Blog

विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्थात तात्पुरत्या पदभरतीतही आरक्षण धोरणाची पायमल्ली, यूजीसीने मागवला देशातील सर्व कुलगुरूंकडून तपशील
देश, महाराष्ट्र

विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्थात तात्पुरत्या पदभरतीतही आरक्षण धोरणाची पायमल्ली, यूजीसीने मागवला देशातील सर्व कुलगुरूंकडून तपशील

नवी दिल्लीः ४५ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या हंगामी व कंत्राटी तत्वावरील भरतीतही आरक्षण धोरणाची अंमलबजावणी करणे बंधनकारक असताना देशातील उच्च शिक्षण संस्था, विद्यापीठे आणि विद्यापीठांशी संबंधित महाविद्यालयांत तात्पुरत्या स्वरुपातील शिक्षक व शिक्षकेतर पदांच्या भरती करताना या धोरणाचे उल्लंघन झाल्याची गंभीर बाब उघडकीस आली असून विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील सर्व विद्यापीठांकडून याबाबतचा अहवाल मागितला आहे. ४५ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या सर्व प्रकारच्या हंगामी व तात्पुरत्या स्वरुपातील नियुक्त्यांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गांसाठी असलेल्या आरक्षण धोरणाची अंमलबजावणी करणे अनिवार्य असल्याचे परिपत्रक केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने १५ मे २०१८ आणि २१ नोव्हेंबर २०२२ रोजी काढले होते. राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आणि केंद्रीय शिक्षण म...
पोलिसांच्या अर्जित रजांची मर्यादा ३०० वरून ६०० पर्यंत वाढणार, सेवानिवृत्तीच्या वेळी खिशात खुळखुळणार जास्तीचा पैसा!
महाराष्ट्र

पोलिसांच्या अर्जित रजांची मर्यादा ३०० वरून ६०० पर्यंत वाढणार, सेवानिवृत्तीच्या वेळी खिशात खुळखुळणार जास्तीचा पैसा!

मुंबईः सततचा बंदोबस्त, गुन्ह्यांचा तपास, कोर्टकचेऱ्यांचे कामकाज आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे येणारा कामाचा ताण यामुळे महाराष्ट्रातील पोलिसांना अनेकदा इच्छा असूनही रजा घेता येत नाहीत. पोलिसांना सेवानिवृत्तीला अशा शिल्लक राहिलेल्या रजांपैकी फक्त ३०० अर्जित रजांचे रोखीकरण केले जाते. उर्वरित रजा मात्र वाया जातात. परंतु आता पोलिसांच्या अर्जित रजांची संख्या ३०० वरून ६०० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव असून राज्य पोलिस मुख्यालयाकडून सर्व पोलिस आयुक्त आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून माहिती मागवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्र पोलिस दलाची सेवा अत्यावश्यक सेवेत मोडते. त्यामुळे पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना रजांची तशी वाणवाच असते. सततचा बंदोबस्त, गुन्ह्यांचा तपास, कोर्टकचेऱ्याचे कामकाज आणि मंजूर पदाइतके मनुष्यबळ नसल्यामुळे येणारा अतिरिक्त कामाचा ताण यामुळे पोलिसांना इच्छा असूनही रजा घेता येत नाहीत...
दहावीच्या परीक्षेत चक्क उत्तरपत्रिकांचीच चोरी, अंजनगाव सुर्जीत परिरक्षकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा; दोघे गजाआड!
महाराष्ट्र

दहावीच्या परीक्षेत चक्क उत्तरपत्रिकांचीच चोरी, अंजनगाव सुर्जीत परिरक्षकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा; दोघे गजाआड!

अमरावतीः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (एसएससी बोर्ड) इयत्ता दहावीच्या परीक्षेत अंजनगाव सुर्जी येथील एका परीक्षा केंद्रावर इंग्रजी विषयाच्या उत्तरपत्रिकांचीच चोरी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन उत्तरपत्रिका कस्टडीत जमा न करता त्या एका खासगी इसमाकडे लपवून ठेवण्यात आल्याचे भरारी पथकाच्या तपासणीत निष्पन्न झाल्यानंतर उपशिक्षण अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून परिरक्षक, सहपरिक्षकासह पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या आदेशानुसार इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. २७ फेब्रुवारी रोजी अंजनगाव सुर्जी येथील एका परीक्षा केंद्रावर अमरावती जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणअधिकारी (माध्यमिक) रजनी शिरभाते यांच्या नेतृत्वातील भर...
पुढारी हरामखोर निघाले तर मग आपण खपवून कसे घेतले?: २० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लोकनाथ यशवंत यांचा सवाल
अभिव्यक्ती, महाराष्ट्र

पुढारी हरामखोर निघाले तर मग आपण खपवून कसे घेतले?: २० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लोकनाथ यशवंत यांचा सवाल

नांदेड येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च असे दोन दिवस सायन्स कॉलेजच्या सदाशिवराव पाटील क्रीडा संकुल मैदानावर उभारण्यात आलेल्या राजा ढाले साहित्यनगरीत २० वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन होत आहे. आज रात्री पँथर पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर आधारित ‘भयंकराच्या दरवाजात कोण?’ या नृतनाट्याने या संमेलनाची सुरूवात होत आहे. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा संपादित भाग... -लोकनाथ यशवंत, अध्यक्ष, २० वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन, नांदेड. मी एक कवी असून कविता हे माझे सर्वस्व आहे. कविता माझ्या जीवनाचा श्वास आहे. जगातील सर्व माणसांचे चांगले दिवस येवोत, या भावनेने मी नेहमी कविता आविष्कारतो. परिस्थितीनुसारच कविता सुचतात. त्यात माझे स्वतःचे काहीच नाही. सगळे सामाजिक परिस्थितीवर अवलंबून असते. एखादा विषय डोक्यात आला की सतत मनात घोळत असतो. त्य...
‘त्रयस्थ’ पक्षाच्या नावाखाली सार्वजनिक माहिती नाकारता येणार नाही, बोगस पदवी प्रकरणात माहिती आयुक्तांचा विद्यापीठाला दणका; १५ दिवसांत माहिती देण्याचे आदेश
महाराष्ट्र, विशेष

‘त्रयस्थ’ पक्षाच्या नावाखाली सार्वजनिक माहिती नाकारता येणार नाही, बोगस पदवी प्रकरणात माहिती आयुक्तांचा विद्यापीठाला दणका; १५ दिवसांत माहिती देण्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): शासकीय कामकाजातून अस्तित्वात आलेली सार्वजनिक स्वरुपाची माहिती त्रयस्थ पक्षाशी संबंधित वैयक्तिक माहिती असूच शकत नाही. त्यामुळे लोकहिताच्या दृष्टीने व्यापक जनहित साध्य करणारी माहिती अपीलकर्त्यास पंधरा दिवसात उपलब्ध करून द्या, असे आदेश छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त प्रकाश इंदलकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला दिले आहेत. त्यामुळे बोगस पदव्यांच्या आधारे पीएच.डी.ला प्रवेश घेऊन फसवणूक करणाऱ्या भामट्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यास गेल्या नऊ महिन्यांपासून टाळाटाळ करणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाला चांगलीच चपराक बसली आहे. खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालय चालवणाऱ्या कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष डॉ. मझहर खान, सचिव आस्मा खान आणि सहसचिव मकसूद खान यांनी बोगस पदव्यांचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे उच्च शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती. आस्मा खान...
दलालांना पोसणे महागात पडले, सह दुय्यम निबंधक गायब असल्याने खासगी व्यक्तीनेच घेतला सर्वासमक्ष खुर्चीचा ताबा; दस्तही हाताळले!
महाराष्ट्र

दलालांना पोसणे महागात पडले, सह दुय्यम निबंधक गायब असल्याने खासगी व्यक्तीनेच घेतला सर्वासमक्ष खुर्चीचा ताबा; दस्तही हाताळले!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): दस्त नोंदणीचे कामकाज हातळणाऱ्या सह दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांशिवाय पानही हालत नाही, असा सार्वत्रिक अनुभव असतानाच या कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी ज्या दलालांना पोसले तेच आज त्यांच्यावर भारी पडल्याचे चित्र छत्रपती संभाजीनगरातील सह दुय्यम निबंधक कार्यालयात पहायला मिळाले. कार्यरत सह दुय्यम निबंधकाने रजेवर जाताना पदभार सोपवलेल्या समकक्ष अधिकारी वेळेवर कार्यालयात हजर न झाल्यामुळे ताटकळत बसलेल्या नागरिकांनी एका खासगी व्यक्तीची सह दुय्यम निबंधक म्हणून बहुमताने निवड केली. निवडीनंतर हा व्यक्ती सह दुय्यम निबंधकाच्या खुर्चीवर जाऊन बसला आणि त्यांनी दस्तही हाताळल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या सह दुय्यम निबंधक क्रमांक-२ कार्यालयात घडला. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नोंदणी तथा मुद्रांक विभाग नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत ...
‘शेतकरी’ या व्याख्येत महिलांचा समावेश करून समान वेतन, अनुकूल कर्ज व विस्तार सेवा उपलब्ध करून द्या: एआय एग्री परिषदेत तज्ज्ञांची शिफारस
देश, महाराष्ट्र

‘शेतकरी’ या व्याख्येत महिलांचा समावेश करून समान वेतन, अनुकूल कर्ज व विस्तार सेवा उपलब्ध करून द्या: एआय एग्री परिषदेत तज्ज्ञांची शिफारस

मुंबई:  शाश्वत शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभावी ठरत असतानाच या तंत्रज्ञानात लिंग-संवेदनशीलता जपणे अत्यावश्यक आहे. महिलांना कृषी नवोपक्रमात समान भागीदार म्हणून मान्यता दिली पाहिजे.महिलांची डिजिटल साक्षरता वाढवली पाहिजे. ‘शेतकरी’ या व्याख्येत महिलांचा समावेश करून समान वेतन सुनिश्चित करा आणि महिलांसाठी अनुकूल कर्ज व विस्तार सेवा उपलब्ध करून देण्याची शिफारस नामवंत तज्ज्ञांनी केली. एआय-अॅग्री २०२६  परिषदेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी  'समतेसाठी कोडिंग: लिंग-संवेदनशील कृषी-एआय परिसंस्थेसाठी धोरणात्मक उपाय' या विषयावर समांतर सत्र पार पडले. डेटा अंतर्दृष्टीच्या प्रमुख सुरभी भाटिया यांनी या सत्राचे समन्वयन केले. सत्राचे सार मांडताना सुरभी भाटिया यांनी बारामतीच्या निंबुत येथील संगीता जाधव या महिला शेतकऱ्याची गोष्ट सांगितली. संगीता जाधव ऊसाच्या शेताव...
५५ कोटी रुपये खर्चून होणार महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्याचे सुशोभीकरण, २० मार्च रोजी सत्याग्रहाचा ९९ वा वर्धापनदिन
महाराष्ट्र

५५ कोटी रुपये खर्चून होणार महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्याचे सुशोभीकरण, २० मार्च रोजी सत्याग्रहाचा ९९ वा वर्धापनदिन

मुंबई: महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या ९९ व्या वर्धापन दिनानिमित्त २० मार्च रोजी राज्य सरकारकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून याच दिवशी चवदार तळ्याच्या सुशोभीकरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ५५ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.  वर्धापनदिन सोहळा व भूमिपूजन कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले. ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या ९९ व्या वर्धापनदिनानिमित्त सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात नुकतेच बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थाचे (बार्टी) महास...
आता प्रत्येक शाळेत लागणार विद्यार्थ्यांसाठीच्या प्रमुख पाच ते सहा योजनांची माहिती देणारे फलक!
महाराष्ट्र

आता प्रत्येक शाळेत लागणार विद्यार्थ्यांसाठीच्या प्रमुख पाच ते सहा योजनांची माहिती देणारे फलक!

मुंबई: विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना असून त्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. यासाठी सर्व शाळांमध्ये प्रमुख पाच ते सहा योजनांची ठळक माहिती देणारे फलक प्रदर्शित केले जावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. शालेय शिक्षण विभागाच्या विविध योजनांबाबत आढावा बैठक मंत्रालयात झाली. यावेळी मंत्री दादाजी भुसे बोलत होते. बैठकीला शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंग देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे, शिक्षण संचालक (एनसीईआरटी) हेमंत वसेकर, शिक्षण संचालक (माध्यमिक) महेश पालकर, शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी, उपसचिव तुषार महाजन व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांची माहिती बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना व पालका...
‘कोल्हापूरचे पैलवान आणून त्याची चरबी वितळवतो’, कुलगुरू डॉ. विजय फुलारींची अधिसभा सदस्यास धमकी; भयग्रस्त सदस्याने मागितले सशस्त्र पोलिस संरक्षण!
महाराष्ट्र, विशेष

‘कोल्हापूरचे पैलवान आणून त्याची चरबी वितळवतो’, कुलगुरू डॉ. विजय फुलारींची अधिसभा सदस्यास धमकी; भयग्रस्त सदस्याने मागितले सशस्त्र पोलिस संरक्षण!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून या-ना त्या कारणाने वाद ओढवून घेणारे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी आता नवीन वाद ओढवून घेतला आहे. त्यांनी एका अधिसभा सदस्याचे थेट नाव घेऊन ‘कोल्हापूरचे पैलवान आणून त्याची चरबी वितळवतो’ अशी धमकी दिल्याची तक्रार छत्रपती संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली असून कुलगुरूंपासून जिवितास धोका असल्याचे सांगत पोलिस संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे २१ फेब्रुवारी रोजी होणारी अधिसभेची बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील कळंब येथील महर्षी ज्ञानदेव मोरेकर महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. संजय कांबळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य आहेत. प्राध्यापक संवर्गातून अधिसभेवर निवडून गेलेल्या डॉ. कांबळे यांनी १६ फेब्रुवारी रोजी छ...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!