Blog

राजधानी दिल्लीत नाइट लाइफः ३०० पेक्षाजास्त आस्थापना २४ तास सुरू राहणार
जीवनशैली, देश, विशेष

राजधानी दिल्लीत नाइट लाइफः ३०० पेक्षाजास्त आस्थापना २४ तास सुरू राहणार

नवी दिल्लीः मुंबईत नाइट लाइफ सुरू करण्याचे युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांचे स्वप्न राजधानी दिल्लीतही साकार होणार आहे. दिल्लीतील ३०० पेक्षा जास्त आस्थापना २४ तास सुरू ठेवता येणार आहेत. यामध्ये रेस्टॉरंट्सपासून मेडिकलची दुकाने, परिवहन सेवा, बीपीओ आणि ऑनलाइन डिलिव्हरीचा समावेश आहे. या श्रेणीतील दुकानांनी २४ तास सुरू ठेवण्याच्या परवानगीसाठी अर्ज केल्यानंतर त्यांना पुढील आठवड्यापासून परवानगी दिली जाणार आहे.  दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी ३१४ आस्थापनांना २४ तास सुरू ठेवण्याची सूट देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामधील काही प्रस्ताव २०१६ पासून प्रलंबित होते. आता उपराज्यपालांनी दिलेल्या निर्देशांनुसार यासंबंधीची अधिसूचना सात दिवसांच्या आत जारी करावी. या निर्णयानंतर मोठ्या शहरांमध्ये प्रचलित असलेल्या ‘नाइट लाइफ’ संस्कृतीलाही चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे. यामध्...
सरकारचा निर्णय आहे, सरकारनेच ठरवावेः हल्लेखोर एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याच्या निर्णयावर शरद पवार
महाराष्ट्र, राजकारण

सरकारचा निर्णय आहे, सरकारनेच ठरवावेः हल्लेखोर एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याच्या निर्णयावर शरद पवार

नागपूरः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी हल्ला करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळातील बडतर्फ ११८ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रूजू करून घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने घेतला आहे. यावर प्रतिक्रिया विचारली असता सरकारचा निर्णय आहे, सरकारनेच ठरवावे, अशा मोजक्या शब्दांत शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला केला होता. या हल्ल्याचा आरोप असलेल्या ११८ एसटी कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारने घेतला होता. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रूजू करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच शरद पवार यांनी मात्र अगदी मोज...
राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाहीः अजित पवारांचे मोठे वक्तव्य
राजकारण

राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाहीः अजित पवारांचे मोठे वक्तव्य

पिंपरीः राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता नाही, आमदारांना निवडणुकांचा खर्च परवडणारा नाही, असे मोठे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. ते पिंपरीत पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता नाही. दोन वर्षे कोरोनामुळे गेली. आता कुठे सुरळीतपणे काम सुरू झाले आहे. निवडणुकांमध्ये किती खर्च करावा लागतो, याची जाणीव आमदारांना आहे. त्यामुळे कोणालाही मध्यावधी निवडणुका परवडणाऱ्या नाहीत. विद्यमान आमदार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करतील, असे वाटते, असे अजित पवार म्हणाले. मुदत संपलेल्या जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका घेतल्या पाहिजेत. मात्र राज्य सरकार जाणीवपूर्वक निवडणुका लांबणीवर टाकत आहे. या निवडणुका घेण्यासाठी वेळ लावण्याचे काहीच कारण नाही. मुंबईतील अंधेरी विधानसभेची...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!