महाराष्ट्र

औरंगाबाद महापालिकेच्या घरकुल घोटाळ्याची ईडी’मार्फत चौकशी; एक हजार कोटींहून जास्तीच्या घोटाळ्यात अडकणार बडे मासे!
महाराष्ट्र, विशेष

औरंगाबाद महापालिकेच्या घरकुल घोटाळ्याची ईडी’मार्फत चौकशी; एक हजार कोटींहून जास्तीच्या घोटाळ्यात अडकणार बडे मासे!

मुंबईः औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गतच्या घरकुल प्रकल्पात झालेल्या अनियमितता आणि भ्रष्टाचाराची सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी) चौकशी करण्याचा आदेश प्रधानमंत्री कार्यालयाने दिला आहे. त्यामुळे औरंगाबादेतील हा प्रकल्प रखडणार तर आहेच, शिवाय या प्रकल्पात अनियमिततेला खतपाणी घालणारे बडे मासेही ईडीच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने पडेगाव, सुंदरवाडी, तिसगाव, चिकलठाणा आणि हर्सूल याठिकाणी १२७ हेक्टर जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजना प्रस्तावित करण्यात आली होती. तब्बल ३९ हजार सदनिकांच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रियाही राबवण्यात आली. परंतु प्रकल्प उभारणीसाठी योग्य जागा नसताना आणि त्या जागेवर ३९ हजार सदनिकांचे बांधकाम शक्य नसतानाही निविदा काढण्यात आल्या होत्या. ज्या कंत्राटदाराला या बांधकामाची निविदा देण्यात आली, त्याची ...
अनुसूचित जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी नवीन धोरण आणणार
महाराष्ट्र

अनुसूचित जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी नवीन धोरण आणणार

मुंबई: राज्यात अनुसूचित जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्रांबाबत आलेल्या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेता राज्यात जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी नवीन धोरण आणणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या अडचणींबाबत सदस्य रमेश पाटील यांनी शुक्रवारी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. याचे उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. जात वैधता प्रमाणपत्र देताना जाणीवपूर्वक विलंब लावला जात असल्याच्या तक्रारी येत असतात. लोकांना त्रास होऊ नये या अनुषंगाने जात पडताळणी समित्यांचे काम पारदर्शकपणे पार पडावे यासाठी नवीन धोरण आणणार असल्याचे फडणवीस म्हणाले.  जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांची संख्या वाढविणे, कामकाज अधिक गतिमान करण्यावर भर देण्यात येईल. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी असणाऱ्या अधिकाऱ्यांना कसे बदलता येईल याबाबतीतही न...
नांदेडमध्ये ऑनर किलिंगः मेडिकलच्या २३ वर्षीय मुलीचा खून करून ओढ्यात केली राख विसर्जित
महाराष्ट्र, विशेष

नांदेडमध्ये ऑनर किलिंगः मेडिकलच्या २३ वर्षीय मुलीचा खून करून ओढ्यात केली राख विसर्जित

नांदेडः देशभरात गुरूवारी प्रजासत्ताक दिन हर्षोल्हासात साजरा केल्याच्या दुसऱ्याच दिवशी आज नांदेड जिल्ह्यातील ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नांदेडजवळील लिंबगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी माहीपाल येथील कुटुंबीयानीच वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या आपल्या २३ वर्षीय मुलीचा निष्ठूरपणे खून करून तिचा मृतदेह परस्पर जाळला आणि राख ओढ्यात विसर्जित केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबीयांच्या ऑनर किलिंगला बळी पडलेल्या मुलीचे नाव शुभांगी जोगदंड आहे. २३ वर्षीय शुभांगी नांदेडमधील आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. गावातीलच तरूणासोबत शुभांगीचे प्रेमसंबंध होते. परंतु तिच्या कुटुंबीयांना हे प्रेम संबंध मान्य नव्हते. हेही वाचाः नांदेडचे बिल्डर बियाणींच्या हत्याप्रकरणात शार्पशूटर रंगाला एनआयएकडून अटक, हत्याकटाचे धागेदोरे उलगडणार? शुभांगीच्या प्र...
महाराष्ट्राला ७४ ‘पोलिस पदक’ जाहीर, चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपतींचे विशिष्ट सेवा पदक! वाचा संपूर्ण यादी
महाराष्ट्र, विशेष

महाराष्ट्राला ७४ ‘पोलिस पदक’ जाहीर, चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपतींचे विशिष्ट सेवा पदक! वाचा संपूर्ण यादी

नवी दिल्ली:  प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पोलिस पदकांची घोषणा झाली असून, यात महाराष्ट्रातील एकूण ७४ पोलिसांना पदक जाहीर झाले आहेत. यातील चार पोलिस अधिकाऱ्यांना प्रतिष्ठित सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट पोलिस सेवा पदक’ (पीपीएम), ३१ ‘पोलिस शौर्य पदक’ (पीएमजी) तर प्रशंसनीय सेवेकरिता ३९ ‘पोलिस पदक’ (पीएम) जाहीर झाली आहेत. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलिस पदक’ जाहीर करते. यावर्षी एकूण ९०१ ‘पोलिस पदक’ जाहीर झाली असून ९३ पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलिस पदक' (पीपीएम), १४० पोलिसांना ‘पोलिस शौर्य पदक’(पीएमजी) आणि ६६८ पोलिसांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘पोलिस पदक’ (पीएम) जाहीर झाले असून यात महाराष्ट्राला एकूण ७४ पदके जाहीर झाली आहेत. देशातील ९३ पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता  ‘राष्ट्रपती  विशिष्ट सेवा प...
चिंचवड, कसबापेठ पोटनिवडणुकीच्या तारखा बदलल्या, निवडणूक आयोगाने जाहीर केले नवीन वेळापत्रक
महाराष्ट्र, राजकारण

चिंचवड, कसबापेठ पोटनिवडणुकीच्या तारखा बदलल्या, निवडणूक आयोगाने जाहीर केले नवीन वेळापत्रक

नवी दिल्लीः महाराष्ट्र विधानसभेच्या चिंचवड आणि कसबापेठ पोटनिवडणुकीच्या तारखांमध्ये निवडणूक आयोगाने बदल केला आहे. महाराष्ट्रात होऊ घातलेल्या इयत्ता बारावी व पदवीच्या परीक्षा आणि मतदानाच्या तारखा एकाच काळात येत असल्याचे कारण देत या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने याआधी जाहीर केलेल्या तारखांनुसार चिंचवड आणि कसबापेठ विधानसभा मतदारसंघात २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते आणि २ मार्च रोजी मतमोजणी करून निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात येणार होते. अरूणाचल प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि लक्षद्वीपमधील विधानसभेच्या रिक्त झालेल्या जागांबरोबरच चिंचवड आणि कसबापेठ विधानसभा मतदारसंघाचीही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र चिंचवड आणि कसबापेठ विधानसभा मतदारसंघात जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीच्या तारखांना  इयत्ता बारावी आणि पदवीच्या परीक्षा घेण्यात असल्याचे पुण्याच्या ज...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांना अटक, राजकीय वातावरण तापले!
महाराष्ट्र, राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांना अटक, राजकीय वातावरण तापले!

मुंबईः ठाण्यातील व्हिव्हीयाना सिनेमागृहात सोमवारी रात्री हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हर हर महादेव चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी रात्री १० वाजता या चित्रपटाचा शो बंद पाडला होता.  आ. आव्हाड यांच्या अटकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सोमवारी रात्री व्हिव्हीयाना सिनेमागृहात हर हर महादेव चित्रपटाचा शो सुरू झाल्यानंतर या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रेक्षकांना सिनेमागृहातून बाहेर जाण्याचे आवाहन केले होते. त्यानंतरही सिनेमागृहात बसून राहिलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हुसकावू...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजीनामा देणार, ‘निरोपाच्या भाषे’त स्वतःच दिली माहिती
महाराष्ट्र, विशेष

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजीनामा देणार, ‘निरोपाच्या भाषे’त स्वतःच दिली माहिती

मुंबईः महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह आणि अपमानास्पद विधाने करून कायम वादाच्या भोवऱ्यात राहिलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा देण्याची मानसिक तयारी केली आहे. आपल्याला राजकीय जबाबदारीतून मुक्त व्हायची इच्छा असल्याचे त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडेही बोलून दाखवली आहे. राजभवनाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. ही माहिती देताना कोश्यारी यांनी निरोपाची भाषाच वापरली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी १९ जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्याकडे राजकीय जबाबदारीतून मुक्त होण्याची आपली इच्छा बोलून दाखवली असल्याचे राजभवनाने म्हटले आहे.  महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ...
शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद आहे का?: आता फक्त १ हजार १०० रुपयांत होणार आदलाबदलीची दस्त नोंदणी!
महाराष्ट्र

शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद आहे का?: आता फक्त १ हजार १०० रुपयांत होणार आदलाबदलीची दस्त नोंदणी!

मुंबईः शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद मिटवणाऱ्या सलोखा योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी सवलतीत मुद्रांक शुल्क नाममात्र १००० रुपये व नोंदणी फी १०० रुपये आकारण्यात येईल. शेतजमिनीच्या ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांमध्ये आपापसात वाद होतात. ते मिटवण्यासाठी व समाजामध्ये सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. या योजनेत एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांचे अदलाबदल दस्तासाठी नोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्यात येईल. या योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक मानसिकता निर्माण होईल. तसेच विविध न्यायालयातील प्रकरणे निकाली निघतील.  भूमाफियांचा अनावश्यक हस्तक्षेप सुद्धा होणार नाही. महाराष्ट्रात एकूण जमिनधारकांची खातेसंख्...
शिवसेनेशी युती का केली?, प्रकाश आंबेडकरांनी सांगितले कारण; ‘वंचित’ महाविकास आघाडीत असेल का? ठाकरे म्हणाले…
महाराष्ट्र, राजकारण

शिवसेनेशी युती का केली?, प्रकाश आंबेडकरांनी सांगितले कारण; ‘वंचित’ महाविकास आघाडीत असेल का? ठाकरे म्हणाले…

मुंबईः महाराष्ट्राच्या राजकारणात गेली काही दिवस चर्चेचा विषय ठरलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर आज अखेर शिक्कामोर्तब झाले. या ऐतिहासिक युतीचे महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होतील, असे राजकीय जाणकारांना वाटते. मात्र प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेशी युती का केली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. खुद्द प्रकाश आंबेडकरांनीच या प्रश्नाचे उत्तर दिले आणि एमआयएमने वंचित बहुजन आघाडीची चळवळ गिळंकृत करण्याचा प्रयत्न केल्याचा थेट आरोपच त्यांनी एमआयएमचे नाव न घेता केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकर भवनात संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली. यावेळी प्रकाश आंबेडकारांनी भूमिका मांडली. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना एकत्र आल्याने निवडणुकीत बदलाचे राजकारण सुरू होणार आहे. उपेक्षितांना संधी देऊन त...
विनाअनुदानित शाळांना अनुदानासाठी १ हजार १०० कोटींची तरतूद, महिनाभरात त्रुटींची पूर्तता न केल्यास ‘दुकान’ बंद होण्याचा धोका!
महाराष्ट्र

विनाअनुदानित शाळांना अनुदानासाठी १ हजार १०० कोटींची तरतूद, महिनाभरात त्रुटींची पूर्तता न केल्यास ‘दुकान’ बंद होण्याचा धोका!

मुंबईः राज्यातील शाळांना अनुदान देण्याचा व त्यासाठी १ हजार १०० कोटी रुपये देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे ६३ हजार ३३८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना होणार आहे. असे असले तरी एक महिन्याच्या मुदतीत त्रुटींची पूर्तता न करणाऱ्या शाळांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा घोषित करण्यात येणार असून यासाठी तयार न होणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुळे ६ हजार १० प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना तसेच १४ हजार ८६२ तुकड्यांना अनुदान मिळेल. त्रुटींच्या पूर्ततेनंतर २० टक्के अनुदानासाठी ३६७ शाळा पात्र असून ४० टक्के अनुदानासाठी २८४ शाळा पात्र आहेत. २० टक्के अनुदान घेत असलेल्या २२८ शाळांना ४० टक्के अनुदान देण्यात येईल. त...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!