देश

पुरोगामी महाराष्ट्राचे राष्ट्रीय पातळीवर ‘दैवतीकरण’, प्रजासत्ताक दिन संचलनात  साडेतीन शक्तीपीठांचा चित्ररथ
देश, विशेष

पुरोगामी महाराष्ट्राचे राष्ट्रीय पातळीवर ‘दैवतीकरण’, प्रजासत्ताक दिन संचलनात  साडेतीन शक्तीपीठांचा चित्ररथ

मुंबई:  फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र ही महाराष्ट्राची पुरोगीमी ओळख आता इतिहासजमा होणार का? असा प्रश्न उपस्थित व्हावा त्या दिशेने महाराष्ट्र सरकारची वाटचाल सुरू आहे. केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही पुरोगामी राज्य अशी ओळख असलेला महाराष्ट्र येत्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात महाराष्ट्रातील तीन शक्तीपीठांचा चित्ररथ सामील करणार आहे. हे महाराष्ट्राचे राष्ट्रीय पातळीवर होणारे दैवतीकरण तर नाही ना?  असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क कार्यालयाने दिलेल्या प्रेसनोट नुसार, प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी व्हावा, यासाठी सतत आग्रही राहून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी थेट बोलल्यानंतर सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश आ...
कर्नाटकच्या मराठीविरोधी प्रवृत्तीचा विधिमंडळात एकमुखाने निषेध ठराव, सीमा भागातील इंच न् इंच जमीन महाराष्ट्रात आणणार
देश, महाराष्ट्र, विशेष

कर्नाटकच्या मराठीविरोधी प्रवृत्तीचा विधिमंडळात एकमुखाने निषेध ठराव, सीमा भागातील इंच न् इंच जमीन महाराष्ट्रात आणणार

नागपूर: कर्नाटक शासनाच्या मराठी विरोधी प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध करणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेला ठराव मंगळवारी महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत एकमताने मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातील बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर या शहरांसह ८६५ गावांतील मराठी भाषक जनतेसोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभे आहे. सीमा भागातील इंच न् इंच जमीन तिथल्या मराठी भाषिक नागरिकांसह कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी आवश्यक तो सर्व कायदेशीर पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात करण्याचा आणि सीमा भागातील मराठी जनतेच्या सुरक्षिततेची हमी घेण्यासाठी कर्नाटक सरकारला समज देण्यात यावी, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दोन्ही सभागृहांत मांडलेल्या ठरावात म्हटले आहे. सभागृहातील दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी बाके वाजवत एकमताने ठ...
चार-दोन उद्योगपतींनी देश ओरबाडायचा असा हिंदुस्तान होऊ देणार नाही: राहुल गांधी
देश, राजकारण

चार-दोन उद्योगपतींनी देश ओरबाडायचा असा हिंदुस्तान होऊ देणार नाही: राहुल गांधी

शेगाव: दोन-तीन उद्योगपतींनी देशाचा सर्वच्या सर्व पैसा ओरबाडायचा आणि देशातील युवांच्या स्वप्नांचा चुराडा करायचा, असा हिंदुस्तान आम्हाला नको आहे. असा हिंदुस्तान आमचा नाही आणि असा हिंदुस्तान आम्ही बनूही देणार नाही, असा विश्वास काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा आज शेगावमध्ये पोहोचली. या यात्रेदरम्यानची महाराष्ट्रातील शेवटची सभा शेगावमध्ये झाली. त्यावेळी राहुल गांधी बोलत होते. महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, शाहू महाराज, संत ज्ञानेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे. यापैकी कोणीही द्वेष, हिंसा,तिरस्काराची भाषा केली नाही. त्यांनी प्रेमाचा, लोकांना जोडण्याचाच संदेश दिला. द्वेष, हिंसा, तिरस्कारामुळे कोणाचा फायदा झाला काय? असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थितांना विचारला. यात्राची गरज काय? या यात्रेचा फायदा काय? असे सव...
ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांना जामीन, अर्बन नक्षलवाद प्रकरणात उच्च न्यायालयाचा दिलासा
देश

ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांना जामीन, अर्बन नक्षलवाद प्रकरणात उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबईः  अर्बन नक्षलवादाच्या आरोपाखाली दोन वर्षांपूर्वी अटक करण्यात आलेले ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत, लेखक प्रा. अनिल तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर प्रा. तेलतुंबडे यांना जामीन मंजूर करण्यात आला असून त्यांना एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने १४ एप्रिल २०२० रोजी अटक केली होती.  अर्बन नक्षलवाद प्रकरणी एप्रिल २०२० मध्ये अटक केल्यापासन प्रा. आनंद तेलतुंबडे हे तळोजा तुरूंगात बंदिस्त आहेत. प्रा. तेलतुंबडे यांनी नियमित जामिनासाठी केलेली याचिका न्या. अजय गडकरी आणि न्या. मिलिंद जाधव यांनी योग्य ठरवली. रोख रक्कम सादर करून जामिनावर सुटका करण्याची तेलतुंबडे यांचे वकील मिहीर देसाई यांनी केलेली मागणीही न्यायालयाने मान्य केली. विशेष न्यायालयाने प्रा. तेलतुंबडे यांनी जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळून लावल्यानंतर त्यांनी मुंबई...
काँग्रेस नेते राहुल गांधींना भारत जोडो यात्रेत बॉम्बने उडवून देण्याची धमकी
देश, राजकारण

काँग्रेस नेते राहुल गांधींना भारत जोडो यात्रेत बॉम्बने उडवून देण्याची धमकी

इंदूरः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले असतानाच राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा इंदूरमध्ये दाखल होण्याच्या आधीच त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारी चिठ्ठी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये मिठाईच्या  दुकानाबाहेर हे पत्र आढळून आले आहे. हे पत्र आढळून आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. हे पत्र मिठाईच्या दुकानाबाहेर सोडून जाणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणारे हे पत्र शुक्रवारी सकाळी इंदूरमधील एका मिठाईच्या दुकानाबाहेर आढळून आले आहे. मिठाईच्या दुकानाबाहेर एक अज्ञात व्यक्ती हे पत्र सोडून गेली आहे. ...
सावरकरांवरील वक्तव्याचा वादः एकनाथ शिंदे गटाच्या फिर्यादीवरून राहुल गांधींविरोधात एफआयआर दाखल
देश, राजकारण

सावरकरांवरील वक्तव्याचा वादः एकनाथ शिंदे गटाच्या फिर्यादीवरून राहुल गांधींविरोधात एफआयआर दाखल

मुंबईः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या ठाण्यातील नेत्या वंदना सुहास डोंगरे यांच्या फिर्यादीवरून ठाणेनगर पोलिसांनी राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे स्थानिक नागरिकांच्या भावना दुखावल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केले आहे, त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान झाला आहे आणि त्यामुळे स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या आहेत, असे वंदना सुहास डोंगरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून ठाणे नगर पोलिसांनी राहुल गांधी यांच्या विरोधात भादंविच्या कलम ५०० आणि ५०१ अन्वये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी महाराष्ट्र...
महत्वाची बातमीः दहा वर्षे पूर्ण झाली असतील तर आधार कार्ड लगेच अपडेट करा, केंद्र सरकारने नियम बदलले!
देश, विशेष

महत्वाची बातमीः दहा वर्षे पूर्ण झाली असतील तर आधार कार्ड लगेच अपडेट करा, केंद्र सरकारने नियम बदलले!

नवी दिल्लीः केंद्र सरकारने आधार कार्डच्या नियमांत सुधारणा केल्या आहेत. आता नागरिकांना दर दहा वर्षांनी कमीत कमी एकदा आधारमधील आपले सहायक दस्तावेजांना अपडेट करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही आधार कार्ड काढून जर दहा वर्षे पूर्ण झाली असतील तर तुमचे आधार लगेचच अपडेट करून घ्या. आधार क्रमांक धारक, आधारसाठी नामांकनाच्या तारखेपासून दर दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर आधारमधील तुमचे सहायक दस्तावेज कमीत कमी एकवेळा ओळखीचे प्रमाणिकरण आणि पत्त्याचे प्रमाणिकरण दस्तावेज जमा कडून अपडेट करू शकतात, असे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) म्हटले आहे. यूआयडीएआयने ही घोषणा मागच्याच महिन्यात केली होती, मात्र आधार अपडेट करणे अनिवार्य केले नव्हते. मात्र आता ९ नव्हेंबरपासून आधार अपडेट करणे अनिवार्य करण्यात आले असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. ज्यावेळी आधार कार्ड तयार करण्यात येत होते, त्यावे...
कर्नाटकात पुढील वर्षीपासून पदवीस्तरावर सायबर सुरक्षा अनिवार्य विषय
देश, विशेष, साय-टेक

कर्नाटकात पुढील वर्षीपासून पदवीस्तरावर सायबर सुरक्षा अनिवार्य विषय

बेंगळुरूः कर्नाटकमध्ये पुढील शैक्षणिक वर्षांपासून सर्व पदवी अभ्यासक्रमांत सायबर सुरक्षा हा अनिवार्य विषय असेल, अशी घोषणा शुक्रवारी कर्नाटकच्या उच्चशिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. बी. थिमेगौडा यांनी केली. कर्नाटकचे उच्चशिक्षण आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण यांच्या प्रमुख उपस्थितीत सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम-२०२२ला आरंभ झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे. उच्चशिक्षण क्षेत्रातील सध्याच्या माहिती तंत्रज्ञान आणि संगणक विज्ञान या अभ्यासक्रमांच्या व्यतिरिक्त नवा सायबर सुरक्षा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. या वर्षी सरकारने नॅसकॉमच्या सहकार्याने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल फ्लुएन्सी हे विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहेत, असे थिमेगौडा यांनी सांगितले. सर्व प्रकारच्या पदवी अभ्यासक्रमांत हे विषय अनिवार्य आहेत. माहिती तंत्रज्ञानमंत्री नारायण म्...
पुण्यात सावरकरांच्या पुतळ्यासमोरच झळकले ‘माफीवीर’चे पोस्टर!, भारत जोडो यात्रेच्या मार्गावरही पडसाद
देश, राजकारण

पुण्यात सावरकरांच्या पुतळ्यासमोरच झळकले ‘माफीवीर’चे पोस्टर!, भारत जोडो यात्रेच्या मार्गावरही पडसाद

पुणेः  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान वीर सावरकर यांच्यावर केलेली घणाघाती टीका आणि या सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचा केलेला पुनरूच्चार यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्तेही आक्रमक झाले असून पुण्यात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट वीर सावरकर यांच्या पुतळ्यासमोरच ‘माफीवीर’चे पोस्टर लावले आहे.  पुण्यातील सारसबाग चौकात वीर सावरकरांचा पुतळा आहे. या पुतळ्यासमोर माफीवीर आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिलेल्या पुराव्याचे फ्लेक्स महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लावल्याचे निदर्शनास आले. पुणे शहरात या माफीवीर पोस्टरची चांगलीच चर्चा रंगात आलेली असतानाच एका व्यक्तीने येऊन हे पोस्टर हटवले. ही व्यक्ती सावरकरप्रेमी असल्याचे सांगण्यात येते. जितेंद्र वाघ असे या सावरकरप्रेमीचे नाव...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!