औरंगाबाद महापालिकेच्या घरकुल घोटाळ्याची ईडी’मार्फत चौकशी; एक हजार कोटींहून जास्तीच्या घोटाळ्यात अडकणार बडे मासे!
मुंबईः औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गतच्या घरकुल प्रकल्पात झालेल्या अनियमितता आणि भ्रष्टाचाराची सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी) चौकशी करण्याचा आदेश प्रधानमंत्री कार्यालयाने दिला आहे. त्यामुळे औरंगाबादेतील हा प्रकल्प रखडणार तर आहेच, शिवाय या प्रकल्पात अनियमिततेला खतपाणी घालणारे बडे मासेही ईडीच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने पडेगाव, सुंदरवाडी, तिसगाव, चिकलठाणा आणि हर्सूल याठिकाणी १२७ हेक्टर जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजना प्रस्तावित करण्यात आली होती. तब्बल ३९ हजार सदनिकांच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रियाही राबवण्यात आली. परंतु प्रकल्प उभारणीसाठी योग्य जागा नसताना आणि त्या जागेवर ३९ हजार सदनिकांचे बांधकाम शक्य नसतानाही निविदा काढण्यात आल्या होत्या.
ज्या कंत्राटदाराला या बांधकामाची निविदा देण्यात आली, त्याची ...