Blog

 बजेटमधून आरक्षण द्या म्हणणारा असा कसा तुमचा नेता? भुजबळांनी उडवली जरांगेंची खिल्ली; म्हणाले, १६ नोव्हेंबरलाच राजीनामा दिला!
महाराष्ट्र

 बजेटमधून आरक्षण द्या म्हणणारा असा कसा तुमचा नेता? भुजबळांनी उडवली जरांगेंची खिल्ली; म्हणाले, १६ नोव्हेंबरलाच राजीनामा दिला!

अहमदनगरः मला मराठा समाजातील नेत्यांची आणि विचारवंतांची कीव येते. असा कसा तुमचा नेता, जो म्हणतो बजेटमधून आरक्षण देता येते का पहा. कुणाच्या मागे चाललात तुम्ही? अशा शब्दांत ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर तोफ डागली. मी १६ नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिला, असा गोफ्यस्फोटही भुजबळांनी केला. राज्य सरकारने मराठा समाजातील गणगोत आणि सग्यासोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्रे देऊन ओबीसीत समाविष्ट करण्याबाबतची अधिसूचना काढली. त्यावरून राज्यभरातील ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात भूमिका घेतली आणि रस्त्यावर उतरून लढाईचे रणशिंग फुंकले. त्याचाच एक भाग म्हणून आज अहमदनगर येथे ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात भुजबळांनी राज्य सरकारच्या व...
उच्च शिक्षण विभागात १० हजार कोटींचा अनुदान घोटाळा, अनुदान दिले पण निर्धारणच न केल्यामुळे संस्थाचालकांनी गिळल्या रकमा!
महाराष्ट्र, विशेष

उच्च शिक्षण विभागात १० हजार कोटींचा अनुदान घोटाळा, अनुदान दिले पण निर्धारणच न केल्यामुळे संस्थाचालकांनी गिळल्या रकमा!

सुरेश पाटील/ छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): राज्याच्या उच्च शिक्षण विभागात एक दोन नव्हे तर तब्बल १० हजार कोटींहून जास्त रकमेचा अनुदान घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. उच्च शिक्षण विभागाने राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांना दरमहा नियमित अनुदान तर दिले परंतु त्या अनुदानाचा योग्य विनियोग झाला की नाही, याचे दरवर्षी अनुदान निर्धारणच केले नसल्यामुळे महाविद्यालयाच्या बँक खात्यात शिल्लक राहिलेल्या रकमा संस्थाचालकांनी गिळंकृत करून टाकल्या. त्यातून हा कोट्यवधींचा घोटाळा झाला. औरंगाबाद विभागातील अनुदान घोटाळ्याची ही रक्कम एक हजार कोटींच्या घरात जाते, अशी माहिती उच्च शिक्षण खात्यातील सूत्रांनी दिली.  राज्याच्या ३६ जिल्ह्यात एकूण ४ हजार ३४६ अशासकीय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालये आहेत. त्यापैकी २ हजार ५७० कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालये कायम विनाअनुदानित तत्वावर आहेत...
मुख्यमंत्री शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रेचा फैसला कधी? सुप्रीम कोर्टाची विधानसभाध्यक्ष नार्वेकरांना नोटीस, दोन आठवडे मुदत
देश, राजकारण

मुख्यमंत्री शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रेचा फैसला कधी? सुप्रीम कोर्टाची विधानसभाध्यक्ष नार्वेकरांना नोटीस, दोन आठवडे मुदत

नवी दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकर निर्णय येण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.१६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सध्या कोणती प्रक्रिया सुरू आहे? अशी विचारणा करत सर्वोच्च न्यायालयाने आज विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांना नोटीस बजावली असून या नोटिसीवर उत्तर देण्यासाठी त्यांना दोन आठवडे मुदत देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकर निर्णय घेण्याचे आदेश महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांना द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर पहिली सुनावणी आज झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांना दोन आठवड्यात आपली बाजू मांडावी लागणार आहे. सर्व...
महिलांनी कपडे नाही घातले तरी त्या जास्त सुंदर दिसतात… बाबा रामदेव यांचे वादग्रस्त वक्तव्य
देश, महाराष्ट्र

महिलांनी कपडे नाही घातले तरी त्या जास्त सुंदर दिसतात… बाबा रामदेव यांचे वादग्रस्त वक्तव्य

ठाणेः महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि माझ्या नजरेने पाहिले तर, काही नाही घातले तरी त्या चांगल्या दिसतात, असे वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले आहे. ठाण्यातील हायलँड भागात पतजंली योगपीठ आणि मुंबई महिला पतंजली योग समितीच्या वतीने शुक्रवारी योग विज्ञान शिबीर आणि महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महिलांशी संवाद साधताना बाबा रामदेव यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस याही उपस्थित होत्या. महिलांनी साडी नेसली तरी चांगल्या दिसतात. सलवार सूट घातला तरी चांगल्या दिसतात आणि माझ्या नजरेने पाहिले तर काही नाही घातले तरी त्या चांगल्या दिसतात, असे रामदेव म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
ज्येष्ठ पत्रकार रविशकुमार यांचाही एनडीटीव्हीचा राजीनामा
देश

ज्येष्ठ पत्रकार रविशकुमार यांचाही एनडीटीव्हीचा राजीनामा

नवी दिल्लीः  एनडीटीव्हीचे संस्थापक डॉ. प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी राजीनामा दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजे आज बुधवारी एनटीडीव्ही इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संपादक रविश कुमार यांनीही एनडीटीव्हीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे देशातील दर्शकांना एनडीटीव्ही इंडियावरील रात्री ९ वाजताचा त्यांचा प्राईम टाईम दिसणार नाही. हम लोग, रविश की रिपोर्ट, देश की बात असे गाजलेले शोही त्यांनी एनडीटीव्ही इंडियावर केले आहेत. कंपनीने त्यांचा राजीनामा तत्काळ मंजूर केला आहे.  रविश कुमार यांच्या इतका काही पत्रकारांनीच लोकांवर प्रभाव पाडला आहे. हे त्यांच्याबाबतच्या अफाट प्रतिक्रियांमधून प्रतिबिंबित होते. गर्दीतही ते सर्वत्र उठून दिसतात. भारत आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर त्यांना मिळालेले प्रतिष्ठेचे पुरस्कार आणि ओळख हे त्यातून स्पष्ट होते. रविश कुमार हे अनेक दशकांपासून एनडीटीव्हीचा अविभाज्य भाग राहिले आहे...
बोगस एमफिल पदवीच्या आधारे पीएचडीला प्रवेश मिळवल्याप्रकरणी ‘कोहिनूर’च्या सचिव आस्मा खान गजाआड; रमजान ईद पोलिस कोठडीतच!
महाराष्ट्र, विशेष

बोगस एमफिल पदवीच्या आधारे पीएचडीला प्रवेश मिळवल्याप्रकरणी ‘कोहिनूर’च्या सचिव आस्मा खान गजाआड; रमजान ईद पोलिस कोठडीतच!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील विदयापीठाच्या बोगस एम.फिल. पदवीच्या आधारे पेट परीक्षेतून सूट मिळवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची फसवणूक करून पीएच.डी.ला प्रवेश मिळवल्याप्रकरणी कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव आस्मा खान इद्रिस खान हिला बेगमपुरा पोलिसांनी आज बेड्या ठोकल्या. त्यामुळे आस्मा खानची ईद पोलिस कोठडीतच साजरी होणार आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी आणि कोहिनूर शिक्षण संस्थेचा सहसचिव पठाण मकसूद खान हा सध्या फरार आहे. न्यूजटाऊनने या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव आस्मा खान इद्रिस खान आणि सहसचिव पठाण मकसूद खान पठाण अन्वर खान या दोघांनी पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे नाव व लोगो वापरून अनुक्रमे इंग्रजी व हिंदी विषयातील एम.फिल.ची बोगस पदवी तयार केली होती. या बोगस एम.फिल. पदवीच्या आधारे या दोघांनी २०२१ मध्...
भारतीय सैन्य दलात भरती;  ‘या’ तारखेपर्यंत करा ऑनलाईन नोंदणी, वाचा संपूर्ण नियमावली
देश, महाराष्ट्र

भारतीय सैन्य दलात भरती;  ‘या’ तारखेपर्यंत करा ऑनलाईन नोंदणी, वाचा संपूर्ण नियमावली

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): भारतीय सैन्य दलातील भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली असून ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा सैन्य दलाच्या वेबसाइट www.joinindianarmy.nic.in वर उपलब्ध करण्यात आली आहे. ऑनलाइन सामान्य प्रवेश परीक्षा (CEE): सर्व उमेदवारांसाठी नामांकित केंद्रांवर CEE परीक्षा होईल. अग्निवीर लिपिक/SKT श्रेणीसाठी टायपिंग चाचणीदेखील घेतली जाईल. CEE उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती रॅलीदरम्यान शारीरिक चाचणी आणि मापन चाचणी होईल. ॲडाप्टेबिलिटी चाचणीसाठी उमेदवारांनी उमेदवारांनी यापूर्वीच कार्यरत असलेला स्मार्ट फोन, पुरेशी बॅटरी आणि 2GB डेटा सोबत आणणे आवश्यक आहे. या परीक्षेसाठी १० एप्रिलपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. अग्निवीर उमेदवारांसाठी विशेष सुविधा: उमेदवार त्याच्या पात्रतेनुसार कोणत्याही दोन श्रेणींसाठी अर्ज करू शकतो. दोन पर्याय निवडणाऱ्या उमेदवारांना दोन्ही गटांसाठी वेगवे...
राज्यातील महामार्गांवर दर २५ किलोमीटर अंतरावर बांधणार महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह!
महाराष्ट्र

राज्यातील महामार्गांवर दर २५ किलोमीटर अंतरावर बांधणार महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह!

मुंबई: चौथ्या महिला धोरणात महिलांसाठी आरोग्य आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध करण्याबाबत अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. यानुसार महामार्गावर प्रत्येक २५ किलो मीटर अंतरावर सुसज्ज स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. या स्वच्छतागृहांची देखभाल व व्यवस्थापन स्थानिक महिला बचतगटामार्फत करण्यात येईल. याशिवाय महामार्गावर बचतगटांना उत्पादनांची विक्री व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे तटकरे म्हणाल्या. महिला धोरणात महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देताना राज्यातील महामार्गावरील स्वच्छतागृहांची दुरावस्था दूर करण्याबाबतही अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते. यात प्रामुख्याने राज्यातील राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्गासह द्रुतगती महामार्गांवर प्रत्येक २५ किलोमीटर अंतरावर महिलांसाठी स्वच्छतागृह उभ...
शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापर्यंतच जमा होणार ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चा सहावा हप्ता!
महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापर्यंतच जमा होणार ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चा सहावा हप्ता!

मुंबई: राज्यातील ९३.२६ लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचा सुमारे रक्कम २१६९  रुपये कोटी लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात ३१ मार्चपूर्वी जमा करण्यात येत आहे अशी माहिती कृषी मंत्री ऍड.माणिकराव कोकाटे यांनी दिली. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजना फेब्रुवारी २०१९ पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षांखालील अपत्ये) २००० रुपये प्रतिहप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्षी ६००० रूपये त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी राज्यात सन २०२३-२...
रस्त्यावरील खड्ड्यांच्या तक्रारीसाठी आता खड्डे तक्रार निवारण प्रणाली, कशी करायची ऑनलाइन तक्रार? वाचा संपूर्ण प्रक्रिया
महाराष्ट्र

रस्त्यावरील खड्ड्यांच्या तक्रारीसाठी आता खड्डे तक्रार निवारण प्रणाली, कशी करायची ऑनलाइन तक्रार? वाचा संपूर्ण प्रक्रिया

मुंबई: पावसाळ्यानंतर रस्त्यांमध्ये खड्डे पडतात. असे खड्डे जलद दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे तक्रार निवारण प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे नागरिकांना आता खड्डयांबाबतची तक्रार ऑनलाईन करता येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाचे संगणकीकारण करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन माहिती प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यासोबतच खड्ड्यासाठी तक्रार प्रणाली विकसीत केली आहे. कशी करायची ऑनलाइन तक्रार? नागरिक या प्रणालीच्या माध्यमातून तक्रार करू शकतात. प्रथम PCRS अँप गुगल प्ले स्टोअर, केंद्र शासनाच्या m- Seva portal, किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे संकेतस्थळ www.mahapwd.gov.in या संकेतस्थळावरून मोबाईलवर डाउनलोड करावे. नागरिकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या OTP चा वापर करावा आणि ॲप नोंदणी पूर्ण करावी. त्यानंतर तक्रार दाखल करण्यासाठी रजिस्टर फीडबॅक येथे क्ल...
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमीः केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात २ टक्के वाढ!
देश

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमीः केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात २ टक्के वाढ!

नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) दोन टक्के वाढ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी मंजुरी दिली. आठव्या वेतन आयोगाची वाट पहात असतानाच त्याआधीच महागाई भत्त्यात वाढ करण्यात आल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. या दोन टक्के महागाई भत्ता वाढीमुळे आता महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५५ टक्के होईल. यापूर्वी केंद्र सरकारने जुलै २०२४ मध्ये महागाई भत्त्यात वाढ केली होती. त्यावेळी महागाई भत्ता ५० टक्क्यांवरून ५३ टक्के करण्यात आला होता. आज महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ करण्यात आल्यामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आता ५५ टक्के महागाई भत्ता मिळेल. इकॉनॉमिक्स टाइम्सने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यात येतो. कर्मचाऱ्यांचे पगार राहणीमानाच्या वाढत्या खर्चाशी सुसंगत र...
अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा मूलाधार, व्यंगात्मक विनोदामुळे जीवन अधिक अर्थपूर्ण: सुप्रीम कोर्ट; खा. प्रतापगढींविरुद्धचा एफआयआर रद्द
अभिव्यक्ती, देश

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा मूलाधार, व्यंगात्मक विनोदामुळे जीवन अधिक अर्थपूर्ण: सुप्रीम कोर्ट; खा. प्रतापगढींविरुद्धचा एफआयआर रद्द

नवी दिल्लीः अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे निरोगी आणि सुसंस्कृत समाजाचा अविभाज्य भाग आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा मूलाधार आहे. एखाद्या व्यक्तीने व्यक्त केलेले विचार बहुसंख्य व्यक्तींना आवडले नाहीत तरी त्या व्यक्तीच्या विचार मांडण्याच्या स्वातंत्र्याचे रक्षण आणि आदर व्हायलाच हवा. कोणतेही साहित्य मग ते कविता, नाट्य, चित्रपट, व्यंग किंवा कला असो त्यातून मानवाचे जीवन अधिक अर्थपूर्ण होते, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी यांच्या विरोधातील एफआयआर रद्द केला आहे. काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी यांनी सोशल मीडियावर ‘ए खून के प्यासे बात सुनो’ ही कविता शेअर केली होती. या कवितेतून राष्ट्रीय एकात्मतेला आव्हान देण्यात आल्याचे तसेच त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात ३ जानेवारी रोजी गुजरातच्या जामनगरमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला...
महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे ढग; पुढील पाच दिवस मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचे संकट
महाराष्ट्र

महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे ढग; पुढील पाच दिवस मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचे संकट

मुंबईः  एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत चालला असतानाच दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्याच्या काही भागांमध्ये उष्णतेत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पुढील पाच दिवस दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट आणि वादळ वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या दरम्यान ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. आज सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळ वारे आणि हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. उद्या (२९ मार्च) रोजी सिंधुदुर्ग, कोल्ह...
मंत्रालयात आता फक्त ऑनलाईन ॲपद्वारेच मिळणार प्रवेश, नव्या प्रणालीने कसा मिळवायचा प्रवेश? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
महाराष्ट्र

मंत्रालयात आता फक्त ऑनलाईन ॲपद्वारेच मिळणार प्रवेश, नव्या प्रणालीने कसा मिळवायचा प्रवेश? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

मुंबई: मंत्रालय सुरक्षा प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पातंर्गत पहिल्या टप्प्यात चेहरा ओळखआधारित प्रवेश प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली. टप्पा २ अंतर्गत प्रवेशासाठी व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम प्रणाली विकसित करण्यात आली आहे.  त्यामुळे यापुढे मंत्रालयात क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, अभ्यागत यांना कोणत्याही कामाकरिता प्रवेश हवा असल्यास त्यांना ‘डिजीप्रवेश’ या ऑनलाईन ॲप आधारित प्रणालीद्वारे मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे. अभ्यांगतांना मंत्रालयाच्या ज्या विभागात कामानिमित्त प्रवेश आवश्यक आहे. केवळ त्यांना दिलेल्या वेळेत आणि अनुज्ञेय असलेल्या मजल्यावरच प्रवेश करावा लागणार आहे. अनधिकृत मजल्यावर प्रवेश केल्यास अभ्यागतावर कारवाई केली जाणार आहे. अभ्यागतांना संबंधित विभागातील आपले काम पूर्ण झाल्यावर विहीत वेळेत मंत्रालयातून बाहेर पडावे लागणार आहे. ज्येष्ठ नागरीक व दिव्यां...
भारताचा शिक्षणावरील खर्च भूतान, मालदीवसारख्या सार्क देशांपेक्षाही कमी; संसदीय समितीने काढले वाभाडे!
देश

भारताचा शिक्षणावरील खर्च भूतान, मालदीवसारख्या सार्क देशांपेक्षाही कमी; संसदीय समितीने काढले वाभाडे!

नवी दिल्लीः भारताचा शिक्षणावरील खर्च भूतान आणि मालदीवसारख्या अन्य सार्क देशांपेक्षाही कमी आहे. यावर संसदीय समितीने गंभीर चिंता व्यक्त केली असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० च्या शिफारशीनुसार शिक्षणावर जीडीपीच्या ६ टक्क्यांपर्यंत खर्च वाढवण्याचा आग्रह केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडे धरला आहे. शिक्षण, महिला, बाल, युवा आणि क्रीडाविषयक संसदीय स्थायी समितीने ‘उच्च शिक्षण विभागाच्या २०२५-२६ च्या अनुदान मागण्या’वरील अहवालात ही बाबा अधोरेखित केली आहे. एनईपी २०२० मध्ये केंद्र आणि राज्य सरकारांनी सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या (जीडीपी) ६ टक्के खर्च सार्वजनिक शिक्षणावर खर्च करण्याची शिफारस केली आहे. परंतु २०२१-२२ मध्ये केंद्र, राज्य व केंद्रशासित प्रदेशांचा शिक्षणावरील एकूण खर्च जीडीपीच्या केवळ ४.१२ टक्केच राहिला आहे. काँग्रेसचे राज्यसभा सदस्य दिग्विजय सिंह यांच्या अध्यक्षतेखालील या संसदीय सम...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!