महाराष्ट्र

हिमायतनगरः ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवकाला जोड्याने हाणले, पहा व्हिडीओ
महाराष्ट्र, राजकारण

हिमायतनगरः ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवकाला जोड्याने हाणले, पहा व्हिडीओ

हिमायतनगरः  राज्यातील विविध जिल्ह्यांतील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदासह सदस्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू असून या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या एका ग्रामसेवकाला एका होतकरू ग्रामपंचायत सदस्याने भरचौकात जोड्याने मारहाण केली. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे आज ही घटना घडली.  राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने आज सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ऑफलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी  मुदतवाढ दिली होती. त्यासाठी होतकरू उमेदवारांची शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी धडपड सुरू होती. काहीही झाले तरी निवडणूक लढवायचीच असा चंग बांधलेल्या काही इच्छूक उमेदवारांच्या या धडपडीत काही ग्रामसेवक अडचणी निर्माण करत होते. काही जण नियमांवर ब...
महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकांची तयारीः मतदारांची नावे, पत्त्यात दुरूस्तीसाठी तातडीने मोहीम राबवण्याचे निर्देश
महाराष्ट्र

महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकांची तयारीः मतदारांची नावे, पत्त्यात दुरूस्तीसाठी तातडीने मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांतील मतदारांच्या नावांत तसेच इमारत, वस्ती, कॉलनी रहिवास क्षेत्राप्रमाणे पत्त्यामध्ये दुरूस्ती करण्यासाठी तातडीने मोहीम राबवावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान व मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी दिले. विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांवरून प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासंदर्भात मदान यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे  गुरूवारी बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. देशपांडे, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यावेळी उपस्थित होते. भारत निवडणूक आयोगातर्फे सध्या विधानसभा मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्यांतर्गत ८ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण...
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात ३ नोव्हेंबरला सार्वजनिक सुटी जाहीर
महाराष्ट्र, राजकारण

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात ३ नोव्हेंबरला सार्वजनिक सुटी जाहीर

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने १६६ - अंधेरी पूर्व’ विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी येत्या ३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या मतदारसंघात मतदानाच्या दिवशी म्हणजेच ३ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. ही सार्वजनिक सुटी अंधेरी पूर्व’ या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी अंधेरी मतदार संघांच्या बाहेर असतील, त्यांना देखील लागू असल्याचे  जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुटी लागू राहील.  या पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून अंधेरी पूर्व भागातील जागरूक नागरिकांनी या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा...
<strong>शेतीच्या वहीवाटी संदर्भातील वाद मिटवण्यासाठी ‘सलोखा’ योजना, नाममात्र शुल्कात होणार अदलाबदल दस्त नोंदणी</strong>
महाराष्ट्र

शेतीच्या वहीवाटी संदर्भातील वाद मिटवण्यासाठी ‘सलोखा’ योजना, नाममात्र शुल्कात होणार अदलाबदल दस्त नोंदणी

मुंबई: शेतीमधील वहीवाटी संदर्भात गावपातळीवर होणारे वाद संपुष्ठात आणण्यासाठी महसूल विभागामार्फत सलोखा योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत  शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्यात येणार असून, यामुळे समाजामध्ये सलोखा, सौख्य आणि सौहार्द वाढण्यास मदत होणार असल्याचेही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले. योजनेमुळे शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांतील आपआपसांतील वाद मिटविण्यासाठी आणि समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी मदत होणार आहे. किमान १२ वर्षांपासून एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क नाममात्र एक ह...
मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या सर्वेक्षणाची चौकशी: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
महाराष्ट्र

मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या सर्वेक्षणाची चौकशी: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

नागपूर: मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या परिशिष्ट-२ च्या सर्वेक्षणात काही मृत तसेच अपात्र व्यक्तीची नावे समाविष्ट झाल्याचे आढळून आले असल्याने या प्रकरणाची पुढील दोन महिन्यात चौकशी केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. झोपडपट्टी पुनवर्सनात पात्रतेचे १३ निकष ठरवण्यात आले असून यासाठी सादर करण्यात आलेले आधार कार्ड चुकीच्या पद्धतीचे आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून आधार कार्डची नव्याने पडताळणी  करण्यात येत असल्याची माहिती श्री.फडणवीस यांनी दिली. विधानपरिषद सदस्य प्रवीण दरेकर, सचिन अहिर, जयंत पाटील, अनिल परब, सतेज पाटील, सुनील शिंदे यांनी विचालेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस बोलत होते. झोपडपट्टी पुनर्वसन योजना अधिक गतिमान करण्यासाठी शासनाने नवीन धोरण हाती घेतले आहे. यात भोगवटा आणि एक रकमी रक्कम भरण्याबाबत ...
वरिष्ठ संशोधन अधिकारी, अनुवादक व भाषा संचालनालय परीक्षांचे प्रवेश प्रमाणपत्रे एमपीएससीच्या संकेतस्थळावर
महाराष्ट्र

वरिष्ठ संशोधन अधिकारी, अनुवादक व भाषा संचालनालय परीक्षांचे प्रवेश प्रमाणपत्रे एमपीएससीच्या संकेतस्थळावर

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गुरूवार, दिनांक ०१ डिसेंबर रोजी नियोजित वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट-अ  व अनुवादक (मराठी), भाषा संचालनालय, गट-क  या दोन संवर्गाच्या संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षेकरीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोडकरुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य राहणार आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थ...
भूमी अभिलेख विभाग सरळसेवा भरतीः भूकरमापक तथा लिपीकपदाची २८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान परीक्षा
महाराष्ट्र

भूमी अभिलेख विभाग सरळसेवा भरतीः भूकरमापक तथा लिपीकपदाची २८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान परीक्षा

मुंबई:  भूमी अभिलेख विभागातील गट ‘क’ पदसमूह (भूकरमापक तथा लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत. या पदाची परीक्षा २८,२९ आणि ३० नोव्हेंबर २०२२ रोजी होणार आहे. २८ नोव्हेंबर रोजी सत्र एक मध्ये पुणे विभागाची तर सत्र २ मध्ये कोकण विभागाची परीक्षा होईल. २९ नोव्हेंबर रोजी सत्र एक मध्ये औरंगाबाद विभागाची तर सत्र २ मध्ये नाशिक आणि अमरावती विभागाची परीक्षा होणार आहे. ३० नोव्हेंबर रोजी सत्र एक मध्ये नागपूर विभागाची परीक्षा होईल, अशी माहिती जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक एन.के. सुधांशू यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.  परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत माहिती विभागाचे अधिकृत संकेतस्थळ http://mahabhumi.gov.in यावर उपलब्ध होणार आहे. संबंधित उमेदवारांने संकेतस्थळावरील सूचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेवून परीक्षा द्याव...
आपली दिवाळी तुळशीच्या लग्नापर्यंत: शिक्षणमंत्री दीपक केसरकरांकडून ऐनदिवाळीत राज्यातील जनतेला अजब ‘शिक्षण’!
महाराष्ट्र

आपली दिवाळी तुळशीच्या लग्नापर्यंत: शिक्षणमंत्री दीपक केसरकरांकडून ऐनदिवाळीत राज्यातील जनतेला अजब ‘शिक्षण’!

मुंबईः एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने दिवाळीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करून शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ देऊन दिवाळी गोड करण्याची घोषणा केली खरी, परंतु दिवाळीचे दोन दिवस उलटून गेले तरी गोरगरिबांना दिवाळी फराळासाठी आवश्यक असलेला आनंदाचा शिधा अनेक रेशन दुकानांत पोहोचलाच नाही. त्यामुळे नाराजी व्यक्ती केली जात असतानाच राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ‘मराठी लोकांची दिवाळी तुळशीच्या लग्नापर्यंत असते, त्यामुळे उशिरा का होईना पण घरोघरी आनंदाचा शिधा नक्की पोहोचेल’ असे सांगत महाराष्ट्रातील जनतेला ऐनदिवाळीत अजबच ‘शिक्षण’ दिले आहे. दीपक केसरकर यांच्या वक्तव्यानंतर आनंदाचा शिधा तुळशीच्या लग्नापर्यंत मिळणार असेल तर महाराष्ट्रातील नागरिकांनी दिवाळीचा फराळ त्यानंतर करायचा का? असा सवाल अनेकांकडून विचारला जात आहे. (adsbygoogle = window.adsbygoogle || ...
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत उद्धव ठाकरे, शरद पवार हे महाराष्ट्राचे राजकारण कूस बदलण्याचे संकेत; भाजप अस्वस्थ!
देश, महाराष्ट्र, राजकारण, विशेष

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत उद्धव ठाकरे, शरद पवार हे महाराष्ट्राचे राजकारण कूस बदलण्याचे संकेत; भाजप अस्वस्थ!

मुंबईः राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेही सहभागी होणार आहेत. या घडामोडीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. सुमारे तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील सत्तेची समीकरणे बदलण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले होते आणि अडीच वर्षांपर्यंत सत्तेतही राहिले. महाराष्ट्राच्या राजकारणात हा नवीन प्रयोग झाला तेव्हा बहुतांश राजकीय विश्लेषकांनी सत्ता हेच महाविकास आघाडीचे एकमेव उद्दिष्ट असल्याचे सांगत या नवीन प्रयोगाची संभावना केली होती. परंतु आता सत्ता जाऊनही काँग्रेसच्या नेतृत्त्वातील भारत जोडो यात्रेत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षाचे नेते सहभागी होत असल्याने त्याचे राजकीय अन्वयार्थ लावले जाऊ लागले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि श...
विधान परिषदेच्या पाचही मतदारसंघात शिंदे गटाचा उमेदवारच नाही, नाशिकमध्ये ‘राजा का बेटा’विरुद्ध ‘सामान्य मुलगी’त थेट लढत
महाराष्ट्र, राजकारण

विधान परिषदेच्या पाचही मतदारसंघात शिंदे गटाचा उमेदवारच नाही, नाशिकमध्ये ‘राजा का बेटा’विरुद्ध ‘सामान्य मुलगी’त थेट लढत

मुंबईः महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या  पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज घेण्यासाठी आज दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत होती. या दरम्यान अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. मात्र सर्वांचेच लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसमधून बंडखोरी केलेले सत्यजीत तांबे विरुद्ध शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत होईल, असे चित्र स्पष्ट झाले आहे. शुभांगी पाटील या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार असतील, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. त्यामुळे ‘राजा का बेटा’ विरुद्ध ‘सामान्य मुलगी’ अशी रंगतदार लढत होण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे या पाच मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात शिंदे गटाचा उमेदवार उभा नसल्याचेही आज स्पष्ट झाले आहे. विधान परिषदेच्या नागपूर, कोकण आणि औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ आणि नाशिक व अमरावती पदवीधर ...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!