राजकारण

ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले विद्रोही साहित्य संमेलनात म्हणाले होते: इच्छा असूनही मी ‘मोदी इज ऍशहोल’ म्हणू शकत नाही, महिनाभरानंतर गुन्हा दाखल
महाराष्ट्र, राजकारण

ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले विद्रोही साहित्य संमेलनात म्हणाले होते: इच्छा असूनही मी ‘मोदी इज ऍशहोल’ म्हणू शकत नाही, महिनाभरानंतर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): १९ व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाला आहे. टकले यांनी आपल्या भाषणात सामाजिक तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये केल्याच्या फिर्यादीवरून त्यांच्याविरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नूतन कॉलनीतील रहिवासी आप्पासाहेब बाबासाहेब पारधे यांनी निरंजन टकले यांच्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून निरंजन टकले यांच्या विरोधात भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम ३५६ (२) आणि ३५३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील आमखास मैदानावर  २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान १९...
नागपुरातील दंगल सुनियोजित पॅटर्नचा भाग, कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करूः मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत निवेदन
महाराष्ट्र, राजकारण

नागपुरातील दंगल सुनियोजित पॅटर्नचा भाग, कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करूः मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत निवेदन

मुंबई: महाराष्ट्र हे ‘प्रगतिशील राज्य’ असून या ठिकाणी जातीभेदाला थारा नाही. नागपूर शहरात १७ मार्च रोजी राज्याची सामाजिक घडी विस्कटणारी घटना घडली. या घटनेमुळे राज्याच्या शांततेला धक्का बसला. सध्या सर्वधर्मीयांचे सण सुरू आहेत. नागरिकांनी संयम बाळगून शांतता राखत हे सण साजरे करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत नागपूर घटनेवर आधारित निवेदनाद्वारे केले. नागपूर येथील प्रकरणात पोलीस शांतता प्रस्थापित करण्यासाठी गेले होते. त्यांच्यावरही जमावाने हल्ला केला. अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था हातात घेणाऱ्या आणि पोलिसांना मारहाण करणाऱ्या कुणालाही सोडले जाणार नाही. त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी इशाराही दिला. नागपूर शहरात १७ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता महाल परिसरात औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी काही संघटनांन...
औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात हिंसाचार, १० पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी; ८० समाजकंटक पोलिसांच्या ताब्यात
महाराष्ट्र, राजकारण

औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात हिंसाचार, १० पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी; ८० समाजकंटक पोलिसांच्या ताब्यात

नागपूरः विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी केलेल्या आंदोलनानंतर नागपुरातील महाल परिसर आणि हंसापुरी भागात सोमवारी रात्री दोन गटात हिंसाचार उफाळला. घोषणाबाजी करत समाजकंटकांनी महाल परिसर, हंसापुरी आणि चिटणीस पार्क भागात तुफान दगडफेक, तोडफोड आणि रस्त्यावर जाळपोळ केली. सुमारे चार तास झालेल्या या हिंसाचारानंतर पोलिसांनी १० पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू केली आहे. या हिंसाचार प्रकरणी ८० जणांना ताब्यात घेण्यात आले असून शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास मोठ्या संख्येने आलेल्या जमावाने महाल परिसरात तोडफोड आणि जाळपोळ केली. स्थानिक रहिवाश्यांच्या घरांवर दगडफेक केली. काही दुकानांवर तलवारींनी हल्ले केले. महाल परिसरातील झेंडा चौकात सुरू झालेला हा हिंसाचार हंसपुरीपर्यंत पसरला. हंसपुरीत समाजकंटकांनी वाहनांना आग लावली. या हिंसाचा...
विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपचे तीन उमेदवार जाहीर, छत्रपती संभाजीनगरच्या संजय केणेकरांना लॉटरी!
महाराष्ट्र, राजकारण

विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपचे तीन उमेदवार जाहीर, छत्रपती संभाजीनगरच्या संजय केणेकरांना लॉटरी!

मुंबईः विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. उद्या सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजपने जाहीर केलेल्या तीन उमेदवारांमध्ये छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) संजय केणेकर यांचाही समावेश असून संदीप जोशी आणि दादाराव केचे हे अन्य दोन उमेदवार आहेत. विधान परिषदेच्या ५ जागांसाठी येत्या २७ मार्च रोजी निवडणूक होत आहे. विधान परिषदेवरील पाच आमदार विधान सभेवर निवडून गेल्यामुळे  रिक्त झालेल्या ५  जागांसाठी विधान परिषदेची ही पोटनिवडणूक होत आहे. प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र पोटनिवडणूक होणार असल्यामुळे या पाचही जागा महायुतीलाच मिळण्याची शक्यता आहे. एकापेक्षा अधिक जागांसाठी पोटनिवडणूक होत असल्यास नियमानुसार प्रत्येक जागा स्वतंत्र मानली जाते. या पाच जागांपैकी भाजपला तीन तर शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) प्रत्येकी एक जागा...
खुलताबादेतील औरंगजेबाच्या कबरीजवळ बंदोबस्त वाढवला, एसआरपीएफची तुकडी, दोन अधिकारी तैनात; एकबोटेंना ५ एप्रिलपर्यंत जिल्हाबंदी!
महाराष्ट्र, राजकारण

खुलताबादेतील औरंगजेबाच्या कबरीजवळ बंदोबस्त वाढवला, एसआरपीएफची तुकडी, दोन अधिकारी तैनात; एकबोटेंना ५ एप्रिलपर्यंत जिल्हाबंदी!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर उखडून फेकण्याची भाषा अनेक संघटना आणि राजकीय नेत्यांकडून केली जात असतानाच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनांनी औरंगजेबाची कबर न हटवल्यास बाबरी मशिदीची पुनरावृत्ती करण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर औरंगजेबाच्या कबरीजवळ बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली असून एसआरपीएफची एक तुकडी आणि दोन अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. खुलताबादेतील औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्राचे राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ औरंगजेबाची कबर उडखून फेकण्यात यावी, अशी मोहीम शिवजयंतीपासून हाती घेण्याची घोषणा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने केली आहे. औरंगजेबाची कबर हटवा, अन्यथा बाबरी मशिदीची पुनरावृत्ती करू, असा इशाराच या हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे. हिंदुत्ववादी संघटनांच्या इशाऱ्याच्या ...
विधिमंडळ अधिवेशनात विरोधात प्रश्न, लक्षवेधी न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटांकडून पैश्यांची मागणी, भाजप आमदाराचा खळबळजनक आरोप
महाराष्ट्र, राजकारण

विधिमंडळ अधिवेशनात विरोधात प्रश्न, लक्षवेधी न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटांकडून पैश्यांची मागणी, भाजप आमदाराचा खळबळजनक आरोप

मुंबईः सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन सुरू असतानाच विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी पैश्यांचा व्यवहार करण्यात येत असल्याचा खळबळजनक दावा सत्ताधारी भाजपच्या आमदाराने केला आहे. विधानसभेत विरोधात प्रश्न लावू. प्रश्न लावायचा नसेल तर पैसे द्या, असे ब्लॅकमेलिंग नेत्यांच्या एजंटांकडून केले जात आहे, असा आरोप भाजपचे आमदार परिणय फुके यांनी केला आहे. विधानसभेच्या अधिवेशनात प्रश्न लावण्यासाठी, लक्षवेधी लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैश्यांचे व्यवहार होत आहेत, असा दावा आ. फुके यांनी बुधवारी विधान परिषदेत बोलताना केला. फुके यांनी यासंदर्भातील ऑडिओ क्लिपही सादर केली आहे. विधानसभेत प्रश्न का लावयचा नाही, प्रश्न लावल्यावर काय होईल, याबाबतच्या धमक्या या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहेत. आ. फुके यांनी हा ‘एजंट बॉम्ब’ फोडून सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील राई...
धनंजय मुंडेंच्या कार्यालयात खंडणीसाठी तीन बैठका, वाल्मिक कराडकडून सहावेळा फोनवर धमक्या; ‘आवादा’च्या अधिकाऱ्याच्या जबाबात धक्कादायक खुलासे
महाराष्ट्र, राजकारण

धनंजय मुंडेंच्या कार्यालयात खंडणीसाठी तीन बैठका, वाल्मिक कराडकडून सहावेळा फोनवर धमक्या; ‘आवादा’च्या अधिकाऱ्याच्या जबाबात धक्कादायक खुलासे

बीडः मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सध्या तुरुंगाची हवा खात असलेला मास्टरमाइंड ‘आका’ वाल्मिक कराडशी असलेल्या घनिष्ठ संबंधामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला असला तरी त्यांच्या अडचणी काही कमी होण्याचे नाव घेत नाहीत. धनंजय मुंडे यांचे विश्वासू निकटवर्तीय वाल्मिक कराड यांनी सहावेळा खंडणी मागितल्याचा तसेच आवादा कंपनीचा कर्मचारी शिवाजी थोपटे आणि वाल्मिक कराड, विष्णू चाटे यांची धनंजय मुंडेंच्या जगमित्र शूगरच्या कार्यालयात खंडणीसाठी तीनवेळा बैठक झाल्याचा धक्कादायक खुलासा आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनिल शिंदे यांच्या जबाबातून झाला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर सुरूवातीपासूनच विरोधकांनी आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. मुंडेंचा अत्यंत विश्वासू निकटवर्तीय वाल्मिक कराड हाच या ...
‘हलाल विरुद्ध झटका’ वाद चिघळणार?, हिंदूंच्या दुकानातूनच मटन खरेदी करा, मंत्री नितेश राणेंचा फतवा; महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वालाच ‘झटका’!
महाराष्ट्र, राजकारण

‘हलाल विरुद्ध झटका’ वाद चिघळणार?, हिंदूंच्या दुकानातूनच मटन खरेदी करा, मंत्री नितेश राणेंचा फतवा; महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वालाच ‘झटका’!

मुंबईः वादग्रस्त वक्तव्यामुळे कायमच चर्चेत राहणारे राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी हिंदू मल्हार सर्टिफिकेट असलेल्या दुकानातूच मटन खरेदी करा, असा फतवा काढला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ‘हलाल विरुद्ध झटका’ मटनाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे. मंत्री नितेश राणे यांच्या या फतव्यामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वालाच ‘झटका’ बसला आहे. पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून कट्टरता चांगलीच डोके वर काढू लागली आहे. त्या कट्टरतेला सत्ताधाऱ्यांकडूनच हवा दिली जाऊ लागल्यामुळे ही कट्टरता आता लोकांचे ताट आणि पोटापर्यंत पोहोचली आहे, हेच महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी काढलेल्या फतव्यावरून स्पष्ट झाले आहे. मंत्री नितेश राणे यांनी मांसाहार प्रेमी हिंदूंसाठी ‘मल्हार सर्टिफिकेशन’ आणले आहे. हे सर्टिफिकेशन महाराष्ट्र सरकारचे अधिकृत सर्टिफिकेशन आहे काय?, हे मा...
महायुती सरकारची पहिली विकेट, धनंजय मुंडे यांचा अखेर कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा
महाराष्ट्र, राजकारण

महायुती सरकारची पहिली विकेट, धनंजय मुंडे यांचा अखेर कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा

मुंबईः बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले महायुती सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच ही माहिती दिली.संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय वाल्मिक कराडचे नाव समोर आल्यापासूनच विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. या प्रकरणात वाल्मिक कराडला आरोपी करण्यात आल्यानंतर विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सरकारव दबाव वाढवला होता. धनंजय मुंडे यांनी आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही तर विधिमंडळ अधिवेशनात सभागृहाचे कामकाज रोखण्यात येईल, असा इशारा विरोधी पक्षाने दिला होता. त्यामुळे विरोधकांचा वाढता दबाव पाहता मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला.ध...
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती, मस्साजोगच्या ग्रामस्थांची मोठी मागणी मान्य
महाराष्ट्र, राजकारण

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती, मस्साजोगच्या ग्रामस्थांची मोठी मागणी मान्य

बीडः बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात मंगळवारपासून अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश आले असून देशमुख परिवाराने केलेल्या सात मागण्यांपैकी एक मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात मस्साजोगचे ग्रामस्थ सात मागण्या घेऊन मंगळवारपासून अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. त्यातील या प्रकरणाचा खटला लढवण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, ही प्रमुख मागणी आहे. राज्य सरकारने मस्साजोगच्या ग्रामस्थांची ही मागणी मान्य केली आहे. बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून तर ऍड....
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!