विहित नमुन्यात EWS प्रमाणपत्र सादर न केलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा, विशेष बाब म्हणून प्रवेश ग्राह्य धरण्याचा निर्णय


मुंबई: चालू शैक्षणिक वर्षात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) प्रवेश घेतलेल्या प्रवेशित परंतु विहित नमुन्यामध्ये  ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर न केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशास एका वर्षासाठी विशेष बाब म्हणून  ईब्ल्यूएस प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  यामुळे  ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या जवळपास १ हजार ६०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. 

 शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबविण्यात आलेल्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) संवर्गातून प्रवेशित झालेल्या १ हजार ६०० विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील ईडब्ल्यूएस प्रमाणपत्राऐवजी केंद्र सरकारच्या नमुन्यातील ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर केले होते. 

या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेऊन केवळ या शैक्षणिक वर्षाकरिता एकवेळची विशेष बाब विद्यार्थ्यांनी सादर केलेले केंद्र सरकारच्या नमुन्यातील ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र या प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाने याबाबत तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाला दिले आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!