‘डॉ. बामु’ अधिसभा निवडणूक:  पदवीधरच्या दहापैकी नऊ जागांवर उत्कर्ष पॅनलचे उमेदवार विजयी, विद्यापीठ विकास मंच पराभूत

औरंगाबाद:  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर गटातील अधिसभा निवडणुकीची मतमोजणी सलग ४५ तासानंतर बुधवारी सकाळी संपली. या निवडणुकीत महाविकास आघाडी प्रणीत विद्यापीठ उत्कर्ष पॅनलने दहापैकी नऊ जागा जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजप प्रणीत विद्यापीठ विकास मंचला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.

पदवीधर गटातील सर्व दहाही जागांचे निकाल बुधवारी सकाळपर्यंत टप्प्याटप्प्याने जाहीर झाले. विजयी उमेदवारांना कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते विजयी झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर गटातील अधिसभेच्या १० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ५०.७५ टक्के मतदान झाले होते. एकूण ३६ हजार २५४ मतदारांपैकी १८ हजार ४०० पदवीधरांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत  विद्यापीठ उत्कर्ष पॅनलचे सुनील यादवराव मगरे, सुनील पुंडलिकराव निकम, राऊत सुभाष किशनराव,  पूनम कैलास पाटील व दत्तात्रय सुंदरराव भांगे हे राखीव गटातून निवडून आले. खुल्या गटातील मतमोजणी बुधवारी सकाळी ७ वाजता संपली.

खुल्या गटासाठी झालेल्या १८ हजार ४०० मतातून १६ हजार ४७२ मते वैध तर १९६८ मते अवैध ठरली. पहिल्या पसंतीच्या फेरीत एकही उमेदवार २ हजार ७४६ हा विजयासाठीचा आवश्यक कोटा पूर्ण करु शकले नाहीत. विद्यापीठ उत्कर्ष पॅनलचे डॉ.नरेंद्र काळे हे बाराव्या फेरीत तर जहूर शेख खालेद हे १८ व्या फेरीत कोटा पूर्ण करुन विजयी झाले. भारत खैरनार २६७६, व हरिदास सोमवंशी हे १७२७ आणि भाजप प्रणीत विद्यापीठ विकास मंचच्या होके पाटील योगिता २१७३  मते घेऊन विजयी ठरले. हे तीनही उमेदवार कोटा पूर्ण करु शकले नाहीत. तथापि मतमोजणीच्या २४ व्या फेरीनंतर या पहिल्या उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले.

खुल्या गटातील उर्वरित उमेदवारांना पडलेली पहिल्या फेरीतील तसेच कंसात बाद फेरीतील मते पुढीलप्रमाणे :- संभाजी भोसले- ९५७ (१४४८), रमेश भूतेकर- ८९० (१२१६), लक्ष्मण नवले- ७१९ (८५०), विजय पवार- ७२१ (८४०), अशिष नावंदर- ४६५ (६१४), तुकाराम सराफ- ४४८ (५२४), प्रकाश इंगळे- ४०१ (५२७) याप्रमाणे मते पडली तर उर्वरित उमेदवारांना पहिल्या फेरीत पुढीलप्रमाणे मते मिळाली.

चंद्रकांत चव्हाण- ३५६, अमर कदम- २३६, पंकज बनसोडे- २८७, सुनील जाधव- २०१, सुनील गावीत- १२६,  भागवत निकम- ११८, पंडित तुपे- १०२, परमेश्वर वाघमारे-९९, हनुमंत गुट्टे- ९४, अमोल शिंगटे- ८५, पकंज बनसोडे- २२७ , सुनील काळे- ३७, सतीश धुपे- ३१, सुचिता इंगळे- २९, नितीन फंदे- २१, अनिल तडवी-१५, विलास सरकटे ९ तर  या प्रमाणे २९ उमेदवारांना मतदान झाले.

सर्वांचेच योगदान: कुलगुरु- पदवीधर अधिसभेच्या मतदार नोंदणीपासून ते निवडणूक प्रक्रिया, मतदान, मतमोजणी ते निकाल या सर्व टप्प्यावर सर्व घटकांचे मोलाचे योगदान व सहकार्य लाभले. विद्यापीठातील कर्मचारी, प्राध्यापक, प्रशासनातील घटक, उमेदवार, पोलीस, माध्यमे यांचे सहकार्य लाभले. त्यामुळे पारदर्शक व निर्विवादपणे तसेच शांततेत मतदान पार पडले. पुढील टप्प्यातही ही प्रक्रिया याप्रमाणेच पार पडू, असे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!