भागातील बोलीभाषा आणि त्यांची खासियत…

 महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांमध्ये अनेक बोलीभाषा प्रचलित आहेत. या बोलीभाषा त्या- त्या प्रदेशाच्या सांस्कृतिक, भौगोलिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीवरून विकसित झाल्या आहेत. त्यापैकी काही प्रमुख बोलीभाषा आणि त्यांची वैशिष्ट्ये सांगणारा हा खास लेख... राजू हिरामण धोत्रे केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यामुळे दिल्लीत होणारे  साहित्य संमेलन पहिलेच 'अभिजात मराठी साहित्य संमेलन' असेल. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा… ही केवळ कविकल्पना नाही तर आपल्या अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय आहे, याचा प्रत्यय आपणास या ऐतिहासिक संमेलनातून येणार आहे. भाषा, संस्कृती, राष्ट्रभावना, मानवता आणि एकात्मता यांचा आगळा मिलाफ यानिमित्ताने महाराष्ट्र वा देशातीलच नव्हे, अवघ्या जगातील साहित्यरसिक देशाच्या राजधानीत अनुभवणार आहेत यापूर्वी १९५४ मध्ये  दिल्लीला ३७ वे अखिल भारतीय ...
१९ व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन, बोधचिन्हातून सांस्कृतिक बहुविविधतेचे प्रतिबिंबः डॉ. मुस्तजीब खान
अभिव्यक्ती, महाराष्ट्र

१९ व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन, बोधचिन्हातून सांस्कृतिक बहुविविधतेचे प्रतिबिंबः डॉ. मुस्तजीब खान

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): विद्रोही साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हातून भारतीय बहुसांस्कृतिक बहुविविधतेचे प्रतिबिंब आहे. यातून बुध्दाची करूणा आणि परिघाबाहेर ढकलेल्यांच्या वेदनेचा विद्रोह प्रतित होतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. मुस्तजीब खान यांनी केले. १९ व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन आज अभ्यासक, विचारवंत डॉ. प्रा. मुस्तजीब खान यांच्या हस्ते करण्यात आले. हे बोध चिन्ह चित्रकार राजानंद सुरडकर यांनी रेखाटले आहे. विद्रोही साहित्य संमेलनाच्या या बोधचिन्हातून सांस्कृतिक क्रांती घडवली आहे. अजिंठ्याच्या पद्मपाणी बुध्दाच्या हातात पिंपळ पानाऐवजी लेखणीची मशाल दिली आहे. सोबतच या शहराची ठळक ऐतिहासिक ओळख असलेल्या बीबी का मकबऱ्याचा मिनारही दर्शवला आहे. संविधानाची मोडतोड सुरु आहे. या जळत्या वास्तवालाही या बोधचिन्हातून दर्शवले आहे, असे डॉ. मुस्तजीब ...
अहिराणी बोलीचा इतिहास आणि भाषावैज्ञानिक ओळख
अभिव्यक्ती

अहिराणी बोलीचा इतिहास आणि भाषावैज्ञानिक ओळख

मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर प्रथमच ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१, २२ आणि २३ फेब्रुवारी असे तीन दिवस दिल्ली येथे होत आहे.  अवघ्या जगातील साहित्यरसिक देशाच्या राजधानीत हा भव्य सोहळा अनुभवणार आहेत. त्यानिमित्ताने राज्यातील अनेक प्रतिभावंत साहित्यिकांच्या साहित्यकृतींना उजाळा या निमित्ताने देण्यात येणार आहे. या निमित्ताने खान्देशातील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रमेश सूर्यवंशी यांनी अहिराणी बोली भाषेवरील केलेले संशोधन व अहिराणी बोली, खानदेश इतिहास,अहिराणी शब्दकोश या विषयावर केलेले विवेचन... डॉ. रमेश सूर्यवंशी अहिराणी ही खानदेश या भू प्रदेशात बोलली जाणारी बोली. महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव या दोन जिल्ह्यांच्या मिळून होणाऱ्या प्रदेशास आजही खानदेश म्हणून ओळखतात. पूर्वी खानदेश हा मुंबई इलाख्याचा एक जिल्हा होता. प्राचीन काळी खानदेश या प्रदेशाचा विस्तार सातपुडा पर्वतापा...
ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा.रं. बोराडे यांचे निधन, मराठवाडी मातीतला अस्सल ग्रामीण कथाकार काळाच्या पडद्याआड; आज अंत्यसंस्कार
अभिव्यक्ती, महाराष्ट्र

ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा.रं. बोराडे यांचे निधन, मराठवाडी मातीतला अस्सल ग्रामीण कथाकार काळाच्या पडद्याआड; आज अंत्यसंस्कार

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): कष्टकऱ्यांचा आवाज आपल्या कसदार लेखणीतून मांडणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि ग्रामीण कथाकार रा.रं. बोराडे यांचे आज मंगळवारी (११ फेब्रुवारी) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ४ वाजता सेंट्रल नाका येथील स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. रावसाहेब रंगराव बोराडे उर्फ प्राचार्य रा. रं. बोराडे यांचा जन्न २५ डिसेंबर १९४० रोजी लातूर जिल्ह्यातील काटगाव येथील शेतकरी कुटुंबात झाला. काटगाव येथे चौथीपर्यंतंचे शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी गाव सोडले. माढा, बार्शी, सोलापूर आणि तत्कालीन औरंगाबादेत त्यांचे शालेय शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षण झाले. नोकरीनिमित्त त्यांचे वास्तव्य नागरी भागात राहिले तरी मराठवाड्याच्या ग्रामीण जीवनाने...
१९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठी लोकसंस्कृतीचे अभ्यासक, भाषातज्ज्ञ डॉ. अशोक राणा, फेब्रुवारीत होणार संभाजीनगरात संमेलन!
अभिव्यक्ती, महाराष्ट्र

१९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठी लोकसंस्कृतीचे अभ्यासक, भाषातज्ज्ञ डॉ. अशोक राणा, फेब्रुवारीत होणार संभाजीनगरात संमेलन!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): १९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी यवतमाळ येथील लोकसाहित्य व संस्कृतीचे अभ्यासक, इतिहास संशोधक व भाषातज्ज्ञ डॉ. अशोक राणा यांची निवड करण्यात आली आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी यांनी पत्रकार परिषदेत आज ही घोषणा केली. २१, २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) हे संमेलन होणार आहे. डॉ. अशोक राणा हे १८ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ग्रामीण साहित्यिक डॉ. वासुदेव मुलाटे यांच्याकडून सूत्रे हाती घेतील. विद्रोही सांस्कृतिक चळवळ जीवनाच्या सर्व क्षेत्रात समतावादी संस्कृती व साहित्य विचारांचा पुरस्कार करते. विद्रोही साहित्य चळवळीच्या वतीने आजवर मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, सोलापूर, नंदुरबार, वाशी (नवी मुंबई), पुणे, मनमाड, धुळे, परभणी, बुलढाणा, हिंगोली, नाशिक, उदगीर, वर्धा, अमळने...
शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीरः संतोष आळंजकर यांना ‘शेतकरी साहित्य’ तर गणेश घुलेंना ‘संदीप दळवी बालसाहित्य’ पुरस्कार
अभिव्यक्ती, महाराष्ट्र

शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीरः संतोष आळंजकर यांना ‘शेतकरी साहित्य’ तर गणेश घुलेंना ‘संदीप दळवी बालसाहित्य’ पुरस्कार

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): प्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य रा.रं.बोराडे संस्थापक असलेल्या शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा शेतकरी साहित्य पुरस्कार संतोष आळंजकर यांच्या ‘रानभुलीचे दिवस’  या ललित गद्यसंग्रहास तर गणेश घुले यांच्या ‘सुंदर माझी शाळा’ या बालकविता संग्रहास संदीप दळवी बालसाहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी कृषक संस्कृतीशी नाते सांगणाऱ्या साहित्यकृतीला मागील बावीस वर्षांपासून ‘शेतकरी साहित्य पुरस्कार’ दिला जातो. शिवार प्रतिष्ठानचा ‘शेतकरी साहित्य पुरस्कार’ साहित्यक्षेत्रात अतिशय प्रतिष्ठेचा समजला जातो. यावर्षी २३ वा पुरस्कार येथील संतोष आळंजकर यांच्या ‘रानभुलीचे दिवस’ या ललितगद्य संग्रहास तर स्व. संदीप दळवी यांच्या स्मरणार्थ संदीप दळवी बालसाहित्य पुरस्कार गणेश घुले यांच्या ‘सुंदर माझी शाळा’ या बाल कविता संग्...
मसाप निवडणूकः आरोप करणारांच्या लेखी ‘प्रसिद्धी’ हेच ‘परिवर्तन’, साहित्य संस्था या केवळ लेखकांच्याच हा भ्रम!
अभिव्यक्ती, महाराष्ट्र

मसाप निवडणूकः आरोप करणारांच्या लेखी ‘प्रसिद्धी’ हेच ‘परिवर्तन’, साहित्य संस्था या केवळ लेखकांच्याच हा भ्रम!

मराठवाडा साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या निवडणुकीत कौतिकराव ठाले-पाटील यांच्या नेतृत्वात मसाप संस्थासंवर्धक अराजकीय पॅनल आणि आरएसएसचे कट्टर स्वयंसेवक डॉ. सर्जेराव जिगे यांच्या नेतृत्वात परिवर्तन मंच पॅनल निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. परिवर्तन मंच पॅनलप्रमुख डॉ. जिगे, उमेदवार प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे, प्रा. डॉ. शुद्धोधन कांबळे यांनी मसाप आणि ठाले-पाटील यांच्यावर ‘एकाधिकारशाही’ व ‘असांसदीय’ व्यवहाराचे आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपांचा मसाप संस्थासंवर्धक पॅनलचे उमेदवार प्रा. डॉ. गणेश मोहिते यांनी केलेला हा प्रतिवाद... डॉ. गणेश मोहिते, मसाप संस्थासंवर्धक पॅनलचे उमेदवार मराठवाडा साहित्य परिषदेची निवडणूक आली की काही हौश्यांना आपण साहित्यिक, विचारवंत(?) असल्याची पंचवार्षिक आठवण येते आणि ते परिषदेच्या ‘सहिता’(?)साठी अध्यक्ष होण्याच्या 'लालसेतून' ...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!